पोस्ट्स

आपण सारे मोटेगावकर ..!!!

इमेज
 आपण सारे मोटेगावकर...!!! NEET 2026 Leake पैसा वाईट असतो.हाव फार करू नये.असा सुविचार नेहमी सांगितला जातो.तसे सारेचं सुविचार व्यवहार्य नसतातच. फक्त सांगणे व ऐकणे एवढाच त्यांचा वापर असतो. आपण लोभी म्हातारीची बोधगोष्ट लहानपणा पासूनच ऐकत असतो.सांगत असतो.कुणी वागतं का तसं? कुणीचं नाही.  हल्लीचे स्वंयघोषित संत,मंहत व बुवा भौतिक सुखात पेंगत असतात.ते चिरंतन आनंद,त्याग, मोक्ष व निष्काम कर्मयोग वगैरेवर तोंडाला फेस येईस्तोवर बडबडत असतात.बडबडे किती बडबडले तरी कुणाला घंटा फरक पडत नाही. तेच माया जमा करित बसलेले असतात. संसारात गुरफटत जातात. त्यांच कोण ऐकतयं?  मोटेगावकरांना काय कमी होतं? गड्याचे विचार काय कमी ग्रेट नव्हते? हाव व अहंकाराने त्याच्या सा-या साम्राज्याची माती केली.सावाचे मुखडे घेऊन सारेच फिरतात. एक दिवस येतो बुरखा फाटतो. सत्य तर नागडचं असतं. अंगड टोपडं आपण घालत असतो त्याला.  मोटेगावकर ही केवळ एक व्यक्ती नाही, एक प्रवृत्ती आहे. एक मानसिकता आहे. एक सामाजिक रोग आहे जो आजच्या स्पर्धात्मक, भौतिकवादी युगात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक क्षेत्रात पसरला आहे. लातूरच्या RCC कोचि...

वैदिक आणि वारकरी

इमेज
 वैदिक आणि वारकरी ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर वेदांचा तो अर्थ आम्हासी च ठावा। येरांनी वाहावा भार माथा॥१॥ खादल्याची गोडी देखिल्यासी नाही। भार धन वाही मजुरीचे॥२॥ उत्पत्तिपाळणसंहाराचे निज। जेणे नेले बीज त्याचे हाती॥३॥ तुका म्हणे आले आपण चि फळ। हातोहाती मूळ सापडले॥४॥ हिंदू समाजात गेल्या हजारो वर्षांपासून दोन विचारप्रवाहांचा सतत संघर्ष चाललेला आहे. त्यातील एक विचारसरणी वैदिक आहे तर दुसरी विचारसरणी समतावादी आहे. वैदिक धर्मविचार सतत वर्णाश्रमाचा, यज्ञादी हिंसक कर्मकांडाचा, जातिविषमतेचा आणि वेदप्रामाण्याचा पुरस्कार करत आला आहे. या वैदिक धर्माला विरोध करत जैन - बौद्धादी श्रमणधर्मांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांचा कैवार घेतला. पुढच्या काळात वारकरी संप्रदाय हा प्रचलित वैदिक धर्माविरुद्ध बंड करत उभा राहिला. वारकरी संप्रदायाने सामाजिक समतेची बाजू लावून धरली. मुळात या संप्रदायाची उभारणीच स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र प्रवर्गातून आलेल्या संतांनी केलेली होती. साहजिकच वैदिक वर्णाश्रम धर्म आणि वारकरी संतांचा मूल्यविचार यात मूलभूत फरक आहे. वैदिक वर्णाश्रम धर्मामुळे हिंदू समाज ...

पैश्यावाल्याला अक्कल जास्त असते.त

इमेज
माणसानं गरीब नसावं.अतिशय गरीब तर कुणीच नसावं.वै-यानं पण गरीब नसावं.  श्रीमंत  असावं.फार फार श्रीमंत  असावं.आपण जगात सर्वात श्रीमंत  असावं असं प्रत्येक माणसाला वाटतं असतं.ते एक स्वप्नच असतं.सुप्त असतं पण ते सां-याचं असतं.माणसानं पैशा कमवला पाहिजे कारण कोण म्हणतंय? पृथ्वी सूर्याभोवती फिरते? पृथ्वी तर पैशाभोवती फिरते. पैसा कमवा.प्रचंड  पैसा कमवा.कसा ही कमवा पैशाला महत्व आहे. सर्व माणसं श्रीमंत  होत नाहीत.जगातील दारिद्र्य  ही कुणी दूर करू शकत नाही.तुम्हाला हे मान्य का? श्रीमंत  लोक हे देवाचे लाडके असतात.श्रीमंती हे वरदान असते.श्रीमंत लोक ज्ञानी आणि हुशार असतात.गरिब  लोक हे मंद बुध्दी व मूर्ख असतात.गरीबी ही शाप असते. त्यामुळे तुम्ही श्रीमंत  व्हा.     मुक्ती, मोक्ष, चिरंतन  आनंद वगैरे या गोष्टी ख-या नाहीत. पैसा आला की सर्वत्र आनंदी आनंद असतो. आशा, लोभ हे दुःखाचं मूळ नाही.पैसा नसणं हे खरं तुमच्या दुःखाचं कारण आहे. षडविकारावर मात करणं हे शक्य नसतं.ऐश्वर्य आहेत तर ते भोगलं पाहिजे.दाखवलं पाहिजे.ऐश्वर्य  दाखवण्यात पराकोटीचा आनं...

संजय गायकवाड: लोकशाहीचा 'चांगभलं' की सत्तेचा उन्माद? राजकीय प्रवृत्तीचा सडेतोड वेध

इमेज
  ​ संजय गायकवाड: लोकशाहीचा 'चांगभलं' की सत्तेचा उन्माद? राजकीय प्रवृत्तीचा सडेतोड वेध Sanjay Gaikwad News  ​ प्रस्तावना: महाराष्ट्राचे राजकारण हे नेहमीच सुसंस्कृत आणि वैचारिक मतभेदांचा आदर करणारे राहिले आहे. परंतु, अलीकडच्या काळात ही परंपरा पुसली जात असल्याचे चित्र दिसत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी अलीकडेच केलेले विधान आणि त्यानंतर मागितलेली माफी, हे केवळ एक राजकीय नाट्य नसून ती एका विशिष्ट 'प्रवृत्ती'ची नांदी आहे. ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक तर आहेच, पण ती महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला लागलेली कीड आहे.Sanjay Gaikwad Controvers ​ १. माफी की सत्तेचा अहंकार? ​जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी माफी मागतो, तेव्हा त्यात नम्रता आणि पश्चात्ताप अपेक्षित असतो. मात्र, गायकवाड यांनी मागितलेल्या माफीतही एक प्रकारचा 'माज' आणि 'खाज' स्पष्टपणे जाणवत होती. त्यांच्या शब्दांतून व्यक्त झालेली ती 'गाज' हे सिद्ध करते की, ही माफी मनापासून आलेली नसून केवळ प्रकरण अंगाशी येतेय हे पाहून केलेली एक 'राजकीय सोय' आहे. सत्तेची गुर्मी जेव्हा कायद्याच्या कचाट्यात सापड...

भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि मूर्ख राजकारणी.

इमेज
भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि मूर्ख राजकारणी. कॅप्टन्स फाईल पाहिल्यानंतर तुम्हाला राग आला की हसू आलं?का त्या राजकारण्याची कीव आली? का किळस वाटली?  शेवटी घटना घडल्यानंतर आपल्याला काय वाटतयं हे महत्वाचं आहे ना? मला तर जॅम हसू आलंय.काय पागल लोक असतात हे ? काय थाटमाट असतो राजकरणी लोकांच? काय रूबाब असतात त्यांचे? तुम्ही बघितला ना? भोंदू बाबाच्या मागे कश्या शेपट्या हालवत फिरत आहेत हे लोक?   हे आडाणी आहेत का? हे शिकले नाहीत का? हे उच्चशिक्षित आहेत ना मग यांची अक्कल अशी शेणं  का खाते ?   कुणी माणूस ब्रम्हांडनायक असतो  का? काळी जादू किंवा तंत्रविदया नावाचा काही प्रकार अस्तित्वात असू शकतो का?अंकशास्त्रात पण तो निपुण होता म्हणे..!! तो कृष्णाचा अवतार नि त्याच्याकडे जाणारी प्रत्येक  महिला ही राधा...?? काय भंकसगिरी ही? शाळेत हे सामान्य विज्ञान तर हे शिकले असतील ना? अगदी शाळकरी पोरामध्ये जेवढा वैज्ञानिक  दृष्टिकोन दिसून येतो तेवढा पण यां राजकीय गेंडयांना नसावा का?  थोडी तरी तर्क बुध्दी जागी ठेवा ना? निव्वळ अक्कलच शेण खाल्ल्यासारखं हे कशी वागतात?  त्या...

मृत्यूला जराशी थांबवणारे डाॅ.दिवाकर गुळोजकर

इमेज
मृत्यूला जराशी थांबवणारे डाॅ.दिवाकर गुळोजकर   मरण कुणाला चुकलं नाही.मरणाच्या हजारो वाटा असतात.मृत्यू शेवटी जीवाला गाठतोचं.काही माणसं आसतात एखाद्या जीवाला मृत्यूच्या जबड्यातून सोडवणारे. त्या काळाला पण ठणकावून सांगणारे "जरा थांब रे..!!!"  असतं काही माणसात सामर्थ्य.असेच सामर्थ्य असलेले डाॅक्टर होते दिवाकर गुळोजकर. त्यांच्या निधनाची बातमी ऐकली.अनेक आठवणी उचंबळून आल्या. त्या आठवणी पापण्या ही ओल्या करून गेल्या. 2003 ची घटना आहे.आमच्या आण्णांला म्हणजे वडीलांना त्यांनी मृत्यूच्या दारातून ओढून काढले होते.ठणठणीत बरे ही केले होते.आण्णाला असेच बीड मध्ये एका नामवंत डाॅक्टरच्या हाॅस्पीटल मध्ये आटमीट केलं होतं.ते नामवंत ही होते आणि सिव्हीलमध्ये वैद्यकीय अधिकारी ही होते. आम्ही त्यांच नाव ऐकून त्या हाॅस्पीटल मध्ये गेलेलो.मला भेटलेले ते एक मूर्ख व घंमेडी डाॅक्टर होते.आण्णांच्या तब्येतीत सुधारणा करण्याऐवजी त्यांनी त्यांना बेशुद्ध केले. आण्णा गंभीर झाल्यानंतर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता असा सल्ला ही दिला.भरमसाठ बील ही हातावर ठेवलं . आण्णा बेशुद्ध झाले असले तरी त्यांचा ताप कमी होत नव्ह...

थांबा , युध्द सुरू आहे..!!

इमेज
Eran war and India   जगात युध्द सुरू आहे.त्याचे  परिणाम जगासोबत  आपल्याला भोगावे लागणार कारण आपण याच जगात राहतो. गॅस,पेट्रोल व डिझेलचा तुटवडा होणारच आहे. सरकार नीट सांगत नाही.जनतेला  विश्वास द्यावा लागतो हे हल्लीच्या सरकारांना माहित नाही.गॅस तुटवडा दाखवून काळा बाजार ही सुरू झाला आहे.साठेबाजी वाढवू लागली. छूपेपणे दर ही वाढले आहेत.सरकार धीर ही देत नाही आणि देत माहिती नाही.अज्ञान भयंकर अश्या भयाला जन्म देते. भारतीय  नागरिकांना भयभीत करण्याचे प्रयत्न ही सुरू आहेत. देशातली जनता घाबरली नाही पाहिजे.या युध्दामुळे होणा--या परिणामाची जाणिव लोकाना द्यायला हवी. त्यासाठी जनतेला व प्रशासनाला सजग करणे आवश्यक आहे  अमेरिका आणि इराणला सोशल मिडीयावर सल्ले  देणे नक्कीच  महत्वाचं नाही.अनेक अंतरराष्ट्रीय राजकारणाचे तज्ञ माध्यमावर  ज्ञान पाजळत आहेत.  सरकार तर वादळात सापडलेल्या शहामृग डोळे बंद करून बसले आहे. आपण डोळे बंद केले की,आपल्या अंगावर  वादळ येणार नाही अश्या मूर्ख शहामृगासारखे  केंद्र सरकार वागते आहे. राज्य सरकारे आपल्या नेत्याच्या टिमकी व...