गुरुवार, २ जानेवारी, २०२५

महाभारत लाईव्ह: तुमची भूमिका काय? धर्म विरुद्ध अधर्माची लढाई!

Mahabharat-महाभारत Mahabharat Image

आज आता तुमच्या समोर महाभारत घडत आहे.
तुम्ही कुरुक्षेत्रावर  उभे आहात.ते सारं लाईव्ह  पहात आहात.
असं समजा.
जे घडतयं ते तुमच्या डोळयासमोर घडते आहे?
इमॅजिंग करा.
कल्पनाचं करायच्या आहेत तर भव्य दिव्य कराव्यात.त्यात कसली कंजूषी करता?त्याला कुठं पैसे लागतात?
एवढं महाभारत  घडते आहे तर तुम्ही  कुणाच्या बाजूनं आहातचं.
नाही कळलं? इझी ते.
कौरवांच्या की पांडवांच्या..?
धर्माच्या की अधर्माच्या?
काय म्हणता?
तुम्हाला धर्म  नि अधर्मचं  ठरवता येईना? 
आता कोण  कौरव? कोण पांडव? कोण श्रीकृष्ण? ते ठरवताच येईना.
त्याची काय मेथड असती काय? कमाल बुवा..!!
त्याची कसली मेथड भिंथडं यार?
आपण कोण आहोत हे ठरवा की फर्स्ट...? कोण आहात तुम्ही नक्की?
तुम्ही तिथं आहात म्हणजे तुमचा भी काही तरी रोल असेलचं ना? 
आपला रोल  ठरवता आलं की
महाभारत समजायला सोप जातं?
तुम्हाला पुढं सारं सहज ठरवता येऊ शकतं. नायक भी खलनायक ही? 
तुमचा मित्र  दुर्योधन ही असू शकतो किंवा सुदाम्याही..!! तुम्ही पांचली भी असू शकता किवा सुभद्रा ही?उत्तरा  किंवा कुंती ही...!!
अगदी तुम्ही कुणी ही असू शकता? नाही तर नुसतचं एखादं प्यादं....!!
कुणीच दिलं न घेतलेले. 
आंधळे धृतराष्ट्र ही...!!  किंवा संजय दिव्यदृष्टी असलेला...!! समजा ना स्वतःला काहीतरी.
काय म्हणता?
महाभारत इथं घडते आहे असं मी समजूच का?  
मग बसा बोंबलत? काही तरी समजावायचा लागेल ना? महाभारत  तर घडतेच आहे. तुम्ही काहीचं नाही ठरवलं तरी महाभारत  हे घडणारच आहे. अटळ असतं ते.



बुधवार, १ जानेवारी, २०२५

नविन वर्षाच्या शुभेच्छा व काळ पुरूष वगैरे

 आज  नवीन वर्षाचा पहिला दिवस.काल वर्ष 2024 गेलं.वर्ष 2025 आलं.भिंतीवरलं एक कलेंडर गेलं नि नवीन आलं.काय घडलय?

New Year नविन वर्ष


उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून निथळणारा प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परीवर्तन व भ्रमण गतीत काहीचं फरक पडतं नाही.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो.

फक्त नव्याचा भास असत़ो.सारं सारं नवं नवं वाटायला लागतं.हातातलं बरचसं निसटून गेल्यासारखं वाटतं.आपल्या आयुष्याची ओंजळ हातात घेऊन आपण उभे असतो. ओंजळ ओली असते पण रितीच असते. मकाही क्षणांच्या अस्तित्वाची ओल सांभाळत.एक एक क्षण क्षण अलगद निखळून पडतात.गेलेले क्षण परतं येत नाहीत.आपल्याला हवे असलेले क्षण आपण पकडून ठेऊ शकत  नाहीत.नको असलेले क्षण रोखू शकत नाहीत. खर तरं या विश्वात आपण काहीचं करू शकत नाही.

       या सृष्टी चक्रात तुम्ही भिंतीवरच कलेंडर बदल म्हणून काहीच घडणार नसतं.जे घडतं ते आपल्या मनाच्या अवकाशात.ते भास असतात.काही अभास असतात.नाहीतरी हे जग भास- अभासाच्या हिंदोळयावरच झुलत असते.त्यात आनंदाचे,दु:खाचे क्षण आपण गोळा करत राहतो.काही क्षणांचे ठसे आपण मनावर छापून ठेवलेले असतात.काही क्षण मनावर ओरखडे उमटवून जातात.


    खरंतर अनंत ब्रम्हाडांत दिवस उगवत नाही.दिवस मावळत नाही.काळाच्या अनंत रेषेवर ब्रम्हांड नुसतं सरकतं असते.ते असेच सरकत राहणार आहे. पुढे मागे खालीवर असा देशाचा पसारा कुठं असतो अवकाशात?

गमंत अशी की, आपण मात्र घड्याळाच्या काटयावर आपलं आयुष्य बेतून घेतो.त्या घड्याळाला ही आपण आकार दिला.उकार दिला.देवासारखा माणसानं काळाला सुंदर केलं.नटवलंयं,सजवलयं.

काळ पुरूष  असतो की स्त्री? 

काळाला आपण जवळचा सखा मित्र, आप्तेष्ट करून टाकलं.बाय -बाय 2024 व वेल कम 2025 अश्या रांगोळ्या तुम्ही पाहिल्याचं असतील.बाय बाय ,वेल-कम असं घसाफोड सुरुच असते.घराघरावर केलेली रोषणाई.चौकाचौकात वाजणारे डीजे नवं वर्षाच्या स्वागताला सज्ज असतात.एका अनोख्या धूंदीत जग बुडालेले असते.बेधूंद...बेभान होतात माणसं. का?

माणसाला बेधुंद होण्यासाठी काही तरी निमित्त  हवं असतं?

पिण्यासाठी तर ते नक्कीच  हवं असतं.

नव्या वर्षाचं स्वागत.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर जगाचं लक्ष असतं.नवं वर्ष आलं की एकच जल्लोष होतो.


    नवं वर्षाचं बाळं रांगत या सृष्टीचा कब्जा घेत पण आपण स्वागतच नाही केलं तर? नवं वर्ष रूसून बसेल का? खूप नाचून नाचून स्वागत केलं तर ते वर्ष माणसांना  प्रसन्न होत असेल का? असं  काही होणार नसतं तरी आपण स्वागतात कसूर करत नाही.कसूर करायची नसते.माणसं एखाद्या संज्ञेच्या संकल्पनेच्या किती प्रेमात पडतात,नाही?


आपण रांगोळ्या काढतो.डीजे वाजवतो.घराघरावर रोषणाई करतो.लेजरचे शो करतो. हे नविन वर्षीला आवडतं म्हणून आपण करत नाहीतर आपल्या ते आवडतं.आपल्याला प्याची असते आपण पितो.आपल्याला नाचायचं असतं आपण नाचतो.आनंद साजरा करण्याची ती आपली पध्दत आहे.जो तो आपआपल्या पध्दतीने करत असतो.निमित्त हवं असतं.

   तसा साराच हा भातकुलीचा खेळ असत़ो.खोटं खोटं का असेना पण मज्जा येते ना ? मग खेळायचं.मज्जा महत्वाची.संस्कृती वगैरे गोष्टी पण अश्याच मानवनिर्मितच आहेत ना? कशाला टेन्शन घ्यायचं? 


      आयुष्य सा-यांनाच असते पण आयुष्याची लांबी सां-याची सारखी नसते.कुणाचं लांब असतं.कुणाचं आखूड असते.जे क्षण आपल्याला वाट्याला येतात.ते फक्त आपले असतात.त्यांना कवेत घेण्याचं काम आपलं असतं.सुख दु:खाचे कण क्षण पाठीवर घेऊन आपल्या वर आदळत असतात.जगणं म्हणजे एक प्रणयच असतो हवाहवासा,नाही का? दु:ख आणखी सुखाच्या झुल्यावर झुलत ठेवणारा...!!!

आपला भुतकाळ आपण बदलू शकत नाही पण वर्तमानाला आपणं भिडवू शकतो.जिंकू ही शकतो.आपण भविष्यकाळ  सुंदर सुंदर स्वप्नांनी व संकल्पनानी सजवू शकतो.नटवू शकतो.सागराच्या किना-यावर नाही का आपण खोपे करतं? एक लाटं आली की ती सारं होत्याचं नव्हते करते.तसचं हे काळाच्या लाटेत  आपलं सारं  सारं या अनंत ब्रम्हांडांत मिसळणार असतं पण ते आपण करतचं असतो.करावं लागतं.दुसरं काय करणार ? आपल्या हातातच काय आहे?


आपलं भविष्य सुंदर स्वप्नांनी सजवू.सुंदर सुंदर संकल्प करू.आपलं आयुष्य आपणचं सुंदर करण्याचा प्रयत्न करूया.त्यासाठी प्राण पणाला लावू.

बोला सर्व जण,"नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!! हॅप्पी न्यू इयर...!!


                                    परशुराम सोंडगे

संशयाचा व्हायरस

  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या न...