पोस्ट्स

कथा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

संशयाचा व्हायरस

इमेज
  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या नातेवाईकांच्या लग्नात मी सुंदर दिसले पाहिजे अशी रवीचीचं खूप इच्छा होती.तिथं मला न पाहिलेले अनेक नातेवाईक असणार आहेत.त्यात मी कशी उठून दिसले पाहिजे अशी रवीची इच्छा होती.नटायला सजायला कुणाला आवडणार नाही?       मी गुलाबी रंगाची साडी, हलका मेकअप आणि माझ्या आवडीचं मंगळसूत्र घातलं होतं.रवीने मला तयार होताना पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. "रचना, तू आज खूपच सुंदर दिसतेस.मला गर्व आहे की तू माझी बायको आहेस,"तो म्हणाला आणि मिठ्ठी मारली. त्याच्या या अतितायीपणाचा मला राग आला.माझं सारं मेकअप ही खराब होऊ शकला असता आणि साडी चुरगाळली पण असते.एक झालं माझं मन भरून आलं.नव-याच्या असल्या गोड हरकती कुणाला नको असतात?  "रवी, हे काय केलस? मी फक्त तुझीच आहे ना? मग इतका उतावीळपणा का?" मी लटकेच राग चेह-यावर पसरवला.त्याने माझा हात हलकेच दाबला,आणि चक्क गालावर ओठ...  माझं अंग शहारून आलं.मी त्याला लाडात येऊन गुद्दे घातले.तसा तो बाहेर पळाल...

अनोळखी सखी: जिंदगीची हुरहूर

इमेज
ती बस स्टॉपवर भेटली.ती सुंदर होती. मी बराचं वेळ पहात होतो. ती खूप चंचल होती. तिचं चालणं पहाणं मोहक होत. मला ती आकर्षित करून घेऊ शकली होती. माझीच नाही अनेकांच्या नजरा ही तिच्याकडेच रोखलेल्या होत्या.असा एखादा चेहरा असल्या अनोळखी गर्दीत असतोच असं माझं निरीक्षण आहे. हआपल्यावर इतक्या नजरा खिळल्या हे तिच्या लक्षात ही आलं असावं तिच्या प्रत्येक हालचालीत एक लय होती. माझ्या मनात अनेक गाणी रूंजी घालू लागली होती. खरतर मी ती गाणी गुणगुणू ही लागलो होतो.माझं ही वय तसं फार नव्हतं.मी नववीत असेल? आणि ती? मला कुठं माहित होतं? ती माझ्या पेक्षा वयानं थोडी लहान असेल.पाठीवर सोडलेले मोकळे केस.पोपटी रंगाचा कुर्ता.. व्हाईट रंगाची टाऊजर.छानशी गुलाबी रंगाची ओढणी.पाठीवर सॅक बहुतेक तिचं ते दप्तर असावं.मला नक्की आज ही आठवतं.तिनं आपल्या ड्रेसला मॅच होईल असे टिकली लावलेली होती.तिचा रंग गोरा होता. तारुण्याच्या खूणा तिच्या अंगा खांदयावर स्पष्ट झाल्या होत्या. या सा-या रंग संगतीमुळे,ती कमालीची आकर्षक दिसतं होती.हाय..हाय..अंधारात!! मर जाऊ..!!!अश्या विशिष्ट वयात साधारण सर्वच मुली सुंदर दिसतात. तारुण्याची झाक सौंदर्...

ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार

इमेज
 ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार   पुरस्कार राव, हे लयं भारी झालयं बघ.गुरूवर्य  सुधीर रसाळला सरांना तू एकदाचं कसतरी गाठलंस. यार,तू लयचं लेट केलसं. जाऊ दे ते. लेट पण थेट भेटलास. हल्ली तू पण हॅक झाल्यासारखा वागतोस.चांगली  चांगली ग्रेट माणसं तुला भेटतच नाहीत बुवा. उगीच आपलं कुणाच्या भी गळयात पडतो. ग्रेट माणसाला तू शोधलं पाहिजे.तुझं भी इम्प्रेशन डाऊन नाही झालं पाहिजे ना? काय म्हणतोयस ?गर्दीच लय झालीय..!!  तुझं भी खरं म्हणा.तू तरी काय करणार? काही माणसांनी तुलाचं कॅपचर करून टाकलयं! त्यामुळे तुझा भी नाईलाजच असतो म्हणा. तू तरी काय करणार? आता खारमुरे वाटाव्यात तसचं तुला कुणाच्या गळयात बांधतात म्हणल्यावर गर्दी तर होणारचं ना? देतेत म्हणल्यावर घेणारे येणारच ना? रेवडी पहिलवानाला काय कमी असते?ते तर कवा भी लंगोट बांधून उभीच  असत्यात की. क्काय..? हौसे नवसे गवसे सारेचं येणार ना? पण पुरस्कारराव, प्राॅब्लेम काय होतोय. गुरूवर्य रसाळ सारखी ग्रेट माणसं गर्दी कसली घुसतेत? ते तिकडं फिरकत भी नसतेत.त्यांच काय आडलं तुझ्या वाचून? त्यांना तुला गळयात घालून तरी फिरायची थ...

चेहरा वाचन

इमेज
 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी|| किताबे बहूत पिढी है तुने | मेरा चेहरा मी जरा पढो|| बता दे मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है||  हे बाजीगर चित्रपटातील गाणं फार लोक प्रिय झालं होतं.मला तर ते खूपचं आवडलं होतं.चेहरा पण वाचला जाऊ शकतो हे मला तेव्हा कळलं होतं.पुस्तकं वाचायचं  सोडून मी चेहरे वाचत सुटलो होतो. अर्थात चेहरे वाचत बसणं सोपी गोष्टं नसते.फार रिस्की कामं असतं. ते काही दिवस मी करण्याचा प्रयत्न केला होता.चेहरे वाचण्याची काही लिपी वगैरे असते का?  लिपी वगैरे काही माहित नाही पण कला मात्र जरूर आहे. त्या माणसाला न कळता आपण त्याचा चेहरा वाचू शकतो.प्रत्येक जणचं ते वाचत असतो. पोलिस खात्यातील लोक चेहरे वाचण्यात तरबेज झालेली असतात.  ओळखीच्या आणि अनोळखी माणसांचे पण आपण चेहरे वाचत असतो. समोर आला की आपण त्याला स्कॅन करत असतो.मनाच्या मेमरीत ते एकदा. डाऊन लोड केले की पुन्हा पुन्हा त्याला वाचत बसतो.आपल्याला भेटलेली सारीच माणसं लक्षात राहत नाहीत.सारीच माणसं कुठल्याश्या नाजूक नात्यांच्या धाग्यात गुंफली जात नाहीत.ह्रदयातल्या आपुलकीच्या ओलाव्यांन  ओथंबून येतं नाहीत. बोलल्याशिवाय माण...

आशा आणि त्याग

 ||आपुलाच संवाद आपुल्याशी|| या जगातील माणसाच्या दुःखाचं कारण आशा आहे.बुध्दांने शोधलेले मानवी दुःखाचं मूळ.आशेची पाळंमूळं खणून काढण्यासाठी  माणसाची तडफड आपण अनेक धर्म ग्रंथाच्या पानापानावर  पाहतच आलो आहोत.आशेशिवाय जीवन अशक्य आहे.वैराग्य,निरपेक्ष कर्म,अश्या अनेक संकल्पनाला माणसांनी जन्म दिला.त्यांची उकल करण्यातच आयुष्यभर माणूस झिजत राहिला.वैराग्य,निरपेक्ष कर्म यांचा अनुभव कुणी घेतला असेल बरं?कर्मकांडाचे जोखड आपल्या अंगावरती ओढून माणूस आशा नष्ट करण्यासाठी झुंजत राहिला.कुठल्याचं जीवाची पिच्छा आशा सोडत नाही.जीव जीवनलोलूप असतो.मरण कुणालाचं नको असते.ते किती ही अटळ असलं तरी ही. त्याला हजारोवाटा असल्यातरी. जगण्याची  लालसा जीवाला संघर्षाच्या चरक्यात कोंबते.दुःखाची डोंगरची डोंगर अंगावर कोसळत असतानाही माणूस सुखाच्या क्षणासाठी धडपडत राहतो.तुम्ही  असा प्रसंग कधी पाहिला आहे का? नागाच्या जबडयात सापडलेला बेडूक.आपण जबड्यात असून ही समोरचा किटक पकडण्याचा त्याचा प्रयत्न.प्रयत्न केविलवाणा असला तरी जगण्याची लालसा जीवला जुंपून ठेवते. त्या बेडकाच्या जीभेवर वळवळणारी असते ना? ती  आशा...

सकारात्मक उर्जा

 || आपुलाच संवाद आपुल्याशी ||   माणसाच्या पाणी,अन्न,वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा आहेत. गरजांचा प्राधान्यक्रम आपल्याला योग्य ठरविता आला की आयुष्याचं पलॅनिंग जमलच की.  हल्ली गरजांचा प्राधान्य क्रम ठरविताना आपला संभ्रम होतो आहे.आपण नेमकं इथचं  गोंधळून जात आहोत. या मुलभूत गरजा इतकचं सकारात्मक विचारांनाही आपणं प्राधान्य दिले पाहिजे.श्रींमतीत व ऐश्रर्यात लोळत असलेली व शरीराने धष्टपुष्टं असलेली माणसं ही  मनानं खचलेली असतात तर भिकारी,दरिद्री व विकलांग ही उत्तूंग स्वप्न उराशी बाळगून जग जिंकण्यासाठी धडपडत असतात. विचारांची उर्जा बाहेरून लपेटता नाही येत.सकारात्मकतेची कॅप्सूल किंवा टॅब्लेट नसते बाजारात.ती अंतरंगातूनचं उसळावी लागते.मानवी पण हे प्रचंड उर्जेचा स्त्रोत आहे. मन ती उर्जा बाहेर फेकत असते.तिच उर्जा माणसाला आतून पेटवते,तेवत ठेवते.प्रखर करते.चकाकी आणते.   उलट नकरात्मक उर्जा माणसाला  काळवंडून टाकते.काजळून टाकते.ग्रासून टाकते. निस्तेज करते. शेवटी माणसाच्या विझण्याचे कारण ठरते.   सुविचार वाचून माणसं सुविचारी होत नाहीत.शाळकरी जीवनात काय आपण कमी सुविच...

वीरचक्र विजेते माळी साहेब -अमर रहे

इमेज
 वीरचक्र विजेते तालुक्याचे भूषण माळी साहेब आपल्यात नाहीत ही गोष्टचं फार वेदनादायी आहे.संपूर्ण स्वच्छता अभियान मध्ये काम करत असताना त्यांच्या सोबत काम करण्याची संधी भेटली. वय झालं तरी कमालीची धडाडी व सकारात्मक विचारांची उर्जा त्यांच्या अंगी होती.त्यांच्या गावाच्या व  पाटोदा तालुक्याच्या स्वच्छता चळवळीला गती देण्यामागे त्यांचा फार मोठा वाटा आहे.    आजची सकाळ शुभ नाही. माळी साहेब आपल्या नाहीत.ही अतंत्य दुंखद घटना आहे.मृत्यू जरी अटळ असला तरी आपल्या तून आपल्याचं एका माणसाला घेऊन जातो ही बाब  जीवनाची क्षणभंगूरताच अधोरेखीत करते.मानवी जीवनाची ही पराधिनता सांगून जाते.   माळी साहेब शरीराने आपल्यात नसतील पण त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील.तारूण्य ओसरलं तरी घडाघडी आणि जिद्द कशी उरात तेवत ठेवायची ,आपणच आपल्याशी प्रमाणिक कसं राहयच हे  त्यांच्याकडून शिकायच. मी एकदा त्यांना विचारलं होत," वीर चक्र भेटलं यासाठी तुम्ही अतुलनीय शौर्य दाखवलं असेलच ना?" ते हासत हासत म्हणाले," सरजी असं काही नाही.मी माझं काम प्रमाणिकपणे केले.अतुलनीय वगैरे काही नाही.मी लढाईत खेळत नव्हतो.मी लढ...

पोळा

इमेज
 पोळयाचा सण महणजे बैलाचं लगीन. शेतक-याच्या आनंदाला या   पारावर राहत नाही.बैलाची अांघोळ.खांदेमळणी,तेलपाणी,मिरवणूक आणि बैलाचं लगीन,पुरणपोळीचा घास.आपल्या शेतात राबणा-या बैलाला वर्षात प्रथमचं पुरण पोळीचा घास खाऊ घालून नंतर दोन घास खाले जातात.                   हे सारं आता राहिलं नाही.पोळयाचा सण आलं की सारं आठवतं राहतं. पोरांना मातीची बैल आणून पुजील जाते.पोरं जमवून पोळयाच्या आठवणी उगळीत बसायच.पोळयाच्या जश्या चांगल्या आठवणीत तश्याचं या कडू आठवणी पण काळजाचा चावा घेत राहतात. अशीच एक ह्रदय पिळवटून टाकणारी ही  दादा , आज पोळयाचा क्षण . मी आता कॉलेज वरून आलोय . आयीचं लयीचं फोन आलं होतं . पोळयाचं सणाला गावाकडं ये . गावाकडं ये . पोळयाच्या सणाला गावाकडं ये ऊ न काय करू ? बैल जित्राब नाही दाव णीला आता . दावणं सारी सुनी सुनीच आहे . नाहीत . एक ही दादा , खरं सांगू का ? पोळयाला येऊच नाही वाटत मला गावाकडं . पोळा आठवला की तुझ्या आठवणी नुसत्या झोंबत राहत्यात अंग भर आग्या मोहळाच्या माश्या सारख्या . आता तू जाऊन ...