सोमवार, २६ मे, २०२५

संशयाचा व्हायरस

 

संशयाचा व्हायरस
संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest 

माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या नातेवाईकांच्या लग्नात मी सुंदर दिसले पाहिजे अशी रवीचीचं खूप इच्छा होती.तिथं मला न पाहिलेले अनेक नातेवाईक असणार आहेत.त्यात मी कशी उठून दिसले पाहिजे अशी रवीची इच्छा होती.नटायला सजायला कुणाला आवडणार नाही?

      मी गुलाबी रंगाची साडी, हलका मेकअप आणि माझ्या आवडीचं मंगळसूत्र घातलं होतं.रवीने मला तयार होताना पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं. "रचना, तू आज खूपच सुंदर दिसतेस.मला गर्व आहे की तू माझी बायको आहेस,"तो म्हणाला आणि मिठ्ठी मारली.


त्याच्या या अतितायीपणाचा मला राग आला.माझं सारं मेकअप ही खराब होऊ शकला असता आणि साडी चुरगाळली पण असते.एक झालं माझं मन भरून आलं.नव-याच्या असल्या गोड हरकती कुणाला नको असतात?


 "रवी, हे काय केलस? मी फक्त तुझीच आहे ना? मग इतका उतावीळपणा का?" मी लटकेच राग चेह-यावर पसरवला.त्याने माझा हात हलकेच दाबला,आणि चक्क गालावर ओठ... 


माझं अंग शहारून आलं.मी त्याला लाडात येऊन गुद्दे घातले.तसा तो बाहेर पळाला.एक बरं झालं होतं.घरात कुणी नव्हतं.असा त्याचा कंट्रोल सुटणं हे काय नवीन नव्हतं.


        लग्नाच्या ठिकाणी सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे वळल्या.


 "रवी, तुझी बायको खूपच छान दिसते!" एक काकू म्हणाल्या.मी लाजले पण रवीचा चेहरा अभिमानाने फुलून आला होता.


 "रचना, तू सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंस," तो हसत म्हणाला व माझा चिमटा काढला.अर्थात इतकी लगट रवीची बरी नव्हती.रोमान्स अश्या सार्वजनिक ठिकाणी? लोक काय म्हणतील?


 पण स्वारी लांब जायलाच तयार नव्हती पण त्या संध्याकाळी एक प्रसंग घडला, ज्याने सगळं बदललं. काही क्षणच दुर्दैवी असतात का?


मी मंडपात फिरत होते. नातेवाइकांशी बोलत होते, तेव्हा मला जाणवलं की एक तरुण माझ्या मागे मागे येतोय.तो मला सतत न्याहाळत होता आणि त्याचं असं पाठलाग करणं मला अस्वस्थ करत होतं.


कधी तो माझ्या जवळ येऊन हसत होता तर कधी मला पाहून काहीतरी बोलत होता.


पुरूषी नजरा तर अनेक माझ्यावर खिळलेल्या होत्याचं पण हे बावळट हद्द सोडत होते.कदाचित हे रवी पाहतो तर दोघांचे भांडण होऊ शकतात.


त्याचं कृत्य मी स्पष्टं रवीला सांगणं सोप नव्हतं? गजब झाला असता रवीचा राग कंट्रोल करणं फारचं कठीण.


 एकदा तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "तुम्ही खूप सुंदर दिसता.मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय का?" मी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.


 "मला माफ करा, पण मी तुम्हाला ओळखत नाही," मी थंडपणे म्हणाले आणि तिथून निघाले पण तो थांबला नाही. त्याने पुन्हा माझ्या मागे येऊन विचारलं, "तुमचं नाव काय? तुम्ही मॉडेल आहात का?" मला राग आला, पण मी शांत राहिले आणि रवीजवळ आले.


"कोण तो?" रवीनं रागातचं विचारलं.


"मी नाही ओळखत त्याला." रवी रागातचं होता.त्याचा चेहरा वरमला होता.रवीचं असं अपसेट होणं मला ही सहन होणारं नव्हतं. त्या बावळटच वागणं ही योग्य नव्हतं.मी त्याला लगेच उत्तर द्यायला हवे होते का?


मी हसून पाहिलं.त्याला चिमटा घेऊन पाहिल पण रवीची खळी खुलतं नव्हती.


तो शांत होता, पण त्याच्या शांततेत राग दडला होता.ही वादळापूर्वीची शांतता असावी अशी माझी खात्री झाली होती.


हे सारं मला कळतं होत पण मी काय करं शकत होते?


 रात्री जेव्हा आम्ही एकटे होतो तेव्हा तो अचानक ओरडला, "रचना, तो कोण होता?खरं खरं सांग. त्या मुलाला तुझ्याशी असं बोलण्याची हिम्मत कशी झाली?" माझे डोळे पाण्याने भरले.


 "रवी, मला खरंच माहित नाही तो कोण होता," मी गोंधळून म्हणाले.


रवीनं माझ्यावर ॲटकच केला होता.


 "तो माझ्या मागे येत होता, पण मी त्याला स्पष्ट सांगितलं की मला त्याच्याशी बोलायचं नाही.मी त्याला प्रोत्साहन दिलं नाही."


"मग तो तुझ्या मागे का आला?" रवीने रागात विचारलं.


" खरचं, तो मागे आला पण.मी काहीच चूक केली नाही."मी काकुळती येऊन सांगत होते.त्या पागलचा चेहरा ही मी नीट पाहिला नव्हता. आता हे रवीला मी कसं पटवून देणार होते?


 "तुझ्या सौंदर्यामुळे सगळे तुझ्याकडे आकर्षित होतात, आणि तू त्यांना थांबवत नाहीस!"


"रवी, तू असं कसं बोलू शकतो?" मी अश्रूंना आवरत म्हणाले. 


"मी तुझ्यासाठी नटले होते,तुझ्यासाठी सुंदर दिसले. त्या मुलाचा माझ्याशी काहीच संबंध नाही."


"रचना, तू,त्याला सिग्नल दिला असशील तो लाईन मारत होता आणि तू....!!" तो रागाने दात खात होता.त्याच्या रागाच्या पा-याने सर्वोच्च बिंदू गाठला होता. मी प्रचंड घाबरले.


"शपथ..!! मला तो कोण खरचं माहित नाही "


 "मला असं वाटतं की मी तुला पुरेसा नाही." त्यांनी जोरात पाय आपटले. त्याचा राग तेवढ्यावरच थांबला होता.ते तरी बरं झालं होतं.


"रवी, तू माझ्यासाठी सगळं आहेस.फक्त तुझी मी." मी त्याचा हात हातात घेत म्हणाले पण रवी काहीच बोलला नाही. त्याच्या शांततेने मला अस्वस्थ केलं.


       त्या रात्री तो प्रणयात ही रागात होता.असं जाणवतं होतं की तो कुठला तरी सूड घेतोय.


त्या प्रसंगानंतर रवीचा संशय वाढत गेला.मी सोशल मीडियावर आमच्या लग्नाच्या आठवणी शेअर करायचे कारण मला त्या क्षणांना जपायचं होतं.एकदा मी आमच्या लग्नाच्या फोटों शेअर केले.ज्यात मी आणि रवी हसत होतो.


मला वाटलं यामुळे त्याला बरं वाटेल पण त्यावर एका अनोळखी व्यक्तीची कमेंट आली, "रचना, तू खूपच हॉट दिसतेस! रवी खूप लकी आहे!" रवीने ती कमेंट वाचली आणि त्याचा राग पुन्हा उसळला.


"रचना, तू हे सगळं का शेअर करतेस?" तो ओरडला. "त्या मुलासारखे लोक तुझ्या पोस्टवर अशा कमेंट्स करतील आणि मला ते सहन होणार नाही!"


"रवी,मी फक्त आपल्या आठवणी शेअर केल्या, कुणातरी अनोळख्या व्यक्तीसाठी तू माझ्यावर संशय घेतोस?" मी डोळ्यांत पाणी साठवत म्हणाले.


 "त्या कमेंट्स माझ्यासाठी काहीच अर्थ ठेवत नाहीत. मी तुझ्यासाठी हे सगळं करते आणि तू ...?" पुढचे शब्द माझे माझ्या हुंदक्यात विरघळले.


"रचना, तुझ्या सौंदर्यामुळे सगळे तुझ्याकडे आकर्षित होतात पण तू सुध्दा काही पथ्यं पाळली पाहिजेत." तो रागात म्हणाल


"रवी, तुझा माझ्यावर विश्वास नाही का?" मी हळूच विचारलं. "मी तुझ्यासाठीच आहे. माझं सौंदर्य, माझं प्रेम, सगळं तुझ्यासाठी आहे.लग्नाच्या आधीपासून तू मला ओळखतोस.आपलं लव्ह मॅरेज आहे ना?तुझ्याच फक्त प्रेमात आहे मी. मीच नाही प्रत्येक स्त्रीकडे त्या नजरेनं पाहणारे अनेक हलकट पुरूष असतात रे.त्यात आमचा स्त्रीयांचा काय दोष?"


तो काहीच बोलला नाही फक्त नजर खाली घेऊन बसला.तो स्वतःला कमी समजत होता.त्याचा आत्मविश्वास कुठं न कुठं कमी होत चालला होता.


माझं हृदय तुटत होतं पण मी शांत राहिले.


संशयाचं भूत एकदा मानगुटीवर बसले की खाली उतरणं एवढं सोप नव्हतं.


मी पण माझ्यात बदल करून घेतले होते.नटणं असेल, मुरडणं असेल.हसणं असेल.बोलणं असेल.सा-याचं बाबतीत मी सावध झाले होते.संशयाच्या पडलेल्या ठिणगीचा मला वणवा होऊ द्यायचा नव्हता.


एक रात्री मी रवीला जवळ घेतलं आणि माझ्या मनातलं सगळं मांडलं. "रवी, तू माझ्यासाठी सगळं काही आहेस," मी अश्रूंना आवरत म्हणाले. 


"त्या मुलाचा माझ्याशी काहीच संबंध नाही. मी तुझ्यासाठी नटते, तुझ्यासाठी सुंदर दिसते. माझं सौंदर्य तुझ्यासाठी आहे, आणि मी तुझ्यासाठीच आहे. तुझा राग मला समजतो, पण तुझा संशय मला दुखावतो." मी कधीतरी हे त्याला बोललं पाहिजे होतं.


रवीने माझ्याकडे पाहिलं, आणि त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. 


"रचना, मला माहित आहे तू माझ्यासाठी खूप काही करतेस. पण जेव्हा लोक तुझ्याकडे त्या नजरेने पाहतात, तेव्हा मला भीती वाटते. मला वाटतं की मी तुझ्यासाठी पुरेसा नाही."


"रवी, तू माझ्यासाठी सगळं आहेस.तुझा हात हाती असला की माझी सारी सुखं माझ्या पायाशी लोळणं घेत आहेत असं वाटतं मला."


मी त्याचा हात हातात घेत म्हणाले.


 त्या रात्री आम्ही एकमेकांना मिठी मारली, आणि मला वाटलं की कदाचित आता सगळं ठीक होईल पण रवीच्या मनातली शंका पूर्णपणे गेली नव्हती.




             एकदा मी माझ्या मैत्रिणींसोबत बाहेर गेले होते. माझा जुना मित्र, राहुल, तिथे होता.आम्ही सगळे हसत-खिदळत गप्पा मारत होतो,आणि राहुलने आमचा एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्याने कॅप्शन लिहिलं, "रचनासोबतच्या जुन्या आठवणी! रचना,तू कायम स्टार आहेस.आज ही.. सदैव...!!" मी हसले कारण राहुल माझा चांगला मित्र होता आणि त्याचं ते कॅप्शन फक्त मैत्रीचं प्रतीक होतं.


पण रवीने तो फोटो पाहिला आणि त्याचा राग पुन्हा उसळला.


 "रचना, हा कोण राहुल?" तो ओरडला. 


"तू मला का सांगितलं नाहीस की तू त्याच्यासोबत भेटलीस?"


"रवी, तो माझा फक्त मित्र आहे मी एकटी नव्हते.त्याची बायको होती सोबत आणि आम्ही दोघी तिघी मैत्रणी पण." मी समजावण्याचा प्रयत्न केला.


 "मी तुला सांगितलं होतं की मी मैत्रिणींसोबत जाणार आहे. त्या फोटोत काहीच गैर नाही!"


"पण त्याने तुझ्यासाठी 'स्टार' असं का लिहिलं?" रवीने रागात विचारलं. 


माझे डोळे पाण्याने भरले.


 "रवी, तू माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीस?" मी हळूच म्हणाले.


 "मी तुझ्यासाठी सगळं करते, तुझ्यासाठी जगते. पण तुझा संशय मला दुखावतो.मी फक्त तुझीचं आहे रे. तुझ्याशिवाय मी कुणाचाच विचार नाही करू शकतं." माझे डोळे रडू न लाल झाले होते.


तो शांत होता.संशयाचे व्हायरस एकदा का मेंदूत शिरले की ते मेंदूवर पूर्ण कब्जा घेत असतील? रवी वेगळयाचं विश्वात गुंतला होता. संशयाचं पण वेगळचं विश्व असेल काय? रवी कायम संशयाच्या नजरेनं माझ्याकडे पहात होता.


एका संध्याकाळ मी रवीसाठी खास सरप्राइझ प्लॅन केलं.मी त्याला आमच्या लग्नाच्या ठिकाणी परत नेलं, आणि तिथे एक छोटी डेट प्लॅन केली. मी त्याला माझ्या मनातलं सगळं सांगितलं. "रवी, तू माझ्यासाठी सगळं काही आहेस," मी अश्रूंना आवरत म्हणाले. "त्या मुलाचा, राहुलचा, किंवा कोणाच्याही माझ्याशी काही संबंध नाही. मी तुझ्यासाठीच नटते.तुझ्यासाठीच सुंदर दिसते आणि मी तुझ्यासाठीच आहे.तुला हे का कळतं नाही?"


रवीने माझ्याकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यांत पाणी आलं.तो खचत चालले होता.माझे सगळे प्रयत्न अपुरे पडले.रवीच्या मनातला संशय कमी होत नव्हता. एकदा मी सोशल मीडियावर आमच्या डेटच्या रात्रीचा फोटो शेअर केला आणि त्यावर एका अनोळखी व्यक्तीने कमेंट केली, "रचना, तू खूपच सुंदर दिसतेस!" रवीने ती कमेंट पाहिली.


"तू सा-यांनाच का आवडतेस?" रवीचा हा प्रश्न होता.


"मी कुणाकुणाला आवडते हे मी ठरू शकत नाही पण मला फक्त तू आवडतोस." मी त्याला विश्वास देण्याचा प्रयत्न केला अर्थात त्याला हे पटणारं नव्हतं.


"असली नाटकं बंद कर.तुझं खरं रूप मला कळलं आहे." तो क्रूरपणे मला बोलला.


मला काय वाटेल याचा,त्यानं अजिबात विचार केला नाही.माझं हृदय तुटलं.मी त्याच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांत अश्रू साठवत म्हणाले, "रवी, माझं काय चुकलं? मी तुझ्यासाठी सगळं करते,तुझ्यासाठी नटते, तुझ्यासाठी जगते.तुझा विश्वास माझ्यावर नाही, तर हे नातं कसं टिकेल?" तो काहीच बोलला नाही.त्या रात्री आम्ही एकाच घरात परके झालो.


 नातं विश्वासावर आणि संवादावर टिकतं, आणि माझा स्वतःवरचा विश्वास मला कधीच डगमगू देणार नाही. मी माझं आयुष्य माझ्या मर्जीनं जगणार आहे. प्रत्येक नव-याला बायको म्हणजे सुंदर बाहुलीसारखी हवी असते.


ती शोभेची वस्तू का? तिला पण एक मनं असतं. ती जिवंत माणूसचं असते ,ना?


जेव्हा माणूस सौंदर्यावर नाहीतर मनावर प्रेम करेल तेव्हाचं हे नातं टिकतं.जिथे विश्वास आणि संवादाचा पूल मजबूत असतो.


 आमच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी एक खास सरप्राइझ प्लॅन केलं.मी त्याला आमच्या पहिल्या डेटच्या जागी, एका शांत तलावाच्या किनाऱ्यावर नेलं. तिथे मी टेबल सजवलं.रवीच्या आवडीचं जेवण बनवलं होतं.


रवीला अशी सरप्राईज व्हीजीट देणार होते.तो कल्पना करणं ही शक्य नव्हतं.


 अचानकच तिथं राहूल आला.त्यानं आम्हाला विश केलं.राहुलला पाहिलयं की रवीचा चेहरा लालबुंद झाला होता.त्याला भयंकर राग आला.तो माझ्याकडे ही रागाने पहात होता. तेवढ्यात कुणीतरी आलं होतं.


"हॅप्पी ॲनव्हसरी रवी अ‍ॅन्ड रचना .!!" रवीनं तो नाजूक आवाज ऐकला.हा त्याला शाॅक होता. रेवा हासत हासत आली होती. रेवा रवीची काॅलेज फ्रेंड...!! ती इथं कशी? आपण स्वप्नात तर नाही ना?असा संशय रवीला आला होता.


"रेवा..आणि तू कशी इथं..??"


"तू तर कधी सांगितलं पण नाहीस.बोलवलं वहिनी आले.!!" रेवाचं हासणं रवी नुसता पहात राहिला.


रवीचा गोंध॓ळ उडालेला पाहून मी त्याला सारा प्लॅन सांगितला.


"राहुलच्या मित्राची बायको आहे रेवा.राहुलला मी माझ्या व्यथा सांगितल्या.त्यानं रेवाची माहिती घेतली. रेवानं तुझ्या व तिच्या संबधाविषयी सार सांगत होती मला अनेकदा .तुमच्या निखळ मैत्री विषयी. तुला हुडकून कशी राखी बांधली होती हा पण किस्सा...!!


राहुल तर मला भावापेक्षा कमी नाही.


मग हा प्लॅन ठरला.


रवी नुसतं ऐकत राहिला.


"रेवाची तुझी ओळख झाली होती." हे त्याला अश्चर्य होतं.


" रवी, मला कुठल्या ही परिस्थितीत तुला गमवायचं नव्हतं.मी काही ही करू शकते तुझ्यासाठी" मी त्याला मिठ्ठी मारली.माझं डोळं भरून आलं होतं. 


रेवा व राहुल टाळया वाजवत आम्हाला विश करत होते. राहुल आणि माझ्या संबंधांविषयी रेवानं त्याला सारं सांगितलं.


" बायको सुंदर असली की,एवढी रिस्क तर घ्यावीच shabdgandha.com

शुक्रवार, २३ मे, २०२५

गुणवत्ता यादी बंद असातना कोण मुलांना जीवघेण्या स्पर्धेत ढकलत आहेत? Merit list

     

SSC Merit list
SSC Merit list

प्रस्तावना

 नुकताच महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल लागला. गुणवंत विद्यार्थ्यांचे सोहळे, कौतुकाचे ढोल वाजवधक सुरूच आहे. गुणवंतांना प्रोत्साहन पण पाहिजे.अलीकडे याचा ही बाजार सुरू करण्यात आला आहे. ज्या उददेश्यांनी सरकारीनी ही यादी बंद केली. ते सारे हेतू धूळीस मिळवण्याचे काम काही लोक करत आहेत.आता जिकडे तिकडे जाहिरती सुरू आहेत. गुणवत्ता यादीत आपणच कसे अव्वल आहोत अश्या जाहिरती करण्यात येते आहेत.क्लासची आणि खाजगी शाळांची सुगी सुरू होते. पालकांना चुकीची माहिती देऊन त्यांना प्रभावित केले जात आहेत.

पण,महाराष्ट्र सरकारने गुणवत्ता यादी (Merit List) बंद केली असतानाही, खासगी शाळा आणि कोचिंग क्लासेस बनावट यादी तयार करून पालकांना आकर्षित करतात. तसेच अनेक खाजगी परीक्षा उन मुलांना मानसिक ताणास व जीवधेण्या स्पर्धेत ढकलत आहेत. शालेय प्रशासन या सा-या गोष्टीकडे दुललललर्लक्ष करत आहेत.

          सरकारने गुणवत्ता यादी बंद करण्यामागील कारणे आणि खासगी संस्था तसेच प्रसारमाध्यमे याचा कसा गैरवापर करतात याचा आढावा घेऊ.

महाराष्ट्र सरकारने गुणवत्ता यादी का बंद केली?

महाराष्ट्र सरकारने 2010 मध्ये दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता यादी बंद करण्याचा निर्णय घेतला.यामागील प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  • विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करणे

    • गुणवत्ता यादीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होत होती, ज्यामुळे मानसिक दबाव वाढत होता. अनेक विदयार्थ्यांच्या आत्म्हत्या होत होत्या. पालक ही मुलांना कमालीची ताण निर्माण करत होते.
    • जे विद्यार्थी यादीत स्थान मिळवू शकत नव्हते, त्यांना वैफल्याचा सामना करावा लागत होता. मुलांच वर्गीकरण केल्यामुळे अनेक मुले नैराश्यात जात होते.तू अव्वल येऊ शकला नाही याची  टोचणी मुलांना कायम ऐकवली जात होते. सर्वच मुलांना पहिलाच नंबर हवा असे..अतिमहत्वाकांक्षी पालक ही आग्रह धरत. त्यामुळे गुणवंत विदयार्थी स्ट्रेसमध्ये येत. या सा-या तणावामुळे पालकांनी ही ताण येत असे. मुलांच्या व्यक्तीमत्व  जडण घडणीमध्ये गुणवत्ता यादीमध्ये अव्वल  असणं पुरेसे नसतं.
    • सरकारचा उद्देश होता की, यादी बंद केल्याने विद्यार्थ्यांचा ताण कमी होईल आणि त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार प्रोत्साहन मिळेल. विदयार्थ्यांध्ये जीवधेणी स्पर्धा होणार नाही

  • सर्वसमावेशक शिक्षणाला प्रोत्साह

    • गुणवत्ता यादी केवळ गुणांवर आधारित होती, ज्यामुळे कला, क्रीडा किंवा सामाजिक कार्यात उत्कृष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत नव्हते. त्यांच्या या क्षमतेचा कौशल्याचा विचार ही यादी केला जात नाही. सर्वकष मूल्यामापन ही होत नाही. गुणवत्ता यादी फक्त मुलांमुलामध्ये पराकोटीच्या तुलनेला जन्म देत होती. सर्वसमावेशक शिक्षण, सर्वांगीण विकास, समान संधी
    •  
    • यादी बंद केल्याने सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल आणि सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा सरकारचा दृष्टिकोन होता. परीक्षातून आपण त्याच्या क्षमता तपासू शकतो. इतर  मुलांमध्ये सपर्धा करण्याची काही ही गरज नसते.
    • सर्वसमावेशक शिक्षण, सर्वांगीण विकास, समान संधी                                                                                          

  • शिक्षणाच्या व्यावसायिकरणाला आळा

    • गुणवत्ता यादीचा उपयोग खासगी शाळा आणि कोचिंग क्लासेस जाहिरातींसाठी करत होते, ज्यामुळे शिक्षणाचे व्यावसायिकरण वाढत होते. गुणवंत विदयार्थी आपल्याच  क्लासमध्ये असावेत. शाळेत असावेत यासाठी शाळा क्लासवाल गैरमार्गचा वापर करीत होते.
    • यादी बंद केल्याने या अस्वस्थ स्पर्धेला आळा बसेल, अशी सरकारची अपेक्षा होती.
    • उप-कीवर्ड: शिक्षणाचे व्यावसायिकरण, खासगी शाळा जाहिराती

  • सामाजिक समता आणि समान संधी

    • यादीत बहुतांश वेळा शहरी किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांचेच नाव येत असे, ज्यामुळे ग्रामीण आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कमी लेखले जाईल, अशी भीती होती. ही दरी वाढत जाणे निकोप समाजासाठी फार घातक होते. आता ही आपल्या धंदयापुढे क्लास वाले शाळां यांना याचे भान नाही.सामाजिक समताग्रामीण विद्यार्थीमागासवर्गीय विद्यार्थी
    • यादी बंद केल्याने सामाजिक समता राखण्याचा प्रयत्न केला गेला.
    • खासगी संस्था आणि प्रसारमाध्यमांचा गैरवापर

      गुणवत्ता यादी बंद असतानाही, खासगी शाळा, कोचिंग क्लासेस आणि काही प्रसारमाध्यमे याचा गैरवापर करतात. यामुळे शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात येत आहे.

      • बनावट गुणवत्ता यादी आणि खोट्या जाहिराती

        • अनेक खासगी शाळा आणि कोचिंग क्लासेस स्वतःच्या बनावट गुणवत्ता यादी तयार करतात.
        • उदाहरणार्थ, “आमच्या शाळेचा 100% निकालकिंवा आमच्या क्लासचा विद्यार्थी प्रथमअशा अतिशयोक्तीपूर्ण जाहिराती केल्या जातात.
        • या जाहिरातींमुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात आणि त्यांना खोट्या आकर्षणात अडकवले जाते.
        • उप-कीवर्ड: बनावट यादी, खोट्या जाहिराती, कोचिंग क्लासेस

      • प्रसारमाध्यमांचा गैरजबाबदारपणा

        • काही स्थानिक वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमे आर्थिक हितसंबंधांमुळे या बनावट यादी आणि जाहिरातींना प्रसिद्धी देतात.
        • टॉपर्सच्या मुलाखती आणि शाळांच्या जाहिराती मोठ्या प्रमाणात छापल्या जातात, ज्या अनेकदा खोट्या असतात.
        • यामुळे खऱ्या पत्रकारितेचे महत्त्व कमी होते आणि समाजात गैरसमज पसरतात.
        • उप-कीवर्ड: प्रसारमाध्यमे, गैरजबाबदार पत्रकारिता, जाहिरातींचा प्रभाव

      • शालेय प्रशासनाची उदासीनता

        • शालेय प्रशासनातील अधिकारी या गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करतात.
        • बनावट यादी आणि जाहिरातींवर कारवाई न केल्याने खासगी संस्थांना मोकळे रान मिळते.
        • यामुळे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कमी होते.
        • उप-कीवर्ड: शालेय प्रशासन, सरकारी अधिकारी, पारदर्शकता
      • विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर परिणाम
        • बनावट यादी आणि जाहिरातींमुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होतो आणि त्यांचा आत्मविश्वास डगमगतो.
        • पालकांना महागड्या शाळा आणि क्लासेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
        • उप-कीवर्ड: विद्यार्थ्यांचा गोंधळ, पालकांचा आर्थिक भुर्दंड

      असं का घडतं?

      • नैतिक मूल्यांचा अभाव

        • शिक्षणाचे व्यावसायिकरण आणि आर्थिक हितसंबंध यामुळे नैतिक मूल्यांचा ऱ्हास झाला आहे.
        • शाळा आणि क्लासेस विद्यार्थ्यांचे यश फक्त आपल्या फायद्यासाठी वापरतात.

      • नियामक यंत्रणेची कमतरता

        • सरकारकडे बनावट यादी आणि जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस यंत्रणा नाही.
        • शिक्षण खात्याकडून कठोर कारवाईचा अभाव आहे.

      • सामाजिक मानसिकता

        • समाजात टॉपरआणि गुणवत्तायांना अतिशय महत्त्व आहे, ज्यामुळे खासगी संस्थांना पालकांना आकर्षित करणे सोपे जाते.

      • प्रसारमाध्यमांचे हितसंबंध

        • जाहिरातींमुळे मिळणारा महसूल हा प्रसारमाध्यमांचा प्रमुख प्रेरक आहे, ज्यामुळे ते खोट्या माहितीला प्रसिद्धी देतात.
        • SSC Merit list
          SSC Merit list



      उपाय काय?

      • कठोर नियामक यंत्रणा

        • खासगी शाळा आणि कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर नियम लागू करावेत.
        • बनावट यादी प्रसिद्ध करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी.

      • जागरूकता मोहीम

        • पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या खऱ्या उद्देशाबद्दल जागरूकता निर्माण करावी.

      • प्रसारमाध्यमांची जबाबदारी

        • प्रसारमाध्यमांनी तथ्यपूर्ण पत्रकारिता करावी आणि खोट्या जाहिरातींना प्रसिद्धी देणे थांबवावे.

      • शिक्षण खात्याची सक्रियता

        • स्थानिक पातळीवर बनावट यादी आणि जाहिरातींची तपासणी करून गैरप्रकारांना आळा घालावा.

      निष्कर्ष

      महाराष्ट्र सरकारने गुणवत्ता यादी बंद करून विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्याचा आणि सर्वसमावेशक शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. पण, खासगी शाळा, कोचिंग क्लासेस आणि प्रसारमाध्यमे याचा गैरवापर करत असल्याने शिक्षण व्यवस्थेची विश्वासार्हता धोक्यात येत आहे. परशुराम सोंडगे यांनी आपण सारे मुर्ख आहोतअसा टोमणा मारत समाजातील उदासीनतेवर बोट ठेवले आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकार, शाळा, प्रसारमाध्यमे आणि समाज यांनी एकत्र येऊन जबाबदारीने पावले उचलणे गरजेचे आहे.

      CTA (Call to Action): तुम्हाला याबद्दल काय वाटते? खासगी शाळा आणि कोचिंग क्लासेसच्या जाहिरातींमुळे तुम्हाला काही अनुभव आला आहे का? खाली कमेंट करा आणि हा ब्लॉग शेअर करून इतरांपर्यंत पोहोचवा..!


परशुराम साेंडगे,बीड

शनिवार, १७ मे, २०२५

नरकातील स्वर्ग – संजय राऊत यांचे कारागृहातील अनुभवकथन Narkatil Swarg by Snjay Raut

 

नरकातील स्वर्ग – संजय राऊत यांचे कारागृहातील अनुभवकथन

Narkatil Swarg by Snjay Raut
 Narkatil Swarg by Snjay Raut


लेखक: संजय राऊत

प्रकाशक: New Era Publications

प्रकाशन दिनांक: 17 मे 2025

प्रकार: आत्मकथन / मराठी राजकीय साहित्य

मिट्ट काळोखाची अखेर नजरेला सवय होतेच. समाजाला आणि माणसांनाही. म्हणून कोणालाही मिट्ट काळोखाची भीती वाटणं काही कमी होत नाही. ज्या काळोखाची पुढे सवय होते, त्या काळोखाला अगोदरच आव्हान देऊन त्यात उडी मारणारी माणसं फार कमी असतात. मुळात ती माणसं तशीच जन्मत असतात की घडत जातात, हाही एक विवाद्य विषय आहे. संजय राऊत हा असाच एक माणूस. २०१४ साली भारतात फॅसिस्ट काळोखाची छाया पसरू लागली. २०१६ च्या मनमानी नोटबंदीने तो काळोख देशभर पसरवला, अधोरेखित केला. त्यानंतर भाजप संघप्रणीत राजवटीचे स्वमर्जीने स्लीपर सेल बनलेल्या अस्सल भारतीय गेस्टापो एजन्सीज, आयटी, ईडी, सीबीआय, एनएसए आणि एनसीबी यांनी सत्तापक्षाच्या राजकीय विरोधातल्या सर्व व्यक्ती, संस्था आणि राजकीय पक्ष यांना लक्ष्य बनवले. देशभर खोट्या आरोपपत्रांद्वारे विरोधातल्या व्यक्ती, शक्ती, उद्योगपती आणि पक्ष यांच्यावर लाखो पानांची आरोपपत्रं लिहिली गेली. शेकडो निरपराध मानवतावादी पत्रकार, राजकीय नेते, उद्योजक आणि मोदीविरोधक तुरुंगात डांबले गेले. आजही डांबले जात आहेत. त्यामधला एक सर्वात डोळस पत्रकार आणि खासदार म्हणजे संजय राऊत. अनेक आमिषं, अनेक धमक्या आणि गद्दारीचे अनेक मोह टाळून त्याने ईडीच्या तुरुंगात उडी घेतली. आपण निरपराध असताना हा तुरुंगाचा काळोख त्याने स्वीकारला. त्या काळोखात हळूहळू त्याला सभोवतालचा तुरुंग आणि त्या तुरुंगाबाहेरचा तुरुंग बनलेला देश दिसू लागला. त्याचंच हे मर्मभेदक चित्रण – ‘नरकातला स्वर्ग.’ भारताच्या इतिहासातल्या एका भयाण काळ्याकुट्ट कालखंडात आपण जगत असताना एका पत्रकार-लेखक-संपादकाने तुरुंगातून आपल्या भोवतालच्या समाजाला मारलेली ही हाक प्रत्येक वाचकाने वाचलीच पाहिजे. त्यामुळे कदाचित त्यालाही हा काळोख दिसू लागेल… राजू परूळेकर


ED अटकेनंतर लिहिलेलं ‘नरकातील स्वर्ग’ काय सांगतं?

राजकारण, सत्तासंघर्ष आणि तुरुंगवास यांच्या संघर्षातून जन्मलेलं नरकातील स्वर्ग हे संजय राऊत यांचं जेलमधून लिहिलेलं पुस्तक आहे. Arthur Road Jail मधील 100 दिवसांच्या अनुभवातून साकारलेलं हे पुस्तक म्हणजे एक मराठी कारागृह साहित्य आणि राजकीय आत्मकथन यांचं दुर्मीळ मिश्रण आहे  संजय राऊत स्वतःचं असं म्हणतात की,हे पुस्तक पूर्णपणे राजकीय आहे.उध्दव ठाकरे यांच सरकार पाडून आपलं सरकार  अणायचं हे भाजपाचे लक्ष होते.भाजपाचे 105 आमदार असून ही त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात  आले होते.त्यामुळे आपल्या केंद्रातील सत्तेचा वापर करून महराष्ट्रातील  सरकार  पाडण्याचा प्रयत्न भाजपा करतच होते. त्यामुळे इडी व सीबीआय सारख्या संस्थाचा गैरवापर केला गेला.त्यातूनच संजय राऊत यांना खोट्या अरोपात गुंतून  अटक करून जेल मध्ये टाकले.त्या शंभर दिवसात आलेल्या वाईट अनुभवाचे हे कथन आहे. आता हे कथन एका सामान्य कैद्यांचे नाही.संजय राऊत हे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उपनेते आहेत.महायुतीचे शिल्पकार ही आहेत.त्यामुळे यातील भाषा असल किंवा अशय असेल हा पूर्णपणे राजकीय असणार आहे. ते सामना दैनिकाचे संपादक असले तरी ते कसलेले राजकारणी ही आहेत. त्यामुळे राजकीय  हेतूने हे लिखाण  केलेले असणार यात नवल नाही.'Narkatil Swarg by Snjay Raut."


पुस्तकाची आत्मीय झलक

संजय राऊत यांना 2022 मध्ये ED अटक झाली आणि त्यानंतर त्यांना मुंबईतील आर्थर रोड जेल मध्ये ठेवलं गेलं.Narkatil Swarg by Snjay Raut त्या काळात त्यांनी अनुभवलेल्या मानसिक ताण, सामाजिक निरख, न्यायाची प्रतीक्षा आणि एकाकीपणाचा थेट लेखाजोखा या पुस्तकात दिला आहे. शिवसेना पक्ष फोडून सरकार बनवण्याचा कट भाजपाची अनेक जेष्ठ नेते करत होते.संजय राऊत यांना आलेले अनुभव त्यांनी कथन केले आहेत. नुसते अनुभवचं नाहीतर त्या अनुषंगाने त्यांनी केलेले चिंतनाचा ही त्यात समावेश आहे  संजय राऊत जसे या उध्दव ठाकरे सरकारच्या विरोधात झुंजत होते तशीच त्यांची लढाई स्वतःशी ही होती. प्रचंड ताण आणि आमिष ही त्यांना देण्यात आली होती परंतु  ते आपल्या निश्चयाने तुसभर  ही हालले नाहीत. हा स्वतःच्याच विरोधात लढला गेलेला लढा या  पुसकात येणार हे नक्कीच  होते. निष्ठावंत शिवसैनिक कसा असतो याचे उदाहरण त्यांनी कृती मधून घालून दिले.



‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकाची वैशिष्ट्ये:

1. कारागृहातील वास्तवाचं निर्भीड चित्रण:

राऊत तुरुंगातील स्वच्छता, प्रशासन, इतर कैद्यांचे जीवन यावर संवेदनशील आणि डोळस भाष्य करतात. ‘सत्य कठोर असतं, पण आवश्यक असतं’ – हे पुस्तक त्याचं उदाहरण आहे. तुरुगातील जीवन कुणाच्या वाटयाला येऊ नये. तो एक नरकच असतो. सुडाच्या भावनेतून  कुणी जर तुम्हाला अडकलेले असेल तर हा नरक अधिक भयानक असणारच.नरक आणि स्वर्ग या दोन संकल्पना असल्या तरी नरकातचं स्वर्गाचे अनुभव मी घेतला आहे हेच संजय राऊत या पुस्तकातून सांगत आहेत. 

2. राजकीय वैचारिक मंथन:

हे केवळ अनुभवकथन नसून, यातून भारतीय राजकारणात सत्तेचा गैरवापर, शिवसेनेतील फाटाफूट, लोकशाहीचा उरलेला श्वास यावर प्रगल्भ टीका केली आहे. 

3. लेखनशैलीचा प्रभाव:

Narkatil Swarg by Snjay Raut
Snjay Raut


"Narkatil-Swarg- by- Snjay- Raut"मराठी पत्रकारिता आणि लेखनात सरावलेल्या अनुभवामुळे राऊत यांची शैली ओघवती, मार्मिक आणि विचारप्रवर्तक आहे. मराठी राजकीय आत्मकथन म्हणून हे पुस्तक एक महत्त्वाची भर आहे.


ज्यांना वाचावं हवं:

  • राजकारणात रस असलेल्या वाचकांनी

  • सामाजिक न्याय आणि व्यवस्थेवर विचार करणाऱ्यांनी

  • मराठीतून समकालीन आत्मकथन वाचू इच्छिणाऱ्यांनी


निष्कर्ष:

नरकातील स्वर्ग हे पुस्तक सत्तेच्या सावलीतील वास्तव उलगडतं. तुरुंग म्हणजे केवळ भिंती आणि तटबंदी नव्हे, तर तिथे माणूस आपल्या अंतरंगाशी झगडतो, हे राऊत यांनी प्रभावीपणे दाखवून दिलं आहे. सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक स्तरांवरील अंतर्मुखतेचा दस्तऐवज म्हणून हे पुस्तक नक्की वाचावं असं आहे.

नरकातील स्वर्ग पुस्तक परीक्षण|संजय राऊत जेल अनुभव |मराठी कारागृह साहित्य 2025|ED अटक आणि आर्थर रोड जेल|New Era Publications Marathi Book|शिवसेना राऊत पुस्तक|Marathi Political Prison Memoir

शुक्रवार, १६ मे, २०२५

साहित्यवीर छत्रपती संभाजी महाराज – विद्वत्ता, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा अद्वितीय

साहित्यवीर छत्रपती संभाजी महाराज – विद्वत्ता, शौर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा अद्वितीय संगम

छत्रपती संभाजी महाराज
 छत्रपती- संभाजी -महाराज


छत्रपती संभाजी महाराज हे केवळ मराठा साम्राज्याचे दुसरे अधिपती नव्हते, तर ते एक अत्यंत विद्वान, तत्वज्ञानी आणि बहुभाषिक साहित्यिकही होते. त्यांच्या आयुष्याचा वेध घेतल्यास आपणास त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील असामान्य पैलू दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, राजमाता जिजाऊंचे नातू आणि राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचे भक्त असलेल्या संभाजी राजांनी केवळ तलवारीचे धारच नव्हे, तर लेखणीचे सामर्थ्यही दाखवून दिले. "छत्रपती संभाजी महाराज

संभाजी महाराजांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. बालपणापासूनच त्यांच्यावर संस्कारांचे आणि शास्त्रविद्येचे घडण झाले. केवळ युद्धशास्त्रच नव्हे, तर संस्कृत, हिंदी, इंग्रजी, पर्शियन, उर्दू, मराठी या सात भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी 'बुद्धिभूषण', 'नायिकाभेद', 'सप्तशतीचा' अनुवाद, अशा अनेक ग्रंथांची निर्मिती केली. ‘बुधभूषण’ हा संस्कृत भाषेतील त्यांचा ग्रंथ त्यांच्या काव्यप्रतिभेचा साक्षीदार आहे.

 साहित्य आणि धर्मनिष्ठा 

छत्रपती संभाजी महाराजांचे साहित्य हे राजधर्म, नीती, नीतिशास्त्र, आणि स्त्रीचे स्थान याबाबत अत्यंत स्पष्ट विचार मांडणारे आहे. त्यांनी आपल्या ग्रंथांतून समाजमन घडवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, त्यांनी स्त्रियांचा गौरव करताना पौराणिक संदर्भ देत स्त्रीशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांची धार्मिक निष्ठाही तितकीच प्रभावी होती. त्यांनी मोघलांनी गाडून टाकलेले काशीविश्वेश्वर मंदिर पुन्हा उभारले आणि धर्मासाठी बलिदान दिले. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाप्रमाणे धर्मांध शत्रूंच्या विरोधात त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली पण धर्म आणि सन्मान झुकू दिले नाही.

 राजकारण आणि युद्धकौशल्य

 संभाजी महाराज यांचे राज्यकारभारही तितकाच प्रभावी होता. त्यांनी मराठा साम्राज्याच्या संरक्षणासाठी २१० युद्धे लढली, त्यात १२८ मध्ये विजय मिळवला. औरंगजेबाचा दीर्घकालीन दक्षिणेकडील स्वारी थोपवून धरण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचा अंत अत्यंत क्रूर आणि अमानुष होता. पण त्यांनी मुसलमान धर्म स्वीकारण्यास स्पष्ट नकार देत "हिंदवी स्वराज्य" या संकल्पनेला सार्थ ठरवले. छत्रपती संभाजी महाराज हे भारतातील पहिले हिंदू राजा होते ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिले.

 छत्रपती संभाजी महाराजांचे वारस 

आजही संभाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनावर आधारित संशोधन, चरित्रलेखन आणि चित्रपटांद्वारे नवीन पिढीला ते प्रेरणा देत आहेत. त्यांचे योगदान केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून ते एक "साहित्यसम्राट", "धर्मवीर", आणि "शौर्यवीर" म्हणून कायम लक्षात राहतील. निष्कर्ष छत्रपती संभाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते, तर ते साहित्य, तत्वज्ञान आणि संस्कृतीचे जिवंत प्रतीक होते. त्यांनी आयुष्यभर हिंदवी स्वराज्यासाठी, धर्मासाठी आणि मातृभूमीसाठी संघर्ष केला"छत्रपती संभाजी महाराज" आजच्या तरुण पिढीने त्यांच्या जीवनाचा आदर्श ठेवावा, हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल.

परशुराम साेंडगेे,बीड

#संभाजी महाराज चरित्र,संभाजी महाराज साहित्य, हिंदवी स्वराज्य, मराठा इतिहास, संभाजी महाराजाचे योगदान, शिवाजी महाराज पुत्र, धर्मवीर संभाजी, मराठा साम्राज्य, संभाजी महाराज बुद्धिभूषण जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर आपल्या ब्लॉगवर शेअर करा, कमेंट करा आणि इतिहासप्रेमी मित्रांसोबत ही प्रेरणादायक माहिती नक्की शेअर करा.

शुक्रवार, २ मे, २०२५

झापूक झुपूक मराठी चित्रपट समीक्षा | Zapuk Zupuk Marathi Movie Review in Marathi | Suraj Chavan | Kedar Shinde

 

गुरुवार, १ मे, २०२५

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं 

पुस्तक परीक्षण: सोंडगे परशुराम,बीड     9527460358

 

 

“धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं  पुस्तक
धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं  पुस्तक  by Dr.Ashok banger

प्रस्तावना

डॉ.अशोक बांगर लिखित धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर हे पुस्तक नुकतचं वाचण्यात आले.पुस्तक लहान असलं तरी अहिल्यादेवी यांची चरित्रात्मक तोंड ओळख करून देणारे आहे. "महाराणी अहिल्यादेवी"

युगचं आपले युग पुरूष जन्माला घालत असतो.ती त्या काळाची गरज असते.अर्थात अहिल्यादेवी ही याला अपवाद नाहीत. अहिल्यादेवीचं कार्य,शौर्य व संघर्ष यावर लेखकांनी वस्तु निष्ठ सहज सोप्या भाषेत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

भारतीय इतिहासात अनेक थोर व्यक्तिमत्त्वं उदयाला आली.जी केवळ त्यांच्या अतुलनीय शौर्यामुळे व कार्यामुळे नव्हे, तर त्यांच्या मूल्यनिष्ठ जगण्यामुळे आजही प्रेरणास्त्रोत ठरलेली आहेत.अशा तेजस्वी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे अहिल्याबाई होळकर आहेत.

त्यांच्या जीवनप्रवासाचा आदर्श आपणास सामाजिक न्याय, कर्तव्यनिष्ठा, धर्मसंवर्धन आणि स्त्रीसक्षमतेचा उत्कृष्ट दृष्टिकोन देतो. जो की हा दृष्टीकोन आजच्या काळाची गरज आहे. अशी चरित्रे या पिढी पर्यंत वस्तनिष्ठपणे पोहचली पाहिजेत.इतिहास लेखन आपल्या स्वार्थावर बेतण्याचं पाप हल्ली काही स्वंयघोषित इतिहासकार करत आहेत.त्यामुळे इतिहासाची दिवसेंदिवस विश्वासर्हताचं कमी  होते की काय अशी भिती  वाटू लागली आहे.

                           डॉ.अशोक बांगर यांनी धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर’हया पुस्तकातून त्यांचा जीवनप्रवास सुलभ आणि भावनिक भाषेत वस्तुनिष्ठपणे आपल्यापर्यंत पोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. 

'‘पराक्रमी मल्हाररांवाचा उदयया प्रकरणातून लेखकाने मराठ्यांच्या इतिसहासातील मल्हारराव होळकर घराण्याची पार्श्वभूमी थोडक्यात परंतु प्रभावीपणे चित्रण करून वाचकांना १८व्या शतकाच्या राजकीय-सांस्कृतिक वातावरणाचा परिचय दिलेला आहे. मराठयांच्या इतिहासतील होळकरशाही एक  अतुलीनीन शौर्याचं, धैर्याचं,असमान्य कार्याच व संघर्षाचं  ज्वलंत पान आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्याचं प्रकरणात ही दिलेली पार्श्वभूमी पुढील घटनांच्या संदर्भासाठी किती आवश्यक आहे हे पुस्तक वाचताना लक्षात येते.'AhilyabaiHolkar'

                            इतिहास लेखनात संदर्भांना फारच महत्व असते.अलीकडे शब्दखल करून अनेक अभ्यासक इतिहास मांडताने दिसतात.इतिहास तर्कावर मांडला नाही जाऊ शकत.डॉ.अशोक बांगर यांनी शब्दोच्छाद या पुस्तकात कुठे ही केलेले नाही.संदर्भासह हे अहिल्यादेवी यांच चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे.पुस्तकाची मांडणी16 प्रकरणात केली आहे.त्यामुळे प्रकरणानिहाय इतिहास समजून घेणं सोप झालेलं आहे.नवख्या वाचकासाठी व शालेय विदयार्थासाठी अशीच पुस्तकं हवी असतात.हे पुस्तक अहिल्यादेवी यांची चरित्रात्मक मांडणी असलेले आहे.त्यात कथात्मकशैली असलीतरी काल्पनिकतेला व रंजकतेला अजिबात महत्व दिलेले नाही.

धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं

किल्ले रायगडावर धर्मयोगिनी अहिल्यादेवी या पुस्तकाचे प्रकाशन करताना देशाचे गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,एकानाथ शिंदे व इतर मान्यवर तसेच लेखक डॉ.अशोक बांगर


संस्कारांची शिदोरी’,‘भविष्यातील जडणघडणया प्रकरणांतून लेखकाने अहिल्याबाईंच्या बालपणातले संस्कार,त्यांचे वडील माणकोजी शिंदे यांचा प्रभाव, आणि त्यांची सहज प्रकट होणारी धार्मिकता,करुणा आणि कर्तव्यनिष्ठा यांची ओळख करून दिली आहे.अहिल्यादेवीच्या कर्तृत्वाचं मूळ हे या घडवलेल्या जडणघडणीतच आहे हे लेखक अत्यंत समजूतदारपणे दाखवतो.अहिल्यादेवीचा संघर्ष आणि कर्तव्याचा होत गेलेला अविष्कार लेखक अतिशय सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडत राहतो.

'संकटाशी दोन हात 'या प्रकरणात लेखकाने अहिल्याबाईंच्या वैयक्तिक दु:खाचा उल्लेख केला आहे.पती खांडेराव होळकर यांचे युद्धात निधन,सासऱ्यांचे पश्चात्तापदग्ध मन आणि त्या पार्श्वभूमीवर स्त्रीच्या जीवनात अचानक आलेल्या जबाबदाऱ्या या सगळ्याच गोष्टी लेखकाने भावनिक संयमानं मांडल्या आहेत.ही सारी प्रकरण अधिक रंजकपणे तेल मीठ लावून ही लिहिता आली असती पण लेखकाने तो मोह कटाक्षाने टाळला आहे.मुळात डॉ.अशोक बांगर यांचा पिंडच एका चिकित्सक इतिहासकाराचा आहे.

स्वाभिमानी खंडेराव होळकर’, ‘चिरंजीव अहिल्यादेवीअशा प्रकरणांतून लेखन एका ऐतिहासिक नोंदीपेक्षा अधिक नैतिक,सांस्कृतिक स्तरावर पोहचतं.अहिल्यादेवींच्या जीवनातील प्रत्येक वळण त्यांच्या धर्मनिष्ठ, सोज्वळ आणि नि:स्वार्थ कार्यभावनेची साक्षचं देणारं आहे या बाबीवरील आपलं भान लेखक ढळून देत नाही.

                     संकटाशी दोन हातआणि राजपदाचा स्वीकारही दोन प्रकरणं पुस्तकाच्या मध्यबिंदूपर्यंत वाचकाला खेचून नेतात.सासऱ्यांच्या निधनानंतर अहिल्याबाईंनी एका विधवेने राज्यकारभार हाती घेतला ही गोष्ट त्या काळात अत्यंत क्रांतिकारक होती.लेखकाने या घटनेचे केवळ ऐतिहासिक महत्त्व सांगितलं नाही तर त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक मानसिकतेचे विश्लेषणही करण्याचा प्रयत्न केला आहे.

या टप्प्यावर येताना पुस्तक एक स्त्रीवादी भाष्य बनतं पण हा इतिहास फक्त एका स्त्रीचा इतिहास नाहीतर धर्म आणि समाजयासाठी झटणा-या एका धर्मयोगिनीचा हा इतिहास आहे  अशी आग्रही मांडणी लेखक करतो.

चंद्रवताचे बंड’, ‘तुमच्या फर्मानास कोण पुसतो’, ‘सामाजिक समतेच्या प्रेरणा’,‘धर्माचा जाणिवेवरया प्रकरणांतून लेखकाने अहिल्यादेवींचा धर्मविषयक दृष्टिकोन,कमालीचा स्वाभिमान, सामाजिक समतेबाबतचा आग्रह आणि मंदिर बांधकामातून सामाजिक संगोपनाचा प्रयत्न दाखवला आहे.

काशीपासून रामेश्वरपर्यंत त्यांनी घाट, मंदिरं, धर्मशाळा उभारल्या, पण केवळ धार्मिक कर्मकांड म्हणून नव्हे तर समाजात संवाद, स्नेह आणि संघटन निर्माण व्हावं यासाठी.लेखकाने हे स्पष्ट केलं आहे की अहिल्याबाईंची धर्मनिष्ठा केवळ कर्मकांडापुरती नव्हती,तर ती मानवतेच्या सेवेसाठी वाहिलेली होती.त्यांच्या एंकदरीत कार्यावरून त्याचा पर्यसवरणस्नेह किती तीव्र होता हे आपल्या लक्षात येते. लेखक अहिल्योदेवी यांच्या  व्यक्तीमत्वातील एकएक पैलू वाचकासमोर उलगडून दाखवत राहतो.

                         प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी’,‘शब्द हाच प्रमाणया प्रकरणांतून अहिल्याबाईंच्या न्यायाधिकार शक्तीचा, त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा आणि निर्णयक्षमतेचा उल्लेख येतो.त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचनेपासून स्त्रियांच्या सन्मानापर्यंत अनेक ठिकाणी थेट कार्य केलं आहे हे लेखक अधिक गडद करू पहातो आहे.

'अखेरचा दंडवतया शेवटच्या प्रकरणात लेखकाने अहिल्याबाईंच्या शेवटच्या काळातील त्याग साधेपणा आणि मनोधैर्याचे वर्णन केलं आहे.त्यांची जीवनशैली, शेवटच्या श्वासापर्यंत प्रजेची सेवा करणे हेच त्यांचं धर्मकार्य होतं,यावर लेखकाचा ठाम विश्वास दिसतो. तसे  संदर्भ ही देत राहतो.

                  डॉ.अशोक बांगर यांची भाषा ही सुगम, भावनाप्रधान आणि विश्लेषणात्मक आहे.पुस्तक हे केवळ शालेय स्वरूपाचं नसून चिंतनपर, मूल्याधिष्ठित आहे.लेखकाने कुठेही अति नाटकी वर्णन न करता,योग्य संदर्भ आणि साधेपणाने कथन केलं आहे.त्यामुळे वाचक विचार करायला लागतो.त्यांची शैली विद्यार्थ्यांना समजेल अशी असूनही परिपक्व वाचकांनाही विचारप्रवृत्त करणारी आहे.विशेषतःवाक्यरचना,उदाहरणांची निवड आणि संक्षिप्त, प्रभावी विधानं ही लेखनाची ताकद आहे.

          हे पुस्तक विद्यार्थ्यांना इतिहास आणि मूल्यशिक्षणाचे एकत्रित उदाहरण देते.शालेय भाषण, निबंध, स्पर्धा परीक्षा, समाजशास्त्राच्या अभ्यासात वापरण्यास अत्यंत उपयुक्त आहे.

तसेच महिला सक्षमीकरण,धर्मनिरपेक्षता,पर्यावरण रक्षण, सामाजिक न्याय, राज्यधर्म यावर कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठीही हे एक मार्गदर्शक पुस्तक ठरू शकतं यात काही ही शंका नाही.

                      पुस्तकात काही ठिकाणी संदर्भांची अधिक माहिती किंवा संदर्भग्रंथांची यादी दिली असती तर अभ्यासकांसाठी अधिक उपयोगी ठरले असते. यादी आहे पंरतु ती पुस्तकाच्या शेवटी आहे.प्रकरणानिहाय संदर्भ दिले असते तर समजून घेण्यासाठी अधिक सुलभ झाले असते.काही प्रकरणांत दृश्यात्मक सामग्री (जसे की नकाशे, चित्रं, कोटेशन बॉक्स) दिले असते तर किशोरवयीन वाचकांना अधिक आकर्षक वाटलं असतं.

“धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं

किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्ताने राजसभमध्ये अभिवादन कार्यक्रमात धर्मयोगिनी अहिल्यादेवी या पुस्तकाचे लेखक  डॉ.अशोक बांगर

धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकरहे केवळ चरित्र नव्हे,तर एक सांस्कृतिक, नैतिक आणि सामाजिक तथ्यं मांडणारे  पुस्तक आहे.अहिल्याबाईंच्या जीवनातील प्रत्येक टप्पा वाचताना आपण वर्तमानकाळात जणू मार्गदर्शन घेतो.त्यांच्या कार्याची प्रेरणा ही काळाच्या पलिकडची आहे.

 डॉ.अशोक बांगर यांनी एक उत्कृष्ट आणि गरजेचं काम केलं आहे.त्यांनी इतिहासाच्या गर्दीत हरवलेल्या एका स्त्रीधर्मयोद्ध्येला आपल्या विचारविश्वात पुन्हा जागृत केलं आहे.मूल्य रूजवण्यासाठी व हल्लीच्या मुलांसाठी प्रेरणा देण्यासाठी अश्या पुस्तकांची निकड फारच आहे.

हे पुस्तक प्रत्येक शाळेच्या ग्रंथालयात,प्रत्येक पालकाच्या वाचनात, आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या विचारांत असायलाच हवं असचं आहे.तसचं हे पुस्तकं आहे.तुम्ही वाचलयं का? अवश्य वाचा.

                                              

 

लेखक : डॉ. अशोक बांगर

प्रकाशक: श्री.शिवाजी रायगड मंडळ

पृष्ठे:55

मूल्यं: 70/- रूपये

संशयाचा व्हायरस

  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या न...