पोस्ट्स

का वाढताहेत अफेअर?

इमेज
 विवाहाच्या योग्य वेळेची शोधार्थ : वयात येण्यापासून लग्नापर्यंतचा वाढता अंतर आणि त्याचे सूक्ष्म परिणाम जीवनाच्या प्रवाहात काही टप्पे असे असतात, जे नैसर्गिक नियमांनी बांधलेले असतात. वयात येणे – ते शारीरिक परिपक्वतेचे पहिले पाऊल – आणि विवाह – जो जीवनाला स्थिरता आणि संतुलन देतो – हे दोन टप्पे एकमेकांशी जवळून जोडलेले आहेत. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत विवाह हा केवळ सामाजिक बंधन नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक गरजांची नैसर्गिक पूर्तता मानला गेला आहे. परंतु आधुनिक युगात शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्वावलंबनाच्या नावाखाली विवाहाचे वय दिवसेंदिवस पुढे ढकलले जात आहे. जसे बालविवाहाचे दुष्परिणाम समाजाने अनुभवले आहेत, तसेच अनावश्यक उशिरा विवाहही समाजाच्या नैतिक आणि सामाजिक आरोग्याला हानी पोहोचवतो. वयात येण्याचे आणि विवाहाचे बदलते अंतर : एक दृष्टिक्षेप भारतात मुलींच्या वयात येण्याचे सरासरी वय (मेनार्क किंवा पाळी सुरू होणे) सुमारे १२-१३ वर्षे आहे. अनेक अभ्यासांनुसार, स्तन विकास (थेलार्क) १०-११ वर्षांपासून सुरू होतो, तर मुलांमध्ये हे वय ११-१२ वर्षे आहे. म्हणजेच, हार्मोनल बदल आणि शारीरिक आकर्षणाच्य...

एका काॅल गर्लची डायरी -भाग 3

इमेज
                                                        तिसरा भाग झिमझिम पाऊस सुरू होता.राधा मॅडम बाल्‍कनीत उभ्या होत्या.सारं शहरं पावसात चिंब भिजत होतं.पावसाचा पण एक सूर असतो ना? झिमझिम…! रिमझिम…!! थंडगार वारं अंगास झोंबत होतं.तसं त्यांनी अंग चोरलं. एक गोड शहरा अंगभर पसरत गेला.वा-यावर उडणारे केस त्यांनी सावरले.पाचव्या मजल्यावर त्या उभ्या होत्या.पाऊस बरसत असला तरी  रोडवरील गर्दी कमी नव्हती.दुथडी  भरून रस्ते वाहत होते.वेगवेगळया रंगाचे रेन कोटस्, छत्र्या ,वाहनं रंगीत ठिपक्यांची दिसत होते. एक विलक्षण दृश्य दिसतं होतं.माणसंच काय वाहन ही इवल्या इवल्या रंगीत ठिपक्यासारखे दिसत होती.                    पाऊस म्हणजे धरती आणि आकशाचा प्रणयचं ना? धूवाधार पावसाला सोसत राहणारी धरती.हिरवागार शालू परिधन करून पाऊस झेलत,शोषत उतावीळ प्रणयीचं ना? राधा मॅडमला उगीच कुठं तरी वाचलेली ही कवी कल्पना आठवली.बाल्‍कनीतच ...

एका काॅलगर्लची डायरी भाग 2

इमेज
एका काॅलगर्लची  डायरी                                                                         भाग -2 ब्ल्यूस्टार हॉटेलच्या भव्य हॉल मध्ये लग्‍नाच्या गर्दीत राधा मॅडमला अचानक आवाज आला.त्या वर्दीतच होत्या.त्याचं एकमेव महिला त्या लग्नात असतील की त्या साडीत नव्हत्या.नटलेल्या,सजलेल्या नव्हत्या. त्या ऑनडीयुटी सहभागी झाल्या होत्या.त्यामुळे वर्दीतच होत्या. “तुम्ही राधा.. देसाई ना?”ओळखीचा चेहरा.ओळखीचा आवाज.कोण असावा याचा अंदाज त्या बांधत बसल्या.खरतर त्यांना काहीच आठवत नव्हतं.गर्दीत असं कुणी तरी अचानक येते आणि डायरेक्टं नावानंच बोलत.त्यावेळी इतकं गोंधळून तर माणूस जाणारच ना?एक सुंदर बांधेसूद तरूण महिला त्यांच्याकडे हासत येत होती.काही क्षण त्या नुसत्या तिच्याकडे पहात राहिल्या.त्या एकटयाचं तिच्याकडे पहात नव्हत्या.अनेक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.ती बाई नटलेली असली तरी ओव्हर मेकअप मुळीच के...

रावण: राजा राक्षसांचा वेगळा दृष्टीकोन देणारी कांदबरी

इमेज
 रावण: राजा राक्षसांचा वेगळा दृष्टीकोन देणारी कांदबरी शरद तांदळे यांची रावण राजा राक्षसांचा (४३२ पृष्ठे, न्यू एरा पब्लिशिंग हाऊस) ही कादंबरी मराठी साहित्यातील एक महत्त्वाची संशोधनात्मक कृती आहे. पारंपरिक रामायणात रावण हा केवळ अहंकारी खलनायक म्हणून दाखवला जातो, पण तांदळे यांनी रावणाच्या दृष्टिकोनातून त्याचे पूर्ण जीवन चित्रित केले आहे. ही कादंबरी रावणाला एक महान नेता, विद्वान, शिवभक्त आणि न्यायप्रिय राजा म्हणून उभी करते, ज्याने दैत्य, दानव, असुर आणि भटक्या जमातींना एकत्र करून सोन्याची लंका निर्माण केली. लेखकाने अनेक पौराणिक संदर्भांचा अभ्यास करून काल्पनिक अतिशयोक्ती टाळली आहे, ज्यामुळे कथा वास्तववादी आणि विचारप्रवर्तक वाटते. Ravan:Raja Rakshncha Novel कादंबरी रावणाच्या बालपणापासून सुरू होते – त्याच्या कौटुंबिक कलह, आई-वडील, आजोबा सुमाली आणि भावंडांशी असलेले नाते. रावण हा ब्राह्मण वंशज असूनही राक्षस संस्कृतीत वाढतो. त्याची महत्त्वाकांक्षा, ज्ञानाची भूक आणि अन्यायाविरुद्ध बंडखोरी यातून तो लंकेचा राजा बनतो. तो देवांना पराभूत करतो, पण त्याचे निर्णय नेहमी न्याय आणि स्वाभिमानावर आधारित अस...

एका काॅलगर्लची डायरी - भाग 1

इमेज
  भाग एक Callgril काॅलगर्ल पहाटेचे पाच वाजले होते.पूर्वेला तांबडा रंग दाटून आला होता.वारं मंद वाहत होतं.थंडी ही चांगलीचं बोचत होती.स्वेटर,मफलिरी गुंडाळून माणसं चालत होती.स्ट्रीट लाईट जळत होत्या.गुलमोहरांच्या फुलांचा खचीचं खच पडला होता रस्त्यावर.कुणाकुणाच्या दारात पारिजाताकांचा सडा पडला होता.त्यांचा मंद पण धूंद गंध मनाला मोहित करीत होता.पाच वाजून गेल्या होत्या तरी माणसांची वर्दळ फारसी नव्हती.तुरळक तुरळक माणसं टोळक्या टोळक्यांनी चालत होते.काही नवीन पोरं पळूपळू घाम काढीत होते.            राधा देसाई ही जाँगींग करत होत्या.रनिंग केल्यामुळे अंग सारं घामेजून गेलं होतं त्यांच.अंग सारं  थबथबलेलं होतं.थोडसं थकल्या ही होत्या त्या.तेवढयात मोबाईल वाजला.               इतक्या सकाळी फोन एकतरी घरीहून तरी असावा नाहीतर पोलिस स्टेशनवरून तरी.दुसरा कॉल या नंबरवर शक्यचं नव्हतं कारण त्यांचा हा प्राव्हेट नंबर होता.अश्या ऑफिसर्सना असे फोन ठेवावेच लागतात.त्या थोडया थांबल्या.कॉल रिसिव...

एपस्टीन फाइल्स १९ डिसेंबरला उघड: भारतातील सत्तापालटाची अफवा की सत्य? पूर्ण विश्लेषण

इमेज
  जगाच्या राजकारणात काही तारखा अशा असतात, ज्या केवळ कॅलेंडरवरच्या आकड्यांपेक्षा जास्त काही दर्शवतात. १९ डिसेंबर २०२५ ही अशीच एक तारीख ठरली आहे, ज्याकडे केवळ अमेरिकेच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांच्या राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील कुख्यात जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडलशी निगडित गोपनीय कागदपत्रे – ज्यांना 'एपस्टीन फाइल्स' म्हणतात – या दिवशी अमेरिकन न्याय विभागाकडून (DOJ) सार्वजनिक होण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासनाने नोव्हेंबरमध्ये 'एपस्टीन फाइल्स ट्रान्स्परन्सी अॅक्ट' कायद्यावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे ३० दिवसांत ही फाइल्स उघड करण्याची बंधनकारकता आली. आता वेळ जवळ आली आहे, आणि या फाइल्समधून काय बाहेर येईल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जेफ्री एपस्टीन हा नाव अमेरिकेच्या उच्चभ्रू वर्तुळातले एक काळे पडदे उघडणारा आहे. धनाढ्य उद्योगपती, राजकारणी, सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींशी जवळीक असलेला हा माणूस, अल्पवयीन मुलींच्या माध्यमातून एक घाणेरडे जाळे विणत होता. हनीट्रॅप, सेक्स ट्रॅफिकिंग आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप त्याच्यावर होते. २०१९ मध्ये तुरुंगात त्याचा मृत्य...

तिने केले बाॅयफ्रेंडच्या प्रेतासोबत लग्न

इमेज
मानवी भावना मध्ये प्रेम ही अतिशय उत्कट भावना आहे.कोवळया वयात ही भावना अधिक मनावर गारूड करते.आई वडीलांवर-मुलांच प्रेम, बहीण भावाचं प्रेम, या सा-यात  मुलं मुलीच प्रेम असतं.त्याच्या,लौकिक  कथा आपण चित्रपटातून  पहात असतो.  प्रेम अजिंक्य असतं. प्रेम उदात्त असत असचं आपल्याला वाटत आलेलं आहे पण प्रेम ही माणसाच्या मनाची अवस्था आहे. मन बदल की प्रेम ही बदलत.कमी वयात जे प्रेम होत ते शारीरिक आकर्षणचा भाग असतो. ते आकर्षण  कमी झालं की प्रेम ही विरत जातं. खर प्रेम  असतच नाही.असा दावा केले आहे  विश्वासाचं  धागे अधिक घट्ट झाले की प्रेम अधिक दृढ होत जात. She,married, with boyfriends  corspe कथा कांदब-यातून ही अशा अनेक अमर प्रेमाच्या कथा आपण ऐकत आलो आहोत. हिंदी चित्रपटात तर प्रेमाचा विजय हा ठरलेलाच असतो.अनेक कवीच्या पहिली कविता ही  प्रेम कविता असते.  नांदेड२शहरात,८ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या एका प्रेमप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. प्रेमसंबंध आणि जातीय विखारामुळे एका तरुणाची निर्घृण हत्या झाली, आणि त्याच्या प्रेयसीने त्याच्या पार्थिवाशीच प्र...