बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

अटलजी: एक संवेदनशील कवी

 

Member of Parliament  #prime minister of India

 Lok Sabha.Bajpai.


भारतीय राजकारणातील कुशल नेता अटल बिहारी वाजपेयी हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते, तर एक संवेदनशील कवी होते, ज्यांच्या कवितांनी मानवतेचा, देशभक्तीचा आणि जीवनाच्या विविध पैलूंचा उदात्त स्वर व्यक्त केला. त्यांचे साहित्यिक मन त्यांच्या प्रत्येक कृतीत आणि निर्णयांत दिसून येत असे. अटलजींच्या कवितांनी केवळ राजकीय विचारसरणी व्यक्त केली नाही, तर त्या समाजाच्या गाभ्याला भिडल्या, विशेषतः भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनाशी.

अटलजींच्या कवितांमध्ये जीवनाचे तत्वज्ञान, संघर्ष, आणि प्रेरणा यांचा मिलाफ दिसतो. त्यांची कविता "हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा" ही केवळ त्यांच्या जिद्दीची अभिव्यक्ती नव्हे, तर देशवासीयांना दिलेला आत्मविश्वासाचा संदेश आहे.

          त्यांच्या कवितांमध्ये मानवी भावना, सामाजिक स्थिती, आणि देशाच्या समस्यांवर एक हळवा दृष्टिकोन दिसतो. त्यांनी शब्दांमध्ये संघर्ष व्यक्त केला, पण कधीही निराशा झळकू दिली नाही. त्यांच्या प्रत्येक ओळीत सकारात्मकता आणि आशेचा संवाद असे 

           भारतीय शेती हा अटलजींसाठी नेहमीच संवेदनशील विषय होता. ते शेतकऱ्यांना भारताचे खरे पोशिंदे मानत. त्यांच्या कवितांमध्ये शेतकऱ्यांच्या श्रमाचं, त्यांच्या संघर्षाचं आणि त्यांच्या आशांंचं प्रतिबिंब दिसतं. त्यांच्या लेखणीतून शेतकऱ्यांच्या श्रमाचं महत्त्व अधोरेखित होतं, तसेच त्यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर प्रकाश टाकला.

त्यांच्या कवितेतून ग्रामीण भागातील परिस्थितीचे चित्रण दिसते:

"धरती मां का कर्ज चुकाने,

हल-बैल संग खेत सजाने,

पसीने की धारों से,

फसलें मुस्कान लाती हैं।"

या ओळींमधून शेतकऱ्यांच्या कठोर मेहनतीला त्यांनी सलाम केला आहे. त्यांना शेती फक्त अन्नधान्य निर्मितीचा स्रोत वाटत नसे, तर ती भारताच्या संस्कृतीचा आत्मा वाटत असे.

         अटलजींनी केवळ कवितांमधूनच नव्हे, तर धोरणांमधूनही शेतकऱ्यांसाठी काम केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या, जसे की पाणी व्यवस्थापन, सिंचन प्रकल्प, आणि ग्रामीण रस्त्यांचा विकास. त्यांच्या "प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजने" मुळे शेती उत्पादनाला बाजारपेठांशी जोडण्याचा मार्ग सुकर झाला.

        अटलजींच्या मते, "शेती हा केवळ एक व्यवसाय नाही, तर देशाच्या संस्कृतीचा एक भाग आहे." त्यांची कविता शेतकऱ्यांच्या श्रमाचं महत्त्व अधोरेखित करते, तर त्यांच्या धोरणांनी त्या श्रमांना योग्य दिशा दिली.

अटलजींच्या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या कोणत्याही एका घटकापुरत्या मर्यादित नव्हत्या. त्यांनी जीवनाचा प्रत्येक पैलू कवितेतून व्यक्त केला. संघर्ष, पराभव, विजय, शांती, आणि सहिष्णुता या सर्व भावनांना त्यांनी आपल्या कवितांमध्ये स्थान दिलं. त्यांच्या कवितांमध्ये एका कवीचं हळवं मन आणि एका नेत्याचं विशाल दृष्टिकोन यांचा सुंदर मिलाफ दिसतो.

त्यांच्या कवितांनी जीवनाच्या संघर्षांमध्ये खंबीर राहण्याचा संदेश दिला.
"जीत की खातिर जिद्दी हूं,

हार नहीं मानूंगा।"

त्यांनी भारतीय निसर्गाचं आणि शेतीचं अप्रतिम वर्णन केलं.

"हरी-भरी धरती का आंचल,

मेरी सांसों में बसा है॥

त्यांची कविता माणुसकी आणि सहिष्णुतेचा संदेश देते.

अटल बिहारी वाजपेयी यांचा कवी म्हणून प्रभाव अमर आहे. त्यांनी आपल्या कवितांमधून फक्त भावना व्यक्त केल्या नाहीत, तर एक राष्ट्र म्हणून भारताला आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासी बनवण्याचा मार्गही दाखवला. त्यांच्या कवितांमधील संवेदनशीलता आणि शेतकऱ्यांवरील प्रेम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची साक्ष देते.

        आजही त्यांची कविता लाखो लोकांना प्रेरणा देते, शेतकऱ्यांना संघर्ष करण्याचं बळ देते, आणि भारताच्या संस्कृतीचा गौरव वाढवते. अटलजी केवळ एक नेता नव्हते, तर शब्दांतून मानवतेचं दर्शन घडवणारे एक अमर कवी होते.


Marathi Quotes | Love Quotes in Marathi | Motivational Quotes in Marathi | Suvichar Marathi | Good Morning Quotes Marathi | Life Quotes in Marathi | Good Thoughts in Marathi | Friendship Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Aai Marathi Quotes | Attitude Quotes in Marathi | Shivaji Maharaj Quotes in Marathi | Mothers Day Quotes in Marathi | Fathers Day Quotes in Marathi | Guru Purnima Quotes in Marathi



सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

तुमचा गाल आमची थप्पडं

 तुमचा गाल आमची थप्पडं

एकांकिका


मी काॅलेजला असताना एक एकांकीका पहिली होती.पूर्वी एकांकिकाचे टायटल फार भन्नाट असतं.सोशल मिडीया नव्हती तेव्हा नाहीतर एका एका टायटेलनं तुफान राडा केला असता  सोशल मिडीयावर....!! 

'तुमचा गालं..!!, आमची थप्पड..!!" अशी भन्नाट  टायटल असलेली सामाजिक  व राजकारणावर भाष्य करू शकेल अशी  एकांकिका एका स्पर्धेत  पाहण्यात आली होती.

एका सामान्य नागरिकाची कशी ससेहोलपट केली जाते या व्यवस्थेमध्ये याची काही प्रसंग मोठ्या कौशल्याने त्या एकांकिकेत गुंफले होते.

आम आदमीची प्रत्येक वेळेला कशी  प्रत्येक टप्प्यावर हारेशमेन्ट केली जाते हे दाखवण्याचा अफलातून  प्रयत्न त्यात केला होता.

या व्यवस्थेचे आणि तुमचं नात काय ?,

तुमचा गाल आणि आमची थप्पड..!!

तुम्ही फक्त  मुकाटयाने गाल पुढे करा....आम्ही एक थप्पड  लावतो.

थप्पड लगावण्यात एक प्रकारचा परमानंद असतो.हा आंनद दुस-याला देताना तुम्ही तक्रार करू नका.हसू नका पण सोसा.रडू नका फक्त कण्हा.

तुमच्या गालात जर कुणी जोरात थप्पडं मारली तर तुम्ही काय कराल? आपल्या चिंतनशीलतेला भरपूर वाव देणारा हा प्रश्न आहे.

एखादा पत्रकार तुम्हाला येऊन विचारू शकतो? आता कसं वाटतय? थप्पड  खाल्ल्यानंतर आपल्याला काय काय वाटू शकत हे याची आपली कल्पना करा.

आमचं एक सरं वर्गात मुलांना शिक्षा देण्यासाठी एक नामी युक्ती करतं.मुलींना मुलाच्या कानफटात मारायला लावतं. आता थप्पड  मारलीचं जाणार आहे हे तर नक्कीच  होतं.आमची एवढीचं अपेक्षा असे की एखाद्या सुंदर मुलीनं आमच्या कानफटात  मारावी.अनेकदा सुंदर मुली या नाजूक असतात.त्यांची थप्पड  म्हणजे गालावर फुलांचा मारा केल्यावाणी असे.कानामागे मुंग्या निघण्यापेक्षा गुदगुल्या होईत.

थप्पडं खाणं चांगलं नसलं तरी पण त्यात एक सुख दडलेलं असे पण हे सुख जास्त वेळ टिकत नसे. त्या गोब-या मऊ मऊ गालावर  सर एक सणसणीत  क आवाज काढणारी थप्पड  मारतं.दिवसाचं चांदण्या पाहण्याचा महत भाग्य ही आम्हाला भेटे.

 आम आदमीचा गाल फक्त थप्पड  खाण्यासाठी असतो.तुमच्यावर सत्ता गाजवणा-या सत्ताधीशासाठी तरी तुमच्या गो-या गोब-या गालाचा दुसरा काय उपयोग असू शकतो?

आता तुम्ही म्हणणार हे काय लावलं थप्पड  पुराणं?

आपले जे राजे,एकटं बाॅस,जंगलाचा शेअर,डाॅन अशी जे नाव धारण करून,आपणचं आपल्या उरावर बसण्यासाठी निवडून  दिले आहेत.त्यांच्या थप्पडा खाण्यासाठी तयार रहा.

थप्पड पे थप्पड  पडणारच आहेतं.

शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

आपण सारे पागल ठरतो तेव्हा...!!!


संसद हे आपलं सर्वोच्च सभागृह आहे.भारतात  संसदेपेक्षा सर्वोच्च असं काही  ही नाही.असं मी नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकलेलो आहे. नागरिकशास्त्र शिकवणारे आमचे शिक्षक भारी शिस्तीचे होते.ते आमचे हात फोडून काढत पण नागरिकाची सनद ,कर्तव्य व अधिकार असल्या गोष्टी पाठचं करून घेत असतं.
एखादा अधिकार आपण त्यांना  सांगितला की ते त्याचं कर्तव्यं विचारतं त्यांच म्हणणं स्पष्ट  असे अधिकार आणि कर्तव्य  हया नाण्याच्या दोन बाजू आहेत.नागरिक आपले अधिकार  मागतात पण कर्तव्य मात्र जाणूनबुजून विसरतात.सुजाण  नागरिक  तोच जे कर्तव्य  विसरत नाही.

                           आम्हास कर्तव्य  सांगता नाही आले की ते चड्डी ओली होई पर्यंत बेजरब मारत असतं.त्यावेळी  सुजाण आणि सजग पालकांच्या टोळया नसतं.त्यामुळे शिक्षकांना आवरायला कुणी नसे.शिक्षणात ही आंनदायी शिक्षण हा प्रकार  तेव्हा सुरू झालेला नव्हता.
जेव्हा मी इतिहासात हिटलर नाव ऐकलं तेव्हा पासून मी त्या सरांना हिटलर समजत असे. ते हिटलर सारखचं वागतं. दिसतं पण.
लोकशाहीच्या धडे देणा-या माणसांनी हिटलर असू नाही अशी माझी अपेक्षा असे पण माझ्या सारख्या गुलामांच्या मताला काहीच किंमत नसे.
बरं मला वाटतं ते तरी व्यक्त होण्याची हिम्मत  माझ्याकडे तरी कुठे होती?कुणाकडेच नव्हती.त्यामुळे गुलामाच्या अपेक्षेला काहीचं महत्व  नसतं.हे सत्य कळायला मला पन्नाशी गाठावी लागली.
नागरिकशास्त्रा शिकवणा-या हिटलरी शिक्षकामुळे मला लहानपणापासून  संसद या शब्दात विषयी कमालीची जिज्ञासा आणि  जिव्हाळा वाटतं आलेला आहे.
संसदेवर दोनदा हल्ले झाले होते तेव्हा पण मी फार भावूक झालो होतो.भावूक होण्यापेक्षा फार भयभीत  झालो होतो.संसदेवर ॲटक म्हणजे काय जोक्स काय? 
आपल्याला वाटतं किंवा कळतं हे सार तसचं असतं असं नाही.खरं तर फारचं भयंकर असतं कधी कधी.आपल्याला काहीचं कळतं ही नसतं. आपण पागल असतो याचा साक्षात्कार  काही घटना आपल्याला करून देतात.
कालपरवा जे संसदेमध्ये घडलं.ती अशीच एक देश वासियांना अक्कल शिकवणारी घटना होती. संसद हे सर्वोच्च  सभागृह  वगैरे काही नसतं. तो एक आखाडा असतो.कुस्त्या खेळायच्या असतात तिथं.झोंबाझोंबी खेळायच्या असतात.नाहीच समोरची गडी रेटले की महिलांना पुढे करायचं.पुढं किती गडी शटकरं असले तरी महिलांना काय करणार? कुणाच्या बांगडया फोडून तुम्ही काय पौरुषत्व  सिध्द करणार?
कसली चर्चा कसली! कसली अर्चा .!!
आज मला भयंकर राग आला आहे.
कुणाचा काय म्हणून विचारता ?त्या नागरिकशास्त्र  शिकवणा-या त्या आमच्या शिक्षकाचा. फुकटातचं त्यानं आमचं हात फोडलं.चड्ड्या ओल्या केल्या.
संसद अशी पण असते हे आम्हा पामराला कुणी शिकवलं नाही.
 हे बरोबर नाही.अध्यक्ष  महोदय...!!

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार

 ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार 








पुरस्कार राव,

हे लयं भारी झालयं बघ.गुरूवर्य  सुधीर रसाळला सरांना तू एकदाचं कसतरी गाठलंस.

यार,तू लयचं लेट केलसं.

जाऊ दे ते. लेट पण थेट भेटलास.

हल्ली तू पण हॅक झाल्यासारखा वागतोस.चांगली 

चांगली ग्रेट माणसं तुला भेटतच नाहीत बुवा. उगीच आपलं कुणाच्या भी गळयात पडतो. ग्रेट माणसाला तू शोधलं पाहिजे.तुझं भी इम्प्रेशन डाऊन नाही झालं पाहिजे ना?

काय म्हणतोयस ?गर्दीच लय झालीय..!! 

तुझं भी खरं म्हणा.तू तरी काय करणार? काही माणसांनी तुलाचं कॅपचर करून टाकलयं!

त्यामुळे तुझा भी नाईलाजच असतो म्हणा. तू तरी काय करणार?

आता खारमुरे वाटाव्यात तसचं तुला कुणाच्या गळयात बांधतात म्हणल्यावर गर्दी तर होणारचं ना? देतेत म्हणल्यावर घेणारे येणारच ना? रेवडी पहिलवानाला काय कमी असते?ते तर कवा भी लंगोट बांधून उभीच  असत्यात की.

क्काय..? हौसे नवसे गवसे सारेचं येणार ना?

पण पुरस्कारराव, प्राॅब्लेम काय होतोय. गुरूवर्य रसाळ सारखी ग्रेट माणसं गर्दी कसली घुसतेत?

ते तिकडं फिरकत भी नसतेत.त्यांच काय आडलं तुझ्या वाचून?

त्यांना तुला गळयात घालून तरी फिरायची थोडी हौस असते? ते थोडचं तुला मिरवित बसणार आहेत.

ग्रेट ते ग्रेटचं...!! 

ऐवढं एक लयं झॅक झालयं बघ.तू कस तरी सरांना गाठलस.त्यांच्या गळयात पडलास.

बाबा, धन्य झालास तू.

नाहीतर तुझी काय कमी थू...!! थू ...!!!  सुरू नाही.आपलं भी स्टेटस राह्यलाय पाहिजे ना?

अशाचं ग्रेट माणसाच्या शोधात राहत जा.तुझी भी इज्जत  राहिल.

चांगल्या ग्रेट माणसाची संगत बरी असते.

माकडासोबत खेळतं बसल्यावर....तुझी तरी काय किमती राहणार?

      सर, साहित्यसेवेसाठी केलेल्या अप्रतिम कामगिरीबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे.आपलं हार्दिक  अभिनंदन..!!

आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!


#साहित्यअकादमीपुरस्कार #सुधीररसाळ #मराठीसाहित्य

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

पुष्पा-2:- राडाच पण हवाहवासा..!!

पुष्पा-02:- एक हवाहवसा राडा..!!



'पुष्पा-02 तुम्ही  पाहिला का?' हा प्रश्न सध्या जनरली तुम्हाला कुणी ही कुठं ही विचारू शकतं.तुम्ही शाॅकेब्लस् व्हायचं नाही.साधा पिक्चर  आहे तो ..!!  नाही पाहिला तर नाही पाहिला त्यात काय एवढं? असं तर बिलकुल म्हणायचं नाही.मग
'पुष्पा-01चांगला होता की पुष्पा-02 ?'
ओटीवर पाहिला की थेटरात?अशी अनेक प्रश्न तुम्हाला विचारली जाणार मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार? आहे की नाही पंचाईत? पुष्पा-02  न पहाणं म्हणजे दिवाळीच्या सणाला लाडू न केल्यासारखं आहे.गटारी साजरी न केल्यासारखा कमी पणा आहे.
अजून यांनी पुष्पा -2 नाही पाहिला रे.बिच्चारा...!! तुमची अशी कुणी कीव ही करू शकतं.
तुम्ही चहा पितात,नास्ता करता,सिगारेट  ओढता ,जेवण  करता,पानं खाता आणि पुष्पा- 2 पाहत नाही? का पहात नाही तो?
छे..छे..!! तुम्ही एक भयंकर चूक करत आहात.
पुष्पा-2 पहाणं फार अपरिहार्य  करण्यात आलेलं आहे.कुणी केलेयं इतकं अपरिहार्य..??
तुम्ही  मला केलं.मी तुम्हाला केलं.आपणचं आपल्याला.
पुष्पा-2 ने तुफान राडा केला बाॅक्स  ऑफिसवर...!! त्या राडा करणा-या गर्दीत  तुम्ही  नाही? कसं वाटतयं तुम्हाला?
रेकॉर्ड  होत असताना आपला पण खारीचा वाटा पाहिजेना त्यातं..!!
बघा,ना एकदाचा पुष्पा-02
काय त्यात एवढं? असं काय विचारता?
'झूकेगा नही साला' असं म्हणतं  एक गावठी आडाणी उडाणटप्पू पुष्पराज आहे त्यातं.फारच बेधडक वागतोय तो.कधी कधी तो सटकतो पण.
तुमच्या आमच्या मनात असा एक हिरो दडलेला असतो.आपण त्याला दाबून ठेवलेले असते आपल्या आत. तोच उफाळून  येतोवर. तुटून पडतो तो समोरच्यावर... या व्यवस्थेवर
.!!
भौतिकशास्त्राचं सारे नियम झक मारतात त्याच्या पुढे..!! पिक्चरमध्ये रोमान्स भी सपक नाही दाळभातासारखा.पुळचाट..!! पुष्पराज हे असलं डेंजर माणूस आणि ती तसली त्याच्यावर जीव ओवाळून  टाकणारी त्याची ती फटाकडी श्रीवल्ली...!! काय अफलातून  पोट्टी यार...!! बालीवूडमधल्या सा-या नटया मिळमिळ वाटतात सा-या रश्मिका पुढे. ठेचा ती... !! नुसता झणझणीत..!!
झुकेगा नही साला म्हणतं भिडणारा प्रचंड महत्वाकांक्षी माणूस पुष्पराज बघा एकदाचा. तेवढचं रक्त थोडं फार गरम होतं काही वेळा पुरतं.
कुणा पुढं ही शेपट्या घालून गोंडा घोळत बसणारी माणसाची कुत्रे झालेली तर आपण रोजचं पहात आहोत.
काय म्हणता? त्या पुष्पराजची व श्रीवल्लीची जात कोणती आहे? इंटर कास्टं लफडं तर नाही ना ते..आपल्या सैराटमधील अर्ची आणि परश्या सारखं..?
डोंबल आमचं....!! घ्या आता. ते कुठं माहित मला?
हॅशटॅग्स तयार:

#Pushpa2Rocks
#झुकेगानहींसाला
#PushpaRajOnFire
#SrivalliForever
#RecordBreakingPushpa
#ActionKaBaap

संशयाचा व्हायरस

  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या न...