सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!! सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गरज नसते.सरकार हे आपल्याला घटनेशी प्रामाणिक राहूनच चालवायचे असते.घटनेतील उद्देश्यासाठी सरकारने प्रमाणिक काम करावे अशी अपेक्षा घटनेची आहे.सरकारने काय करावे,काय करू नये याचे नियम आहेत.कायदे आहेत.या देशात घटनेपेक्षा कुणी ही मोठा नसतो.जेव्हा कायद्याचा,पदाचा गैरवापर केला जातो आणि स्वायत्त संस्था जेव्हा सरकारच्या हाताच्या बटीक बनतात तेव्हा देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभा असतो.या स्वायत्त संस्थेच्या खांद्यावर बंदूक ठेऊनच हुकुमशाही आपले पाय हळूहळू पसरत जाते.आपला झेंडा रोवत असते हे सा-या जगाने पाहिले आहे. हुकुमशाहीची सुरूवात घटना आपल्याला हवी तशी लवचिक करूनच होत असते.आपण लोकशाहीचे किती सुंदर गीतं गायली तरी हुकूमशाही आपली मूळं खोलवर रूजवत जात असते.एक कंपूशाही निर्माण होत जाते.दुर्बल,भित्रे,लाचार लोक कंपूशाहीत सामिल होऊन आपली जागा तयार करून घेतात.सोन्याच्या पिंजरा त्यांना महाल वाटु लागतो.त्यांना गुलामीची जाणीव होतेच असं नाही.झाले तरी ते हतबल असतात. ...