नरकातील स्वर्ग – संजय राऊत यांचे कारागृहातील अनुभवकथन
लेखक: संजय राऊत
प्रकाशक: New Era Publications
प्रकाशन दिनांक: 17 मे 2025
प्रकार: आत्मकथन / मराठी राजकीय साहित्य
मिट्ट काळोखाची अखेर नजरेला सवय होतेच. समाजाला आणि माणसांनाही. म्हणून कोणालाही मिट्ट काळोखाची भीती वाटणं काही कमी होत नाही. ज्या काळोखाची पुढे सवय होते, त्या काळोखाला अगोदरच आव्हान देऊन त्यात उडी मारणारी माणसं फार कमी असतात. मुळात ती माणसं तशीच जन्मत असतात की घडत जातात, हाही एक विवाद्य विषय आहे. संजय राऊत हा असाच एक माणूस. २०१४ साली भारतात फॅसिस्ट काळोखाची छाया पसरू लागली. २०१६ च्या मनमानी नोटबंदीने तो काळोख देशभर पसरवला, अधोरेखित केला. त्यानंतर भाजप संघप्रणीत राजवटीचे स्वमर्जीने स्लीपर सेल बनलेल्या अस्सल भारतीय गेस्टापो एजन्सीज, आयटी, ईडी, सीबीआय, एनएसए आणि एनसीबी यांनी सत्तापक्षाच्या राजकीय विरोधातल्या सर्व व्यक्ती, संस्था आणि राजकीय पक्ष यांना लक्ष्य बनवले. देशभर खोट्या आरोपपत्रांद्वारे विरोधातल्या व्यक्ती, शक्ती, उद्योगपती आणि पक्ष यांच्यावर लाखो पानांची आरोपपत्रं लिहिली गेली. शेकडो निरपराध मानवतावादी पत्रकार, राजकीय नेते, उद्योजक आणि मोदीविरोधक तुरुंगात डांबले गेले. आजही डांबले जात आहेत. त्यामधला एक सर्वात डोळस पत्रकार आणि खासदार म्हणजे संजय राऊत. अनेक आमिषं, अनेक धमक्या आणि गद्दारीचे अनेक मोह टाळून त्याने ईडीच्या तुरुंगात उडी घेतली. आपण निरपराध असताना हा तुरुंगाचा काळोख त्याने स्वीकारला. त्या काळोखात हळूहळू त्याला सभोवतालचा तुरुंग आणि त्या तुरुंगाबाहेरचा तुरुंग बनलेला देश दिसू लागला. त्याचंच हे मर्मभेदक चित्रण – ‘नरकातला स्वर्ग.’ भारताच्या इतिहासातल्या एका भयाण काळ्याकुट्ट कालखंडात आपण जगत असताना एका पत्रकार-लेखक-संपादकाने तुरुंगातून आपल्या भोवतालच्या समाजाला मारलेली ही हाक प्रत्येक वाचकाने वाचलीच पाहिजे. त्यामुळे कदाचित त्यालाही हा काळोख दिसू लागेल… राजू परूळेकर
ED अटकेनंतर लिहिलेलं ‘नरकातील स्वर्ग’ काय सांगतं?
राजकारण, सत्तासंघर्ष आणि तुरुंगवास यांच्या संघर्षातून जन्मलेलं नरकातील स्वर्ग हे संजय राऊत यांचं जेलमधून लिहिलेलं पुस्तक आहे. Arthur Road Jail मधील 100 दिवसांच्या अनुभवातून साकारलेलं हे पुस्तक म्हणजे एक मराठी कारागृह साहित्य आणि राजकीय आत्मकथन यांचं दुर्मीळ मिश्रण आहे संजय राऊत स्वतःचं असं म्हणतात की,हे पुस्तक पूर्णपणे राजकीय आहे.उध्दव ठाकरे यांच सरकार पाडून आपलं सरकार अणायचं हे भाजपाचे लक्ष होते.भाजपाचे 105 आमदार असून ही त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले होते.त्यामुळे आपल्या केंद्रातील सत्तेचा वापर करून महराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपा करतच होते. त्यामुळे इडी व सीबीआय सारख्या संस्थाचा गैरवापर केला गेला.त्यातूनच संजय राऊत यांना खोट्या अरोपात गुंतून अटक करून जेल मध्ये टाकले.त्या शंभर दिवसात आलेल्या वाईट अनुभवाचे हे कथन आहे. आता हे कथन एका सामान्य कैद्यांचे नाही.संजय राऊत हे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते आहेत.महायुतीचे शिल्पकार ही आहेत.त्यामुळे यातील भाषा असल किंवा अशय असेल हा पूर्णपणे राजकीय असणार आहे. ते सामना दैनिकाचे संपादक असले तरी ते कसलेले राजकारणी ही आहेत. त्यामुळे राजकीय हेतूने हे लिखाण केलेले असणार यात नवल नाही.'Narkatil Swarg by Snjay Raut."
पुस्तकाची आत्मीय झलक
संजय राऊत यांना 2022 मध्ये ED अटक झाली आणि त्यानंतर त्यांना मुंबईतील आर्थर रोड जेल मध्ये ठेवलं गेलं.Narkatil Swarg by Snjay Raut त्या काळात त्यांनी अनुभवलेल्या मानसिक ताण, सामाजिक निरख, न्यायाची प्रतीक्षा आणि एकाकीपणाचा थेट लेखाजोखा या पुस्तकात दिला आहे. शिवसेना पक्ष फोडून सरकार बनवण्याचा कट भाजपाची अनेक जेष्ठ नेते करत होते.संजय राऊत यांना आलेले अनुभव त्यांनी कथन केले आहेत. नुसते अनुभवचं नाहीतर त्या अनुषंगाने त्यांनी केलेले चिंतनाचा ही त्यात समावेश आहे संजय राऊत जसे या उध्दव ठाकरे सरकारच्या विरोधात झुंजत होते तशीच त्यांची लढाई स्वतःशी ही होती. प्रचंड ताण आणि आमिष ही त्यांना देण्यात आली होती परंतु ते आपल्या निश्चयाने तुसभर ही हालले नाहीत. हा स्वतःच्याच विरोधात लढला गेलेला लढा या पुसकात येणार हे नक्कीच होते. निष्ठावंत शिवसैनिक कसा असतो याचे उदाहरण त्यांनी कृती मधून घालून दिले.
‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकाची वैशिष्ट्ये:
1. कारागृहातील वास्तवाचं निर्भीड चित्रण:
राऊत तुरुंगातील स्वच्छता, प्रशासन, इतर कैद्यांचे जीवन यावर संवेदनशील आणि डोळस भाष्य करतात. ‘सत्य कठोर असतं, पण आवश्यक असतं’ – हे पुस्तक त्याचं उदाहरण आहे. तुरुगातील जीवन कुणाच्या वाटयाला येऊ नये. तो एक नरकच असतो. सुडाच्या भावनेतून कुणी जर तुम्हाला अडकलेले असेल तर हा नरक अधिक भयानक असणारच.नरक आणि स्वर्ग या दोन संकल्पना असल्या तरी नरकातचं स्वर्गाचे अनुभव मी घेतला आहे हेच संजय राऊत या पुस्तकातून सांगत आहेत.
2. राजकीय वैचारिक मंथन:
हे केवळ अनुभवकथन नसून, यातून भारतीय राजकारणात सत्तेचा गैरवापर, शिवसेनेतील फाटाफूट, लोकशाहीचा उरलेला श्वास यावर प्रगल्भ टीका केली आहे.
3. लेखनशैलीचा प्रभाव:
"Narkatil-Swarg- by- Snjay- Raut"मराठी पत्रकारिता आणि लेखनात सरावलेल्या अनुभवामुळे राऊत यांची शैली ओघवती, मार्मिक आणि विचारप्रवर्तक आहे. मराठी राजकीय आत्मकथन म्हणून हे पुस्तक एक महत्त्वाची भर आहे.
ज्यांना वाचावं हवं:
-
राजकारणात रस असलेल्या वाचकांनी
-
सामाजिक न्याय आणि व्यवस्थेवर विचार करणाऱ्यांनी
-
मराठीतून समकालीन आत्मकथन वाचू इच्छिणाऱ्यांनी
निष्कर्ष:
नरकातील स्वर्ग हे पुस्तक सत्तेच्या सावलीतील वास्तव उलगडतं. तुरुंग म्हणजे केवळ भिंती आणि तटबंदी नव्हे, तर तिथे माणूस आपल्या अंतरंगाशी झगडतो, हे राऊत यांनी प्रभावीपणे दाखवून दिलं आहे. सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक स्तरांवरील अंतर्मुखतेचा दस्तऐवज म्हणून हे पुस्तक नक्की वाचावं असं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा