![]() |
संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest |
माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या नातेवाईकांच्या लग्नात मी सुंदर दिसले पाहिजे अशी रवीचीचं खूप इच्छा होती.तिथं मला न पाहिलेले अनेक नातेवाईक असणार आहेत.त्यात मी कशी उठून दिसले पाहिजे अशी रवीची इच्छा होती.नटायला सजायला कुणाला आवडणार नाही?
मी गुलाबी रंगाची साडी, हलका मेकअप आणि माझ्या आवडीचं मंगळसूत्र घातलं होतं.रवीने मला तयार होताना पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. "रचना, तू आज खूपच सुंदर दिसतेस.मला गर्व आहे की तू माझी बायको आहेस,"तो म्हणाला आणि मिठ्ठी मारली.
त्याच्या या अतितायीपणाचा मला राग आला.माझं सारं मेकअप ही खराब होऊ शकला असता आणि साडी चुरगाळली पण असते.एक झालं माझं मन भरून आलं.नव-याच्या असल्या गोड हरकती कुणाला नको असतात?
"रवी, हे काय केलस? मी फक्त तुझीच आहे ना? मग इतका उतावीळपणा का?" मी लटकेच राग चेह-यावर पसरवला.त्याने माझा हात हलकेच दाबला,आणि चक्क गालावर ओठ...
माझं अंग शहारून आलं.मी त्याला लाडात येऊन गुद्दे घातले.तसा तो बाहेर पळाला.एक बरं झालं होतं.घरात कुणी नव्हतं.असा त्याचा कंट्रोल सुटणं हे काय नवीन नव्हतं.
लग्नाच्या ठिकाणी सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या.
"रवी, तुझी बायको खूपच छान दिसते!" एक काकू म्हणाल्या.मी लाजले पण रवीचा चेहरा अभिमानाने फुलून आला होता.
"रचना, तू सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंस," तो हसत म्हणाला व माझा चिमटा काढला.अर्थात इतकी लगट रवीची बरी नव्हती.रोमान्स अश्या सार्वजनिक ठिकाणी? लोक काय म्हणतील?
पण स्वारी लांब जायलाच तयार नव्हती पण त्या संध्याकाळी एक प्रसंग घडला, ज्याने सगळं बदललं. काही क्षणच दुर्दैवी असतात का?
मी मंडपात फिरत होते. नातेवाइकांशी बोलत होते, तेव्हा मला जाणवलं की एक तरुण माझ्या मागे मागे येतोय.तो मला सतत न्याहाळत होता आणि त्याचं असं पाठलाग करणं मला अस्वस्थ करत होतं.
कधी तो माझ्या जवळ येऊन हसत होता तर कधी मला पाहून काहीतरी बोलत होता.
पुरूषी नजरा तर अनेक माझ्यावर खिळलेल्या होत्याचं पण हे बावळट हद्द सोडत होते.कदाचित हे रवी पाहतो तर दोघांचे भांडण होऊ शकतात.
त्याचं कृत्य मी स्पष्टं रवीला सांगणं सोप नव्हतं? गजब झाला असता रवीचा राग कंट्रोल करणं फारचं कठीण.
एकदा तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "तुम्ही खूप सुंदर दिसता.मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय का?" मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.
"मला माफ करा, पण मी तुम्हाला ओळखत नाही," मी थंडपणे म्हणाले आणि तिथून निघाले पण तो थांबला नाही. त्याने पुन्हा माझ्या मागे येऊन विचारलं, "तुमचं नाव काय? तुम्ही मॉडेल आहात का?" मला राग आला, पण मी शांत राहिले आणि रवीजवळ आले.
"कोण तो?" रवीनं रागातचं विचारलं.
"मी नाही ओळखत त्याला." रवी रागातचं होता.त्याचा चेहरा वरमला होता.रवीचं असं अपसेट होणं मला ही सहन होणारं नव्हतं. त्या बावळटच वागणं ही योग्य नव्हतं.मी त्याला लगेच उत्तर द्यायला हवे होते का?
मी हसून पाहिलं.त्याला चिमटा घेऊन पाहिल पण रवीची खळी खुलतं नव्हती.
तो शांत होता, पण त्याच्या शांततेत राग दडला होता.ही वादळापूर्वीची शांतता असावी अशी माझी खात्री झाली होती.
हे सारं मला कळतं होत पण मी काय करं शकत होते?
रात्री जेव्हा आम्ही एकटे होतो तेव्हा तो अचानक ओरडला, "रचना, तो कोण होता?खरं खरं सांग. त्या मुलाला तुझ्याशी असं बोलण्याची हिम्मत कशी झाली?" माझे डोळे पाण्याने भरले.
"रवी, मला खरंच माहित नाही तो कोण होता," मी गोंधळून म्हणाले.
रवीनं माझ्यावर ॲटकच केला होता.
"तो माझ्या मागे येत होता, पण मी त्याला स्पष्ट सांगितलं की मला त्याच्याशी बोलायचं नाही.मी त्याला प्रोत्साहन दिलं नाही."
"मग तो तुझ्या मागे का आला?" रवीने रागात विचारलं.
" खरचं, तो मागे आला पण.मी काहीच चूक केली नाही."मी काकुळती येऊन सांगत होते.त्या पागलचा चेहरा ही मी नीट पाहिला नव्हता. आता हे रवीला मी कसं पटवून देणार होते?
"तुझ्या सौंदर्यामुळे सगळे तुझ्याकडे आकर्षित होतात, आणि तू त्यांना थांबवत नाहीस!"
"रवी, तू असं कसं बोलू शकतो?" मी अश्रूंना आवरत म्हणाले.
"मी तुझ्यासाठी नटले होते,तुझ्यासाठी सुंदर दिसले. त्या मुलाचा माझ्याशी काहीच संबंध नाही."
"रचना, तू,त्याला सिग्नल दिला असशील तो लाईन मारत होता आणि तू....!!" तो रागाने दात खात होता.त्याच्या रागाच्या पा-याने सर्वोच्च बिंदू गाठला होता. मी प्रचंड घाबरले.
"शपथ..!! मला तो कोण खरचं माहित नाही "
"मला असं वाटतं की मी तुला पुरेसा नाही." त्यांनी जोरात पाय आपटले. त्याचा राग तेवढ्यावरच थांबला होता.ते तरी बरं झालं होतं.
"रवी, तू माझ्यासाठी सगळं आहेस.फक्त तुझी मी." मी त्याचा हात हातात घेत म्हणाले पण रवी काहीच बोलला नाही. त्याच्या शांततेने मला अस्वस्थ केलं.
त्या रात्री तो प्रणयात ही रागात होता.असं जाणवतं होतं की तो कुठला तरी सूड घेतोय.
त्या प्रसंगानंतर रवीचा संशय वाढत गेला.मी सोशल मीडियावर आमच्या लग्नाच्या आठवणी शेअर करायचे कारण मला त्या क्षणांना जपायचं होतं.एकदा मी आमच्या लग्नाच्या फोटों शेअर केले.ज्यात मी आणि रवी हसत होतो.
मला वाटलं यामुळे त्याला बरं वाटेल पण त्यावर एका अनोळखी व्यक्तीची कमेंट आली, "रचना, तू खूपच हॉट दिसतेस! रवी खूप लकी आहे!" रवीने ती कमेंट वाचली आणि त्याचा राग पुन्हा उसळला.
"रचना, तू हे सगळं का शेअर करतेस?" तो ओरडला. "त्या मुलासारखे लोक तुझ्या पोस्टवर अशा कमेंट्स करतील आणि मला ते सहन होणार नाही!"
"रवी,मी फक्त आपल्या आठवणी शेअर केल्या, कुणातरी अनोळख्या व्यक्तीसाठी तू माझ्यावर संशय घेतोस?" मी डोळ्यांत पाणी साठवत म्हणाले.
"त्या कमेंट्स माझ्यासाठी काहीच अर्थ ठेवत नाहीत. मी तुझ्यासाठी हे सगळं करते आणि तू ...?" पुढचे शब्द माझे माझ्या हुंदक्यात विरघळले.
"रचना, तुझ्या सौंदर्यामुळे सगळे तुझ्याकडे आकर्षित होतात पण तू सुध्दा काही पथ्यं पाळली पाहिजेत." तो रागात म्हणाल
"रवी, तुझा माझ्यावर विश्वास नाही का?" मी हळूच विचारलं. "मी तुझ्यासाठीच आहे. माझं सौंदर्य, माझं प्रेम, सगळं तुझ्यासाठी आहे.लग्नाच्या आधीपासून तू मला ओळखतोस.आपलं लव्ह मॅरेज आहे ना?तुझ्याच फक्त प्रेमात आहे मी. मीच नाही प्रत्येक स्त्रीकडे त्या नजरेनं पाहणारे अनेक हलकट पुरूष असतात रे.त्यात आमचा स्त्रीयांचा काय दोष?"
तो काहीच बोलला नाही फक्त नजर खाली घेऊन बसला.तो स्वतःला कमी समजत होता.त्याचा आत्मविश्वास कुठं न कुठं कमी होत चालला होता.
माझं हृदय तुटत होतं पण मी शांत राहिले.
संशयाचं भूत एकदा मानगुटीवर बसले की खाली उतरणं एवढं सोप नव्हतं.
मी पण माझ्यात बदल करून घेतले होते.नटणं असेल, मुरडणं असेल.हसणं असेल.बोलणं असेल.सा-याचं बाबतीत मी सावध झाले होते.संशयाच्या पडलेल्या ठिणगीचा मला वणवा होऊ द्यायचा नव्हता.
एक रात्री मी रवीला जवळ घेतलं आणि माझ्या मनातलं सगळं मांडलं. "रवी, तू माझ्यासाठी सगळं काही आहेस," मी अश्रूंना आवरत म्हणाले.
"त्या मुलाचा माझ्याशी काहीच संबंध नाही. मी तुझ्यासाठी नटते, तुझ्यासाठी सुंदर दिसते. माझं सौंदर्य तुझ्यासाठी आहे, आणि मी तुझ्यासाठीच आहे. तुझा राग मला समजतो, पण तुझा संशय मला दुखावतो." मी कधीतरी हे त्याला बोललं पाहिजे होतं.
रवीने माझ्याकडे पाहिलं, आणि त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.
"रचना, मला माहित आहे तू माझ्यासाठी खूप काही करतेस. पण जेव्हा लोक तुझ्याकडे त्या नजरेने पाहतात, तेव्हा मला भीती वाटते. मला वाटतं की मी तुझ्यासाठी पुरेसा नाही."
"रवी, तू माझ्यासाठी सगळं आहेस.तुझा हात हाती असला की माझी सारी सुखं माझ्या पायाशी लोळणं घेत आहेत असं वाटतं मला."
मी त्याचा हात हातात घेत म्हणाले.
त्या रात्री आम्ही एकमेकांना मिठी मारली, आणि मला वाटलं की कदाचित आता सगळं ठीक होईल पण रवीच्या मनातली शंका पूर्णपणे गेली नव्हती.
एकदा मी माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर गेले होते. माझा जुना मित्र, राहुल, तिथे होता.आम्ही सगळे हसत-खिदळत गप्पा मारत होतो,आणि राहुलने आमचा एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याने कॅप्शन लिहिलं, "रचनासोबतच्या जुन्या आठवणी! रचना,तू कायम स्टार आहेस.आज ही.. सदैव...!!" मी हसले कारण राहुल माझा चांगला मित्र होता आणि त्याचं ते कॅप्शन फक्त मैत्रीचं प्रतीक होतं.
पण रवीने तो फोटो पाहिला आणि त्याचा राग पुन्हा उसळला.
"रचना, हा कोण राहुल?" तो ओरडला.
"तू मला का सांगितलं नाहीस की तू त्याच्यासोबत भेटलीस?"
"रवी, तो माझा फक्त मित्र आहे मी एकटी नव्हते.त्याची बायको होती सोबत आणि आम्ही दोघी तिघी मैत्रणी पण." मी समजावण्याचा प्रयत्न केला.
"मी तुला सांगितलं होतं की मी मैत्रिणींसोबत जाणार आहे. त्या फोटोत काहीच गैर नाही!"
"पण त्याने तुझ्यासाठी 'स्टार' असं का लिहिलं?" रवीने रागात विचारलं.
माझे डोळे पाण्याने भरले.
"रवी, तू माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीस?" मी हळूच म्हणाले.
"मी तुझ्यासाठी सगळं करते, तुझ्यासाठी जगते. पण तुझा संशय मला दुखावतो.मी फक्त तुझीचं आहे रे. तुझ्याशिवाय मी कुणाचाच विचार नाही करू शकतं." माझे डोळे रडू न लाल झाले होते.
तो शांत होता.संशयाचे व्हायरस एकदा का मेंदूत शिरले की ते मेंदूवर पूर्ण कब्जा घेत असतील? रवी वेगळयाचं विश्वात गुंतला होता. संशयाचं पण वेगळचं विश्व असेल काय? रवी कायम संशयाच्या नजरेनं माझ्याकडे पहात होता.
एका संध्याकाळ मी रवीसाठी खास सरप्राइझ प्लॅन केलं.मी त्याला आमच्या लग्नाच्या ठिकाणी परत नेलं, आणि तिथे एक छोटी डेट प्लॅन केली. मी त्याला माझ्या मनातलं सगळं सांगितलं. "रवी, तू माझ्यासाठी सगळं काही आहेस," मी अश्रूंना आवरत म्हणाले. "त्या मुलाचा, राहुलचा, किंवा कोणाच्याही माझ्याशी काही संबंध नाही. मी तुझ्यासाठीच नटते.तुझ्यासाठीच सुंदर दिसते आणि मी तुझ्यासाठीच आहे.तुला हे का कळतं नाही?"
रवीने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.तो खचत चालले होता.माझे सगळे प्रयत्न अपुरे पडले.रवीच्या मनातला संशय कमी होत नव्हता. एकदा मी सोशल मीडियावर आमच्या डेटच्या रात्रीचा फोटो शेअर केला आणि त्यावर एका अनोळखी व्यक्तीने कमेंट केली, "रचना, तू खूपच सुंदर दिसतेस!" रवीने ती कमेंट पाहिली.
"तू सा-यांनाच का आवडतेस?" रवीचा हा प्रश्न होता.
"मी कुणाकुणाला आवडते हे मी ठरू शकत नाही पण मला फक्त तू आवडतोस." मी त्याला विश्वास देण्याचा प्रयत्न केला अर्थात त्याला हे पटणारं नव्हतं.
"असली नाटकं बंद कर.तुझं खरं रूप मला कळलं आहे." तो क्रूरपणे मला बोलला.
मला काय वाटेल याचा,त्यानं अजिबात विचार केला नाही.माझं हृदय तुटलं.मी त्याच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांत अश्रू साठवत म्हणाले, "रवी, माझं काय चुकलं? मी तुझ्यासाठी सगळं करते,तुझ्यासाठी नटते, तुझ्यासाठी जगते.तुझा विश्वास माझ्यावर नाही, तर हे नातं कसं टिकेल?" तो काहीच बोलला नाही.त्या रात्री आम्ही एकाच घरात परके झालो.
नातं विश्वासावर आणि संवादावर टिकतं, आणि माझा स्वतःवरचा विश्वास मला कधीच डगमगू देणार नाही. मी माझं आयुष्य माझ्या मर्जीनं जगणार आहे. प्रत्येक नव-याला बायको म्हणजे सुंदर बाहुलीसारखी हवी असते.
ती शोभेची वस्तू का? तिला पण एक मनं असतं. ती जिवंत माणूसचं असते ,ना?
जेव्हा माणूस सौंदर्यावर नाहीतर मनावर प्रेम करेल तेव्हाचं हे नातं टिकतं.जिथे विश्वास आणि संवादाचा पूल मजबूत असतो.
आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी एक खास सरप्राइझ प्लॅन केलं.मी त्याला आमच्या पहिल्या डेटच्या जागी, एका शांत तलावाच्या किनाऱ्यावर नेलं. तिथे मी टेबल सजवलं.रवीच्या आवडीचं जेवण बनवलं होतं.
रवीला अशी सरप्राईज व्हीजीट देणार होते.तो कल्पना करणं ही शक्य नव्हतं.
अचानकच तिथं राहूल आला.त्यानं आम्हाला विश केलं.राहुलला पाहिलयं की रवीचा चेहरा लालबुंद झाला होता.त्याला भयंकर राग आला.तो माझ्याकडे ही रागाने पहात होता. तेवढ्यात कुणीतरी आलं होतं.
"हॅप्पी ॲनव्हसरी रवी अॅन्ड रचना .!!" रवीनं तो नाजूक आवाज ऐकला.हा त्याला शाॅक होता. रेवा हासत हासत आली होती. रेवा रवीची काॅलेज फ्रेंड...!! ती इथं कशी? आपण स्वप्नात तर नाही ना?असा संशय रवीला आला होता.
"रेवा..आणि तू कशी इथं..??"
"तू तर कधी सांगितलं पण नाहीस.बोलवलं वहिनी आले.!!" रेवाचं हासणं रवी नुसता पहात राहिला.
रवीचा गोंध॓ळ उडालेला पाहून मी त्याला सारा प्लॅन सांगितला.
"राहुलच्या मित्राची बायको आहे रेवा.राहुलला मी माझ्या व्यथा सांगितल्या.त्यानं रेवाची माहिती घेतली. रेवानं तुझ्या व तिच्या संबधाविषयी सार सांगत होती मला अनेकदा .तुमच्या निखळ मैत्री विषयी. तुला हुडकून कशी राखी बांधली होती हा पण किस्सा...!!
राहुल तर मला भावापेक्षा कमी नाही.
मग हा प्लॅन ठरला.
रवी नुसतं ऐकत राहिला.
"रेवाची तुझी ओळख झाली होती." हे त्याला अश्चर्य होतं.
" रवी, मला कुठल्या ही परिस्थितीत तुला गमवायचं नव्हतं.मी काही ही करू शकते तुझ्यासाठी" मी त्याला मिठ्ठी मारली.माझं डोळं भरून आलं होतं.
रेवा व राहुल टाळया वाजवत आम्हाला विश करत होते. राहुल आणि माझ्या संबंधांविषयी रेवानं त्याला सारं सांगितलं.
" बायको सुंदर असली की,एवढी रिस्क तर घ्यावीच shabdgandha.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा