पोस्ट्स

पुस्तक परिक्षण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रावण: राजा राक्षसांचा वेगळा दृष्टीकोन देणारी कांदबरी

इमेज
 रावण: राजा राक्षसांचा वेगळा दृष्टीकोन देणारी कांदबरी शरद तांदळे यांची रावण राजा राक्षसांचा (४३२ पृष्ठे, न्यू एरा पब्लिशिंग हाऊस) ही कादंबरी मराठी साहित्यातील एक महत्त्वाची संशोधनात्मक कृती आहे. पारंपरिक रामायणात रावण हा केवळ अहंकारी खलनायक म्हणून दाखवला जातो, पण तांदळे यांनी रावणाच्या दृष्टिकोनातून त्याचे पूर्ण जीवन चित्रित केले आहे. ही कादंबरी रावणाला एक महान नेता, विद्वान, शिवभक्त आणि न्यायप्रिय राजा म्हणून उभी करते, ज्याने दैत्य, दानव, असुर आणि भटक्या जमातींना एकत्र करून सोन्याची लंका निर्माण केली. लेखकाने अनेक पौराणिक संदर्भांचा अभ्यास करून काल्पनिक अतिशयोक्ती टाळली आहे, ज्यामुळे कथा वास्तववादी आणि विचारप्रवर्तक वाटते. Ravan:Raja Rakshncha Novel कादंबरी रावणाच्या बालपणापासून सुरू होते – त्याच्या कौटुंबिक कलह, आई-वडील, आजोबा सुमाली आणि भावंडांशी असलेले नाते. रावण हा ब्राह्मण वंशज असूनही राक्षस संस्कृतीत वाढतो. त्याची महत्त्वाकांक्षा, ज्ञानाची भूक आणि अन्यायाविरुद्ध बंडखोरी यातून तो लंकेचा राजा बनतो. तो देवांना पराभूत करतो, पण त्याचे निर्णय नेहमी न्याय आणि स्वाभिमानावर आधारित अस...

नरकातील स्वर्ग – संजय राऊत यांचे कारागृहातील अनुभवकथन Narkatil Swarg by Snjay Raut

इमेज
  नरकातील स्वर्ग – संजय राऊत यांचे कारागृहातील अनुभवकथन   Narkatil Swarg by Snjay Raut लेखक: संजय राऊत प्रकाशक: New Era Publications प्रकाशन दिनांक: 17 मे 2025 प्रकार: आत्मकथन / मराठी राजकीय साहित्य मिट्ट काळोखाची अखेर नजरेला सवय होतेच. समाजाला आणि माणसांनाही. म्हणून कोणालाही मिट्ट काळोखाची भीती वाटणं काही कमी होत नाही. ज्या काळोखाची पुढे सवय होते, त्या काळोखाला अगोदरच आव्हान देऊन त्यात उडी मारणारी माणसं फार कमी असतात. मुळात ती माणसं तशीच जन्मत असतात की घडत जातात, हाही एक विवाद्य विषय आहे. संजय राऊत हा असाच एक माणूस. २०१४ साली भारतात फॅसिस्ट काळोखाची छाया पसरू लागली. २०१६ च्या मनमानी नोटबंदीने तो काळोख देशभर पसरवला, अधोरेखित केला. त्यानंतर भाजप संघप्रणीत राजवटीचे स्वमर्जीने स्लीपर सेल बनलेल्या अस्सल भारतीय गेस्टापो एजन्सीज, आयटी, ईडी, सीबीआय, एनएसए आणि एनसीबी यांनी सत्तापक्षाच्या राजकीय विरोधातल्या सर्व व्यक्ती, संस्था आणि राजकीय पक्ष यांना लक्ष्य बनवले. देशभर खोट्या आरोपपत्रांद्वारे विरोधातल्या व्यक्ती, शक्ती, उद्योगपती आणि पक्ष यांच्यावर लाखो पानांची आरोपपत्रं लिहिली ग...

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

इमेज
युध्दं पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता. 'युध्द पेटले आहे 'हा बाळासाहेब नागरगोजे यांचा पहिलाच कविता संग्रह.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून अनघा प्रकाशना मार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे.तो नुकताच वाचण्यात आला. पिढयानपिढया वाटेला आलेला संघर्ष व काळजात घर करून राहिलेल्या वेदनांचा परिपाक म्हणजे हा कविता संग्रह आहे. होरपळत गेलेली स्वप्न,व्यवस्थेने खुडून घेतल्या गेलेल्या जगण्याच्या आशा,वाटयाला आलेलं दारिद्रय व उपेक्षित जिणं.मराठवाड्यातील ग्रामीण भागातील वास्तव,त्याचे चटके,उपेक्षितांचे प्रश्न,सामाजिक विषमतेमध्ये भरडत गेलेले माणूसपण.जातीवादाचे उसळलेले डोंभ,दांभिक राजकारणात होरपळत जाणारी पण जगण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करणारी माणसे इ.गोष्टीने कवीचं भावविश्व आकारत गेलेले असावं याचा प्रत्ययं आपल्याला कविता वाचतानी सतत येत राहतो.संपूर्ण शोषण मुक्तसमाज हे भगतसिंगाचं स्वप्न उरी घेऊन कवी धडपडतो आहे.हीचं हया कवीची काव्यप्रेरणा आहे असे आपल्याला अनेक कविता वाचताना जाणवते.                ...