पोस्ट्स

सत्यवती: एक शापित कुमारी

इमेज
 सत्यवती: एक शापित कुमारी  सत्यवती: एक शापित कुमारी अकाशातून सूर्य सृष्टीवर सोनसळी प्रकाशाचा अभिषेक घालत होता.झाडांच्या पानापानावर ते सोन पिवळ उन्हं सा॔डलं होतं.यमुनेच्या गहि-या खोल प्रवाहाच्या उरावर ते  नाचत होतं.पक्ष्यांचा मंजूळ कुंजरव भवतालात सर्वदूर पसरला होता.यमुना संथ वाहत होती पण त्यात एक लयं होती.दूर पाण्यात कुणी दोन तीन नौका पैलतीरी सोडल्या होत्या. यमुनेच्या शांत निळ्या गहि-या पाण्यावर कुणी तरी ओल्या जलरंगात चित्र रेखाटवं तसं ते सारं विलोभनीय दृश्य दिसतं होतं .सत्यवती-एक- शापित- कुमारी  झाडं वेली बहरली होती.फुलं आपल्या गंधराशी वा-याच्या हवाली करत होते.तो मंद गंध  सर्वत्र दरवळला होता. रानवेली रंगबेरंगी फुलांनी डवरून आल्या होत्या. फुलपाखरं? फुलावर घिरट्या घालत होते.इतक्या शुभवेळी प्रभात समयी महर्षी पराशर मंद पावलं टाकीत किना-याकडे चालत होते.वर बांधलेल्या जटा.टोकदार दाढी.काळी पांढरी. भगवं उत्तरीय पांघरलेले.शुभ्र धवल पितांबर नेसलेले...हातात कमंडलू.लाकडी पादुकाचा टकटक अवाज करत होत्या.लाल गर्द मऊशार माती त्या पवित्र चरणस्पर्शासाठी अतुर  झालेली..!!  ...

हाके मिटकरी आणि प्राण्यांची सभाLaxman hake and Amol mitkari

इमेज
Laxman hake and Amol mitkari जंगलात सर्व प्राण्याची तातडीने एक सभा भरली.वाघ,सिंह,खोकडं,गेंडे,हत्ती,कुत्री,मांजर,डुक्कर,गाढव कोल्हा,हरीण,ससे एक नाय सारचं प्राणी झाडून आले होते. विषय काय होता तर?माणसं देत असलेल्या शिव्या. Laxman hake and Amol mitkari "त्यांच्या शिव्या आणि आपली सभा कमून बोलीली? माणसा सारख्या बुध्दिमान माणसाच्या फंदयात आपून कशाला पडायचं?"  चतुुर कोल्हयांनं प्रश्न उपस्थित केला.त्याचं भी खरचं होतं.माणसाच्या विरोधात सभा घेऊन काय होतं? "माणसानं त्यांच्या आया बहिणीचा उद्दार करणा-या शिव्या खुशाल द्याव्यात.आपल्याला फक्त मधी घेऊ नये एवढीचं माफक इच्छा. !!" माकडं म्हणालं."ते कशाला आपल्याला मध्ये घेतील? ते माणसं आहेत. सुसंस्कृत असतात.त्यांना धर्म,संस्कृती वगैरे असते." चित्याने स्पष्टीकरण  दिले' Laxman hake and Amol mitkari' "कशाची डोंबल संस्कृती त्यांची? गेल्या आठवड्यात नाही पाहिलय का तुम्ही हायवेवर काय करत होते? आम्हाला हाय शंकराचा शाप पण माणसांना काय?खुशाल भर रस्त्यावर..छी..!!लाज वाटली बुवा आपल्याला." एक कुत्रं आपली व्यथा मांडत बोलल...

आपण फक्त क्रिकेटचे प्रेक्षकरूपी ग्राहक आहोत

इमेज
  RCB नामक कोणे एका टिमच्या विजयोत्सवामध्ये 11 चाहते चेंगरून मरण पावले. जे झाले ते दुर्दैवीच .IPL-2025    #कथा आणि व्यथा आयपीएल-2025 विजयी मिरवणूक बंगलोर  वास्तविक पाहता IPL वगैरे हे शुद्ध व्यवसायिक गणितं डोळ्यांसमोर ठेवून आयोजित केलेला तद्दन व्यवसाय आहे. लिलाव होतात खेळाडूंचे. ते ही ठीक. मनोरंजनही ठीक. प्रत्येक देशाचा एक स्वभावधर्म असतो व त्यानुसार त्या देशाचे वर्तन असते. तशी भारताची राष्ट्रभक्ती ही पाकिस्तान व क्रिकेट या दोन गोष्टींवर ऊतू येते. यानंतर ती कोमात जाते. वास्तविक पाहता उद्योजकांनी विकत घेतलेल्या या संघांचा आणि देशाचा नेमका काय संबंध ? काही उत्पादनांची खरेदी -विक्री व टॅक्स सोडला तर देशाशी याचा संबंध नाही. देशतपातळीवरील क्रिकेट टिम ही देशासाठी खेळते असाही एक समज सातत्याने बिंबविण्यात आला आहे. वास्तविक पाहता हा संघ BCCI या खाजगी संस्थेसाठी खेळतो. यापुढेही कमाल म्हणजे जगात 200 पेक्षा अधिक देश आहेत आणि 12 देशातल्या स्पर्धेला हे विश्वचषक (World Cup ) म्हणवून घेतात. अगदी अलीकडच्या काळापर्यंत या 12 देशांमध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया देश सोडले तर बहुतांशी मागास द...

संशयाचा व्हायरस

इमेज
  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या नातेवाईकांच्या लग्नात मी सुंदर दिसले पाहिजे अशी रवीचीचं खूप इच्छा होती.तिथं मला न पाहिलेले अनेक नातेवाईक असणार आहेत.त्यात मी कशी उठून दिसले पाहिजे अशी रवीची इच्छा होती.नटायला सजायला कुणाला आवडणार नाही?       मी गुलाबी रंगाची साडी, हलका मेकअप आणि माझ्या आवडीचं मंगळसूत्र घातलं होतं.रवीने मला तयार होताना पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. "रचना, तू आज खूपच सुंदर दिसतेस.मला गर्व आहे की तू माझी बायको आहेस,"तो म्हणाला आणि मिठ्ठी मारली. त्याच्या या अतितायीपणाचा मला राग आला.माझं सारं मेकअप ही खराब होऊ शकला असता आणि साडी चुरगाळली पण असते.एक झालं माझं मन भरून आलं.नव-याच्या असल्या गोड हरकती कुणाला नको असतात?  "रवी, हे काय केलस? मी फक्त तुझीच आहे ना? मग इतका उतावीळपणा का?" मी लटकेच राग चेह-यावर पसरवला.त्याने माझा हात हलकेच दाबला,आणि चक्क गालावर ओठ...  माझं अंग शहारून आलं.मी त्याला लाडात येऊन गुद्दे घातले.तसा तो बाहेर पळाल...

गुणवत्ता यादी बंद असातना कोण मुलांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलत आहेत? Merit list

इमेज
      SSC Merit list प्रस्तावना   नुकताच म हाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल लागला . गुणवंत विद्यार्थ्यांचे सोहळे , कौतुकाचे ढोल वाजवधक सुरूच आहे. गुणवंतांना प्रोत्साहन पण पाहिजे.अलीकडे याचा ही बाजार सुरू करण्यात आला आहे. ज्या उददेश्यांनी सरकारीनी ही यादी बंद केली. ते सारे हेतू धूळीस मिळवण्याचे काम काही लोक करत आहेत.आता जिकडे तिकडे जाहिरती सुरू आहेत. गुणवत्ता यादीत आपणच कसे अव्वल आहोत अश्या जाहिरती करण्यात येते आहेत.क्लासची आणि खाजगी शाळांची त र सुगी च सुरू होते. पालकांना चुकीची माहिती देऊन त्यांना प्रभावित केले जात आहेत. पण , महाराष्ट्र सरकारने गुणवत्ता यादी ( Merit List) बंद केली असतानाही , खासगी शाळा आणि कोचिंग क्लासेस बनावट यादी तयार करून पालकांना आकर्षित करतात. तसेच अनेक खाजगी परीक्षा उन मुलांना मानसिक ताणास व जीवधेण्या स्पर्धेत ढकलत आहेत. शालेय प्रशासन या सा-या गोष्टीकडे दुललललर्लक्ष करत आहेत.           सरकारने गुणवत्ता यादी बंद करण्यामागील कारणे आणि खासगी संस्था तसेच प्रसारमाध्यमे याचा ...

नरकातील स्वर्ग – संजय राऊत यांचे कारागृहातील अनुभवकथन Narkatil Swarg by Snjay Raut

इमेज
  नरकातील स्वर्ग – संजय राऊत यांचे कारागृहातील अनुभवकथन   Narkatil Swarg by Snjay Raut लेखक: संजय राऊत प्रकाशक: New Era Publications प्रकाशन दिनांक: 17 मे 2025 प्रकार: आत्मकथन / मराठी राजकीय साहित्य मिट्ट काळोखाची अखेर नजरेला सवय होतेच. समाजाला आणि माणसांनाही. म्हणून कोणालाही मिट्ट काळोखाची भीती वाटणं काही कमी होत नाही. ज्या काळोखाची पुढे सवय होते, त्या काळोखाला अगोदरच आव्हान देऊन त्यात उडी मारणारी माणसं फार कमी असतात. मुळात ती माणसं तशीच जन्मत असतात की घडत जातात, हाही एक विवाद्य विषय आहे. संजय राऊत हा असाच एक माणूस. २०१४ साली भारतात फॅसिस्ट काळोखाची छाया पसरू लागली. २०१६ च्या मनमानी नोटबंदीने तो काळोख देशभर पसरवला, अधोरेखित केला. त्यानंतर भाजप संघप्रणीत राजवटीचे स्वमर्जीने स्लीपर सेल बनलेल्या अस्सल भारतीय गेस्टापो एजन्सीज, आयटी, ईडी, सीबीआय, एनएसए आणि एनसीबी यांनी सत्तापक्षाच्या राजकीय विरोधातल्या सर्व व्यक्ती, संस्था आणि राजकीय पक्ष यांना लक्ष्य बनवले. देशभर खोट्या आरोपपत्रांद्वारे विरोधातल्या व्यक्ती, शक्ती, उद्योगपती आणि पक्ष यांच्यावर लाखो पानांची आरोपपत्रं लिहिली ग...

साहित्यवीर छत्रपती संभाजी महाराज – विद्वत्ता, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा अद्वितीय

इमेज
साहित्यवीर छत्रपती संभाजी महाराज – विद्वत्ता, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा अद्वितीय संगम  छत्रपती- संभाजी -महाराज छत्रपती संभाजी महाराज हे केवळ मराठा साम्राज्याचे दुसरे अधिपती नव्हते, तर ते एक अत्यंत विद्वान, तत्वज्ञानी आणि बहुभाषिक साहित्यिकही होते. त्यांच्या आयुष्याचा वेध घेतल्यास आपणास त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील असामान्य पैलू दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, राजमाता जिजाऊंचे नातू आणि राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचे भक्त असलेल्या संभाजी राजांनी केवळ तलवारीचे धारच नव्हे, तर लेखणीचे सामर्थ्यही दाखवून दिले. " छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराजांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. बालपणापासूनच त्यांच्यावर संस्कारांचे आणि शास्त्रविद्येचे घडण झाले. केवळ युद्धशास्त्रच नव्हे, तर संस्कृत, हिंदी, इंग्रजी, पर्शियन, उर्दू, मराठी या सात भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी 'बुद्धिभूषण', 'नायिकाभेद', 'सप्तशतीचा' अनुवाद, अशा अनेक ग्रंथांची निर्मिती केली. ‘बुधभूषण’ हा संस्कृत भाषेतील त्यांचा ग्रं...