शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

जगजेत्ते जंतू

 ||आपुलचं संवाद आपल्याशी|

हे जग सा-यांच आहे.प्रत्येक प्राण्यांच,कीटकांच,वनस्पतींचं. ज्यांनी ज्यांनी  या पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्या सर्वांचं हे जग आहे.

फक्त माणसांचं एकट्याचं हे जग नाही.माणूस मात्र हे जग आपलं एकटयांचं आहे असं  समजतो.

कुणी काय समजावं  हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे.

बेडूक सुध्दा त्याच्या जागाचा राजा असतो.भलं आपणं त्याला डबकं समजतं असलो तरी. त्या डबक्याला आपण जग समजतं नाही पण बेडकांची ते जग असतं.

 जंगलाचा राजा सिंह असतो.अर्थात टोळयांनी तर त्यांना पण राहवचं  लागतं.एखादया समुद्रातल्या राजा शार्क मासा असतो.प्रत्येक मोठा मासा लहान माश्याला खात असतो. मासेचं माश्याला खातात असं नाही.बोके ही आपलीं पिल्लं खातो.माणसं ही माणसांचं  शोषण करतात. माणसं माणसाला खातात.(मी बातम्या वाचल्या आहेत. काही हाॅटेल मधून माणसाचं मानस खायला दिले जात होते.) असो.

मोठी माणसं लहान माणसाला गुलाम करतात. शोषण करतात.आपलं वर्चस्व या जगावर ठेवण्याचा प्रत्येक जीव प्रयत्न करत असतो. 

कोणे एके काळी डायनासोरची सत्ता या जगावर होती म्हणे.

    आता दोन वर्षा पूर्वी करोना व्हायरस एका विषाणूने हे जग काबूत केलं होतं.माणूस त्या लढाईत सध्या तरी  अंशतःजिंकला आहे.पूर्णता नाही.जेव्हा दुसरा जीव आपल्या वर आक्रमण करतो तेव्हा  तो जीव एकी करतो.सापावर तुटून पडलेल्या  मुंग्या तुम्ही पाहिल्याच असतील.माणूस ही या लढाईत काही प्रमाणात एक झाला होता.

करोना कालाचं अजून ही घाणरेडं राजकारण माणसं करतचं आहेत.

माणुस हा सदैव अजिंक्यच राहिल असं नाही.त्याचा ही पराभव होऊ शकतो.हे जग कुठला ही जीव जंतू जिंकू शकतो. काबिज करू शकतो.

  परीवर्तन अटळ असतं. परिवर्तन या जगाचा नियम आहे. सत्तांतर होत असते. ग्रमापंचायती ताब्यातून जातात हे तर जग.

मानवतेपेक्षा ही भूतदयेला संतांनी फार महत्व दिलेले आहे. जगाला कुटूंब मानण्याचा आग्रह संतांनी धरलेला आहे.

माणसावर तर प्रेम कराचं पण प्रत्येक जीवावर प्रेम करा.ह्रदय प्रेमाने पाझरू दया. प्रेमाने जग चिंब होऊ द्या.

जग फक्त प्रेमानीच  जिंकता येत नाही, का?

           परशूराम सोंडगे

       Youtuber||Blogger||

संख्या रेषा आणि आयुष्यरेषा

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

विद्यार्थ्यांना शिकवायचं म्हणून मी एक संख्या रेषा फळयावर काढली.शून्यातून दोन्हीही बाजूंनी वाढतं जाणा-या धन आणि ऋण संख्या.

रेषा अनंत असते.प्रतल ही अनंत असते.आरंभ ही अंनत आणि शेवट ही अनंत असलेली रेषा.

भूमितीय संज्ञा समजून घेताना मला नेहमी सारखंचं तत्वज्ञानाच्या काही संकल्पना मनात खुणावू लागल्या.खरचं शेवटचं नाही असं काही असू शकत? फक्त अनंत..???

अंनत विश्वाची, ब्रम्हांडाची किंवा अंनत कालाची कल्पना आपण नाही करू शकत.ती आपल्या बुद्धीची मर्यादा आहे.असो.

      आपलं आयुष्य पण एक रेषाच आहे.काळाच्या अवकाशात वाढत जाणारी रेषा.संख्यारेषेसारखी.भूतकाळ  व भविष्य काल अनंत असलेली. वेदांत तत्वज्ञानाच्या कल्पसिध्दांता प्रमाणे आपण कालचक्राच्या अंनत प्रवासात आहोत.वाढत वाढतं  जाऊन पून्हा शून्य होणारं.शून्यातून पुन्हा हे विश्व व्यापतं जाणार.

मृत्यू  हा कोणत्याचआयुष्याचा शेवट नाही असू शकत.तो एक टप्पा असेल.आयुष्यचा रेषा खंड असतं नाही. मृत्यू हा जीवाचा शैवट नाही तर एका देहातून दुस-या देहात स्थलांतरणंअसते. वैदिक तत्वज्ञानानुसार.विज्ञान तर जन्म मृत्यूचं अजून ही योग्य स्पष्टीकरण ही देऊ शकलेलं नाही.जन्मानंतरच व जन्मापूर्वचं आयुष्य विज्ञान मान्य करत नाही.तसच़ ते नाकारू ही शकलेलं नाही.

         आपलं जन्ममृत्यूच्या फे-यात भ्रमण अनिवार्य असलं तर आपण मृत्यूला का घाबरतो? जीवाच्या बाबतीत मृत्यूपेक्षा भयंकर भीतीप्रद असं दुसरं काय आहे? माणसांनं निर्भय असलं पाहिजे. निर्भयता ही मनाची एक अवस्था आहे.छातीवर गोळया झेलणारे वीर सैनिक,हसत हसत फासावर जाणारे स्वतंत्र वीर.मृत्युला हसत हसत कवटाळून अनंताच्या प्रवासाला जाणारे अनेक माणसं तुम्ही पाहिले असतील.भिती ही कल्पना आहे.कल्पनेचं माणसं खचून जातात. निर्भयता ही जीवनाची आवश्यकता आहे.

 बघा,मन निर्भय बनवा.आयुष्य अधिक सुंदर होईल.

       सुप्रभात

                     परशुराम सोंडगे

               || Youtuber||Blogger||

चेहरा वाचन

 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी||


किताबे बहूत पिढी है तुने |

मेरा चेहरा मी जरा पढो||

बता दे मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है||



 हे बाजीगर चित्रपटातील गाणं फार लोक प्रिय झालं होतं.मला तर ते खूपचं आवडलं होतं.चेहरा पण वाचला जाऊ शकतो हे मला तेव्हा कळलं होतं.पुस्तकं वाचायचं  सोडून मी चेहरे वाचत सुटलो होतो. अर्थात चेहरे वाचत बसणं सोपी गोष्टं नसते.फार रिस्की कामं असतं. ते काही दिवस मी करण्याचा प्रयत्न केला होता.चेहरे वाचण्याची काही लिपी वगैरे असते का?  लिपी वगैरे काही माहित नाही पण कला मात्र जरूर आहे. त्या माणसाला न कळता आपण त्याचा चेहरा वाचू शकतो.प्रत्येक जणचं ते वाचत असतो. पोलिस खात्यातील लोक चेहरे वाचण्यात तरबेज झालेली असतात. 

ओळखीच्या आणि अनोळखी माणसांचे पण आपण चेहरे वाचत असतो. समोर आला की आपण त्याला स्कॅन करत असतो.मनाच्या मेमरीत ते एकदा. डाऊन लोड केले की पुन्हा पुन्हा त्याला वाचत बसतो.आपल्याला भेटलेली सारीच माणसं लक्षात राहत नाहीत.सारीच माणसं कुठल्याश्या नाजूक नात्यांच्या धाग्यात गुंफली जात नाहीत.ह्रदयातल्या आपुलकीच्या ओलाव्यांन  ओथंबून येतं नाहीत. बोलल्याशिवाय माणसाचं मन कळत नाही आणि दिसणा-या सा-यांच माणसाला आपण बोलू ही शकत नाहीत. सारीच माणसं आपल्याला कशाला बोलत बसतील?आपण नुसतं पाहून ही माणसं समजून घेत असतो. तसाच प्रयत्न असतो आपला.माणसाचे चेहरे  पण बोलके असतात.

              तुम्ही कुण्या नटाच्या किंवा नटीच्या प्रेमात पडलाय का कधी?एखादा खेळाडू,एखादी माॅडेल तुम्हाला जाम आवडली असणार.त्यांना आपण कधी भेटलेलो नसतो.भेटणारं ही नसतो. तरी ते आपल्याला का आवडतात?एखाद्या गर्दीत एखादा चेहरा मनात रूतून बसतो.संपूर्ण अनोळखी गर्दीत सुध्दा आपल्याला काही माणसं प्रेमळ, काही खडूस,काही लबाड,काही क्रूर,काही समजस़ वगैरे वाटत राहतात.अर्थात आपण त्यांना भेटलेलो नसतो.आपला चेहरा वाचला जातोय हे लक्षात आलंयं म्हणून ही काही सावरलेली, बावरलेली माणसं आपण पाहतो.

आपण जरं वाचलं जाणारं असू तर आपण सावध राहायला हवं ,नाही का? चेहरा प्रसन्न, सोज्वळ ठेवावा लागेल.अंतरंगच चेह-यावर उमटतं जातं.ते लपवता येत नाही.अ़तरंग चांगल कसं करायचं?चांगली पुस्तके आणि चांगली माणसं वाचायची. मग सोप्पं की. काय?

 सुप्रभात

           परशुराम सोंडगे

        || Youtuber|Blogger||

रोजची सकाळ

 ||आपलाच संवाद आपल्याशी

  दिवस रोज उगवतो. उगवलेला सूर्य रोज मावळतो.अंधाराचं जाळं फेडत फेडत सूर्य येतो. त्याची चाहूल पुर्वी आपल्या ओठांवर लाली पसरतं देते.पहाटं रंग उमटले की चैतन्य सृष्टीच्या कणाकणांत पसरतं जातं.प्रसन्नताच सकाळ घेऊन येते.अंगास झोंबणारा गारवा असेल.झुळझुळणारा वारा असेल.किलबिलणारे पक्षी असतील.सकाळी सारं कसं मस्त असतं.ताजं ताजं असतं. भेटणारी हवा असेल नाहीतर माणसं...

  सकाळ रोज येते म्हणून उदास वाटत नाही.ती रोजच्या सारखीच येते.नटतं नाही.थटतं नाही. प्रसन्नता व ताजेपणा तिचं वैशिष्ट्यचं असतं.

 सकाळ अल्लड पोरी सारखी निरागस असते.लोभस असते. हवीहवीशी असते.

  ती रोज असते पण आपल्या सर्वांना ती रोज भेटतेच असं नाही.तिच्यासाठी आपल्याला काही वेळ आपल्या खुराडयातून बाहेर  पडावं लागतं? सकाळ कुणाच्या बेडरुम मध्ये नाही येत.त्यासाठी थोडं मुक्त व्हावं लागतं.मुक्त वगैरे म्हणजे  असं  फार काही नाही. मार्नींग वाकला जावं लागतं.बस्सं..

ती आपल्या स्वागताला सज्जचं असते.

  सकाळी सकाळी फिरायला जायचा स़ंकल्प तर  या वर्षी तुम्ही पण केलाचं असेल?मी पण केलाय. बहुतेक जण करतात.अरोग्यासाठी चा़घल असतं. काही अजून पाळत असतील.काहीचा तुटला ही असेल. संकल्प फार नाजूक असतात. ते लवकर तुटतात.ज्यांचा चालू असेल  त्यांचा ही लवकरचं तुटेल.नेहमी असचं होतं.त्याचं कारणं आळस. आळस हा पक्का मानवीय स़ंकल्पद्रोही आहे. लाखो लोकांच्या संकल्पाचं तो भरीत करतो.

आळस हा माणसाचा शत्रू आहे हे आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो आहोत.ऐकत आलो आहोत पण आपण त्याला शत्रू थोडचं मानतो? तो आपला तसा ब-याच जणा़चा जीवलगच असतो. तो आपल्या प्रेमापशात माणसाला पुरता जखडून ठेवतो. त्याची ही मिठ्ठी सोडवत नाही माणसाला.त्याला झटकून टाकला तर रम्य सकाळ आपल्याला भेटते.सकाळच्या हवेत सकारात्मक उर्जा पण  असते. ती आपल्या अंगातून शरीरात प्रवेश करते.मनाचा ताबा घेते. अनुभवातून  हे बोल आहेत.आज तीन दिवस झालयं.मार्निंग वाकला जातोय.तुम्ही जाता का? बघा जमलं तर अवघड पण अशक्य नाही.

     सुप्रभात...!!!

                   परशुराम सोंडगे

        ||Youtuber||Blogger||

स्पेशल माणूस

 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी ||



 हे जग आपलंच आहे.जगात असंख्य माणसं राहतात.इतक्या माणसाच्या गर्दीत फक्त आपल्यालाचं आवडणारी माणसं असतं नाहीत.आपल्याला आवडणारं माणूस दुस-याला आवडणारचं नाही असं ही नाही.आपल्याला अजिबात न आवडणारी माणस़ ही आपल्या अवतीभवती सगळीकडे असतातचं.

एकच माणूस अनेकां

ना ही आवडू शकतं.आवडण़ ही सपशेल खाजगी गोष्टं आहे.

आपण कुणाला तरी आवडतो ही गोष्ट माणसाला प्रच़ड आनंद देणारी असते.असं झालं की  या जगात उन्हाचे चांदणे होते.आयुष्याच़ एक सूरेल गाणे होते.आयुष्याच्या को-या कागदांवर अनेक रंग सजत जातात.अनेक स्वप्नांचे मोरपंखी दिवस  रेंगळत  राहतात.

  जगात आपलं आणि फक्तं आपलंच कुणीतरी असावं असं वाटतं पण सहसा स्पेशल आपलं असं कुणी असतं नाही.

 आपल्या आवडीचा माणुस आला की आपण स्पशेल चहा करतो,स्पेशल डीश बनवतो.असं म्हणतात की प्रेम ,जीव ओतून जर आपण काही पदार्थ बनवला तर त्याला प्रेमाची चव येते.तसं स्पेशल मनचं बनवलं कुणासाठी तर? मन सुंदर आणि गोड करण्याची पण काही रेसेपी  असते का?

असते की.सदैव हसतमुख रहा.तुम्ही समोरच्यासाठी स्पेशल होऊ शकता.

सुप्रभात

              परशुराम सोंडगे

        || Youtuber||Blogger||

समजासेवेची ढोंगं

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

   आता तुम्ही पाहिलेलं असतील गावागावात  समाज सेवेची संधी मागणारी अतिशय नम्र झालेली माणसं.समाज सेवा करण्यासाठी पण  किती आग्रही होतात माणसं, नाही?किती लाचार आणि लोचटं होतात माणसं? वाघा सारखी गुरगुरणारी माणसं  कुत्र्यासारखा गोंडा घोळतानी पाहिलेच असतील.लोकशाहीची जादू आहे ही.

राजकरणात माणसं खरं बोलत नाहीत. ते भयंकर चांगलं बोलतात.ते कधी कधी इतकं गोड असतं पचत  पण नाही.गद्दारी,फितुरी करणारी माणसं चतुर समजली जातात. राजकरणात असंच असतं हा  सुविचारचं करून टाकला आहे लोकांनी.

निवडून येणं महत्वाचं.कसा आला याला हल्ली लोक फारसं महत्व देत नाहीत.राजकरणाण  कायम शत्रू आणि मित्र नसतात तसचं मार्ग आणि गैरमार्गा हा ही प्रकार मानला जात नाही.

राजकारण हे एक करिअर झालं.व्यक्तीगत स्वार्थाला महत्व दिलं गेले आहे. व्यक्तीगत आणि  समुहाचं तुष्टीकरण सुरू झालं आहे.समुह म्हणजे  जाती आणि धर्म तसेच व्यवसायिक वर्ग उदा. नोकरदार, कामगार, शेतकरी, मजूर, बेरोजगार. तुष्टीकरण ही गंभीर समस्या बनली आहे.शोषणा पेक्षा ही भयंकर  असतं तुष्टीकरण.  मतासाठी फसव्या अभासी अश्वसनांची  खैरात सुरू झाली.सुंदर सुंदर स्वप्नाच्या झालरी फडफडू लागल्या.राजकारणातून सत्ता,सत्तेतून राजकारण. हे चक्र फिरतचं राहणार असतं. त्या चक्रातचं लोक फिरत राहतात.

विचारापेक्षा संधीसाधूपणाला महत्व आलं आहे.व्यक्तीस्तोम माजलं आहे. पक्षातील व्यक्तीच्या पूजा होऊ लागल्या आहेत.राजकरणात असचं असतं.गद्दारीला फितुरीला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं.आमिष आणि प्रलोभन देऊन दुस-याच्या कळपातील माणसं आपल्या कळपात घेणं सुरू झालं.फितुरीचं,गद्दारीचं उदात्तीकरण सुरू झालं आहे. लाॅबिंग सुरू झालं.आपला तो बाब्या....

चुकीचं समर्थन आपण समजू शकतो पण त्या गद्दारीचं  उदात्तीकरणं सुरू झालं. उदात्तीकरणासाठी चालाखपणे त्याचं समर्थन केले जाते.नीतीमुल्याची बेगडं त्यावर लपेटली जातात.स्वार्थ आणि आपला अहंकार कुरवाळणारी माणसं सर्वांनाचं  आवडतात.  अस्मिता हेरून त्यावर बोट लावून राजकीय मंडळी  गुदगुल्या  करत राहतात. त्या गुदगुल्यातूनचं लाचाराची फौजची फौजचं उभी राहते. पक्षातील सत्तेत असलेल्या महवाच्या  व्यक्तीचे पाय चाटतानी अनेक लोक तुम्ही याची डोळा पाहिले असतील.जो आपल्या कक्षेत आपण होऊन येत नाहीत.त्यांना खेचून घेतले जाणार,त्यांना तोडेन मोडून टाकले जाणार हे अपरिहार्यचं असत.राजकरणात असंच असतं म्हणून आपण ही ते स्वीकारणार का? हे सारं लाथाडून ही व्यवस्थाच उलथून टाकणार? 

सुप्रभात

             परशुराम सोंडगे

            ||Youtuber||Blogger||

नटवणं आणि सजणं

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

तुम्ही बहरलेली ,डवरलेली झाडं पाहिलीचं असतील?कुणासाठी झाडं नटतात?कुणासाठी थटतात? वेली ही अंगा खांदयावर फुलांचे  झुबके लेऊन सजलेल्या असतात.वसंत आला की झाडांना ही चैत्र पालवीचा मोह कुठे आवरतो? पल्लवीत होणं ही किती अनिवार्य असतं नाही? साधं फुलांचे  गंध, मंकरंदानी ओथंबून जाणं हे लपवून राहत नाही. आपणं आपलं अंतरंग दडून नाही ठेऊ शकतं.साधी फुलपाखरे किती रंगबेरंगी होऊन भिरभिरत राहतात फुला फुलांवर.ढग असुसले बरसायला की मोर ही नयनरम्य पिसारा फुलवून  नाचतात.मोराचं धूंद होणं असेल नाहीतर ढगाचं दाटून येणं असेल सृष्टीतलं हे रम्य आविष्कारचं असतात. नागिनीची सळसळ ही मोहकचं असते ना? हरिणीची चाल? काय कमी  हवीहवीशी असते? कोकीळचे मधूर स्वर कुणासाठी गुंजत असतात? अतिशय नटलेली थटलेली माणसं ही  आपल्या अवतीभवती असतातच की. आपल्या कुणाला तरी आवडायचं असतं.कुणाच्या तरी मनात भरायची असतं. त्यासाठी ही धडपड असते.माणसाच्या नटण्यात ,सजण्यात  मात्र एक कृत्रिमता असते. तसं सृष्टीतल्या इतरांच नसतं.जंगलात कुठं ब्युटी पार्लर ची दुकान असतात. इतरांचे रंग ,गंध घेऊन स्वतः ला पेश करायचे प्रयत्न माणसा शिवाय कुणीच करत नाही.आपणं सुगंधित व्हावं म्हणून अत्तराचे फवारे माणसाशिवाय कोण मारू शकते?फुलांची कत्तल करून केसात माळणा-या ललना ही काय कमी क्रूर नसतात? सृष्टीतल्या सर्वांनाच अधिक सुंदर दिसायचं असतं.अधिक गंधायचं असतं.अधिकचं गोड व्हायचं असतं.आपल्या मध्ये जे जे चांगलं असेल ते ते  सृष्टीत उधळून द्यायचं असतं.अंतरंगातील रंग उसळून  बाहेर कळतं नकळत येतचं असतात. 

   हे जग अतिशय सुंदर आहे आणि  ते सुंदर करण्यात आपला ही  इवलासा वाटा असतोच की.आपला रंग,गंध व रूप घेऊन व्यक्त होणं आपल्या हाती असतं.बहरणं,मोहरणं,फुलून येणं तरी दुसरं काय असतं? ते  एक व्यक्त होणंचअसतं. आपल्यातलं सर्वीत्तम  आहे ते बाहेर उधळून दिलं की अख्खं जग आपोआपच सुंदर होतं असतं. आपणं अधिकच सुंदर व चांगलं होतं राहिलं की जग  सुंदर व चांगलं असणारच आहे.तुम्हाला हे जग सुंदर करून जायचं का? तर मग आपलं सुंदर असणं अनिवार्य आहे.अश्या अनिवार्यता तर  जगण्याला अर्थ देतात, नाही का? आपलं दिसणं, बोलणं,वागणं,हासणं वगैरे सारंच सर्वांना हवंहवंसं वाटेल असं  असलं पाहिजे , नाही का? सर्वांना आपणं हवंहवंसं असं असणं सोपं नाही पण अशक्य थोडचं ?

सुप्रभात

            परशुराम सोंडगे

||Youtuber||Blogger||

 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी||


काल पूर्वसंध्येला एक भंयकर घटना या जगात घडली.माहितयं का तुम्हाला?भारत काल सिमी फायनल मॅच हारला. इतका महत्वाचा मॅच भारत हारूच कसा शकतो.राग ,संताप आणि त्रागा समाज माध्यमांवर उसळून आलेला पाहिलाच असेल.त्यात ही एक बरं झालं होत.हा मॅच पाकिस्तानासोबत नव्हता.नाहीतर भारतीय क्रिकेटपटूच काही खरं नव्हतं. भारत -पाक क्रिकेट मॅच युध्दा पेक्षा नक्कीच कमी नसतात.

 खेळ म्हटलं की हारणं आणि जिंकण आलचं.खेळात कुणाला तरी हरावाचं लागणारं असतं.कुणी तरी हारल्याशिवाय कुणीतरी जिंकणार नसतंचं. हारणं तसं कुणालाचं आवडतं नसतं.खेळाडू कधीच पराभवाची भीक मागत नसतात.प्रत्येकालाचं जिंकायचं असतं पण कधी कधी पराभवाचा धोंडा पदरी पडतोचं.पदरी जे पडलं ते पवित्र करून घेण आवश्यक असते.कुठलाचं पराभव हा अंतीम नसतो तसाच विजय ही. 

एखादी मॅच हरणं ही साधी गोष्टं असते पण हल्ली माणसं मॅच हारला की हताश होतात.रडतात.संतापतात.शिव्या देतात.फुकटचे सल्ले तर विचारूच नका.खेळात ही माणसं इतकं इमोशनल आणि गंभीर का होतात? कारण सध्या मॅच खेळले जात नाहीत तर लढले जातात.खेळाचे  सामने आपण युध्द करून ठेवले आहेत.

खेळ आणि माणूस  फार छान नातं आहे.खेळ आनंद देण्याचं साधन आहे.खेळ माणसाला संघर्षाचे धडे देतो.पराभव पचवण्याचं बळ देतो.जिंकण्यातला उन्माद कमी करतो.संयम बळकट करतो. खिलाडूवृत्तीची रूजवणं खेळातूनच होते. 

   कोंबडयाची झुंज लावून लोक ते पहात राहतात.रक्त बंबाळ झालेली कोंबडी असतील किंवा बाॅक्सींगमध्ये  हतबल आणि विवश झालेले बाॅक्सर असतील.कधी कधी त्यात काहीचे  जीव  ही जातात. फूटबालमध्ये अलीकडे अनेक खेळाडू जायबंदी होत आहेत. कधी कधी काही खेळाडू खेळता खेळता मरत आहेत.प्रंचड महत्वकंक्षेने माणसं पेटली आहेत. वर्चस्ववादाने भारलेली आहेत.माणसं उन्मादाने इतकी भडकली आहेत.ते मरणं सुध्दा साजरी करत आहेत.

   खेळाला ह्रदयाशी जोडलं जाते आहे.कसल्या कसल्या अस्मिता खेळा सोबत जोडल्या जात आहेत. खेळ माणसाच्या  भावनांशी खेळत आहेत.प्रचंड महत्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.वर्चस्वाच्या नादात खेळ राष्ट्रीय इश्यू होत आहेत.टोकाची इर्षा व जिद्द हानीकारकच असते. खेळाच्या बाबतीत  माणसं भयंकर भावनिक होताहेत. खेळातून आनंद घेता आला पाहिजे. दुस-या देशाच्या सर्वोत्तम खेळाडूचे कौतुक करणारी विशाल ह्रदयाची माणसं या जगात असली पाहिजेत.ते  आता अजिबातचं नाहीत असं नाही पण त्यांची संख्या वाढली पाहिजे.त्यात आपण ही असलं पाहिजे.समोरच्या माणसाच्या चांगुलपणाचे कौडकौतुक आपण ही करायच शिकू. काल जरी भारत हारला असला तरी आजची सकाळ इंग्लडच्या विजयात सामिल होऊन साजरी करूया.बघा जमतयं का?

           परशुराम सोंडगे.✍️

     || Youtuber||Bloger||

 ||आपुलाच संवाद आपुल्याशी||

या जगातील माणसाच्या दुःखाचं कारण आशा आहे.बुध्दांने शोधलेले मानवी दुःखाचं मूळ.आशेची पाळंमूळं खणून काढण्यासाठी  माणसाची तडफड आपण अनेक धर्म ग्रंथाच्या पानापानावर  पाहतच आलो आहोत.आशेशिवाय जीवन अशक्य आहे.वैराग्य,निरपेक्ष कर्म,अश्या अनेक संकल्पनाला माणसांनी जन्म दिला.त्यांची उकल करण्यातच आयुष्यभर माणूस झिजत राहिला.वैराग्य,निरपेक्ष कर्म यांचा अनुभव कुणी घेतला असेल बरं?कर्मकांडाचे जोखड आपल्या अंगावरती ओढून माणूस आशा नष्ट करण्यासाठी झुंजत राहिला.कुठल्याचं जीवाची पिच्छा आशा सोडत नाही.

 जीव जीवनलोलूप असतो.मरण कुणालाचं नको असते.ते किती ही अटळ असलं तरी ही. त्याला हजारोवाटा असल्यातरी.

जगण्याची  लालसा जीवाला संघर्षाच्या चरक्यात कोंबते.दुःखाची डोंगरची डोंगर अंगावर कोसळत असतानाही माणूस सुखाच्या क्षणासाठी धडपडत राहतो.

           तुम्ही  असा प्रसंग कधी पाहिला आहे का? नागाच्या जबडयात सापडलेला बेडूक.आपण जबड्यात असून ही समोरचा किटक पकडण्याचा त्याचा प्रयत्न.प्रयत्न केविलवाणा असला तरी जगण्याची लालसा जीवला जुंपून ठेवते. त्या बेडकाच्या जीभेवर वळवळणारी असते ना? ती  आशा  असते.

 आशाचा समूळ नाश अशक्य आहे पण आशा कमी करू शकतो.इच्छा नष्टं नाही पण इच्छेची तीव्रता कमी करू शकतो. छाताडावर गोळया झेलतं मरणाला ही शरण आणणारे अतुलनीय शौर्य आपण पहातोच की.आशेचा त्यागाकडे प्रवास शक्य आहे.त्यागातून ही आनंद मिळतो. त्याग आनंदाचे साधन आहे.

मित्र हो,सोप्पं की मग आनंदाचा मार्ग.आपण योगी नाही पण  जरा त्यागी तर होऊया.बघूया ना आज जमतयं का?

 सुप्रभात...!!!

                परशुराम सोंडगे

          Youtuber|| Bloger||

सकारात्मक उर्जा

 || आपुलाच संवाद आपुल्याशी ||

 

माणसाच्या पाणी,अन्न,वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा आहेत.

गरजांचा प्राधान्यक्रम आपल्याला योग्य ठरविता आला की आयुष्याचं पलॅनिंग जमलच की. 

हल्ली गरजांचा प्राधान्य क्रम ठरविताना आपला संभ्रम होतो आहे.आपण नेमकं इथचं  गोंधळून जात आहोत.

या मुलभूत गरजा इतकचं सकारात्मक विचारांनाही आपणं प्राधान्य दिले पाहिजे.श्रींमतीत व ऐश्रर्यात लोळत असलेली व शरीराने धष्टपुष्टं असलेली माणसं ही  मनानं खचलेली असतात तर भिकारी,दरिद्री व विकलांग ही उत्तूंग स्वप्न उराशी बाळगून जग जिंकण्यासाठी धडपडत असतात.

विचारांची उर्जा बाहेरून लपेटता नाही येत.सकारात्मकतेची कॅप्सूल किंवा टॅब्लेट नसते बाजारात.ती अंतरंगातूनचं उसळावी लागते.मानवी पण हे प्रचंड उर्जेचा स्त्रोत आहे. मन ती उर्जा बाहेर फेकत असते.तिच उर्जा माणसाला आतून पेटवते,तेवत ठेवते.प्रखर करते.चकाकी आणते. 

 उलट नकरात्मक उर्जा माणसाला  काळवंडून टाकते.काजळून टाकते.ग्रासून टाकते. निस्तेज करते. शेवटी माणसाच्या विझण्याचे कारण ठरते.

  सुविचार वाचून माणसं सुविचारी होत नाहीत.शाळकरी जीवनात काय आपण कमी सुविचार पाठ करतो? चांगला विचार करणा-या सवयीचं गुलाम व्हावं लागतं.तीच गुलामी माणसाला या जगाचं सिंकदर करत असते.

सकारात्मक विचारच माणसाला आकाश कवेत घेण्याचं बळ देतो.नकारात्मकता माणसाच्या जीवनातील आनंद गोठून टाकते.पंखातले अवसान गिळुन टाकते.नकारात्मकताच माणसाला नैराश्यीच्या गर्तेत ढकलते.सकारात्मकता माणसाला यशाचं शिखरावर घेऊन जाते. सकारात्मकता व नकारात्मकता माणसाच्या विचार करण्याच्या  पध्दती आहेत.फक्त कोणती ही गोष्टं सहज आणि सकारात्मकतेनं घेणं जमलं पाहिजे. ते तेज विलोभनीय असतं.  या शिवाय सक्सेस पासवर्ड  दुसरा नाही.जादूची कांडी हीच तर असते.

 चला,आज सकारात्मकतेने ऊर भरून घेऊया. 

सुप्रभात 

                           परशुराम सोंडगे

                    || Youtuber||Bloger||

संशयाचा व्हायरस

  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या न...