रविवार, १८ मार्च, २०१८

शाळा ,पोलिस आणि काॅपी वगैरे


दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या.आता एका मागून एक परीक्षा सुरू होणार.हे एक दोन महीने परीक्षाचे दिवसच ….पूर्वी परीक्षा ही
 एक शैक्षणीक प्रक्रीया होती.अध्ययनं अध्यापनासारखीच साधी
 आणि निंरतर चालणारी प्रक्रीयाआता मात्र या परीक्षानां फार महत्व आले आहे. कारण या परीक्षाचे आधारे मुलांचे वर्गीकरण करण्यात येऊ लागलेत्या प्रमाणे गुणवत्ता यादया तयार करण्यात येऊ लागल्याअतिहुशारहूशारमध्यम हुशार,साधारण आणि`असे मुलांचे प्रकार करण्यात येऊ लागले आहेत..मेरीट नावाची एक फुलपटी तयार करण्यात आली.त्याने त्यांच्या बुदधीची मापे घेण्यात येऊ लागले.एकाच तराजूत सा-याना मोजले जाऊ लागलेपरीक्षा साधन नाही तर साध्यं झाली.
                   मुलांच्या वर्गीकरणानंतर या व्यवस्थेने पालकाचं  वर्गीकरण करायला सुरू केले.मुलं हुशार ठरली की त्यांचे पालक ही हुशार,जागरूक पालकसभ्य पालक असे मानले जाऊ लागले मुलांच्या पालकाना ही समाज  व बेजबाबदार पालक म्हणूनच ओळखू लागला आहे.हुशार मुलांचे पालक छाती ताणून चालू लागले.यातूनच भंयकर चढाढी सुरू झाल्या.मुलांमुलांतपालकापालकांत कमालीच्या तुलना सुरू झाल्या.परीक्षा या परीक्षा नाहीतर त्या शर्यती झाल्या.मुलं शर्यतीचं घोडे झाले आहेत.शर्यत आली की सा-यानाचं पळण्याची सक्ती झाली.आता शर्यत म्हणलं की जिंकण आलं.शर्यत कोणती ही असो.त्यात जिंकण्यासाठीच्या सा-या मार्गचा अवलंब केला जातो.गैरमार्ग व योग्यंमार्गत्यात चिंटीग सुरू झालीतश्याचं चीटींग या परीक्षा नावच्या शर्यतीत सुरू झाल्यात्यातूनचं कॉपी करणं,पेपर फुटणं,मार्कस वाढवीणं व अनेक प्रकारचे घोटाळे होऊ लागले.त्यात अनेक प्रकारची विविधता आलीकॉपी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊ लागला आहे.अनेक नवनवीन कल्पना आल्या.
                               परीक्षा केंद्रावर नुसती पळापळी सुरू झाली.परीक्षा सेंटरला बाजारचे स्वरूप आले.प्रशासनावर ताण आला आहे.कॉपी बहाद्दर मौत का खेल करू लागले.चीप ,उपचीप, प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक,शिपाई,पोलीस (अर्थात परीक्षा सेंटरवर डीयुटी असणारे ) यांना अनन्यसाधारण महत्व् आलं.या काळात  काही शिक्षक हिरो झालेले आपण सारे पहातच असतोकॉपीला सपोर्ट करणारे शिक्षक विदयार्थी प्रिय शिक्षक,लोकप्रिय शिक्षक झालेले आपण पहातचं आहोत.त्यातले अनेकजण  आदर्श पुरस्कार पटाकावून ही बसले आहेत.अशी सेंटर असणारी शाळानां एक वगेळचं वैभव प्राप्त झालेले याच देही याच डोळी पाहीले आहे.तुम्ही म्हणालं त्यात एवढं काय ?हे तर आम्ही सारखंच पहात आहोतनवीन काय.?कॉप्या तर सारेच करतात.
                        एका परीक्षा केंद्रावर चक्कर टाकण्याचं  योग   आला.आमचा एक परममित्र  त्या सेंटरवर गार्डींगसाठी नेमला होता.त्याच्याकडं माझं एक खाजगी  पण महत्त्वाचं काम होतं.त्या प्रागंणात मी शिरताचं आमच्या गल्लीतलं शामराव काका तिथे भेटले.त्या परिक्षा केंद्रावर लांब एका झूडूपा खाली स्वारी जरा खराब मूडमध्ये उभी होती.त्यांच्या बाजूला काकू पण होत्या.मला पाहिलं की ते पळतचं आले.मी जाग्यावरच उभा राहिलो.आता हे दोघ पण इथं आहेत म्हणाल्यावर माझ्या लक्षात आलं.त्यांच्या स्वीटीचा पेपर दिसतोय.तिचं खरं नावं तृप्ती.लाडाचं नाव स्वीटी.सारी गल्ली तिला स्वीटीचं म्हणते.स्वीटी काका आणि काकूची एकुलती एक लाडाची लेक.ते जवळ आलेउन्हं किर्रं पडलं होतं.मीच आपलं झाडं जवळ करण्याचा प्रयत्न केला.चालत चालत आम्ही झुडूपाखाली गेलोत.तिथं ही अनेक पालक होते.त्यात माता पालकांची ही संख्या लक्षणीय होती.आता माता पालकांना ही आपली जबबादारीची जाणीव झाली आहे.मुलांच्या यशात आई आणि वडीलांचा वाटा मोठा असतो. (तो समान असावा असं माता पालकांना ही वाटणं साहजिकचं आहे.) आपण अनेक यशवंताच्या तोंडून ऐकतचं असतो.मी आपलं त्यांना सहज विचारलं,”कसं काय गेलेत स्वीटी दिदीला पेपर ?
पेपर चांगले गेलेत.कायम ती वर्गात टॉपवरच राहती पण.”
आता काय पण.”
सरळ ,स्भ्य माणसाची काम नाही राहिले आता.”
कसं काय ? तिला तर पेपर चांगले गेलेत ना?”
पेपर चांगले गेलत पण सारं वशिल्याचं खेळ.गरीबाचं कोण वाली.”(गरीब म्हणून त्यांची काही ख्याती नव्हती पण ते तस समजत असावेत.स्वत:ला काय समजावं हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न असतो.)
आता यात काय वशिला ? गरीब श्रींमतीचा काय प्रश्नं ?”माझा एक भाबडा प्रश्नं.
असं कसंतुम्ही सारं जणता.कमून गरीबाची थटटा करता ?”
आज इंग्रजीचा पेपरनेमकं आजच झाडून काढलेतन सारी पोरंपोरी.”
रोज नाही.आजच का तपासलं?”
नेमकं तेवढया वेळातचं कसलं तरी जिल्हयाचा मोठा सायेब आला.लयचं कडक जणू तेव्हं.”
मग गेला असेल ना लगीच ?”
“ते थांबत आसतेत व्हयं.जायला काय लगेच गेला पण आता स्वीटी कडं काहीच राहिलं नाहीअपेक्षीत घेतलं.मायक्रो झेराॅक्स ही घेतल्यागेसच गाईड व्हतं ते भी घेतलं.”
असं इतकं कसून नाही तपासयाला पाहिजेसा-याच पोराची पंच्यात झाली आताते तपासायाला ते सर नी मॅडम होत्यानं त्यांनी काय लयंच अभ्यास करून परीक्षा दिली आसलं काय?”
 शेजारी एक नव तरूण उभा होता.त्यांन डायरेक्ट आक्षेप घेतला.मी त्याच्याकडं पाहिलं.त्याचा कॉन्फीडन्स जबरदस्तं होता.तो नेटका होता.रूबाब तर विचिरूच नका.
खरं काय राहिलयं ? पैसं घेतले आसतेल त्यांनीतोंड पाहून,तोंड पाहून  तपासीत होते.” 
तिथचं एक पौढ बसले होते. त्यांनी डायरेक्टं त्या दोघावर आरोपचं केले.
काकात्याचं काय एवढं टॅन्शान घेता?आत सर लोक मदत करतच आसतेत मुलांनाआपल्या सारखचं त्यांना पण मुलांचं टेन्शनं आसतचं की.” सामुहिक कॉपीचे महायज्ञ मी माझ्या डोळयानी पाहीलं होते. त्यामुळे मला अंदाज होतामला आमच्या काकाचं टेन्शनं कमी करायचं होतं.
कसलं कायसारं वशील्यानं चालतं आतां.आपल्या साळा असल्यासा-या पैसं घेऊनचं ॲडमीशन देतातपासींग सह गुत्तचं घेतेत.त्याचं सारं लक्ष त्याचं पोराकडं असतंंआपली पोरं तशीचं राहणारं.”
पासींग पुरत ते सा-यालाच सांगणारेत असं आमचं शेळके सर म्हणत होतेतिथचं एक सभ्यं व शांत पालकांनी त्याचं तोंड उचकटलं.
ते तर करतेलचं पण दयायचं थोडं मटरेल बाहेरून भी.” मी जास्तीचा सल्ला दिला.
कसं दया?”
खिडकीतून दयायचं नाय.. तर सरळ आत जाऊन दयायचं.”
आत…? आम्हला कोण जाऊन देतेतत्याला भी वशिला पायजे.तेव्हं परदश्या गेला की सरळ आत मोठया सायबावाणी  डुलत डुलत…. सारं देउन आला पोराला.त्या तिकडं बसलाय आता आईस्क्रीम खात.”
असं नाय करायला पायजे.जाऊ दयायचं तर सा-यालाच जाऊ दयालया पायजेहयो अन्याय  झाला.” मी आपलं सहज हळहळ व्यक्तं केली.दुसरं मी काय करू शकत होतो?
आता त्याचं दारूचं दुकानं… हप्तेबिप्ते चालू असतेत.ओळखी पाळखी आसत्याततुम्ही काय दोन नंबर करता का?"
इतका वेळ शांत बसलेल्या काकू बोलल्या.माझ्या समोरचं एका खिडकीवर झुंबड उडली होती.माकडासारखी माणसं गजाला लोंबकळत होती.
जाऊ दया.आपलं असं खिडकीतून दयायाचं.”
कसं ? अहो आमच्या स्वीटीचा नंबर वरच्या मजल्यावर आलायनेमका मधल्या रांगेत.”
त्या प्राचार्याची नात परीक्षा देतीयंत्यामुळे खालीवरून नंबर दयायला सूरू केलं.सारं त्यांच्याचं हातात.” एक खरमरीत चेह-याचा पालक आपल्या टकलवरला घाम पुसतं म्हणाला.
एवढचं नाय.तिला अर्धा तास जादा वेळ देतेत असं ऐकल मी.काही खरं नाय. सारं मॅनेज रावआपल्यासाख्याचं फक्तं हालं.”
लयचं पर्सनॅलीटी चालली मग पत्रकार लोंकाना सांगायला पायजे.”
ते कशाचं काय करतेतच्या पाणी दिलं की झालंबर त्यांना कोण आडवीतते सरळ जातेत येतेतजवळच्या जवळच्याला देते कॉप्या.त्यांच भी कुणी तरी आसतचं की.”
जाउ दयालयं कॉप्या करून तरी काय ओरीजनल ते ओरीजनलच असत.”
असं नका म्हणून….. पोरांना मार्क कमी पडलं की त्यांच काॅन्फीडन्स कमी होतं.काहीचं येत नसून ही मार्क चांगली पडलं की त्यांचा उगचं पाऊर वाढतोत्यांची नुसती शायनींगच पाहत बसावं लागत.” कोणत्याचं उत्तरांन त्याचं समाधान होत नाही हे पाहून मी आपलं समजुतीच्या स्वरात म्हणलं,”आता काय करावं?दयायचं सोडूनआपलं अभ्यासावर लक्ष दयायच.” माणूस मदत नाही करू शकला की फुकटचा उपदेश करायला सुरू करतो.
ते तर हायचं हो.दोन दोन क्लास लावलेत मी तर.पण त्यांच भी फिक्सनचं आसतंफालतू पोरीचा लाड करतेत ते.मोठयाच्या लेकरांच्या पुढं पुढं करतेत ते.”
ज्याला जे जमतं ते करतकाय करावं?” मी खरतर हतबल झालो होतो.
पण अन्याय नाय करायला पायजे.समोर काय चाललं पगाहे पोरग वर चढून दोनचं प्रश्नं घेऊन गेलं होत.खालूनच काठीन मारलं.”
हयो वरच्या मजल्यावर कसा गेला?”
गेला खिडकीवर चढून.लय चपळ पण मरणाचे रेमाटलं.सारं अंग मऊ केलयं. म्हणालाय गेलं तर माझ्यावरच धावून आलं ते शेपूर्ड….” एक चुणचुणीत गोरं गोमटं पोरग माझ्या समोर उभा केलं.त्याचा चेहरा लाल झाला होता. चांगलं रेखाटलं  असावं त्याचा चेहराचं सांगत होता.
हा कोणयं ?”
दुसरं  कोणहीच्या भावाचं पोरगखास परीक्षेसाठी बोलावून घेतलाय.”मी पाहिलंअक्षरशत्याच्या पाठीवर्‍ आणि पिंढ-यावर जबरदसत मार  होता.वळ उठले होते.तो बिचारा सारं अंग दाखवत होता.मला त्या कूर पोलीस कर्मचा-याचा भंयकर राग आला.
असं कसं मारता गुरावाणी. त्याचं वय नव्हतं.हो ,एवढा मार खायचं.आत नाही जाऊ दयायचं तर नाही जाऊ दयायचं पण सा-यानाचं नाही जाऊ दिलं पायजे.असा भेदभाव काय कामाचा?" काकीनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं.तो मासूम चेहरा ओशाळला.त्यांच्या समोर इतकं मारलं तरी आमचे काका काहीच करू शकत नव्हते.ज्याची चलायची त्याची चलती
          तेवढयात टोल वाजला."बघा, काही तरी कराआता एकचं तास राहिलायतुमच्या जरा ओळखी आसत्यात."
त्यांची उलाघाल वाढली होती.मी काही तरी करू शकतो असं त्यांना वाटत होतं.
"बघतो काही जमत का ?"असं म्हणून मी तिथून सटकालो.माझी मीच सुटका करून घेतली.सा-या खिडक्याला माणसं लोंबकळत होती.पोलिस मागे पळत होते. शिटया वाजत होत्याआत अनेक सर लोक विदयार्थ्याना मदत करण्यात गर्क होतेमी दोनचं मिनीटं चाललो असेल.तेवढययात चार पाच पोरानी एक पोलीस कर्मचा-यावरचं आक्रमण केलतसे सारेच धावले.सारी गर्दीच गर्दी झाली.त्या गर्दीतून जागा करीत मी रोड पकडला.
                आपण कॉपीमुक्तीसाठी काय करू शकतो ? या विचारतच मी गाडीला किक मारली.अशी ही व्यथाअशी ही कथा…!!
                                               परशुराम सोंडगेपाटोदा
                                                         

मंगळवार, ६ मार्च, २०१८

तू असचं छान लाजत राहवं

तुझे चांदण पाऊल या माझ्या प्रेम कविता संग्रहातील
या कविता खास माझ्याच आवाजात. नक्की ऐका

सोमवार, ५ मार्च, २०१८

युज अॅन्ड थ्रो.

 आबाला बसस्टॉपवर सोडयासाठी आलो होतो. बसस्टॉपवर फार गर्दी होती. नुसती चेंगराचेंगरी... तसल्या गर्दीत शाम्या भेटला. शाम्या काय आमचा क्लासमेट बिट नाही.तेव्ह. आणि आमचा दादा...म्हणजे चुलता.एका वर्गात होते पण त्याला अख्खं गावचं शाम्या म्हणतं. लहान थोर सारेचं. शाम्या नावचं पडलं त्याचं .त्याचा ही कधी धताबाला राग आला नाई. समदचं म्हणतेय गडीच लयं सरळ.आपलं काम जानं नि आपून जानं. तो भेटला म्हणजी.. जरा गडी तारांबळीतच असावा.केस वाढलेले...दाढी वाढलेली...काळी पांढरी...खूटं लयं विद्रूप दिसतं होती. बरं कपडे धड नव्हतं त्याची. बेसूर दिसतं होता. पार कंबरात वाकून नमस्कार केला. अगदी मुजरा केल्यावाणी. "राम राम सायब..."
"काय शामा काका ....कुणीकडे इकडं.?"
 "आता लयं ताप झालायं. तुम्हाला नाही का माहित?"
 "...नाय बुवा.काय झालय?"
 "तेच..ते..इलेक्शनचा राडा."
 "इलेकशनचा राडा...कसला...?"
 "निल्या टाकलायना आत ..."
"आत...निल्या..?"
 "पोलसाडचं जिप्पडचं आल्लतं.उचल्लं पोरगं त्यांनी रातचंच." "पण कमून...?"
"दुसरं काय राजकारणच."
"आर, राजकारणचा तुझा काय सबंध ?"
" कमून थट्टा करता गरीबाची?तुम्हाला माहित नाय व्हयं? घाबडं ....राज्या माग फिरतं होतं. त्याचाचं कुसूर काढला त्यांनी..."
" आत्ता हे राज कोणतं बुवा...?"
 "ते...निखीलराजे कसबे पाटील...पाटल्याचा नातू...प्रतापरावचं पोरगं..?"
 "प्रतापरावच पोरगं..राजं झालय काय..?"
"तेच..ते...लयं बेस्ट गडी...हवा भी लय केली त्यांनी. वट भी जणू त्याचा. नुसती पोरचं माग त्याच्या. गडी आला की पाच पन्नस नव्वाट पोरग गोळा व्हतंय."
"मग...?"
 "मतदानाच्या दिवशी नव्हता उल्लीकसा राडा झाला.बूथावर... त्यांच्या वरूनच बारा पोरं पोलसाडानं उचल्ली. त्यांच झालं राजकारण पण लयं पोरं पिसल्लीत.... पोलसाडचं ती ! त्यांना कुठं दया मया असती व्हयं ? नुसत्या आकडं झाल्लीत. निल्यात पारचं गारं झालंय."
 "मग ते राज नाय काय सोडीत?"
 " त्यांच्या कडचं आल्लतो.सुटत्यालं म्हणतेतं...पाच सहा दिवसात. सुटूनशान तरी काय करतील ? लंय्यं काम करत्याय काय? उग टॅन्शॅन नका घेऊ.उग गप्प मरा".
"मरा की गप्प.."
"निल्याची आय दम खातीयं व्हयं.? ते तर येडचं. हायच खाल्ली. असल्या टायमाला हाय खाऊन जमत का ? राजकारणात  अशा कुरघोडया....डाव असत्यातचं. तस्स त्याला काय कमी...?डब्ब बिब्बं जातेतय..बाहेरून..."
 "मग काय...सुटलचं ना ...आज उदया...करतेलं जामिन.सारं...मॅनेज करतेलं.सत्ता...पैसा.. त्यांच्याकडं काय नाय..?."
" त्यांचं काय करायचं....आपल्याकडं काय ?म्या कधी असल्या लफडयात नाय पडलो बुवा. पोरानी पार मथुरा पाण्यात घातली. असली पोरं मेलेलो बरं."
 " असं त्रागा नका करू. सुटलं...होत असतं. समोर चं भी पडलेले असतेत.पैस गेलेलं असतेत.राग असतोचं. व्हयील कमी."
 "ते टेलर तसचं म्हणत व्हतं "
 "कस्स?"
 "आता पुढचं जे इलेक्शॅन झालं त्यात.या दोन्ही पार्टया एकचं झाल्यात जणू.... काॅप्रमाईज काय ते झालयं जनू."
 "झालं असेल विकासाठी.विकासाच्या मुद्द्यावर एक व्हावचं लागतं. "
"कसला इकास अन् बिकास..वर सारं एकचंअसत्यात.दाखवायचं दात अन् खायचं दात येगळचं असत्यात. आपूनचं येडेत म्हणायचं अन् काय."
 "असं कसं म्हणतोस...आर ते पक्षच वेगळे."
 "मलात काय भी कळत नाय.टकले यांनी केस केली.पोरं जित्राबावाणी पिसल्लेत .ते आणि कसबे राजे एकचं झाल्यात.तसलं कसलं व्हृटस अप काय असतं त्यावर आल्त जणू. दोघ एका ताटात जेवतेत जनू "
"मग..निल्या का म्हणतोय आता.?" "ते कशाच काय म्हणतयं ? नुसतं दाताड काढतं .राजकारण असंचं असतं म्हणतयं.तुम्हाला नाय कळायचं."
 "असं म्हणतयं ?मग ....कळतय की नाय? "
 "नाय बाबा.अस्सलं राजकारण नाय कळतं. कुणाचं वासरूआणि कुणाला पेत.काहीचं मेळ नाय."
 "मग जाऊ दया.... नाय मेळ तर नाय."
 "आता हे झालं माझ...पण निल्याची आय. दम काढती व्हयं ? ते तर येड नुसंत रडतं . मवा निल्या..मवा निल्या .. "
 " काका. आईचं ह्रदय ते. तडफडणाराचं "
 "आर, सारं खरं पण मी तरी काय करू ? माझा जीव तडफडत नाय काय ? ते एक झालेत म्हणल्यावर....कोण लक्ष देत आता या घाबडयाकडं. आपलं नाय शहाणं ...दुस-यावर कशाला टेपूरा." शामा काका हताश वाटला. त्याचं डोळे पाणवलं होतं. गळयातलं भगवं उपारणं काढलं. डोळं पुसलं. त्याचा हुंदका अनावर झाल्ता. त्यानं तो तसाच दाबला. मला ही त्याच्या जखमेवर अजून मिठ चोळायचं नव्हतं.
"येतो ...गाडी लागली आसलं."
            माझ्या पासून तरातरा निघून गेला.मी विचार करत बसलो.राजकारण असं कसं झालं. शामकाकाच्या डोळयातील पाणी मला पाहवलं नाही. अगदी आमने सामने लढणारी नेते एक कसं होतात ?पक्षाची तत्व, जाहीरनामा, विचार यांना काहीच महत्व नसतं का ? एका एका मतावरून सरकार पडलेली याचं डोळयांनी पाहिली. तत्त्वला महत्त्व दिलं गेलं. आता तत्त्वापेक्षा विकासाला महत्तव आलं. विकासाठी एक आलोत. असं ते ठासून सांगत असतात.आता विकास....तर.आपण पहातोच अहोत की....सत्तेसाठी काय पण... हेच होणार असेल.लुटूपुटूचे भांडण होणार असतील.तर आमच्या शामा काकाच्या निल्याचं का व्हावं? सत्तेवर मिळून जाऊ.दोघ मिळून खाऊ.याचसाठी राजकारण असेलतर ....? नागरिकशास्त्रातले शिकलेल्या धडयाचं काय करायचं? बरं.हे कुठं ग्राप....पस...जिपला झालं तरी समजू शकतं.पण डायरेक्ट विधानसभेतचं...अशी तत्व खुटीला अडकवून ठेवू लागल्यावर....लोकशाही चं काय ? आता जन्माची वैरी गळयात गळा घालून फिरायला लागल्यावर... चेल्यांनी...पिल्यांनी काय करायचं? चमचे फिरतील इकडून तिकड... त्यांच काय कसं जमतयं.पण निष्ठावंताचं काय ? निल्याला राजकारण कळत असेल पण त्याच्या आईला हे कसं कळणार? तिनं आपल्या पोराचं आयुष्य...भविष्य उध्दवस्त होतानी कसं पहायचं. असलं राजकारण त्या भोळया मायला थोडचं कळत असतं ? आपल्याला निल्याचं नाही पण त्याच्या आईचं जॅम टेन्शन आलं बुवा...!
                                      परशुराम सोंडगे,पाटोदा,( बीड)
                                          9673400928
                              sahitygandha.blogspot. com

रविवार, ४ मार्च, २०१८

लोकशाही झिंदाबाद

आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या.गाव गावचं पुढारी निवडण्यात आलं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत आली.नात्या गोत्यात,पावण्या -रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू-सुना आमने सामने आल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या.बाप-लेक एकमेकांची उणी धुणी काढु लागले.बाधांवरल्या दुशमन्या गावाचे मोठे प्रश्न झाले.गावातल्या पोरा पोरीची लफडे,मोठयाला माणसाची जुगाड प्रचाराची मुद्दे झाले.जातीजातीचे गटाव झाले.भावकीचे गटाव झाले.तालुक्यातील,परिसरातली नेते मंडळी आपआपला पाऊर वाढण्यासठी गावागावात चकरा मारू लागले.डावपेच रंगलं.कुणी खुटया हाणू लागलं.कुणी गुंडया मनात धरू लागलं.सारं रोडची धाबे फुल्लं चल्लु लागली.पंग झालेली माणसं प्रचार करू लागली.इरोधातल्याची आयमाय उजारू लागले.पापंलेटी,बॅनरं झळकू लागले.गावातली हुशार माणसं बेरजा करू लागले.एक्झीट पोल सांगू लागले.कशाच्या ही वावडया उठया लागल्या.साध्या साध्या गोष्टीवर माणसं हमरी तुमरी येऊ लागले. वातावरण तंग झाले.कवा काडी पडणं कवा भडका उडलं.याचा नेम राहीला नवहता.रातच्या बैठका रंगू लागक्या.एकदंरीत वातावरण चांगलचं तापलं होतं. अशाच एका संवेदनशील बूथ असलेल्या गावात निवडणूकीत मतदान अधिकारी म्हणून माझ्या एका मित्रांची निवड झाली होती.त्यानं सांगितलेली ही घटना आहे.त्यानं सांगितली पण आपल्या सभोवती सरार्स या घटना घडत असतात.आपण तसे याबाबतीत एवढे गंभीर नसतोत.गंभीर तर नसतोतच पण बेजबाबदार ही असतोत. मतदाराला मतदान स्वतंत्रपणे व निर्भीडपणे करता यावे असा प्रशासनाचा प्रयत्न असतो.ते अधिकारी याचा कसून प्रयत्न करत होते.अनेक उत्साही कार्यकर्ते नियमाचं  उल्लघंन करण्याचा प्रयत्न करत होते.अर्थात त्यात स्टंटचबाजीच जास्त असते.मोठयाने आवाज करणे,उगच शिव्या देणं,समोरच्यावर आक्रमण करणे.हे सारं उगचं करणं.दहशत पसरविणे हा त्यांचा उद्देश असतो.कधी कधी आपणच फक्त प्रमाणिक आणि आक्रमक कार्यकर्ता आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
         ती त्यांची गरज ही असते.प्रत्येक धंदयाचं एक कौशल्य असत.राजकारण हा जर धंदा मानला तर अशी नाटक करणं आवश्यकच असते.अभिनय उत्तम करावा लागतो.एखादया कसलेल्या कलाकारापेक्षा ते ग्रेट असतात. नेत्यांना ओरिजनल स्टेज असते. इतर पात्र ही खरे खुरे माणसं असतात.त्यांच्या भावना नाटकी नसतात.ओरिजनलं स्टेजवर हा अभिनय करावा लागतो.एकटयालाच हे करावं लागतं.
असा' शो 'च असतो पण गोंधळ खरा होतो.तो खरा गोंधळ होतो.पोलिस शिपायाची दमछाक होते.अनेक लोक पळत ....पुन्हा येत.मतदान केल्यानंतर तिथचं थांबत.आपल्या मतदानाचा अधिकार बजावून शांत जाणारे मतदार दुर्लभ असतात.गावातील झाडून माणसं मतदानाला आणण्याचा प्रयत्न जो तो करत होता.म्हतारे कोतारे,रानातून छप्परातून आणले जात होते.कुणाला गाडीवर. ...कुणाला चालत,तर कुणाला चक्क पाटकोळी....त्यांना अंधाळे दाखवून मतदान घरातले लोकच ठोकत होते.या वेळी मात्र दोन्ही पार्टया समजदार होतात.विधानसभेत नाही का सारे आमदार एक होऊन स्वत:चं मानधन व भत्ते वाढवून घेत.बहुमताने नव्हे तर सर्वानुमते.
असाच बराचं वेळ गेल्यानंतर एक जर्जर म्हतारी आणली गेली. तिला चक्क उचलूनच आणलं होतं.एका तरूणाने त्याला अजून मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला नसावा .तो इतका लहान वाटत होता.त्याला नुकतचं मिसरूड फुटलं व्हतं.त्याचं तिथ यायचं काहीचं कारण नव्हतं. तो म्हतारीचा सोबती म्हणून आला होता.त्यालाच म्हतारीच मतदान ठोकायचं होतं.आता ज्यालाच मतदानाचा अधिकार नाही त्याला दुस-याच मतदान करण्याचा अधिकार कसा दयायचा? हा प्रश्न अधिका-यासमोर असताना तेवढयात दुसरा ही मुलगा पळतच आला.तो ही म्हतारीचा नातू होता.हा ही नातूच होता.मीच मतदान करणार म्हणून त्यांनं लांबूनच डरकाळी फोडली.जो घेऊन आला होता.त्यान तर अगोदरच दावा केला होता.आता दोघांची तिथचं जुंपली.अर्थात दोन्ही पार्ट्यांचा नेहमीप्रमाणे काही आक्षेप नव्हता.ते म्हतारीचे नातूच होतॆ.अधिका-याने उलट घराच्या भांडणात पडायला नको.त्यांचे आपापले सपोर्टर ही बोलू लागले.प्रश्न हा होता की कोणत्या नातवाला मत ठोकू दयायचे? एकच कालवा झाला.मतदान अधिका-याकडं प्रकरणं आलं. 
 अधिकारी: "आजी,खरच दिसत नाही का ?" 
आजी:" म्या काय दाटून म्हणतेयं काय ? पारं डोळयाचं खाचा झाल्यात की."
अधिकारी:"हे बोट किती?" तीन बोट म्हतारी पुढं दाखवत ते म्हणाले.म्हतारीनं थोडा वेळ घेतला.पटकन उत्तर दिलं. 
'पाच"तसं त्यातलचं एकजण आराडलं,सायेब,म्हतारी काय लबाड बोलती काय? खरच तिला दिसत नाही." सायबाची भी खात्रीच झाली होती.त्यांनी पुढच्या प्रश्न विचारला,"हे दोघ कोण आहेत ?" 
आजी:" हा थोरल्याचं नि हा धाकल्याचायं." अधिकारी:मतदान कुणाला करू दयायचं ?" 
आजी:"या धाकल्याच्याला.इकासला".असं ती म्हतारी म्हणल्या बरोबर थोरल्याचं ते पोरग पारं म्हतारीच्या अंगावरच धावून गेलं आणि म्हणालं,"म्हतारे काय म्हणालीस ?" 
आजी :"काय नाय बाबा तुला देते ना निम्मे.तेव्हचं नातू नि तू नाहीस काय ?"
 नातू :"बघ इचार कर.मतदान मला करू दे."
तो पोरगा डायरेक्टचं दम टाकत होता.हा काय तमाशा आपल्यामुळे झालाय याचं प्रेशर त्या म्हतारीला आलं होतं.तो नातू नंबर दोन जास्तच कालवा करत असल्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आलं.तवा मात्र दोन्ही पार्टया हातघाईवर आल्या.तेव्ह कराकरा दात ओठ खातचं बाहेर गेला.ते पण मोठं रगील होतं.मागं गुरकू गुरकू बघ. सर्व प्रोसीजर झाल्यानंतर त्या नातवांन मतदान केल.मतदान केल्या नंतर तेव्ह खूश झाला होता.ते खुशीतच पळालं बाहेर.म्हतारी राहिली तिथंच.आता म्हतारीला चालता येईना,उठता येईना.ती तिथचं आरडू लागली.बाकीचे म्हतारीला घेऊन बाहेर नेऊ लागले.म्हतारी जाईना."अगोदर त्याला बोलवा.महया इक्कासाला बोलवा."असं ओरडू लागली.इक्कासला मोठयाने चार पाच जणानी हाका मारल्या तवा तेव्ह आला.म्हतारीला हाताला धरून घेऊन जाऊ लागला.म्हतारी तरी जायला राजी होत नव्हती.आता सा-यांनाच काही कळेना की म्हतारीचा असा हट्ट का? "तू अगोदर त्या दोन नोटा दे." 
"चल बाहेर देतो"
 "नाय आता दे.इथच दे.त्या सुभ्याला लगेच माझ्या हाताने देते.तेव्ह आताच डाफरून गेलाय.उग कशाला भांडणाचा कहारं."ती सर्व लोकांकडे पाहत पाहत म्हणाली.लोकांचा काहीच आक्षेप नव्हता.अर्थात तो पण त्याचा घरगुती मुद्दाच होता.फक्त त्यांनी तो घरी मिटवावा एवढीच अपेक्षा होती. बबळच इक्काश्या ओढू लागला.म्हतारी कावाली. ""तू दे आधी...त्याची भी अन् तुझी पण आजीच त्यांनी दिलेत मताला पण मला कोण देतेय.मत माझं आणि मालक हे झालेत.म्हतारी साराचं पोलखोल करील म्हणून त्या नातवानं एक शंभराची नोट काढली.तशी म्हतारी ओरडली,"म्या काय आंधळी काय?पाचश्याची दे" तसा तो विकास नावाचा नातू तिला ओढीतच घेऊन गेला.प्रश्न हा होता म्हतारीला दिसतं होत.ती आंधळी नव्हती.मग ती खोट का बोलली? इक्कासने हे डील केल असेल.म्हतारीच मतदान करून घेतो अस सांगून तिन्ही ही पार्टयाकडून पैस उकळले असणार.लय्यीचं चाप्टर गडया.त्याच्या चाप्टरपणा बाबत सा-यांच एकमत झालं होतं.मतदानाचा अधिकार नसलेला इक्कसही आजच मतदान विकत घेण्याच व्यवहार करतो.त्याला हा देश व्यवहारचतुर म्हणतो.मताचा निलाव केला जातोय.हे सारेच बघतात.नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शिकलेले अधिकार आणि कर्तव्य कुठे शोधायचे?तेव्ह इक्कस मोठा नेता होणार.हे निश्चितच आहे.असे इक्कास गावागावातून शेकडयांनी तयार होत आहेत.भारतीय नसगरिक 'भारत माझा देश आहे'ही प्रतिज्ञा म्हणत लोकशाहीचं ही झिंदाबाद करत राहतील.कुणाला काही डाऊट? परशुराम सोंडगे,पाटोदा sahitygandha.blogspot.com

बळीराजा, कर्जमुक्ती आणि कर्जमाफी वगैरे

कथा आणि व्यथा

बळीराजा आणि कर्जमुक्ती , कर्जमाफी वैगरे.....!!
चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची .
"सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा.
थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? "
धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ."
रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं .
शेवटी दोघ आले .
थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं "
धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत"
थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला पाहिजे.बघ दादा फिल्टर आणलं ."
धाकटा: ."लय घाण दारात .आजार होणारच.मी पैस देतो. शौचालयच बांधून देतो. "
म्हतारी सारं ऐकत व्हती .ती जरा सटकली म्हणाली , "आरं शाहण्यावं, म्हता-याला दवाखान्यात न्यायचं सोडून हे काय लावलं ?फिल्टारच काय आणताय? संडास काय बांधता ?सारी नाटकचं का ? दवाखान्यात न्या नाहीतर म्हया राजाच्या मातीला सुद्दीक येऊ नका ."

कथेतल्या पोरांसारखंच सरकार निष्ठूर झालं आहे. शेतक-यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि हे धोरण आखताहेत शेतक-याची कर्ज माफी ,कर्ज मुक्तीची मागणी असतानी मुख्यमंञ्याला कशा सुंदर कल्पना सुचतात ? कसे भयकर उपाय सुचतात ? या पेक्षा निष्ठूर कोणं असू शकेल बरं ? काय शेतक-याची व्यथा आहे आणि काय कथा झाली आहे.
. . . . . . . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
sahitygandha.blogspot. com
https://www.misalpav.com/node/39191या वर ही कथा वाचता येईल
लेखसंस्कृतीकथा



गरिबी अाणि जिद्द

कथा आणि व्यथा

गरिबी आणि जिद्द

यवतमाळ शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण  त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण  नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.
 आम्ही थांबल्याबरोबर ती सारीचं माणसं आमच्याकडं पाहू लागली.कारण ही तसचं होतं.आम्ही सारे नटून थटून आलो होतो. पुढी-या टाईप. एकदम पाॅश...आम्ही तिथचं बाकडयावर टेकलो. बाकडांनी आमचं कपडे मळू नाहीत म्हणून सावध बसलो. अल्लाद...
" तीन चाय दे लवकर." मी आॅडर सोडली.
तो हाॅटेलवाला पाण्याचा जग घेऊन आला.
पलीकडं काही कागद पडले होते. काही खरकट सांडलं होतं.त्याच्या हातात जे ओलं फडकं होतं.त्यानं पुसून घेतलं. सापसूप करून घेतलं.
"सायब पाणी...!!" मी आणि माझ्या मित्रांनी त्याच्याकडं पाहिलं.त्या नजरेत थोडी तुच्छता नि राग होता.  गि-हाईक आलं की त्याला पाणी दयावं नंतर आॅर्डर घ्यावी अशी रीतच असते. त्यात रागण्यासारख काय होत ? त्या मघाकडं  आम्ही तुच्छ नजरेनं पाहिलं.
"सायब तुम्हाला बिसलरी हवी का ? पण ती माझ्याकडं नाही.समोरून आणून देऊ का ?"
"एवढं मोठं हॉटेल आहे नि बिसलरी नाही? "
"सायब त्याला फ्रिज पायजे की "
"मग ठेवायचं की?"
" इथं असं रस्त्यावर...? " तो हासला आणि पळतचं मेडीकल मध्ये गेला . त्याला कळून चूकलं होतं हे आपली मज्जा घेत आहेत. तो पाण्याची बाटली घेऊन आला. मला देत तो म्हणाला,
"सायब पाणी नाय ठेवत मी पण चहा असा फक्कड बनवतो ."
"स्वच्छता भी पायजे.नुसतं फक्कड नि बिक्कड" काय कामाचा ?" मी उगच उपदेशाचा डोस दिला.असा डोस देण्याची संधी आली तर सहसा मी सोडत नाही. स्वच्छता शब्द एेकल्यावर तो बारिक हासला. तिथं जी माणसं होती. ती घटाघटा पाणी पित. चहा पित.वचावचा खात.मी कुतुहलाने पहात होतो.ते इतकं घाणरेडे खात आहेत. धूळ बसलेले अन्न खात आहेत.इतकं अशुध्द पाणी पित आहेत.यांच्या पोटात इतके विषाणू जात असतील.जंतू जात असतील.यांना कसं काही होत नाही?रोग गरीबांच शरीर निवडत नसतील काय ?
माझा मलाच भाबडा प्रश्न पडला.
आमच्यासाठी स्पेशल चहा बनत होता.तेवढयात तिथं एक कप्पलं आलं. त्यांच्या सोबत त्यांच एक पिल्लू पण होत. त्या गडयाचे केस  वाढलेले...विस्कटलेले...थोडे थोडे पिकायला लागलेले.दाढीचं खूट वाढलेले. जीन्स होती पण फाटलेली..मळलेली...त्यानं किमान आठ दिवस तरी अंघोळ केली नसेल.गाल पार चपटे झाले होते. त्याची बायको पण तशीच अवतार उतारलेली होती. तिचं वय तीसच्या आतचं असावं .जांभळया गर्द रंगाची साडी.कळकटलेल हिरवट रंगाचं पोलकं... ते पण विरलेलं होतं.त्यातून तिचं अंग दिसतं होतं. तिचा ते पदराने झाकण्यासाठी केविलवाणा प्रयत्न चालु होता. . केसाचा झाप झालेला...पायात तुटकी चप्पल...ते लेकरू कडाला. त्याचं अंग मळलेलं...शेंबडाच्या वाळून गेलेल्या रेषा.. ते पण हं ते तिला तोडीत होतं.तिनं तिला पाजलं होत की नाही ? ते भुकेलेले असावं. तिनचं जर काही खाल्ल नसल्ल तर ? ती काय करू शकत होती. बाकी ती सुंदर  नाही पण आकर्षक होती.  तिची आकर्षकता तिच्या तारूण्यात असावी.तिला पाहिलं की मला जरा कळवळून आलं. ह्रदय माझं कणव पाझरू लागलं. ते सारे आमच्या पुढयात येऊन उभे राहिले.
" ती खिचडी दे एक प्लेट" त्यानं आॅर्डर दिली.
" पैसं आहेत का ?"
" दहा....हायेत "
"आरं मग ...पाच ?"
"देऊ की दादा .... त्यानं विनवणी केली.
"असं रोजचं कमी कसं ?"
" दे दादा ...आज देऊ तुझे .लेकरू लयं भुकेल"
हाॅटेलवाल्यांन लगेच एक प्लेट घेतली.खिचडी टाकली.त्यावर हरभरा उसळ टाकली .कांदा कापला.कोंथिबर टाकली तिच्या हातात दिली.
"बस्स..एकचं.तुम्हाला नको का?"
"आम्हाला नको .आज लग्नात जातोय.तिथचं खाऊ ." तिनं सपष्टीकरणं दिलं.
" त्यांना कशाला सांगायचं लग्न बिग्न...."तिनं सपष्टीकरण देणं त्याला आवडलं नव्हतं.
तिथचं झाडाच्या सावलीला बसले. आमचा चहा आला.फुरके मारीत चहाचं पिऊ लागलोत.चहाला भारी चव होती.पाॅश हॉटलात चहात अशी चव नि मज्जा नाही कधी सापडली.
 माझं लक्ष त्या कप्पलं कडेचं होतं. ती त्या लहानग्याला भरवित होती.ते लहानग अधाशापणे खात होते. हा तिथचं बसून होता. बोलता बोलता तो एकदा घास तोंडात टाकायचा.तशी ती ओरडायची ...त्याच्यावर खेकासायची..
"लेकराला खाऊ दया." तो नुसता हसायचा. दाताड काढयचा. तो जीभल्या चाटत होता.
तिच्या ही त्वांडाला पाणी सुटलं होतं.ते मी सपष्ट पाहू शकत होतो.मी त्यांच्याकडं पहातचं होतो. तेवढयात तिची नि माझी नजरा नजरा झाली.ती जरा संकोचली.  तो फटकाचं पदर तिनं नीट केला. हे मी माझ्या मित्राला दाखवलं. मला त्यांच्याबद्दल प्रंचड सहानुभूती होती .मित्र पण ते दृश्य पाहू लागलं.  आम्ही सारे त्यांच्याकडं पहात होतो.तिनं हळूचं तिच्या नव-याला सांगितल असावं .तो जरा सावध बसला.आपल्या दारिद्रायचं प्रदर्शन कुणाला हवं असेल बरं ?
माझ्या एका मित्रांनी ते करूण दृश्य कॅमे-यात बंध करण्याची उत्कट इच्छा झाली .एक बरं होतं.त्याला सेल्फी काढण्याची तीव्र इच्छा झाली नाही. त्यानं मोबाईल काढला नि फोटो काढले. त्यांनी फोटो काढलेले तिला कळले.ती ताडकून उभी  राहिली.त्या लहानग्याला भरवण्याचं बंद केल.तिथूनचं ओरडली," फोटो का काढला काय  ? आम्ही काय वेडे वाटलोका ?"
तिला फार राग  आला होता. आमची सा-यांची चीड आली होती.
" तुझा नाय फोटो काढला मी"  मित्र घाबरून गेला. हासत हासत मागे सरकला. मोबाईल खिशात ठेऊन दिला. उग सुरक्षीत ...
ती पुन्हा पलीकडं गेली.त्या लहानग्याला खाऊ घालू लागली. हॉटेलवाला मित्राकडं बघून मुरक्या मुरक्या हासला.
" मी सहज फोटो काढयला गेलो.बाई पार जहाल दिसते बुवा"
" तुम्ही कशाला काढयचा फोटो?"
"उग आपला सहज...."
" गरीबी खूप वाईट असते. ती अशी फुटू नाहीत मावायाची."
" तसं नाही रे..."
" मग कसं ?"
" ती उपाशी राहते पण भीक नाही मागत. काम करते तेवढचं खाते.तो मात्र पैसा आला का मुत पितो."
"राहते कुठं ?"
" त्या तिथचं पुलाच्या खाली. सायब तिचं घर संसार... पण लयं इमानी .उधारी नाही ठेवत."
"पण ती इथं कशाला आली?"
"आली.कुणाला कोणतं भोग दयायचं त्याच्या हातात सायब .ती लय्यं मोठी स्टोरी हाय."
"लव्ह स्टोरी तर नाही ना ?"
"तसं...चं हाय." तो खळखळून हासला. सारे हासले. मला हासू नाही आलं.
" कसं? सांग तरी."
"एका प्राघ्यापकाची पोरगी सायब ती. त्याच्यात जीव गुंतला.आली सारं घर दार सोडून.आणि  या माठयांनी ठेवली आता पुलाच्या खाली.”
“तशीचं असलं ती.” आमच्यातला एक जण म्हणाला"असं नका म्हणू सायब. ती मला भाउ मानते.
 ती तुला भाऊ मानते पण तू मानतो का तिला बहीण..."माझा  खोचक प्रश्न.
"मानतो सायब.ती लय्यचं जिद्दी नि खंबीर ..."
मला त्याची छाती तिच्या गर्वानं फुगून आल्यावाणी वाटलं. ती आमच्याकडं पहात होती.
त्यानं तंबाखूचं पुडी काढली. त्यानं घेतली.तिला दिली चिमूटभर... दोघांनी चोळली .तोंडात टाकली. लेकराला कडेला घेतलं. तिनं त्याचा हातहातात घेतला व त्याला अधिकचं बिलगली.आमच्यकडं पाहिलं. विजयी मुद्रेने ती हासत गेली
                                  परशुराम सोंडगे,पाटोदा
                              sahitygandha.blogspot. com
                                  prshuramsondge.blogspot.com

गुरुवार, १ मार्च, २०१८

गुडमाॅर्नींग पथक (कथाकथन)

गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी एका शिक्षकाची होणारी दमछाक.  .....व. शारदा काकूची जिद्द व प्रेरणेने गाव हागणदारमुक्तीसाठी सकारात्क होणारी भुमिका  .   (मराठवाडा साहित्यसंमेलब,अंबाजोगाई येथे प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेली कथा.परशुराम सोंडगे यांच्याच अावाजात)

तहान

कथा आणि व्यथा
 ******************************
          तहान
( जलदिना निमत्त ही कथा लिहीली होती.व्यस्तमुळे प्रसिध्द करता आली नाही.माझ्या काही मित्र च्या आग्रहाखातर पोस्ट करतोय.)
त्यादिवशी दुपारी सहज मी खिडकीत उभा होतो. समोरच्या पटागंणात काही बि-हाड उतरली होती. ऊन मी म्हणत होतं. त्या पटांगणावर नावाला पण झाड नव्हतं. नुसतं वेडपाटं होती.त्याला पानं नव्हती राहिली.लेकर बाळं सारी ऊन्हात तळत होती.
गडी माणसं पालं ठोकत होती. सारे चार पाच पालं असतीलं.त्यात काही लेकरं वाळया ही होत्या.ती लहान लहान पिल्लं  नुसती केकत होती. येडया बाभळीच्या झाडावर गोधडी टाकून सावली केली आणि त्या तिथचं बसून लेकरं पाजू लागल्या.  बाकी पाच सहा लेकरं नुसती हुंदडत होती. उघडी नागडी पळत होती. त्यातल्याचं काही थोराडं पोरी, बायानं मात्र डर्म, डब्बे, कळश्या  बकेटा काढल्या. आता तिथचं संसार थाटणारं होतं. त्यांना पाणी लागणारं होतं. हे कुठून पाणी आणणार ? मलाच प्रश्न पडला.त्या पटांगणात कुठं ही सार्वजनिक नळ नव्हता.हापश्या ही बंद होता. नळाला पाणी यायचं ही पंधरा दिवस बंद झाले होते.टॅकरने पाणी पुरवठा  होतं होता.
त्यात वशिल्यावाल्याला... नगरसेवकाच्या जवळच्याला पाणी जास्त दिलं जातं होतं.
टॅकर आलं की महायुध्द सुरू झाल्या सारखा महोल होतो. दोन दिवसापूर्वीच दोन गटात टॅकर मध्ये पाईप टाकण्यावरून तुंबळ  हाणामारी झाली होती.त्या हाणामारीला थांबता थांबवता...पोलिसांच्या तोंडाचं पाणी पळालं होतं.कारणं त्या भांडणाला जातीय स्वरूप आलं होतं. जातीय स्वरूप आल्यावर मग काय दुसरं ? दंगलच...
  आता यांना पाणी कोणं देणारं ? मलाच प्रश्न पडला.  सहा सात बाया पोरी डर्म , कळशा , पात्यालं घेऊन निघाले. त्यांना पाणी हवं होतं.
आता या बापुडया कुठून पाणी आणणार...मलाच प्रश्न पडला.आता इथं जो तो पाण्यांनी परेशान. यांना कोण पाणी देणारं ?
तो सारा ताफा हापश्या जवळ गेला . हापश्याय... तो कधीचं बंद झाला होता. त्याचं दांडकं हालवून बघीतलं. त्यातून कसलं पाणी येतं? सा-याचं हिरमुसल्या. त्या पाण्याची शोध मोहीम सुरू झाली ?
पाणीचं कुठं दिसेना.
आता त्यांनी मोर्चा...काॅलनीतल्या घरांकडे वळवला.  अगोदर त्या नुसत्याचं फिरल्या...पाण्याचा त्यांना काही ठाव ठिकाणा दिसतो का हे पाहिलं.ओपन पाणी कुठं दिसतं असत व्हयं ? कुठं आता.त्या जाईत दारं वाजवतं. पाणी मागतं.त्यांना कोण पाणी देतं.जारचं विकतं पाणी घेणारे कुठं फुकट पाणी देतत असतेत का ?
भला मोठा खंडा पाहिला की गपकन दार बंद होईत.काही दारं तर उघडतचं नव्हती. कुणी नुसतं खेकसतं होती.कुत्र्यावर भुंकावं तशी भुंकत.
मला तर प्रचंड दया येत होती पण मी काही करू शकत होतो . दयेचा पाझर काळजात होऊन ही मी काहीच करू शकतं नव्हतो. कधी कधी आपण दयेच्या पाझर करण्या पलीकडं  काहीचं करू शकतं नाही. मी हतबल होतो. जेमतेम दोनच बकेट पाणी होतं माझ्याकडं
ते मेटाकुटीस आले.पाणी दिसत नव्हतं...आणी कुणी बोलतं ही नव्हतं.
आता हे काय करणारं ? मला उत्सुकता  लागली होती.
     देवगावकरचं घर त्यांना दिसलं. तो मात्र दारातल्या झांडांना पाणी घालतं होता. त्याच्या बोअरला पाणी बरं पाणी. त्याच्याकडं मोठा हौद...टॅकर आलं की तो डायरेक्ट भरून घेतो.मोटार टाकून...
त्याचं नाव घेण्याची ही सोय नाही.  त्याचा मोठे वशिलेत. नगराध्यक्ष कधी जेवायला त्याच्याकडे असतो.त्यामुळं त्याला
पाण्याला कमी नव्हतं.
  आमची सत्ता...आमचं माणसं... आमचं पाणी... असंचं वागणं असतं त्याचं. गल्लीतल्या माणसाला यांन कधी पाणी दिलं नाही. तो या भिका-यांना कधी पाणी  देणं शक्य नव्हतं.
पाणी पहायला भेटल्यामुळे ती झुंबड काही पुढे सरकेना. ते सारे नुसतं पाण्याकडं पहात राहिले. टूकमूक ...
लाचार नजरेनं सा-या पाहू लागल्या. देवगावकर...रागानं त्यांच्याकडे  पहात होता. त्या हालत नव्हत्या.उलट एकीने पुढं जाऊन धाडसानं ओठं उचकले.
" दादा दे ना पाणी. "
" पळा.. पाणी  बिणी काय नाही."
" दे ना रे...एक एक डराम दे फक्स्त..."
" पळा हे पाणी फुकाटचं नाय....
" दे ना रे दादा पाया पडते .हात जोडते. तहानलेरे..."
" आता पळता का  कसं .." तो पार मारायला धावला. ते भिकारीच लयं चिवाट....
मग हळूहळू ते पार कंपाऊडच्या  एक एक आत शिरले. आता मात्र देवगावकरचा ताबा सुटला. हातातला पाईप खाली टाकला. त्यांच्या माग पळाला तस सारे धूम...एक प्रौढ बाई पळाली नाय.
अरे दादा हाणते काय ? झाडाला पाणी देते अन् माणसाला नाय. दे ना तहानलीरं लेकरं .."
" पळ .भिकारडे.. पाणी फुकटं नायं"
"मग विकते देते काय ,"
" जाती की  नाय  .आयघाले ..." देवगावकर डायरेक्ट  शिव्याचं दयायला लागला. अंगावरच धावला तशी ती तिरकं तिरकं हालली. देवगावकरनं मोटारचं बंद केली.ते मनालाचं लाजलं. घरात गेला.
  ते सारे पालावर आली. पाणी नव्हतं .पालं टोकून गडी दमून गेले असतीलं. तहानले असतील. डरम तर सारे रिकामेचं.  एक दोघानी त्या रिकाम्या डरमावर...लाथा घातल्या. थोडा कालवा झाला. सारे गप झाले.
मी थोड आत आलो. पाणी प्यालो. माझी तहान तृप्त झाली पण...
त्यांची तहान....? या जगात असे किती लोक असतील...ते पाणी नाही पिऊ शकतं. रानावनात  किती प्राणी ,पक्षी किटक असतील त्यांना जिवंत राहण्यासाठी  पाणी नाही.
पाणी... आणि ....काही काही  आठवत राहिले.  दारात आलो तर...
पहातो तर देवगावकरच्या दारातं गर्दी होती. एक पोरगी पकडली होती.तिला चोर चोर म्हणून मारलं होतं. तिनं देलगावकरच्या नळाचं पाणी चोरलं होतं. हिसकावुन घेतलेला ...हंडा .
...सांडलेलं पाणी...माती पाणी माती पितं होती पण तिला पाणी नव्हतं.
तिच्या डोळ्यात प्रंचड चीड आणि चेह-यावर....भंयकर तहान दिसतं होती. ती तहान नक्कीचं पाण्याची नव्हती....ती माणसाच्या रक्ताचीही असू शकते.

पाणी हे जीवन जपून वापरा. ते प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी
आवश्यक असते याचे भान ठेवा.
******************************
              परशुराम सोंडगे,
                 पाटोदा( बीड )
                  9673400928

हाके मिटकरी आणि प्राण्यांची सभाLaxman hake and Amol mitkari

Laxman hake and Amol mitkari जंगलात सर्व प्राण्याची तातडीने एक सभा भरली.वाघ,सिंह,खोकडं,गेंडे,हत्ती,कुत्री,मांजर,डुक्कर,गाढव कोल्हा,हरीण,ससे ...