पोस्ट्स

महाराज, हे पाप कशाने धूवायचे? कीर्तनाला ही गर्दी होऊ शकते.इंदुरीकर तरुणाईला कीर्तनाकडे मोठया संख्येने आकृष्ट करून घेण्यात कमालीचे यशस्वी झाले. त्यांची भाषा विनोदी आहे.उपहासात्मक आहे.व्यंग निर्माण करणारी आहे.ती अस्सलं बोली भाषा आहे.प्रमाण भाषेचा वापर ते करत नाहीत. इंदुरीकर लोकप्रिय होण्याची कारणे अनेक असले तरी ते फार स्पष्टं बोलतं.स्पष्टं आणि खरं बोलले लोकांना आवडतं. त्यामुळेच लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. इंदोरीकरच्या कीर्तनाची भाषा ग्राम्य असली तरी ती अनेकदा अश्लील व शिवराळ असते.लोक इंदुरीकरला शिव्या खाण्यासाठी पैसे देतात असं ही बोललं जातं. "या बोंकाडी बसा..!!" पठ्याच्या एका डायलॉवर गाणं निघालं.अनेक वरातीत गाजलं.अनेक बेवडे त्यावर थिरकले पण. समाजातील व्यसनाधीनतेवर व अनिष्ट रूढी परंपरेवर ते प्रखर बोलतं असतात. इतकं कटू बोलणं ही लोक एन्जॉय करायचे. इंदुरीकर यांच कीर्तन या व्याख्येत बसत नाही अशी ओरड काही दिवस चालू होती.पुन्हा असल्या विनोदी कीर्तनाची लाटचं आली. कपात माशी पडली तर दूध फेकून देतात येतं. दुधाच्या कढईत जर माझी पडली तर काय करणार? स्वच्छ पाणी शिंपडून कढईतले दूध पवित्र करण्याची प्रथा आहे. तसचं झालं. लोकांनी कीर्तनाच्या नावाखाली कसले ही जोक विनोद सहन केले. वारकरी संप्रदायात कीर्तनाचा एक साचा आहे.त्याची एक शैली आहे.त्याची एक अचारसंहिता आहे.वारकरी संप्रदायाच्या पडठीत इंदुरीकराचं कीर्तन बसत नाही. हल्ली अनेक कीर्तनकाराची कीर्तने वारकरी संप्रदायाचे अचारसंहिता न पाळणारे आहेत. इंदोरीकर एकटेच नाहीत. व्हाटस्ॲपवरचे जोक सांगून,किस्से सांगून करमणूक करणारे कीर्तनकार ही शेकड्याने आहेत. विनोदाचार्य,समाजप्रबोधनकार,गायन सम्राट अशी बिरुदावली घेऊन कीर्तनाचे धंदा करणारे उदंड झाले आहेत. पक्ष व पुढा-यां मागे लाळ घोडमारे ही अनेक पाहिले आहेत. इंदुरीकर व तश्याच धाटणीच कीर्तनकार वारकरी संप्रदायातील लोकांना आवडत ही नाहीत. त्यांना नाही आवडलं तरी लोकांना ते फार आवडतात. आज ही इंदुरीकरांच्या दोन दोन वर्षाच्या तारखा बूक असतात.लोकांना, ते हसवतात.डोळ्यांत, अंजन घालतात.लोकांना इंदुरीकरचं कीर्तन जाम आवडतं. ते,अध्यात्मिक आनंद देते असं नाही पण ते एन्टरटेनमेंट चांगल करतं. इंदुरीकर एका अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात स्पष्टं बोलले होते की लाख दीड लाखाचा इंदुरीकर व पाच सहा लाखाचा ढोक महाराज ऐकण्याची ऐपत नाही तुमची तरी तुम्ही तो खर्च करता. देव तुमचं भलं करो. इतकं स्पष्टं बोलून ही त्यांच किर्तन लोक आज ही ठेवतात.ऐकतात. आता कीर्तन हा धंदा झाला आहे.उदरनिर्वाहाचं साधन झाले आहे. अनेक जण त्याच्या कडे करिअर म्हणून पाहतात. त्यातील अध्यात्मिक ढाचा गळून पडला आहे. धंदा कुणी कोणता ही करू शकते.कीर्तनाचा धंदा करणं हाडाच्या वारक-याला आवडणार नाही. त्यांना ते पचत नाही. लोकांना मनोरंजन प्राधान्य किर्तन आवडतात. कीर्तनकार ही तसचं किर्तन करतात. लोक वर्गणी करून लाखाच्या खर्चाचे सप्ताह करतात.काही संस्थानाच्या सप्ताहाच्या कीर्तनाचे बजेट कोटीत असतात.लोक वर्गणी करून ते खर्च करतात.लोकांना ते परवडत पण. हरी किर्तन करताना पैसे घेऊ नयेत.तिथं जेऊ,नये.चंगळीत व चैनीत जीवन जगू नये असे अनेक संत प्रमाण आहेत.किर्तनकार सांगतात पण तसं वागत नाहीत. उलट किर्तनकार भलं मानधन घेतात त्याचं ही समर्थन करतात. गावागावात स्पर्धा लावून सप्ताहाचे मोठे इव्हेंट साजरे करून घेतले जातात.महागाडया गाड्या घेतात. ख-या सुखाची व्याख्या करताना अनेक कीर्तनकार भौतिक सुखात गुरफटत जातात. 'संसार दुःख मूळ' आहे हे सांगताना अनेक किर्तनकार त्यात जखडून गेले आहेत. ऐश्वर्य तर ते जमा करतातचं पण त्याचं प्रदर्शन ही करतात. मत्सर तर महाराज लोकांत पराकोटीचा असतो. कोणत्याही जीवाचा ना घडो मत्सर हे कोण्या तोंडानी महाराज सांगतात काय माहित? अध्यात्मिक मूल्य जोपासणारे अनेक महाराज अडगळीत पडले आहेत.लाखोचे मानधन स्वीकारून अनेक बड्या नेत्याच्या,वाढदिवसाला हे महाराज लोक किर्तन करतात. आपले मानधन वाढवून ते आपला बाजार भाव ही वाढवून घेतात. मार्केटिंगचे अनेक फंडे ते आमलात आणतात.आपलं नाणं टिकलं पाहिजे. ते वाजले पण पाहिजे. असा आटोकाट त्यांचा प्रयत्न असतो. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" असं म्हणतात. बोलणं सोप असतं. तसं वागणं अवघड असतं. इंदुरीकर महाराजांचं पण हेच चुकलं आहे. ते ज्या प्रमाणे बोलत आले तसं वागणं अपेक्षित होते. लोक अपेक्षा ठेवणारं. त्यांना ते जमलं नाही. समाजप्रबोधनकार इंदुरीकरचा त्यांच्यातला बापाने पराभव केला. मोहमायात ते गुतत गेले. षट्कार विजय मिळवणे सोपे नाही. आता अनेक महाराज इंदुरीकरचं समर्थन करताना तुम्हालाच दिसतील. ते अनेक वाईट प्रथाच उदात्तीकरण करताना ही दिसतील. मराठा समाज मुलीच्या लग्नात बडेजावपणाने मोठा खर्च करतात.हे एक मराठा समाजाच्या अर्थिक मागासलेपणाचे कारण आहे. सकल मराठा समाजाने हगवणे हुंडाबळीच्या प्रकरणा नंतर साधेपणाने लग्न करण्याचा एक मनोदय व्यक्त केला होता. जे करून ह्या प्रथेला आळा बसेल. ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी खर्च केला तर काय होते? विवाह सोहळ्यावर ही अनेकांची पोटं भरतात असा ही युक्तिवाद केला जातो. श्रीमंत व प्रसिध्द लोकांनाच सामान्य लोक फालो करत असतात.श्रीमंत लोकांनी साधे लग्न केले तरचं हा पायंडा पडणार आहे.तरच गरीब लोक कर्ज काढून लग्न करणार नाहीत. हे पायंडे कुणी पाडायचे? गरीब लोकांना तर आपण श्रीमंत आहोत याचा आव आणायचा असतोच.भिका-याला हि भिकारी म्हणून नसतं मरायचं. इंदोरीकर महाराज,तुम्ही साधं लग्न करायचं. लोकांनी डोक्यावर घेतलं असतं तुम्हाला.आता किर्तन कसले बंद करता? का फेटा ठेवता? वारकरी संप्रदायातील ही घाण कोण साफ करणार आहे? इथून पुढ जर काही चांगलच करायचं असेल तर फुकट किर्तन करा.कशाला मानधन घेता? व्हा की जरा खरं संत. किर्तनकार पैसे घेणे हे जर तुम्हाला पाप वाटत नसेल तर तुम्ही वारकरी संप्रदायाशी व संतपंरपरेशी प्रतारणा करत आहात. दया फुकट सल्ले. कीर्तनाच्या गादी कलंकित करण्याचं पाप शेकडो महाराज करत आहेत. हे पाप कशाने धूवायचे? घ्या शपथ की एक रूपया ही मानधन घेणार नाही. तुम्ही जसं स्पष्टं बोलतात ना तसचं बोला पण तसं वागायचा प्रयत्न करा. पुढा-यांच्या दावणीला बांधलेले काही महाराज आहेत त्यांची सुटका करा.या,दास्यातून...!! पक्षाची तळी उचलणारे भटीगंण त्यांच्या डोळ्यांत थोडं अंजन घाला. जाती जातीची पाटलाकी करून जातीयवाद पोसणा-याच्या गढया पण उध्वस्त करा. इंदुरिकर महाराज पुन्हा किर्तन करा...!! शेवटी ही सारी घाण कुणी काढयाची? वारकरी संप्रदायाची निर्मळ गंगा अखंड वाहिली पाहिजे मानव जातीच्या कल्याणासाठी. या विश्वस्वधर्म सूर्य पाहण्यासाठी....!!!

इमेज
 महाराज, हे पाप कशाने धूवायचे? कीर्तनाला ही गर्दी  होऊ शकते.इंदुरीकर तरुणाईला कीर्तनाकडे मोठया संख्येने आकृष्ट करून घेण्यात कमालीचे यशस्वी झाले. त्यांची भाषा विनोदी आहे.उपहासात्मक आहे.व्यंग निर्माण करणारी आहे.ती अस्सलं बोली भाषा आहे.प्रमाण भाषेचा वापर  ते करत नाहीत. इंदुरीकर लोकप्रिय होण्याची कारणे अनेक असले तरी ते फार स्पष्टं बोलतं.स्पष्टं आणि खरं बोलले लोकांना आवडतं. त्यामुळेच  लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले  होते. इंदोरीकरच्या कीर्तनाची भाषा ग्राम्य असली तरी ती अनेकदा अश्लील व शिवराळ असते.लोक इंदुरीकरला शिव्या खाण्यासाठी पैसे देतात असं ही बोललं जातं.  "या बोंकाडी बसा..!!" पठ्याच्या एका डायलॉवर गाणं निघालं.अनेक वरातीत गाजलं.अनेक बेवडे त्यावर थिरकले पण. समाजातील  व्यसनाधीनतेवर  व अनिष्ट  रूढी परंपरेवर ते प्रखर बोलतं असतात. इतकं कटू बोलणं ही लोक एन्जॉय  करायचे. इंदुरीकर यांच कीर्तन या व्याख्येत बसत नाही अशी ओरड काही दिवस चालू होती.पुन्हा असल्या विनोदी कीर्तनाची लाटचं आली.  कपात माशी पडली तर दूध फेकून देतात येतं. दुधाच्या कढईत जर माझ...

टीईटीचं भूत शिक्षकांच्या मानगुटीवर

इमेज
टीईटी परीक्षेचे भूत शिक्षकाच्या मानगुटीवर  प्रस्तावना १ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने (न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व मनमोहन) दिलेल्या निर्णयानुसार, कक्षा १ ते ८ पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरले आहे. हा नियम २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही लागू होतो. या लेखात या निर्णयाची पार्श्वभूमी, परिणाम, तथ्ये आणि शक्य उपाय यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेतला आहे. १. आरटीई २००९ कायद्याची भूमिका राइट टू एज्युकेशन (आरटीई) कायदा २००९ हा भारतातील प्राथमिक शिक्षणाचा कायदेशीर आधार आहे. या कायद्याच्या कलम २३ अंतर्गत शिक्षकांच्या कमीतकमी पात्रतेची अट निश्चित करण्यात आली. त्यानुसार, राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (एनसीटीई) ने २९ जुलै २०११ रोजी टीईटी अनिवार्य केली. टीईटी पेपर १: कक्षा १ ते ५ टीईटी पेपर २: कक्षा ६ ते ८ उत्तीर्ण गुण: १५० पैकी ९० (६०%) २०११ पूर्वी नियुक्त शिक्षकांना ही अट लागू नव्हती. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती सर्वांसाठी बंधनकारक केली आहे. २. इतर देशांतील शिक्षक पात्रता व दर्जा देश पात्रता सामाजिक स...

तुफानातील दिवे

इमेज
 तुफानातील दिवा...!!! अंधार दाटला आहे. गच्च  सभोवती.अशात उजेडाची सुतराम शक्यता नाही.अश्या काळया कुट्ट अंधारात  एक पणती तेवत आहे. तेवढयात वादळ ही सुटलं आहे. आता कसं तेवायचं..?? कसं अंधाराच्या उरावर नाचायचं..??? अंधार असो नाहीतर वादळ असो. ते क्रूरचं असतं. ते तेवत राहिले.. भिडत राहिले.... इवलीशी पणती शरण येत नाही.हा कदाचित तिचा विजय नसतो पण त्या क्रूर अंधाराचा नि वादळाचा सपशेल पराभव नक्कीच असतो. संजय राऊत साहेब, तुम्ही अनेकदा पराभूत केले या भयंकर संकटांना. तुमची झुंज फार कडवी. तुमच्या रक्तातचं आहे ती. तुम्ही या गंभीर आजाराला हरवून ही लवकर बरे व्हालं असा विश्वास ही आहे. पण काही छोटी माणसं मात्र... तुमच्या आजाराला राजकीय संधी बनवतायत. कीचड उडवतायत. दिल ही छोटासा है..!! खरा योध्दा तर आपल्या शत्रूवर  ही प्रेम करतो. तेच तर खरं शौर्याचं तेज असतं. आज राजकारण बाजूला ठेवूया.माणुसकी पुढे येऊ द्या.  मा.पंतप्रधान नरेंद मोदींनी लवकर बरे होण्येसाठी  शुभेच्छा दिल्या.पवार साहेबांनी फोन केला.फडणवीसांनी संवेदना  व्यक्त केल्या.हीच महाराष्ट्राची शान आहे.हीच भारताची माणुसकी आ...

DNA आख्यानं

इमेज
 DNA आख्यान तुमचा डीएनए  कोणता? असा प्रश्न कुणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करणार? आहो,दात ओठ काय खाता? सध्या हा प्रश्न कुणी ही कुणाला विचारू शकत? DNA ही गोष्टं तितकीशी  खाजगी पण राहिली नाही. ती एक सार्वजनिक  बाब झाली आहे. जीवाचा व त्याचा वंशवृक्षचा डीएनए असतो.DNA ची  एक लिपी पण असते.तिचे अर्थ ही उमगले आहेत.DNA ही एक सूक्ष्म जीवशास्त्रीय  संज्ञा आहे. विज्ञान या क्षेत्रात  प्रचंड  गतीने प्रगती करत आहे. DNA चे आख्यान व ज्ञान पाजळण्याचा हेतू नाही माझा.मग कोणता हेतू?  ..तर राजकरणात या DNA शब्दांचा फार वापर सुरू झाला आहे.महाराष्ट्राच्या झणझणीत  राजकीय  भाषेत  DNA ला पर्यायी शब्द आहे आवलाद. जीनस्...?? म्हणजे तुमची अवलाद कुणाची आहे? असा प्रश्न कुणी विचारलं तर लयं गरम नका होऊ.  कुणी कुणाच्या अवलादीवर जाऊ नये.सध्या सर्रास माणसं आवलादीवर जातात.जे जातात त्यांना ही फॉलोअर्स प्रचंड  संख्येने आहेत. लोकशाहीत शेवटी आकडा महत्वाचा असतो. त्यामुळे त्यांचे ही बाहू स्फुरस्फुरतात. नुसता जीव व वंशवृक्ष यांनाच डीएनए नसतो तर राजकीय पक्षाला ...

Phaltan Doctor Death: महिला डाॅक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिस अधिकाऱ्याने केला अत्याचार, CM फडणवीसांचा सातारा एसपींना फोन

इमेज
Phaltan Doctor Death: महिला डाॅक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिस अधिकाऱ्याने केला अत्याचार, CM फडणवीसांचा सातारा एसपींना फोन Phaltan Doctor Death : डाॅ.संपदा मुंडे यांनी हाॅटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्यावर अत्याचार केल्याचा उल्लेख आहे. Phaltan Doctor Death :* साताऱ्यातील फलटण शहरामध्ये महिला डाॅक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी पीडित डॉक्टरनं आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आहे. या नोटीमध्ये पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचे म्हटले आहे. तसेच प्रशांत बनकर याने आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी साताऱ्याचे एसपींना फोन करून तत्काळ दोनही पोलिसांना निलंबित करत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची दखल महिला आयोगाने देखील घेतली असून संबंधितांवर कठोर करावाईच्या सुचना पोलिसांना केल्या आहपीडित डॉक्टर महिलेला त्रास दिला जात असल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली ...

गलिच्छ राजकरणाचा भाडखा प्रशासनाचा बळी ठले डाॅ.संपदा मुंडे.

इमेज
 सरकार आमचं.सत्ता आमची.इथं फक्त आमचं चलं पाहिजे. खासदार,आमदार कुणी असेल? वठं तर आपलाच पाहिजे.  आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं. नोकरी करयाची तर आमच्याशी जुळून घ्या. आमच्या चमच्याशी पण. चेल्याचपाटयाशी पण..... सरंजामशहा असल्याच्या फिलिंग आल्यात अनेक राजकारण्यांना....  ते आणि त्यांचे लाडाचे पाडाचे कार्यकर्ते स्वतःला जहागिरदार समजात.  प्रशासनात पण असे काही चेलेचपाटे असतात. अधिकारी नि पुढारी यांच्यासाठी यांनी कासेची पण सोडलेली असते. प्रशासनातोल हरामखोर अवलादीमुळे राजकारण्याच फावत.  प्रामाणिक, स्वाभिमानी व कर्तव्यकठोर अधिका-याचा डाॅ. संपदा  मुंडे केला जातो.  तुम्ही लाचार असलं पाहिजे. तुम्ही गुलाम असले पाहिजे  सच्चेपणाचा,कर्तव्य निषठतेचा व जनसेवेचा, देशप्रेमाचा पुळका आणला की आम्ही...खपवून नाही घेत. डाॅ.संपदा मुंडे यांची आत्महत्या हा सज्जन नागरिकाला आणि प्रामाणिक अधिका-याला दिलेला सज्जड दम आहे. कळत ना? चड्डीत राहायचं...!!! न्याय द्या..!! न्याय द्या..!!! म्हणून कसली घसाफोड करता तुम्ही? कुठं राहतो तो न्याय? कसला असतो न्याय ? काळा की गोरा...?? गलिच्छ राजकारणाच...

देव,नरेंदमोदी आणि भाविक भक्त महेश कोठारे

इमेज
 देव,नरेंदमोदी आणि भाविक भक्त महेश कोठारे ************************************* तुम्हाला  माहित का? पंतप्रधान  पण बिचारे असतात.क्काय..?? खरचं..!!! सारी टीकाचं त्यांच्या वाट्याला येते.कधी कधी त्यांची पण स्तुती केली पाहिजे.त्यांना पण आपल्या कौतुकाचे दोन शब्द ऐकायचे असतात. का ते माणूस नसतात का?  खरंतर अशी मोठी माणसं दोन कौतुकाच्या शब्दांसाठी आसुसलेले असतात.पंतप्रधानाचे पण भक्त असतात. भक्ताची मांदियाळी कुणाला नको असते बरं?  भक्तात  अंधभक्त नि डोळस भक्त असे प्रकार करू नका.भक्ती ही आंधळीच असते. भक्ताकडून आपल्या आरत्या करून घेणं देवाला आवडतं तसं आपले पोवाडे केलेले कोण्या राजाला आवडत नाहीत?  राजाचं काय घेऊन बसले?आमच्या ऑफीसात आमच्या बाॅसचा एका  टिमके नामक कर्मचाऱ्यांने पोवाडा लिहीला.नुसता लिहिला नाहीतर  तो  जाहीर पणे गाऊन दाखवला. बाॅसची स्वारी खूश..!! मोगँबो खूश हुआ..!! त्या टिमके नावाच्या कारकुनाचे ऑफिसातले महत्व फार वाढले हे सांगणे नको. भक्तीत एक विलक्षण ताकद असते.  आमच्या ऑफिसातील सुंदर चेहरा असलेल्या सुजाता मॅमने मग साहेबाची आरती लिहील...