पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सागरी किनारा ,ती आणि मी

इमेज
 सागरी किनारा ती आणि मी.                              तुम्ही समुद्र कधी पाहिला? नक्की आठवत नाही ना? मी प्रत्यक्ष समुद्र पार उशीरा पाहिला आहे. मात्र समुद्राविषयीचं माझं आकर्षण  फार लहानपणी तयार झालं होतं. मी एक चित्रपट पाहिला होता. तो पण व्हिसीसी आर वर.लहानपणी आमच्या गावात लग्न झालं की वरात साजरी केली जाई. ती वरात म्हणजे अख्ख्या गावांसाठी पद्धतीचं असायची. वरातीत गावक-यांच मनोरंजन करता यावे म्हणून चित्रपट दाखवत असतं. एका वरातीत मी हा चित्रपट पाहीला होता.मुंबईचा फौजदार.त्यातलं हे एक गाणं मनात खोलं रूतून बसलं होतं.त्या गाण्या सोबतचं समुद्र ही मनात घर करून बसलेला.           'हा सागरी किनारा.... ओला सुगंध वारा. ' अथांग सागर, उसळणाऱ्या लाटा आणि तरूण जोडप्याचं ते प्रणय धुंद गाणं... मनात नुसतं रेंगाळत राहिले अनेक दिवस. माझं वय ही तसचं होतं.बालपण सरून तारूण्याच्या उंबरठ्यावर आलेलं.तारूण्याचा बहर तनामनावर मोहरून आलेला.ते शब्द,ते स्वर, संगीत आणि अभिनय मनात सारचं नुसतं रूंजी घालतं होते.ते गा...

समुद्र न पाहिलेला माणुस

इमेज
अण्णांनी समुद्र पाहिला नाही. असचं ते एकदा बोलता बोलता म्हणाले परशु, मी अजून समुद्र पाहिला नाही. "कसं काय?" "आमचा कशाला योग आलाय? रावणाच्या लंकेत जाण्यासाठी  वानर सेनेने  शीळा पाण्यवर तरंग ठेऊन सेतू बांधला होता.समुद्र दरी खोल असते जणू." "७१ टक्के या पृथ्वीचा भाग समुद्रानं व्यापलेला आहे." मी त्यांना माहिती दिली.काय बोललो आहे. हे त्यांना कळणं शक्य नव्हतं.आण्णा निरक्षर होते. "म्हजीं" " बारा आणे पाणी आहे.चाराणे जमीन..." "एवढं मोठं पाणी?" पृथ्वीचं आकार त्यांना काय माहित? पृथ्वी शेषांच्या फण्यावर आहे हे त्यांना माहित होतं.पोथी पुराणातून ते ऐकतं होते.पोथी पुराणात खोटं असू शकत नाही असा त्यांचा दृढ विश्वास.एक ही दिवस शाळेत न जाणाऱ्या  अण्णांचा हा शब्द साठा रामायण,शिशिवलिलमृ व महाभारत अश्या ग्रंथातून आलेला होता "समुद्र पाहिला नाही बघ मी.तुम्ही आत्ताची पोरं किती पाहिला असेल.अशी फोटो पण काढलेत. "त्यांना ते अप्रुप वाटलं होतं. "आपण या वर्षी उन्हाळ्यात जाऊ.मला सुट्टी लागली की." हे आश्वासन देऊन मी मोकळा झालो.ते फक्त हासले. ...

पाऊस आणि आठवणीचं मेतकूटं

इमेज
 रिमझिम गिरे सावन....... पाऊस आणि आठवणींच मेतकूटं पाऊस आणि आठवणींच असं काही मेतकूट आहे की आपण आठवणी आवरू शकत नाहीत.आठवणीं नक्कीच पाऊसाच्या प्रेमात असणारं.तिच्या सोबत भिजण्याचा योग आला असेल तर आठवणी ला वेगळाचं ऱग येतो.पाऊसाचे अंगाला चुंबना रे थेंब आणि अंगावर थरथरता शहारे... आपल्याला या जगातील अत्युच्च आनंदाची अनुभूती देतात.     पाऊस स़ोबत भिजला नसाल तरी कल्पनेचे पंख असतात की त्या रम्य जगात जाण्यासाठी.हे गाणं असचं कुठं तरी नक्की घेऊन जाईल आपल्याला.