बुधवार, १२ जुलै, २०२३

पक्षफुटी,सदू आणि बंडया



पाराजवळ सकाळ सकाळ एक टोळकं जमा झालं होतं.सकाळ पासूनचं दोन चार गाबडी नुसती तोटं वाजवीत होतं. सकाळ सकाळचं ठो..ठो...  बारं व्हायला लागलेत म्हणल्यामुळे  गलका तर होणारच ना? त्यांच्या भोवती येणारी - जाणारी माणसं गराडा टाकित हुती.जसा जसा गरदा जमा होतं व्हता.तसं ती गाबडी चेकाळतं व्हती.त्या  रामा सावकाराच्या बंगल्याकून डीजेचा भी आवाज येतं हुता.नेमकं कशाचं काय ? हे ब-याचं जनाला कळतं नव्हतं.

 सदू  यटण पाठीवर टाकून झपाझपा शॅतात निघाला होता.एवढा गराडा पाहून तेव्हं भी थांबला.उग आपला उल्लीकसा टायेम पास करावा म्हणूनचं तेव्हं तिथं घुटमळला व्हता.

"अरं कमून  असं बारं करित्यात रं? "सबागती त्यांनी बंडयाला परशन केला. कुठं काय घडलं?त्याला काय माहित ? तेव्हं शेतकरी माणूस.लयं कुणाच्या राड्यात पडतचं नाय.

"आरं काल मोठा भूकंप झालायं की...तुला नाय व्हवं ठावं?"बंड्या त्याच्या हातावर टाळी देत  बोलला. 

"भूंकंप...??कुठं ?कवा ?" सदू हादरला ना?त्याला काही इश्यचं ठाऊक नव्हता.तेव्हं हादरायचं नाय तर काय?दोन च्यार थोबाडातून नुसते दातं विचकले.उगाच दाताड विचकल्यामुळे तर सदू  एकदमचं गांगरला. आयला हे कमून दात काढयत्यात कायनु? काही जणं चेकाळलेत.काही दाताड इचकितेत.काही त्या तिकडं नाचत्यात..म्हंजी हे काय तरी भारी घडलेलं दिसतंयं पण असं सा-यांन खुशीत गाजरं चघळया सारखं नेमकं काय झालं आसलं? आसला मज्जाच हादरा तरी कसा असलं? असला कसला भूंकप? त्याला प्रशन पडला. आता प्रशन नुसतं सदूला एकट्याला पडलाय व्हयं? आख्खा महाराष्ट्रालाच ह्यो प्रश्न हाय. असल्या प्रश्नांनी लोकांच्या मेंदूचं पारं भरितचं केलं की.त्याचं कुणाला टेन्शान.

"आर,असला हादराच कुणी कवा दिला नसलं?लयं जबर हादरायं तेव्हयं."

"जबर हादरा ?"

हाॅं...जबराटचं.....? बंड्या गुटक्यानं लाल किटाण चढलेले दात इचकित बोल्ला.

"बार उडीत्यात... नाचत्यात...असला कसला  ग्वाडं हादरा...? मज्जा लका...तुमची." सदू बंडयाची मज्जा घेतं बोल्ला.

"आर,एवढंचं काय घेऊन बसला.ते बघ डीजे...पण आलाय इकडं."

सदूनं मान वळिली. तिकडून खरचं डीजे येतं व्हता. डीजे बघितल्यावर तर सदू  पारं पपचरंचं झाला.

"खरचं की लका..आता ह्यो डीजे कशाला?."

"कशाला म्हंजी? नाचायला...!! बघ...बघ..नाचायला लागली पारू.... पोरं सोरं भी झाल्यात चालू."बंड्याने तर तालचं धरला.चांगलाच नाचायला लागला.

सदूचं टेन्शाॅन गेलं असलं तरी कनफ्यूजन  पारचं वाढलं होतं.

" अरं बंड्या हे कसला भूंकप... हे तर लग्नाच्या वरातीवाणीचं सारं.वातावराणं टाईट."

"आयला तू का यंटम का रं? भूंकपच केलाय  लका दादांन. जबर हाबाडायं हेव्हं ."

"दादानं...कोण्चा दादा....?"

"आरं, महाराष्ट्रात एकच दादा....??"

"गप,हेकाण्या...दादा कुठं एकच असतो.इथं फुटाफुटावरं दादा पडलेत? खालच्या अळीचादादा, वरच्या अळीचा,मिच मिचं डोळयाचा, तेव्हं डबका दाद्या.इथं काय एक दादा व्हयं?"

"ऐ,यंटम... एकच दादा...वन्लि अजित दादा..." बंडयानं एकदम क्लेअरचं केलं.

"ते  पवार सायबाचा पुतण्या का?तेव्हचं दादा ना?"

"हाबडा दिलायं.. आपल्या दादानं."

"हाबडा? कुणाला.??"

"आरं,फोडलानं राष्ट्रवादी पक्ष त्यांनं... फट्दिसी."

"आयला हे पक्ष हायत की फुगं रं? फटाफटाच फुटतेतं लका.मागं ती शिवसेना भी अशीच फाटकुणी फुटली. आता त्यांच होतं हिंदूत्वाचं मॅटर..यांचं काय?

"दादा तेव्हं.इक्कासचा लयं नाद दादाला."

"इक्कास?कोण्चा इक्कास? सरकार कोणाचं भी आलं तर आपलं हाय ते हायचं.शेतक-याला काय?डेंगळ?"

"आर,इक्कासाची लांब लचक दृष्टी हाय दादा कडं.ईक्कासाठीच हा यगळा इचार केला त्यांनी.शेतक-यासाठीच तर पाऊल उचलयं दादांनी."

"उग फेकू नक्कू.शेतक-यांच कोण ईचार करतयं? स्वार्थ असलं त्यांचा काही.आर,हे पुढारी लयं गंडयाचे असतेत?खायचं एका दातांनी नि दाखवायचं यगळच दात."

"आर,सत्ते शिवाय प्रश्न नाय सुटतं.अॅडजेसष्ट

"आयला ....पण ही गद्दारीचं की." सदूला काय  राजकारणातले छक्के पंजे कळतेय? ते आपला सरळं बोलत हुता.

"गद्दारी...?नाय नाय पक्ष दादांचा खरा हाय."

" हे तर लयच झालयं? ज्या ताटात खाल्लं त्याचं ताटात हागल्या सारखं झालं."

"ऐ,हेकण्या,महत्वाचं काय रं? "

" इक्कास."

" इक्कास काय इरोधात बोंबलून  होतो का?आर, ईरोधआत असलं की नुसत्या वाटा अडीतेत? इरोधातलं आमदार म्हंजी...उग बुजगावण्या गत राहतं? आहे म्हणतं येतं नाही नाही  म्हणता येतं नाही.ईक्कास करायचं म्हणलं की सत्ता पायजी.उग तंडत बसून उपेग नसतो.म्हणून ह्यो यगळा इचार केला दादांनी."

"आर,पण कुणी तरी ईरोधआत भी पायजी ना?सारेच एक झाल्यावर ? लोकशाही कशी तग धरिल?"

"लोकशाहीच नक्कू टेन्शन घेऊ तू."

"असं गापकुणई गडी फुटायचे म्हणाल्यावर काय तरी जबराटचं कारण असलं?असलं मोठाले गडी कसं काय फुटत्यात? तसली ईडी का काडी तर माग नसलं ना ?"

"नाय नाय...दादा तेव्हं.. त्याला कोण घाबरू शकतं?"

" तू काय भी म्हणं बंड्या.काही तरी हूकचं अडकईलं असणं? त्या शिवाय अशी मोठाले पक्ष कसे फुटतेलं? गेल्यावर्षा तेव्हं शिवसेना पक्ष फुटला तवा गुवाहाटी...डोंगार, झाडी..हाटील. सारं गडी स्पेशल इमानानं गडी सहल करून आणले हुते.त्यांनी लयं मज्जा केल्ती. त्यांचा डान्स भी आल्ता की मोबाईल वर.खोके काय ते पण भेटल हुतं जणू?"

"खरं,हे खरं नसतं?"

"मग हे एकदम फुकटचं कसं गद्दार हुतेल.एवढं मंत्री राहिलेलं नेतं कसं काय गळाला लागले असत्यालं?"सदूच्या मेंदूचा पारं भजं झालं होतं.

"दादांची घुसमटं भी व्हती म्हणा तशी."

"घुसमट?काय घुसमटं असलं बुवा? काही भावकीचं मॅटर आसलं? चुलत्या पुतण्याचं कुठं जमतं आपल्यात. पुराणा पासून तेचं आलं.भावकी ती भावकी.उण्याची वाटेकरी." सदा असा बोल्यावर बंडयाचं डोकं गरम झाल. बंडया कट्टरं गडी.

"गप,गैभाण्या,इक्कास साठी फूटलेत दादा.."

"इक्कास..?कोण्चा?'

"महाराष्ट्राचा..शेतक-याचा...!!"

"हे भारी मॅटर रंगिलं...शेतक-याच्या इक्कासाचं.

"बरळायला माझं काय जातं? पण त्या थोरल्या वाडयाचं कसं व्हुईल?"

"सावरकरांचा नि त्यांचा  लयं छत्तीसचा आकडा हुता."

"ते बघ,सारेचं नाचतेत? मंत्र्याच्या स्वागतला...!!"

"वरचं असं गुटमॅट झाल्यावर खालच्याची लयं पंच्यात हुती? मुळयादं झाल्यासारखं सांगता येत नाही.सोसता येत नाही."

"राजकारणात कायम कुणीच कुणाचं मित्र नसतं आणि..दुश्मन नसत. राजकारणात लयं इमोशनल.व्हायचं नसतं.डोकं वापरायच असतं."

"ते कसं?"

"जिकडं...घुग-या "तिकडं..उदो..उदो..वाहत्या नदीत घ्यायचं हात पाय धुवून..."

"बंड्या डोकं लका...तुला.आम्ही होकार इमोशनल होऊन मतदानाच्या टायमाला काशि करायचो.आता नक्की डोकं वापरायचं...हे काळीज काढून कुणाला नाही दयायच.

"मग करायचा डान्स? दादांचा नाद करायचा नाय."

सदू आणि बंड्या गर्दीत शिरले.नाचू लागले. बीजे वाजतं होता.नाद करायचा नाय....नाद करायचा..

शुक्रवार, ७ जुलै, २०२३

राजकारण आहे की बहुरंगी बहुढंगी नाटक?



हल्ली महाराष्ट्रात जनता सरप्राइज शाॅक खाऊन खाऊन घायाळ झाली आहे.उत्सुकता माणसाला पराकोटीचा आनंद देत असते.सस्पेंन्स..आता पुढे काय?  पुढे काय..?? पक्ष फुटला..आता राष्ट्रवादी कुणाची ? या प्रश्नांच उत्तर मिळवण्यासाठी कमीत कमी वर्ष  भरी तरी महाराष्ट्राला वाट पहावी लागेल.शिवसेना कुणाची या प्रश्नांच उत्तर अजून ही महाराष्ट्राला मिळाल नाही.ते मिळेलंच असं ही नाही.तो वरचं राष्ट्रवादी  पक्ष कुणाचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या मानगुटीवर ठेवण्यात  आला आहे. काही प्रश्न कायम प्रश्नच राहतात.नव्या प्रश्नाला जन्म देतात. माणसं बारा बापाचे नसतात पण प्रश्न  बाराचंचे काय  शंभर बापाचेचं पण असतात.

                या  महाराष्ट्रात  मडकी फुटावीत तशी फटाफट पक्ष कसे काय फुटतात? एवढी प्रचंड गद्दारी  कशी काय होते?कोण गद्दार ? कोण खुद्दार ?असे प्रश्न मेंदूचा पार भूगा करत आहेत.चक्क वाघाची शिकार हरणं कशी काय करतात? सध्या महाराष्ट्रात काही घडू शकतं?तुम्हाला हरिण वाघाच्या बछड्याला दूध-भात भरवताना  लाईव्ह दृश्यं दाखवलं तर तुमचं कसं होईल? कल्पना करा.नुसता आश्चर्याचा धक्का नाहीतर सरप्राइजचा बाॅम्ब अंगावर पडल्यासारखं वाटेल?सध्या अश्याच  आश्चर्याच्या प्रलयात गुदमरतो अख्खा महाराष्ट्र.टीव्ही पुढं तास तास बसून ही उत्तर सापडत नाही.या पापाचा बाप ही....ठरवता येत नाही.

           महाराष्टात चाललं ते काय चाललयं? हे असलं भयंकर राजकारण कसं असेल? छे..? हे बहूढंगी  बहुरंगी नाटय रंगलेले आहे.एक एक अंक सादर होतो आहे. भंयकर मेहनत घेऊन  पडद्या मागे तालिम केली जाते आहे .विधनाभवनाच्माया मंचावर माय बाप जनतेला नुसते सप्राईजचे शाॅक दिले जातं आहेतं. एखाद्याची पोरगी पळून जाणं ही मोठी चटकदार बातमी असते त्यात ती पोरगी खानदानी असेल तर?मग तर काय? चटकदार भेळी पेक्षा भारी काम असतं? पोरगी पळून जाणं ही फार वाईट गोष्टं असते. कुणाची का असेना. प्रंचड सहानुभूती  आपली  त्या मुलीच्या आई वडीलाबाबत असते तरी गल्लीत,गावात दबक्या आवाजात चविष्ट चर्चा  रंगतात.ऐकायला सांगायला बरं वाटतं. रोमांचक स्टोरी ऐकायला पहायला  भारी मज्जा येते लोकांना.त्या खानदानी घराण्याच्या अब्रुचं फार खोबरं झालं तरी लोकांना त्याचं फार देणं नसतं.सर्वांनाच मज्जा घ्यायची असते. त्यात एक थ्रिलर दिलेलं असतं. ते हवं असतं सर्वांना .किती ही सहानुभूती असली तरी रोमांचक स्टोरीतील पुढच्या अंकाची उत्सुकता असते. आता पुढे काय? ही उत्कंठाच खरी मज्जा देते.महाराष्ट्र सध्या हीच मज्जा घेतोय.या नाटकाला अजून एक ग्रेड कुणीच दिला नाही.त्यामुळे लहान थोर सारेच मज्जा घेत आहेत?

तुम्ही दोन कोंबड्यांची झुंज पाहिली का?ते कोंबडे रक्तबंबाळ जरी झाले तरी  कोण जिंकणार आहे हे आपल्याला पाहायचं असतं. किंवा बाॅक्संसिंगचा खेळ ?स्पेन्स फार क्रुर असतो.त्याला दया माया नसते.झुंज लावणारे क्रुर व झुंजीची मज्जा लुटणारे हे क्रुर असतात हे मान्य केलं तरी खेळं तर हवाच असतो ना ?आपण भावूक होऊ नाही. कशाला टेन्शन घ्यायचं? तुम्हाला हे सारं पाहून लोकशाही बाबत टेन्शन आलं असेल.जनरली ते कुणाला ही येऊ शकतं.तसचं सारं चालू आहे हे.पण करणार काय तुम्ही ?

ते राज्य चालवत आहेत की राजकारण  खेळतं आहेत? राजकारणाचा खेळ खेळत आहेत. त्यांचा खेळ आपण एन्जॉय केला पाहिजे .आपला मेंदू का तापून घ्यावा? खरं तर राजकरणात विचार तत्व वगैरे ची अजिबात गरज नसते. तशी नाटक रंगवता आली पाहिजेत.लोकापुढे जे भासाचं नवं जग उभे करू शकतात तेच उत्तम अभिनेते होऊ शकता.लोक त्याना नेता मानू लागतात.एकदा का नेता म्हणून तुम्हाला लोकांनी मान्य केलं की ते राजकारण खेळायला मोकळे.

तुळशीची माळ घातली की मांसाहारी केला जात नाही.काही ढोंगी माळक-याची गोष्टं आम्हाला नेहमी सांगितली जायची. माळ खुंटीला टांगून येथेष्ट   मटनावर ताव मारून  ढोंगी माळकरी साळसुदपणे भजन म्हणत असतं.त्या दांभिक माळक-यात आणि राजकारणी नेत्यांत फारसा फरक नसतो.

तो मी नव्हेच या नाटकाचा  अंक पण ते छान रंगवू शकतात. आपण  निष्ठा, प्रामाणिकपणा तत्वज्ञानात  गुरफटून  गेलो तर त्यांच्या या नाटकाची मज्जा कशी घेणार? ते जसं सारं गुंडाळून सावपणासाठी  घसा फोड करत राहतात तसं आपण सारं खुंटीला टांगायचं? जमलं तर घ्यायचा ताव मारून.

मित्र ह़ो,राजकारण एक खेळ समजा नाही तर बहुरंगी बहुढंगी नाटक समजा....आनंद भेटेल. फार गंभीर विचार करायचा विषयाचं राहिला नाही राजकारण.अंधभक्त,मावळे,पाईक,निष्ठावंत,कट्टर खंदे समर्थक यां सर्वांना सांगायचं.फार गंभीर वैगरे होऊ नका. तुम्ही तुमचं रक्त तापू नका.आमचं ही. हे सारं राजकारण एन्जॉय करा...अंक तिसरा....लवकरच सादर होतोय...

नाटक...नाटक..नाटिका..नाट्य पुष्पं....

जीव मुठीत घेऊन बसा.

सोमवार, १९ जून, २०२३

इंग्लिशस्कूलचं फॅड

 



गावचा नामा त्या दिवशी बॅंकेच्या दारात भेटला.गडी जरा घाईतच होता.घाईत म्हणजे गरबडीत.हातात बरीचं कागद होती.त्याला बॅंकेचं कर्ज काढायचं असावं.मी सहज त्याला हटकलं.
मी:अरे कर्ज कशाला काढतो?"
तो:"कशाला म्हंजे...? पोरग टाकलं की शाळात"
मी:"शाळात टाकलं ?त्यासाठी कर्ज ?"
तो:"मग ?"इंग्लीश स्कूल मध्ये टाकलं.साध्या साळात नाही. रोज येतं की स्कूलबसात बसून पाटादयाला."
मी: "किती पैसं भरलं ?
तो:आता तुर्त भरलं पंच्चीस. पुन्हा दयाचेत वीस.तसं काय नाही .सारे संभाळून घेतात आपल्याला आपल्या रामाचं पोरग घेतलं की पियोन म्हणून चिटकवून."
मी:"आरं, आता एवढ पैसं कशी आणणारेस वर्षाला ?"
तो:"कसं म्हंजे? काय झाडाला तोडायचेत व्हयं ? उचल घेणारं .बायको भी समजदार. ती पण म्हंती काय भी करू.कुणाचा गू काढू पण पोरग इंग्रजीतच शिकू.मुकादम उचल देतो की.त्याच्या मेहूण्याचीच शाळा जनू"
मी:" पोराचं काय वय?"
तो:" चौथं लागलं असलं बघा आवंदा."
मी: "अजून त्याचं वय नाही की झाली शाळाचं "
तो:आता पोटातचं असल्या पासून शिकशान सुरू होतं.आता हे काय आम्ही सांगायचं का तुम्हाला. उग कशाला याड घेता?"
मी:"गावात शाळा आहे सरकारी.अंगणवाडी आहे बरं सारं फुकाटं उग़ कशाला खर्चात पडतो?"
तो:गावात हाय.सार हाय .फुकाट हाय पण ते मराठी हाय. आपल्याला इंग्रजी पायजे"



मी:"का ?मराठी भाषा आपली मातृभाषा ना रं ? "
तो: कोण शिकतं मराठी ? सा-या मोठया लोकांची पोरं इंग्लीशच शिकत्यात.उग आपल्याला चुत्या काढतेत.आमच्या निल्यानं सांगितल सारं खरं.ते काय कमी शिकलाय व्हयं?ही साळा अख्खी ताब्यातचं दिली की त्याच्या"
मी:"आता हयो निल्या कोण ?"
मी:आमच्या थोरलं पोरग ना ते.लय चाप्टर..!"
मी: "मुकादम पैसं देणाऱ मग कर्ज कशाला?"
तो: " पुस्तकं.कपडे घ्यावी लागतात.त्याचं सात हजारं दयाचेत."
मी:अरे,सारं फुकटंच सोडून का खर्चात पडतो? अजून तर तुझ्या मुलाचं शाळाचं वय नाही ."
तो:सर, ठरलं एकदा .पोरग इंग्लीस स्कूलातचं शिकणार .आमचं जिनं गेलं पाचाटात .त्याला नाय या नरकात येऊ दयायचो. मोठा सायब करणार हाय मी त्याला.घाणं राहू पण इंग्लीशचं शिकू "
माझी बोलती बंद झाली. एेपत नसतानी हा कसा शिकवणाऱ . महागडया फिस कशा भरणाऱ?
महत्त्वकांक्षा चेतवल्या जात आहेत.
आपली दकानं चालवण्यासाठी सरकरी शाळा व शिक्षक यांना बदनाम केले जात आहे. उंदड झाली इंग्लीश स्कूल पण सरकार कां राहतं थंडा थंडा कूल ? इंग्लीश स्कूल म्हंजे ब्रम्ह देवाचा हात नाही तिथं गेलं की साहेब व्हायला.पण हे कुणाला सांगावा ? कसं सांगाव? आपलीच कथा आपलीच व्यथा ....!!









गुरुवार, १ जून, २०२३

जगण्याचा आराखडा








जगण्याचा आराखडा

आयुष्तयं तर आपलं आणि आपलंच असतं ना?इतरांना ना आपण ते देऊ शकतो.ना इतरांच आयुष्य आपण घेऊ शकतो.आयुष्याचे क्षण ही मर्यादित आहे.त्यामुळे इतरांवर ते खर्च नाही झाले पाहिजेत. आपला गेलेला वेळ आपण परत नाही आणू शकत.त्यामुळे आपल्या जीवनाचा आराखडा आपणच आखला पाहिजे. इतर कुणी तो आखला नाही गेला पाहिजे.आपलं जगणं कुणी नियंत्रित तर करत नाही ना ? हे पण पाहयला हवं.

पाहण्याची वगैरे काही गरज नाही. बहुतांश लोकांच्या जगण्यावर  इतर लोकांचं नियंत्रण असतंच.

    ए-हवी आपण फार इगो पाळतो पण खरंतर आपण आपल्या दो-या इतरांच्या हातात कायमचं दिलेल्या असतात.कुणी तरी येतो आपली कुणाशी तरी तुलना करतो.स्तुती असेल तर अंहकाराचे पंख घेऊन आपण  हवेत तरंगू लागतो.तिच तुलना जर उलटी असेल तर द्वेषाच्या, मत्सराच्या आगीत जळू लागतो.तुलना करणा-यांने ठरवलेलं असतं याला आज हवेत तऱगत ठेवायचं की मत्सराच्या आगीत होरपळत ठेवायचं. का रागात तडफडत? आपण आज कसं जगायचं ह्याचं काही प्लॅनिंग आहे का आपलं स्वत:च?असलं तरी ते ढासळला जातं.आपण कुणाच्या तरी अंकित असतो.

  कळसुत्री बाहुल्या़चा खेळ आपण पाहिलाच असेल. ज्याच्या हातात असतात दो-या  त्याच्या बोटावर  नाचतात बाहूल्या.कुणी आपलं हसू चोरतं.कुणी आपला राग वाढवत.कुणी आपल्या इर्षा पेटवत.कुणी तरी त्याचं रडगाणे ऐकून आपलं डोळं ओलं करतं.नीट विचार करा. हे परावलंब मान्य होतंच ना  आपल्याला ? राग,दृवेष व आनंद  या भावना कुणी तरी नक्की   नियंत्रित करत असते.जगण्याचा आराखडा आपला हवा. दु:ख आणि सुख हि आपलंच हवं ना ? त्यासाठी आपला स्वतःचा जगण्याचा आराखडा हवा.आपली आणि फक्त आपली स्टाईल हवी,नाही का?

      परशुराम सोंडगे,बीड

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

नशिबाचे रडगाणं



 माणसांना नशिब नावाचं काही तरी असतं.आपल्या आयुष्यात चांगल वाईट काही घडत असते त्याचे कारण नशिब असतं.आजी सांगायची सटई नावाची कुणी तरी एक दैवशक्ती असते. ती आपलं नशिब आपल्या कपाळावर कोरून जाते.तिनं लिहिलं कुणीचं बदलू शकत नाही. हे पटवून देण्यासाठी ती अनेक गोष्टी सांगत असे.त्या गोष्टी  छान असतं.नेमकं सटईने आपल्या कपाळावर काय लिहून ठेवलं आहे हे आरश्यात आम्ही कपाळ न्याहाळत बसतं असतं.नशिबाचे शिलालेख वाचण्यासाठी धडपडत असतं. माणसांना ते दिसतं नाही.

              नशिब सा-यांनाच असतं.ते मागील जन्माच्या तुमच्या पाप पुण्यावर ते अंवलंबून असतं.त्याला प्रारब्ध असं ही म्हणतात.प्रारब्ध बदलता येत नाही. पुढे काय घडणार आहे याचा एक प्लॅनच तयार असतो.ज्योतिषशास्त्र याचं गोष्टीवर अवलंबून असतं.थोडक्यात ज्योतिषी तो प्लॅन समजून घेतात. लोकांना सांगतात.आपलं पोट भरून घेतात.तुमचा विश्वास आहे या गोष्टींवर ?

तुम्ही विश्वास ठेवा अथवा न ठेवता हे घडतं असतं.जे मी घडतं असतं ते माणसाच्या हातात नसतं.भुतकाळ आता लिहून ठेवता येतो. त्यालाचं आपण इतिहास म्हणतो.आठवणींच्या रूपात तो मनात साठवून ठेवलेला असत़ो.भविष्यकाळ आपल्याला कळतं नाही.तिन्ही काळाच ज्ञान असलेला फक्त एकचं देव आहे.सर्वज्ञ भगवान परमात्मा.

  योगायोग तर माणसाच्या आयुष्यात घडतं असतात.कर्मधर्मसंयोग म्हणजे तर नशिबचं असतं,ना? नशिब म्हणा किंवा योगायोग म्हणा जे घडतं असतं ते  आपल्या हातात नसतं.

                 आता ,बघा ना, पाऊसाचे थेंब आकाशातून पडत राहतात.काही गुलाबाच्या नुकत्याच उमललेल्या फुलांवर पडतात.कोवळया उन्हात फुलांच्या कुशीत हसतं राहतात.कुणी चातकाच्या चोचीत पडतात. त्याला तृप्त करतात.कुणी तप्त मातीची तहान भागवतात.कुणी हागणदारीत पडतात.कुणी शिंपल्यात पडून मोती होतात.

        तसचं फुलांचं पण आहे.कुणी देवाच्या पायी,कुणी प्रेताच्या अंगावर ,कुणी एखादं सुंदरीच्या केसात गजरा होऊन हसणं राहतं.एखादंला हाव-या माणसाच्या शेंबड्या नाकात ही हुंगलं जावं लागतं.

आपण कसे वापरले जावं हे काही फुलांच्या  हाती नसतं.नशिबवान कुत्री मर्सिडीज गाडीतून फिरताना पाहिलीच असतील.दारोदार हिंडणारी कुत्री आणि माणसं ही असतातच की.योगायोग म्हणा किंवा नशिब म्हणा.हे घडतं असतं.अनेक मूर्ख चांगल्या खूर्च्या बळकावतात. तसेच अनेक तज्ञ खितपत पडतात.दोन घासासाठी अपार कष्ट करावं लागतं.ताटला लाथ मारणारी माणसं आहेत. चव भुकेत असते. अन्नात नाही. काहीचं गोड न लागणारी माणसं ही असतातच की.


अनेक गोष्टीला आपण व्यवस्थेला दोष देत राहतो. रेल्वेचा अपघात झाला रेल्वे प्रशासन आपल्या ऐरणीवर असतं.संसार नीट चालत नाही आपला डायरेक्ट विवाह संस्थेवरच आक्रमण असतं.लफडी झाली तरी आपण पोर्न साईटवर बंदी आणण्याची मागणी करतो.पूर्वी हे सारी खापरं आपण नशिबाच्या डोक्यावर फोडून मोकळे व्हायचो.नशिबाच्या नाववर अनेक अपयश पचवायची सवय आहे माणसाला.अर्थात यशाचं श्रेयं हे माणस स्वतः च्या प्रयत्नाला देतात. दुस-याचं यशाचं श्रेय आपण नशिबाला देत असतो.नशिब माणसाच्या सोबतीला कायम राहिलेले आहे.निर्माता कायम या जगात विषमतेचे बीज पेरत आला आहे.वर्ण,लिंग ,शरीर, प्रदेश, बुध्दी, सौंदर्य अश्या अनेक बाबतीत माणसा मध्ये भेद केले आहेत.नशेत पबमध्ये नाचणारी धुंद माणसं आणि दोन घासांसाठी तडफडणारे माणसं याच जगात राहतात. माणसं समतेची हाक देतात पण सर्वत्र विषमतेचे राज्य आहे.

ठेवीले अंनते तैसेचि राहवे|चि

त्ती असू द्यावे् समाधान||हा अभंग पाठ करून ठेवला की दु:खात ही आनंद शोधण्याचं बळ येतं. सा-याचं गोष्टी नशिबाच्या हवाली करतात माणसं.प्रयत्न संपलं की नशिबच येत पुढे.ते ब-याचदा सोयीचं असतं.

प्रयत्न असेल किंवा नशिब असेल,योगायोग असेल चित्त समाधानी ठेवा असा सल्ला तुकोबांचा आहे.कर्मवादावर व प्रयत्नवादावर काथ्याकुट करीत बसण्यापेक्षा चित्ताचं समाधान महत्वाचं आहे.हे सोप काम नाही.

चित्ती समाधान....एकचं ध्येय.

सुप्रभात

     परशुराम सोंडगे

   ||Youtuber|| Blogger||़

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०२३

भावनांचा बाजार

 ||आपलाच संवाद आपुल्याशी|

आंनद असो की दु:ख.माणसाला व्यक्त व्हायचं असतं.राग तर अनावरणचं असतो.ठरवून ही तो आवरता येत नाही.कुणाचा मत्सर तुम्ही झाकून नाही ठेवू शकत. एखाद्यावर तुमचं प्रेम बसलं तर चेहरा प्रेम रंगात चिंब होऊन जातो.तुम्ही एखाद्या प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियेशीचा चेहरा पाहिला आहे का?प्रेम रंगाचा उत्सव असतो तिच्या चेह-यावर.सृष्टी पण  ऋतू टाळू शकत नाहीत. पानगळीच्या शिशिर असो असो की अंग अंग पल्लवित करणारा वसंत असो.ऋतू सोसणं ही आलं आणि मिरवण ही आलं.



भावभावनांचे तरंग मनात उठले की ते चेह-यावर उमटतं जातात.चेहरा एलडीच्या स्क्रीन सारखा असेल का?कळत नकळत भावरंग आणि भावरेषा  चेह-यावर उमटतं राहतात.काही गडद काही पुसटं.....

 भावचित्राचं विलोभनीय प्रदर्शनच असतं चेह-यावर.

माणसं फार चतुर तरी काही भावना लपवून ठेवतातच.मनात कोंडुन ठेवतात भावनांना.अवखळ जनावर कोंडून ठेवावे कोंडवाडयात तश्या कोंडतात मनात.भावना ही  उलगडून दाखवण्यासाठी खास असं आपलं माणूस असावं लागतं.डोळयातील आश्रूचे ही तसचं आहे.त्यांना सुध्दा हक्काचं माणूस असावं लागतं ओघळण्यासाठी.आपल्या हक्काचं माणूस समोर असलं की ते नुसते घळाघळा ओघळत राहतात.पुसणारं कुणीतरी हवं असतं त्यांना .कुणीतरी पुसलं जावं म्हणूनच तर  ते ओघळत असतात ना?आश्रूचे आयुष्यचं कितीकस असतं? फक्तं काही क्षणाचं.

 आपण आपलं समजतो पण ती माणसं आपली असतां असं नाही. आपल्या भावनांचा ही काहींना बाजार भरवायचा असतो.

मोर नाचतात

पिसे सांडतात.

माणसं त्याचा ही

बाजार मांडतात.

आपल्या ह्रदयाचे खेळणं करून त्याचा खेळ मांडणारे चतुर लोक  या जगात पुष्कळ आहेत.आपण सारं सारं सांगत राहतो.ते त्याचं भांडवल करत राहतात.तुमच्या  व्यक्त होण्याने कुणी मनोरंजन तर करत नाही ना? एखाद्याच्या गळ्यात पडून आपण रडतो तेव्हा त्याचं मनोरंजन करायचं म्हणून आपण रडतो नसतो. काळजातल्या दु:खाचा निचरा करायचा असतो.प्रत्येकालाच आपली कदर  असतेच असं नाही.दु:ख झालं म्हणून कुणी नाचत नाही.आंनद झाला म्हणून कुणी ऊर बडवत नाही.

नृतिका आपल्या समोर नाचते तेव्हा तिला आपलं मनोरंजन करायचं असतं.उरातलं दु:ख झाकून ती व्यक्त होत असते तालासुरारोबर.चित्रपट नाटकात नटव्या भावभावनांचा तो बाजार असतो. आपल्या भावनांचा बाजार तर कुणालाचं मांडण्याचा नसतो.आपल्या व्यक्त होण्यानी कुणी मनोरंजन करून घेत असेल तर?तुम्ही काय करणार? 


मी माझं दु:,ख असं  कुणाजवळं ही जाहिर नाही करणार.माणसाची पारख करणारं. कुणाच्या तरी खांदयावर डोकं ठेऊन  रडणं मला ही आवश्यक आहे.इतकं दु:ख तर माझ्याजवळ आहेच की. हक्काचा खांदा शोधवा लागेल. मी माझ्या प्रेमाच्या माणसाचा शोध घेणं सुरू केलं आहे.आज एवढंच ठरवू. कुणाच्या भावनांचा बाजार नाही मांडायचा.कुणाचे तरी अश्रू पुसायचे.विश्वसानं कुणाचे तरी डोळं पाझरावेत आपल्यासमोर इतकं कुणाचं तरी व्हायचं.श्रीमंत व बुध्दीमान होण्या इतकं ते सोप नक्कीच नाही. 

सुप्रभात.

             परशुराम सोंडगे

      ||Youtuber||Blogger||

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०२३

आनंदाचे गाणे - कष्टाचे तराणे

गेल्या दोन आठवाडयापुर्वी एक रील्स प्रचंड व्हायरल झाली.एक ऊसतोड कामगांर असलेल्या कपल्सची ती रिल्स होती.भर रस्त्यावर ऊसाच्या गाडीवर ती शूटं केली होती.ओठावरलं गाणं आणि गोड हास्यात चिंबलेले त्यांचे चेहरे.... महाराष्ट्राला फार काही सांगून गेले.

त्यांच्या चेह-या वरील हसू अनेकांना अप्रुप वाटलं.अप्रूप  वाटणारचं ना?काम करताना रडगाणे आणि ग-हाणे गाणारांना तर ते आश्चर्यचं होतं.

अरे,असं हासतं हासत काम करता येऊ शकतं?

वेतन आयोग,भत्ते ,सवलती आणि मोठं मोठे पॅकेज देऊन ही  हे  हसू आणि गाणं आपणं  कर्मचा-यांच्या ओठांवर नाही आणू शकत.

   कामातला आंनद आपण हिरावून बसलो की तेचं काम सक्त मजुरी वाटू लागते.मजबूरी आपल्याला  गाणं नाही तर रडगाणे देते.रडगाणे ऐकायला कुणालाच आवडतं नाही.



      रिल्सं  व्हायरल करण्यासाठी शार्ट कपडे घालून प्रसिद्ध रील्स स्टार असलेल्या परपुरूषाच्या  मिठीत शिरणा-या लोंचट स्त्रिया काही कमी नाहीत.प्रसिध्दीचा हव्यास व लोचटपणाशिवाय त्यांच्या मेकअप चोपाडलेल्या चेह-यावर तुम्हाला दुसरं काय दिसलं?

आपल्याचं कुंकवाच्या धन्यासोबत आपल्या फाटक्या साडीत कष्ट करताना हासत हासत गाणं गाणारी स्त्री जीवनाचं  सारं सर्वांना सांगून गेली.लोचटपणा व कसलाचं हव्यास नाही दिसला तिच्या चेह-यावर....

आपला रील्स व्हायरल करून व्हयूजस् आणि  फालोअर्स वाटायचे तर नक्कीच नव्हते त्यांना.त्यांना फक्त हसायचं होतं.गाणं गायचं होतं.आपल्या आनंदाचं प्रदर्शन प्रत्येकाला हवं असतं.आंनद आपण लपवून नाही ठेवू शकत.आंनद फक्त माणसांनाच नाही तर प्रत्येक जीवालाच उधळून द्यायचा असतो.आनंदी माणसं पाहिली तशी तुम्ही आनंदी प्राणी पण पाहिली आसतीलच.आपल्या आंनदचा दरवळ सारीकडे व्हावा ही इच्छा सर्वांचीच असते.

कष्ट करताना गुणगुणे  किंवा गाणं गाणे नवीन नाही.शेतात काम करताना भल्लरी हे गीत म्हटल जातं असे.विहीरीवर मोठं हाकताना,रानात मोघडा -पाळी घालताना लावो घातलं जायचं. लावोनं शिवारं दुमदुमून जायचं.तिफणं गीत ही असायची.जात्यावरल्या ओव्यात ही गावं पहाटे पहाटे रमून जायची.शेतात इर्जीक घातली की ढोल ताश्या वाजून काम करण्याची पद्धत होती.कोळीगीत ही कष्ट करा-यांच गीत आहे.काम करताना  सामुहिक नृत्य केली जायची.आपल्या कामात आंनद निर्मितीसाठी लोक प्रयत्नशील असतं.थोडक्यात पूर्वी  माणसं आपलं कामं एन्जाॅय करायची.तुम्ही तुमचं काम एन्जॉय करता का? करत असाल तर तो आंनद शेअर करा.करत नसाल तर आज पासून सुरू करा.  बघा,आंनद कसा खळखळून वाहतो ते. 'तू जो हसते...'हे त्यांच रील्स  आहेच की सोबतीला.आपला ही एखादं रील्स बनवायचं का काम करताना ?  होऊनचं जाऊ द्या.

सुप्रभात

               परशुराम सोंडगे

      || YouTuber||Blogger||

शनिवार, २१ जानेवारी, २०२३

सत्याचा शोध प्रवास


 || आपलाचं संवाद आपुल्याशी||


हे जग आहे त्याचं एक कारण आहे. कारणाशिवाय काहीचं असू शकत नाही असं गृहीत धरून तेच कारणं युगेनोयुगे माणसं शोधत आहेत.कधी धर्माचं साधन तर कधी विज्ञानाचं माध्यम घेऊन माणसं धडपडत आहेत.

माणूस हाच सर्वात बुध्दीमान प्राणी आहे हे माणसांनं स्वतःजाहिर केलेले आहे. दॅटस् इट्स.

धर्म असेल किंवा विज्ञान असेल दोन्हीच्या माध्यमातून माणसांनी हाच प्रयत्न केलेला आहे.प्रयत्न अजून ही चालूं आहेत.अंतिम सत्य अजून तरी कुणाच्या हाती लागलं नाही.तसा कुणाचा दावा ही नाही.आजच ज्ञान उद्या अज्ञानात रुपांतरित होत जाते. आपण जे खरं समजतं असतो.तेचं काही दिवसांत मिथ्य ठरवले जाते.सत्याचा हा शोध प्रवास अखंडित पणे सुरूच राहणार आहे. 

मलाच  फक्त समजतं,मीच तेवढा शहाणा आहे अशी अतिशहाणी माणसं तुम्हाला पावलोपावली भेटतं असतील.त्यांना पाहून तुम्हाला काय वाटतं? हे महत्वाचं आहे.

              तुम्ही त्यांच्या पेक्षा जास्त हुशार किंवा शहाणे असण्याचा साक्षात्कार होतो की त्यांची दया येते? का तुम्हीचं स्वतः जगात. सर्वात हुशार असण्याची दाटं शक्यता वाटते? खरं  काय ते तपासुन बघा स्वतः:ला. आत्मप्रौढी असणारा माणूस सर्वात जास्त अज्ञानी असण्याची जास्त शक्यता असते.माणसाला आत्मभान असणं महत्वाचं आहे

     स्वत:चे जयजयकार करणारे व टोळी ट़ोळीने खुशमस्करी करणारे असंख्य माणसं पाहून तुम्हीही  स्वतःच्या मोहात पडण्याची शक्यता असते किंवा त्यांना शहाणं करण्याचा तुमचा प्रयत्न  तरी असू शकेल पण

असं  तुम्ही काहीचं करू नका. यावर उपाय एकचं आहे.चंद्रशेखर गोखले यांच्या शब्दांत सांगतो.

इथं प्रत्येकालाचं वाटते

आपण किती शहाणे?

यावर उपाय एकचं

गप बसून पहाणे.

गप बसणे  हा सर्वात सोपा उपाय आहे. पटतं ना ?

आज अतिशहाणा समोर गप राहण्याचा प्रयत्न करू.

                       परशुराम सोंडगे

           ||Youtuber|| Blogger||

शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

शूभेच्छांची मांदीयाळी

 ||आपुलचं संवाद आपुल्याशी||

आज मक्ररसंक्रांतीचा दिवस.सण आनंदचा,सण समृध्दीचा, सण सौभाग्याचा.सण सुवासिनीचा...!!!

कालपरवा पासूनचं मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा मोबाईल वर येऊन धडकत असतील.शुभेच्छांचा नुसता वर्षाव सुरूच असेल.हल्ली प्रत्येक सणाला माणसं कमालीचं शुभेच्छूक होताहेत.सोशल मिडीयावर धो धो शुभ संदेश कोसळतं आहेत.जे सहज देता येतं ते माणूस देतं.शुभेच्छा....!!

सण म्हटलं की संसाराच्या दगदगीत आलेली थंडगार झुळूकच असते माणसाला.माणसं स्वतः ला कुठं कुठं बांधून घेतात.सण म्हटलं की तेवढच निमित्त...व्यक्त होण्याला.दुसरं काय?असो.

मकरसंक्रांत हा तसा देण्या-घेण्याचा सण.वाण लुटण्याचा सण.वाण लुटू देण्याचा सण.आपल्या शेतात पिकलेले दुस-याला देणे. वाणोळा देणे.वाणोळा घेणे.बोरचं ती पण प्रत्येकाच्या बांधावरल्या बोरीची चव वेगळीच की.वाणोळा म्हणून दोन चार चाखायची.

लहानपणी या सणाचं केवढ अप्रूप असे.काय खावं आणि काय नाही खावं हा प्रश्न असे आम्हा पुढे. सारी रानं पिकानं बहरलेली बावरलेली असतं.काही पिकं रसानं चिकांनं ओथंबलेली असतात.थंडी वाढत चाललेली...सूर्याचं उन्हं ही गारठा घेऊन येणारं...दिवस शिळू झालेले....दिवसांन आपलं थोडं आयुष्य रात्रीला दिलेले. त्यामुळे रात्र  ही थोराड होत गेलेली.

त्या दिवसांत हा मकरसंक्रांतीचा सण हळूच येतो. बोरं,पेरू,ऊस,हुरडा,गाठं,वाल,

गाजर अश्या अस्सल रानमेवांनी घराची पराळं भरून गेलेली असतं.कुणी यावं जे आपल्या नाही ते न्यावं.समृध्दी अशी दारादारातून खळाळून वाहत असे.सुवासिनी नटून थटून वाणं लुटत असतं.घराच्या मालकीण बाईच़ ना त्या  ? काय तो रूबाब ?काय तो तोरा ?सुगडची सुगड भरून वाण दिला जायचा. घेतला जायचा.

घरातलं सारं सौंदर्य, ऐश्वर्य, औदार्य आणि सौभाग्य

घेऊन त्या गावभर फिरत राहयच्या.हळदी कुंकवांने माखलेले सौभाग्यवतीचे कपाळ,भांगं म्हणजे कोण भाग्य असे.आताच्या सारखी घडीघडीला फोटो काढून ठेवायची  सोय नव्हती पण अंतःकरणात आपलं खानदानी सौंदर्य कोरून ठेवलं जायचं.लेकी सूनांना डोळं भरून पाहिलं की मन ही भरून यायचं.आपल्या सुरकुत्या चेह-यावरून समाधानचा पाझर ओसंडून वाहायचा.

तिळाचे गुळाचे लाडू  घरोघर वाटले जायचे.गोड गोड बोलण्याचा आग्रह धरला जाई.नाती,लोभ,मैत्री अधिक स्निग्ध केली जाईत.स्नेहाद्रता वाढली जाई.वाणाच्या वस्तू बरोबरचं माणसांच्या मनामधील प्रेमाचं,आपुलकीचं वाणं ही भरभरून लुटलं जाई.प्रेम आपुलकी  लुटण्याची संधी हा सण देई.

अनेक जणांची जुनी भांडणं थोरं मोठी लोक तीळाचे लाडू भरून मिटवत असतं. सलोख्याचं चांदण असं मुद्दाम होऊन पसरलं जाई.

आता सारंच हरवतं गेलं.

आता वाणांची दुकानं थाटतात.वाणं  ही विकले जातात. वाणोळा कुणीचं कुणाला देत नाही.

खरेदी विक्रीला आपणं वाणं लुटणं म्हणू शकत नाहीत.आपण वाण विकत  आणतो.मालकीणीचा  जो वाण देताना तोरा असतो तो वाण विकत  घेताना कसा असेल? आवं पांघरूणच सण साजरा करावा लागतो.

तेव्हा गोड बोलण्याचा आग्रह असे.लोक कठोर बोलतं.खरं खरं बोलत.ते कडू लागे.काही दुरावलेली मनं जवळ आणण्यासाठी तिळगुळ असे.

आमचा तीळगूळ सांडू नका

आमच्या संगे भांडू नका.

आता माणसं सरार्स गोड बोलतात. हे बरंयं.गोड बोलण्यानं मधुमेह होत नाही.नाहीतर मधूमेहाच प्रमाण वाढलं असतं. किती गोड बोलतात माणसं? भांडत नाहीत पण गेमचं करतात.अबोला धरतात.छोटया छोट्या भांडणातून माणसंचं मन मोकळं होई.रागाचा निचरा होई.राग मनात कोंडून ठेवला की त्यांचं कपटं  होतं.सूडाची भावना   वाढू लागते. सुटाने पेटलेली मनं तीळगूळ घ्या गोडव्यांनं निव्वळत नाहीत.सोशल मिडियावरच्या शुभेच्छा संदेशनं हे कितपत घडतं असेल? जुनी भांडणं विसरून एखाद्याला बोला.फक्त बोलणं आवश्यक आहे.संवाद सुरू राहतो. दुरावलेले संवाद सुरू करू जमलं तर आज.

मकरसंक्रांतीसाठी मेकअप करून मिळेल असे बोर्ड ही हल्ली असतात.मक्ररसंक्रांतीला स्पेशल शुटं ही केलं जातं.

 आता जी साधन उपलब्ध आहेत त्याचा वापर होणारं.त्यांचा वापर करून सण उत्सव साजरे होणार. आंनदाचे कण कण गोळा केले जाणारं.ती खरी  माणसाची गरज आहे.सण साजरा करा पण उत्साहाने.त्या उत्साहातचं आनंदाचं चिमूटभर चांदण घरभर पसरेल.दुसरं काय ?

मकरसंक्रांतीच्या खुप शुभेच्छा...!!

         परशुराम सोंडगे

      ||Youtuber||Blogger||

खरं कधी कधी बोलूया

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी ||


कधी कधी खरं बोलूया.

*************************

 शालेय जीवनात अनेक सुविचार आपल्या कडून गोठून घेतले जातात.घरात ही माणसं मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणून सदैव उठता बसता संस्काराच्या उपदेशाचे डोस पाजत असतात.

त्यात 'माणसांनं खोटं बोलू नाही.' हा सुविचार प्रामुख्याने सांगितला जातो.

मुलांचं मन निर्मळ असतं.ते निरागसं असतं. कोवळ मन नाजूक असतं.थोडक्यात काय तर मुलांची. मन संस्कारक्षम असतात.काही संस्काराचे बीज आपण त्यात  पेरले तर उगवू शकतात.खरं बोलणं हा सुविचार माणसाच्या मनात का रूजतं नाही. मूलं जसं मोठं मोठं होतं जातं तसं तसं ते अधिक लबाड बोलत राहतं.खोटन बोलण्याची एक कला आहे .ती हळूहळू आत्मसात करत राहतं.

     खोटं  बोलणं हे एक चातुर्य समजलं जातं.जी माणसं सराईतपणे खोटं बोलतात त्यांना हे जग व्यवहार चातुर्य समजत. खरं बोलणारांना अर्थात च मूर्ख समजलं जातं.आपण मूर्ख आहोत हे मान्य करणारा सज्जन माणूस अजून या पृथ्वीतलावर अवतारायचा आहे.त्यामुळे या जगात जिकडे तिकडे सदैव सातत्याने कारण असताना काहीच किरण नसताना ही माणसं खोटं बोलत राहतात.

      कधी कधी तुम्ही काही मिनिटे ही खरं बोलून बघा.कसला गजब होतो. काही मिनिटे ही तुम्ही खरं खरं बोलू शकत नाहीत.अनुभव घ्या.हे जग फक्त माणसं खोटं बोलू शकतात या एकाच गोष्टींवर चालते आहे याचा दिव्य अनुभव तुम्हाला येईल.

आश्चर्य याचं वाटतं की माणसं सदैव खोटं बोलत राहतात पण खरं बोलण्याचा आग्रह  कायम धरत असतात.इतकं पण खोटं बोलू नाही अशी माफक सज्जनतेची आलं पांघरणारी  अपेक्षा ही हल्ली करतात.

मापात,पचलं असं खोटं बोलावं  अशी इच्छा करतात.पचवू शकालं इतकं खोटं बोलणं अपेक्षित असते.

बाबांना खोटं बोलला म्हणून मुलांचं कौतुक करणारी आई याचं जगात आहे.वरिष्ठांना खोटं बोलून आॅफीस मधल्या गोष्टी लपवून ठेऊ शकला म्हणून पार्टी देणारी घेणारी माणसं ही असतात की.छान आणि पचलं इतकं खोटं बोललं म्हणून कोतुक करणारी गुरुजी तुमच्या आयुष्यात आलेच असतील. बाॅयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असत्याचे निस्सीम भक्त असतात.

सत्याच्या बेगडात  खोटं गुंडाळून ते आपल्याला बाजारात विकायचं असतं म्हणून हे जग खोटं बोलते आहे. बोलत राहणारं आहे.

बरं,खोटं बोलण्याचं काही परिमाण नाही. त्यामुळे माणसं किती खोटं बोलतात हे मोजता येत नाही.माणसं किती ही  स्पेशलं खोटं बोलू शकतात! 

 माणसं खोटं का बोलतात ? प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कधी कधी माणसं काहीचं कारणं नसताना ही खोटं बोलतात.उगीचं खरं काय बोलावं म्हणून माणसं खोटं बोलतात.फोनच्या संवादामध्ये  सर्वाधिक खोटं बोल जातं.खरं बोललं तरी काही हरकत नसते  तरी माणसं स्पेशल खोटं बोलतात. सामुहिकपणे एका सुरात खोटं बोल जातं.पक्षाचा नेता खोटा बोलला की सारा पक्ष तेचं बोलत राहतो.मिडीयापणे एका सुरात खोटं बोलत राहतात.

 राजकरणात माणसांनं खरं बोलू नाही असा एक राजकरणचा मंत्रच आहे.खरं बोलणा-या माणसांनी राजकरणात पडू नाही असा ही एक सल्ला  दिला जातो.

या जगात एकदम खरं बोलणारा माणूस असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जगातील सर्व  लोक राजकारण प्रिय आहेत.राजकारणी आहेत.घराघरात काय कमी राजकारण असते?

राजकारणात फेकू आणि  नौटंकी करणा-या माणसांचा सक्सेस रेशव  जरा जास्त आहे. सहसा लबाड आणि नटवं बोलणारी माणसं राजकरणात यशस्वी होतात.

    ही माणसं लबाडं बोलतात हे माहीत असून ही  लोकं त्यांना डोक्यावर घेतात.आपला नेता मानतात.

  'माझे सत्याचे प्रयोग' हे म.गांधीचं पुस्तक तुम्ही वाचलं असेलच? खरं बोलणारी आणि वागणारी माणसं या जगानं चक्क खोटी करून टाकली आहेत.

खोटं बोलण्याची सवय लागली आहे माणसांना. 

माणसं किती ही खोटं बोलत असली तरी विजय सत्याचा होतो.सत्य अजिंक्य असतं. आपल्या देशाचं ब्रीदचं सत्यमेव जयते आहे.ते उपनिषदांतून घेतलेले आहे.सत्याचा आग्रह हा फार प्राचीन आहे.युधिष्ठराला ही खोटं बोलायला लावणारा सर्वज्ञ भगवान परमात्मा आपलाचं देव आहे.आपण त्याचेच अंश आहोत.

देशाचं ब्रीद आहे सत्यमेव जयते म्हणून या देशासाठी थोडं थोडं खरं बोलण्याचा सराव सुरू आज सकाळ पासून. 

जपून हं. सत्य कडू असतं.खरं बोलणं की सख्ख्या आईला पण राग येतो.

 सुप्रभात....!!!

              परशुराम सोंडगे

             ||Youtuber||Blogger||

संशयाचा व्हायरस

  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या न...