सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

मृत्यू विसरलेली माणसं

 मृत्यू विसरलेली माणसं

जीव जन्माला आला की त्याचा मृत्यु अटळ असतो. तो कधी ही कुणाला येऊ शकतो. मृत्यूला  हजार वाटा असतात.अवतीभवती अनेक मृत्यू होत असताना,अनेक सरण जळताना आपण पहात असतो. आपण एक दिवस मरणार आहोत हे माहीत असून ही माणसं आपल्या स्वप्नातचं दंग असतात. अजून त्यांना काय काय करायचं असतं?

फाशीवर जाणा-या  आरोपीला त्याची शैवटची इच्छा विचारण्यात येते.अपघात मरणाराला ती पण संधी नियती देत नाही. रंगलेला डाव तसाच टाकून मृत्यू जीवाला ओढत घेऊन जातो. मरणाची इच्छा कुणालाचं नसते पण मृत्यू कुणालाच  सोडतं नाही. मरणा इतकी भिंती कशाची वाटतं नाही माणसाला. मरण येऊ नाही म्हणून काही करण्याची तयारी असते माणसांची. त्यातूनच  दवाखाने रुग्णालये तयार झाली.ही रूग्णालय फक्त मृत्यू पुढे ढकलू शकतात. अमरत्व कुणाला देऊ शकत नाहीं. जी माणसं दवाखान्यात भरती  होतात.त्यांना लगेचं मारायचं नसतं. फक्तं जगायचं असतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संशयाचा व्हायरस

  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या न...