पोस्ट्स

स्वारगेटला शिवशाही बसमध्ये झाला तो बलात्कार की लफडं? का पेड सेक्स...??? संशय कल्लोळात महाराष्ट्र.

इमेज
पहाटेची वेळ आहे.गजबजलेलं पुण्यातील स्वारगेट बस स्टेशन आहे. एक तरूणी येते आहे. स्कार्पने तोंड बांधलेले आहे.तिला फलटणला आपल्या घरी जायचं आहे.गाडी लवकर येत नाही.बस सहसा वेळवर येत नाहीत हे सर्वांचा अनुभव राहिलेला आहे.त्यामुळे ती बेचैन होते.असं वाट पाहून पाहून थकल्यावर झालं की माणूस हैराण होतो.तसं ती ही झाली.बस येणार आहे की गेली असेल? हा प्रश्न माणसाला फार त्रासदायक  असतो.बसच्या वे॓ळा तर विचारूच नका.स्वारगेट स्टेन्शनच तर माझा वैयक्तिक अनुभव फारच वेगळा आहे. असो.         तिला एक तरूण भेटतो.त्याला ती विचारते.,कारण,तिथूनही बसलेले नीटस सांगत नाहीत.कुत्रे जसे भुंकणारे तसे ते येणा-या माणसावर नुसते तुटून पडत असतात. चौकशी कक्षात चौकशी नको रे बाबा..!! "ही गाडी फलटणाला जाते आहे.अस तो सांगतो.हायसं वाटतं.बस स्थानकावर फक्त तुम्हाला हायसे वाटू शकते. या गुड फिलींग  तिथे काय असू शकते?ती गाडी शिरते. बसते. पहाटेचा वेळ आहे.बस रिकामी आहे येतील पॅसेंजर अशी ती वाट पहात बसते. आपल्यासोबत पुढील काही  मिनिटांत काय घडणार  आहे हे तिला माहित नाही. तसं ते कुणालाचं कळत नाही. तिला तरी...

अनोळखी सखी: जिंदगीची हुरहूर

इमेज
ती बस स्टॉपवर भेटली.ती सुंदर होती. मी बराचं वेळ पहात होतो. ती खूप चंचल होती. तिचं चालणं पहाणं मोहक होत. मला ती आकर्षित करून घेऊ शकली होती. माझीच नाही अनेकांच्या नजरा ही तिच्याकडेच रोखलेल्या होत्या.असा एखादा चेहरा असल्या अनोळखी गर्दीत असतोच असं माझं निरीक्षण आहे. हआपल्यावर इतक्या नजरा खिळल्या हे तिच्या लक्षात ही आलं असावं तिच्या प्रत्येक हालचालीत एक लय होती. माझ्या मनात अनेक गाणी रूंजी घालू लागली होती. खरतर मी ती गाणी गुणगुणू ही लागलो होतो.माझं ही वय तसं फार नव्हतं.मी नववीत असेल? आणि ती? मला कुठं माहित होतं? ती माझ्या पेक्षा वयानं थोडी लहान असेल.पाठीवर सोडलेले मोकळे केस.पोपटी रंगाचा कुर्ता.. व्हाईट रंगाची टाऊजर.छानशी गुलाबी रंगाची ओढणी.पाठीवर सॅक बहुतेक तिचं ते दप्तर असावं.मला नक्की आज ही आठवतं.तिनं आपल्या ड्रेसला मॅच होईल असे टिकली लावलेली होती.तिचा रंग गोरा होता. तारुण्याच्या खूणा तिच्या अंगा खांदयावर स्पष्ट झाल्या होत्या. या सा-या रंग संगतीमुळे,ती कमालीची आकर्षक दिसतं होती.हाय..हाय..अंधारात!! मर जाऊ..!!!अश्या विशिष्ट वयात साधारण सर्वच मुली सुंदर दिसतात. तारुण्याची झाक सौंदर्...

गुंतता ह्रदथ हे..!! भाग 5

इमेज
  भाग 5 तृप्ती हो ना?रात्रं झालीय.” त्याचं लक्षं नव्हतं तिच्याकडं.तृप्ती फ्रेश झाली होती.तिनं कपडे ही चेंज केलं. निलेशचं चित्तं कुठं जाग्यावर होतं? रेवाच्या अनेक छबी त्याच्या डोळया समोरून हालत नव्हत्या. खरतर त्याला यातलं काहीचं आठवायचं नव्हतं पण आठवणीची पण उबळ असेल न थोपवता येणारी.आठवणीची मळमळ त्याला सहन होत नव्हती.माणूस  त्या उपसून नाही टाकू शकतं.                                रेवाची अनेक वर्षची रूप त्याच्या डोळयासमोर उभी राहिली. हासरी ,लाजरी,भित्री,रागातली,प्रणयातूर,लटक्यारागतली व संतृप्तं.अश्या अनेक भाव मुद्रा तिच्या  निलेशच्या मनावर उमटतं. काही क्षण त्याला वेडावत नि अदृश्य होतं. रेवा अशी आज नको होती भेटायला. आपल्याला हवं तसचं सारं नाही होऊ शकतं. ती अचानक भेटली. भेटली तर भेटली पण तृप्ती सोबत असताना तरी नको होती भेटायाला.तिला असं काहीच बोलता आलं नाही.तिच्या डोळयात ही पहाता आलं नाही. डोळ तरी कसं वाचणार?  खर तर ती पाहील्यानंतर सुरवातीला प्रचंड भिती वाटली. रेवा येऊन जर काही बोललं तर तृप्त...

मराठी साहित्य संमेलन: ‘आम्ही कसे घडलो’ की ‘आम्ही कसे बिघडलो’?

इमेज
मराठी साहित्य संमेलन हे साहित्य, विचार आणि नव्या दृष्टिकोनांचा मिलाफ असतो. दरवर्षी यात वेगवेगळ्या विषयांवर विचारमंथन होते. यंदाच्या संमेलनात ‘आम्ही कसे घडलो’ या विषयावर चर्चा सुरू असताना, नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे संमेलनाचा रोखच बदलला. ही चर्चा ‘आम्ही कसे बिघडलो’ याकडे वळली आणि साहित्यसंमेलनाला अनपेक्षितपणे राजकीय वळण लागले. साहित्य संमेलनाचा मूळ उद्देश आणि त्याला मिळालेलं वळण साहित्य संमेलन हे नेहमीच विचारवंत, लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींसाठी एक महत्त्वाचा मंच राहिला आहे. साहित्य, समाज आणि संस्कृती यावर प्रगल्भ चर्चा व्हावी, नव्या संकल्पना समोर याव्यात आणि विचारांना चालना मिळावी, हाच संमेलनाचा मूळ हेतू असतो. मात्र, यंदा झालेल्या चर्चेने या संमेलनाचे स्वरूप बदलल्याचे जाणवले. नीलम गोऱ्हे यांनी ‘आम्ही कसे घडलो’ या विषयावर बोलताना शिवसेनेच्या अंतर्गत घडामोडींवर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीवर टीका केली. परिणामी, एका साहित्यिक चर्चेचे राजकीय कुरघोडीत रूपांतर झाले. नीलम गोऱ्हे यांची भूमिका आणि उद्धव ठाकरेंवरील आरोप नीलम गोऱ्हे या अनेक वर्षे शिवसेनेशी ...

फुटलेला पेपर आणि राजू - मराठी कथा

इमेज
  फुटलेला पेपर आणि राजू जालना जिल्ह्यातील एका शाळेत, दहावीचा गणिताचा पेपर फुटला.बातमी वा-यासारखी पसरली आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चमक आली. कोण कुठून पेपर मिळवतोय, याचा शोध सुरू झाला पण राजू मात्र या सगळ्यापासून अलिप्त होता.राजू अभ्यासू मुलगा होता.त्याला लायकीच्या बळावर पास व्हायचं होतं पण त्याच्या समोर मराठीचा फुटलेला पेपर उभा होता.रडका,थोडासा चिंतेत आणि काहीसावैतागलेला.त्याचा अवतार फारच कळा गेलेला होता.रडून रडून डोळे सुजले होते. हा आपल्याकडे का आला आहे हे राजूला कुठं नव्हतं. "राजू, माझं ऐकशील का रे?" पेपर डोळे पुसतं बोलला. "अरे, तू बोलतोस?म्हणजे तू बोलू शकतोस? आणि इतका दुःखी का आहेस?फुटलास तूच आणि रडतोस  पण तुच.कमाल बुवा तुझी..!!" राजू त्याच्याकडे राग राग पहात बोलला.त्याला बातमी आल्यापासूनच फुटलेल्या पेपरचा  राग आला होता. "मी काय स्वतःहून फुटलो का रे? मलाही कुणीतरी फोडलंच असेल ना?कुणी तरी फोडल्या शिवाय काहीच फुटतं नाही रे. साधं लाॅजिक हे.आता माझ्यावर सगळे ओरडतायत.खासदार,आमदार फुटतात, पक्ष ही फुटतात, लोकही फुटतात... मग मीच का दोषी? ...

"छावा (Chaava) मराठी चित्रपट – बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय!"

इमेज
छावा, चित्रपट तुम्ही पाहिलायं का?  याचं उत्तर तुमचं 'नाही' असं असेल तर हे काय हे जिणं तुमचं..!! पहा, ना मग उशीर कसला करताय? तुम्हाला तो पाहायचा तर आहेच ना? मग बघा ना लवकर...!! उशीर का करता..?  हे पहा तो थिएटरला जाऊन पाहयचा आहे.कुठं ही आणि कसा ही पाहयचा नाही. मज्जा नाही येणार? साॅरी..!! छावा चित्रपटाची मज्जा नाही घेऊ शकत कुणीचं.आपलं काळिज कुणी होरपळून काढताना कुणी सिनेमा एन्जॉय करू शकत का? ते शक्य नाही. धडपडणारे जर ह्रदय तुम्हाला असेल तर तुम्ही न रडता तो चित्रपट पाहू नाही शकत. काय म्हणता? इतकं इमोशनल का होताय.साधा चित्रपट तो? फार तर तो छान जुळून आला आहे असं म्हणा.कलाकाराचं कौतुक करा फार तर.  चित्रपट तो.एक कलाकृती म्हणूनच पहा ना? कुणाचं पात्र कसं रंगलय? हे सांगत बसा.आहो,रडताय काय तुम्ही? ही एक कलाकृतीची आहे याचं भान ठेवा.ते सारं सारं खोटं असतं.सारं रंगवलेलं असतं. चित्रपट गृहातचं शिवगर्जना वगैरे .... हे फार अति होत हं...!! खरं तुमचं.ते सारं रंगवलेलं आहे. मला माहिती ही आहे ते सारं खोटं घडतयं.इफेक्ट दिलेले सीनस् आहेत ते सारे. सारं सारंचं खोटं पण आम्हाला खरं का वाटतय...

महाभारत लाईव्ह: तुमची भूमिका काय? धर्म विरुद्ध अधर्माची लढाई!

इमेज
आज आता तुमच्या समोर महाभारत घडत आहे. तुम्ही कुरुक्षेत्रावर  उभे आहात.ते सारं लाईव्ह  पहात आहात. असं समजा. जे घडतयं ते तुमच्या डोळयासमोर घडते आहे? इमॅजिंग करा. कल्पनाचं करायच्या आहेत तर भव्य दिव्य कराव्यात.त्यात कसली कंजूषी करता?त्याला कुठं पैसे लागतात? एवढं महाभारत  घडते आहे तर तुम्ही  कुणाच्या बाजूनं आहातचं. नाही कळलं? इझी ते. कौरवांच्या की पांडवांच्या..? धर्माच्या की अधर्माच्या? काय म्हणता? तुम्हाला धर्म  नि अधर्मचं  ठरवता येईना?  आता कोण  कौरव? कोण पांडव? कोण श्रीकृष्ण? ते ठरवताच येईना. त्याची काय मेथड असती काय? कमाल बुवा..!! त्याची कसली मेथड भिंथडं यार? आपण कोण आहोत हे ठरवा की फर्स्ट...? कोण आहात तुम्ही नक्की? तुम्ही तिथं आहात म्हणजे तुमचा भी काही तरी रोल असेलचं ना?  आपला रोल  ठरवता आलं की महाभारत समजायला सोप जातं? तुम्हाला पुढं सारं सहज ठरवता येऊ शकतं. नायक भी खलनायक ही?  तुमचा मित्र  दुर्योधन ही असू शकतो किंवा सुदाम्याही..!! तुम्ही पांचली भी असू शकता किवा सुभद्रा ही?उत्तरा  किंवा कुंती ही...!! अगदी तुम्ही कुणी ही असू...

नविन वर्षाच्या शुभेच्छा व काळ पुरूष वगैरे

इमेज
 आज  नवीन वर्षाचा पहिला दिवस.काल वर्ष 2024 गेलं.वर्ष 2025 आलं.भिंतीवरलं एक कलेंडर गेलं नि नवीन आलं.काय घडलय? उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून निथळणारा प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परीवर्तन व भ्रमण गतीत काहीचं फरक पडतं नाही.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो. फक्त नव्याचा भास असत़ो.सारं सारं नवं नवं वाटायला लागतं.हातातलं बरचसं निसटून गेल्यासारखं वाटतं.आपल्या आयुष्याची ओंजळ हातात घेऊन आपण उभे असतो. ओंजळ ओली असते पण रितीच असते. मकाही क्षणांच्या अस्तित्वाची ओल सांभाळत.एक एक क्षण क्षण अलगद निखळून पडतात.गेलेले क्षण परतं येत नाहीत.आपल्याला हवे असलेले क्षण आपण पकडून ठेऊ शकत  नाहीत.नको असलेले क्षण रोखू शकत नाहीत. खर तरं या विश्वात आपण काहीचं करू शकत नाही.        या सृष्टी चक्रात तुम्ही भिंतीवरच कलेंडर बदल म्हणून काहीच घडणार नसतं.जे घडतं ते आपल्या मनाच्या अवकाशात.ते भास असतात.काही अभास असतात.नाहीतरी हे जग भास- अभासाच्या हिंदोळयावरच झुलत असते.त्यात आनंदाचे,दु:खाचे क्षण आपण गोळा करत राहतो.काही क्षणांचे ठसे आपण मनावर छापून ठेवलेले असतात.काही क्षण मनावर ओरखडे उमटवून...

अटलजी: एक संवेदनशील कवी

इमेज
  Member of Parliament    # prime minister of India   Lok Sabha . Bajpai . भारतीय राजकारणातील कुशल नेता अटल बिहारी वाजपेयी हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते, तर एक संवेदनशील कवी होते, ज्यांच्या कवितांनी मानवतेचा, देशभक्तीचा आणि जीवनाच्या विविध पैलूंचा उदात्त स्वर व्यक्त केला. त्यांचे साहित्यिक मन त्यांच्या प्रत्येक कृतीत आणि निर्णयांत दिसून येत असे. अटलजींच्या कवितांनी केवळ राजकीय विचारसरणी व्यक्त केली नाही, तर त्या समाजाच्या गाभ्याला भिडल्या, विशेषतः भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनाशी. अटलजींच्या कवितांमध्ये जीवनाचे तत्वज्ञान, संघर्ष, आणि प्रेरणा यांचा मिलाफ दिसतो. त्यांची कविता "हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा" ही केवळ त्यांच्या जिद्दीची अभिव्यक्ती नव्हे, तर देशवासीयांना दिलेला आत्मविश्वासाचा संदेश आहे.           त्यांच्या कवितांमध्ये मानवी भावना, सामाजिक स्थिती, आणि देशाच्या समस्यांवर एक हळवा दृष्टिकोन दिसतो. त्यांनी शब्दांमध्ये संघर्ष व्यक्त केला, पण कधीही निराशा झळकू दिली नाही. त्यांच्या प्रत्येक ओळीत सकारात्मकता आणि आशेचा संवाद असे...

तुमचा गाल आमची थप्पडं

इमेज
 तुमचा गाल आमची थप्पडं मी काॅलेजला असताना एक एकांकीका पहिली होती.पूर्वी एकांकिकाचे टायटल फार भन्नाट असतं.सोशल मिडीया नव्हती तेव्हा नाहीतर एका एका टायटेलनं तुफान राडा केला असता  सोशल मिडीयावर....!!  'तुमचा गालं..!!, आमची थप्पड..!!" अशी भन्नाट  टायटल असलेली सामाजिक  व राजकारणावर भाष्य करू शकेल अशी  एकांकिका एका स्पर्धेत  पाहण्यात आली होती. एका सामान्य नागरिकाची कशी ससेहोलपट केली जाते या व्यवस्थेमध्ये याची काही प्रसंग मोठ्या कौशल्याने त्या एकांकिकेत गुंफले होते. आम आदमीची प्रत्येक वेळेला कशी  प्रत्येक टप्प्यावर हारेशमेन्ट केली जाते हे दाखवण्याचा अफलातून  प्रयत्न त्यात केला होता. या व्यवस्थेचे आणि तुमचं नात काय ?, तुमचा गाल आणि आमची थप्पड..!! तुम्ही फक्त  मुकाटयाने गाल पुढे करा....आम्ही एक थप्पड  लावतो. थप्पड लगावण्यात एक प्रकारचा परमानंद असतो.हा आंनद दुस-याला देताना तुम्ही तक्रार करू नका.हसू नका पण सोसा.रडू नका फक्त कण्हा. तुमच्या गालात जर कुणी जोरात थप्पडं मारली तर तुम्ही काय कराल? आपल्या चिंतनशीलतेला भरपूर वाव देणारा हा प्रश्न आहे. ए...