![]() |
Laxman hake and Amol mitkari |
जंगलात सर्व प्राण्याची तातडीने एक सभा भरली.वाघ,सिंह,खोकडं,गेंडे,हत्ती,कुत्री,मांजर,डुक्कर,गाढव कोल्हा,हरीण,ससे एक नाय सारचं प्राणी झाडून आले होते.विषय काय होता तर?माणसं देत असलेल्या शिव्या.
"त्यांच्या शिव्या आणि आपली सभा कमून बोलीली? माणसा सारख्या बुध्दिमान माणसाच्या फंदयात आपून कशाला पडायचं?" चतुुर कोल्हयांनं प्रश्न उपस्थित केला.त्याचं भी खरचं होतं.माणसाच्या विरोधात सभा घेऊन काय होतं? "माणसानं त्यांच्या आया बहिणीचा उद्दार करणा-या शिव्या खुशाल द्याव्यात.आपल्याला फक्त मधी घेऊ नये एवढीचं माफक इच्छा. !!" माकडं म्हणालं."ते कशाला आपल्याला मध्ये घेतील? ते माणसं आहेत. सुसंस्कृत असतात.त्यांना धर्म,संस्कृती वगैरे असते." चित्याने स्पष्टीकरण दिले'Laxman hake and Amol mitkari'
"कशाची डोंबल संस्कृती त्यांची? गेल्या आठवड्यात नाही पाहिलय का तुम्ही हायवेवर काय करत होते? आम्हाला हाय शंकराचा शाप पण माणसांना काय?खुशाल भर रस्त्यावर..छी..!!लाज वाटली बुवा आपल्याला." एक कुत्रं आपली व्यथा मांडत बोललं.
"माणूस हा मुळचा प्राणीच आहे.त्यामुळे त्याला कायम प्राण्याचं आकर्षण राहिलेलं आहे.ते राहणार पण.शेवटी ते पण आपलीच आहेत."वनराज सिंहांनी भरकटलेला विषय तिथचं थांबविला. माणसा सारखीचं प्राणी पण विषय भरकटू लागलेत हा वनराजांचा अनुभव होता.
"ही माणसं शिव्या देताना सरळ सरळ आपली नावं घेत आहेत.असं आपली नावं घेऊन शिव्या देणं म्हणजे..आपला अपमान आहे.ते पण जाहिरपणे टीव्हीवर...हद्द कर दी यार माणसाने." एका माकडांनी आपली कैफियत मांडली.
"विषय खोलून सांगा म्हणजे माझं म्हणणं स्पष्टं बोला.मुद्द्याचं बोला.वनराजांना विषय नीट समजला पाहिजे." उपवनराज वाघांनी सुनावलं.वाघाला लयं एरंडेचा गु-हाळ पटत नाही. कुत्र्यांना सवय मोकार भोगायची."Laxman hake and Amol mitkari"
"त्याचं काय?माणसात लयी चिक्कार जाती.त्यात अनेक प्रवर्ग.त्यातल्या ओबीसी प्रवर्गाचे नेते.लक्ष्मणराव हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गोचिडं म्हटलं." माकडााने सविस्तर विषय मांडला.
"गोचिडांना काही ही म्हणले तरी आपून कमून अंगावर ओढून घ्यायचं? गोचीड काय आपल्या जंगलाचे सदस्य आहेत का?" वाघाने विषय वाढून दिला नाही.जंगलाच्या सभेचा विनाकारण का वाया घालवायचा? ही का भारतीय माणसांची संसद आहे का?
"ते ओबीसी नेते अजित पवारांना गोचीड म्हटल्यामुळे त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते... तसा भारी वक्ता माणूस हाय ते अमोल मिटकरी.त्यांनी लक्ष्मणरावांना माकडं म्हटलं.मग ओबीसी नेते मिटकरींना डुक्कर म्हणाले.उगीच आमच्या नावाचा उद्दार केला." माकडांनी संयमाने मुद्दा क्लिअर केला. डुक्कराकडं पाहूनच माकडं बोलतं होते.डुक्करांनी ही सहमती दर्शवली. "मान्य आहे आम्हाला सौंदर्य नाही पण ही देवाची देणं आहे ही. सुंदर जन्माला याचं हे काय आपल्या हाती असतं का?माणसांनी अशी अवहेलना करू नाही आमची.जंगल सुंदरीची स्पर्धा थोडीच आपल्याला भरायची आहे. आहेत ते आहेत.आमच्या दिसण्याहून टवाळी करायचं काम नाही.माणसं कसं पण वागतात. आम्ही कधी ही त्यांचा उपमर्द केला नाही.त्यांनी अस कसं वागावं?" डुक्करांनी भी माकडाच्या मुद्द्याला पुष्टी जोडली.
"ते विंचू बिच्चारे..!! कधी कुणाला मुका घे म्हणालेत का? हे नंग्या ठेचाईची भाषा करणार? ठेचायचं असलं तर त्या हाकेला काय नाक नाही का?ते ठेचावं? नसलेली नांगी ठेचणार कशी? विंचवा सारख्या प्राण्याचा उगीच उपमर्द केलाय त्यांनी. मिटकरी आमदार आहेत ना? ही भाषा शोभते का?" हुशार कोल्हा म्हणाला. कोोल्हयाचा हा मुद्दा पण सा-याचं जगला पटला. सारे प्राणी हळूहळू कुजबूजू लागली. तेव्हा वनराज सिंह बोलायला उभे राहिले. सारे शांत झाले.ते धीर गंभीर आवाजात बोलायला लागले.माणसाच्या विरोधात सभा आहे. वनराज काय आदेश देतील यांकडे सर्वांचेच लक्ष होते.Laxman- hake- and -Amol mitkari
"माझी व आपले उपवनराज वाघ यांची पण माणसं तुलना करतात.हा टायगर..!! हा सिंह..!! माणसा सारख्या अति सामान्य प्राण्यानी आमच्याशी तुलना करावी? हे आमचा पण अपमानच आहे की.काही तर स्वतःला गजराज संबोधून घेतात.विरोधकांना कुत्रं म्हणतात.कुणाला चिलटं म्हणावं हे नित्याचं झालं आहे.माणूस स्वतःला जरी हुशार प्राणी समजत असला तरी तो एक मूर्ख प्राणी आहे.मूर्खाच्या कुणी नादी लागू नये.काय गर्दभराज..?"सिंहाने गाढवाकडून होकार घेतला. गाढवाला जे माण ते मााणसाला का कळतं नाही?"तसे सारे प्राणी हासले.
"राजे,त्या माणसाचा निषेध तरी करायला पाहिजे.त्या अमोल मिटकरींना..!! हाके डुक्कर तोंडया म्हणाले." डुक्करांला अजून ही राग होता. ते साहजिकच.कुणाला पण असं तोंडाच्या अकारावरून अपमानित करणं योग्य नव्हतं. हाके सारख्या माणसाला आपली उपमा द्यवी हे डुक्करांन पण रूचलेलं नव्हतं.
मिटकरी नाही का हाकेला माकड तोंडया म्हणाले." गेंडा बोलला. गेंड्याने माकडाची बाजू लावून धरली.
"मुळात माणसात आणि आमच्यात फरकच काय? फक्त शेपटी नसलेले ते पण माकड असतात. शेपटी नसून ही त्यांचा हा रूबाबदार?" माकडाचा इगो दुखावला होता.
"एवढं भांडण लागलं तरी ते देवेंद्र फडणवीस का काहीच बोलत नाही? काही तरी डाव असेल?" चतुर कोल्हा बोलला.खुशाल खिदळत बसला.
"राजकारण आलं की डाव तर असणारच? बिगर डावाची राजकारण कसं रंगेल? कोल्हा लयं नक्कू शेजारू.लबाड बोलण्यात माणसं एक नंबर आहेत. तुला तर कधीच मागे टाकले आहे.लबाडा..!!" जिराफ आपल्या टांगा टाकत बोललं.
"यात काय राजकारण असेल? हाकेने पण भाजपाला पाठींबा दिलेला व मिटकरी पण युतीच्या पक्षातले. यांची झुंज लावली कुणी?" रान गवा बोलला.
"माणसाच्या राजकारणात पडू नका.ते फार खालच्या दर्जाचे आहे.आपल्याला काय,करायचं त्याचं.मोकार मंगळवरी नाही करायची." युवा बिबट्याकुमार बोलला.
"ते नुसतं मुरक्या मुरक्या हासत आहेत.ते हासणं क्रूर असाव.इतकं सुंदर हासणं कातील असतं बरं? सबसे कातील... गौतमी पाटील नाही.यांच हासणं असतं." एक सुंदर हरीण म्हणाली. तशी सारेच प्राणी टवकारले.या हरीणींनी भन्नाट मुद्दा मांडला.
"लक्ष्मण हाके असतील नाही तर अमोल मिटकरी असतील यांचा निषेधाचा ठराव मांडा.आज पासून मिटकरी आणि हाके यांच्या नावाने जंगलात शिव्या सुरू करा.जशास तसचं उत्तर दिल जाईल..."!! धीर गंभीर आवाजात वनराजसिंह यांनी आदेश दिला.एकच गलका झाला.मिटकरी व हाके यांचा निषेध सारं जंगल करत होते.नंतर... या दोघांच्या नावाने शिव्या देण्याचा सराव प्राण्यांनी सुरू केला होता. त्यामुळे फारच गलका झाला.
देवेंद्र... खुद्द महाराष्ट्राचे सुहास्य वदनी मुख्यमंत्री जागे झाले. डोळे चोळले. टिव्हीवर संजय राऊत यांची पत्रकार सभा सुरू होती."हे कुत्रं अजून..!! त्यांच्या ओठात शब्द आले पण उच्चारले नाहीत.
दुसरं काय स्वप्नांचा इफेक्ट ?
हल्ली स्वप्न कशी भयंकर पडतात नाही..? ते गालातली गालात हासले.
परशुराम सोंडगे,बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा