हा मराठी साहित्य, कविता, कथा, ललित लेख आणि सामाजिक विषयांवरील विचारमंथन यांसाठी एक उत्कृष्ट मंच आहे. येथे तुम्हाला भावस्पर्शी प्रेमकथा, प्रेरणादायी लेख, राजकीय विश्लेषण, तंत्रज्ञानविषयक माहिती आणि साहित्यिक चर्चांचे वैविध्यपूर्ण लेखन वाचायला मिळेल. मराठी भाषा आणि संस्कृती जोपासण्याचा आमचा प्रयत्न असून, नवोदित लेखकांसाठी हे व्यासपीठ खुले आहे. नवीन साहित्य वाचण्यासाठी आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला आजच भेट द्या! मराठी ब्लॉग, कथा आणि कविता, मराठी साहित्य, ललित लेख, प्रेरणादायी लेख,मराठी वेबसाईट
बुधवार, १४ मार्च, २०१८
मंगळवार, ६ मार्च, २०१८
तू असचं छान लाजत राहवं
या कविता खास माझ्याच आवाजात. नक्की ऐका
सोमवार, ५ मार्च, २०१८
युज अॅन्ड थ्रो.
आबाला बसस्टॉपवर सोडयासाठी आलो होतो. बसस्टॉपवर फार गर्दी होती. नुसती चेंगराचेंगरी...
तसल्या गर्दीत शाम्या भेटला. शाम्या काय आमचा क्लासमेट बिट नाही.तेव्ह. आणि आमचा दादा...म्हणजे चुलता.एका वर्गात होते पण त्याला अख्खं गावचं शाम्या म्हणतं. लहान थोर सारेचं. शाम्या नावचं पडलं त्याचं .त्याचा ही कधी धताबाला राग आला नाई. समदचं म्हणतेय गडीच लयं सरळ.आपलं काम जानं नि आपून जानं.
तो भेटला म्हणजी.. जरा गडी तारांबळीतच असावा.केस वाढलेले...दाढी वाढलेली...काळी पांढरी...खूटं लयं विद्रूप दिसतं होती. बरं कपडे धड नव्हतं त्याची. बेसूर दिसतं होता.
पार कंबरात वाकून नमस्कार केला. अगदी मुजरा केल्यावाणी.
"राम राम सायब..."
"काय शामा काका ....कुणीकडे इकडं.?"
"आता लयं ताप झालायं. तुम्हाला नाही का माहित?"
"...नाय बुवा.काय झालय?"
"तेच..ते..इलेक्शनचा राडा."
"इलेकशनचा राडा...कसला...?"
"निल्या टाकलायना आत ..."
"आत...निल्या..?"
"पोलसाडचं जिप्पडचं आल्लतं.उचल्लं पोरगं त्यांनी रातचंच." "पण कमून...?"
"दुसरं काय राजकारणच."
"आर, राजकारणचा तुझा काय सबंध ?"
" कमून थट्टा करता गरीबाची?तुम्हाला माहित नाय व्हयं? घाबडं ....राज्या माग फिरतं होतं. त्याचाचं कुसूर काढला त्यांनी..."
" आत्ता हे राज कोणतं बुवा...?"
"ते...निखीलराजे कसबे पाटील...पाटल्याचा नातू...प्रतापरावचं पोरगं..?"
"प्रतापरावच पोरगं..राजं झालय काय..?"
"तेच..ते...लयं बेस्ट गडी...हवा भी लय केली त्यांनी. वट भी जणू त्याचा. नुसती पोरचं माग त्याच्या. गडी आला की पाच पन्नस नव्वाट पोरग गोळा व्हतंय."
"मग...?"
"मतदानाच्या दिवशी नव्हता उल्लीकसा राडा झाला.बूथावर... त्यांच्या वरूनच बारा पोरं पोलसाडानं उचल्ली. त्यांच झालं राजकारण पण लयं पोरं पिसल्लीत.... पोलसाडचं ती ! त्यांना कुठं दया मया असती व्हयं ? नुसत्या आकडं झाल्लीत. निल्यात पारचं गारं झालंय."
"मग ते राज नाय काय सोडीत?"
" त्यांच्या कडचं आल्लतो.सुटत्यालं म्हणतेतं...पाच सहा दिवसात. सुटूनशान तरी काय करतील ? लंय्यं काम करत्याय काय? उग टॅन्शॅन नका घेऊ.उग गप्प मरा".
"मरा की गप्प.."
"निल्याची आय दम खातीयं व्हयं.? ते तर येडचं. हायच खाल्ली. असल्या टायमाला हाय खाऊन जमत का ? राजकारणात अशा कुरघोडया....डाव असत्यातचं. तस्स त्याला काय कमी...?डब्ब बिब्बं जातेतय..बाहेरून..."
"मग काय...सुटलचं ना ...आज उदया...करतेलं जामिन.सारं...मॅनेज करतेलं.सत्ता...पैसा.. त्यांच्याकडं काय नाय..?."
" त्यांचं काय करायचं....आपल्याकडं काय ?म्या कधी असल्या लफडयात नाय पडलो बुवा. पोरानी पार मथुरा पाण्यात घातली. असली पोरं मेलेलो बरं."
" असं त्रागा नका करू. सुटलं...होत असतं. समोर चं भी पडलेले असतेत.पैस गेलेलं असतेत.राग असतोचं. व्हयील कमी."
"ते टेलर तसचं म्हणत व्हतं "
"कस्स?"
"आता पुढचं जे इलेक्शॅन झालं त्यात.या दोन्ही पार्टया एकचं झाल्यात जणू.... काॅप्रमाईज काय ते झालयं जनू."
"झालं असेल विकासाठी.विकासाच्या मुद्द्यावर एक व्हावचं लागतं. "
"कसला इकास अन् बिकास..वर सारं एकचंअसत्यात.दाखवायचं दात अन् खायचं दात येगळचं असत्यात. आपूनचं येडेत म्हणायचं अन् काय."
"असं कसं म्हणतोस...आर ते पक्षच वेगळे."
"मलात काय भी कळत नाय.टकले यांनी केस केली.पोरं जित्राबावाणी पिसल्लेत .ते आणि कसबे राजे एकचं झाल्यात.तसलं कसलं व्हृटस अप काय असतं त्यावर आल्त जणू. दोघ एका ताटात जेवतेत जनू "
"मग..निल्या का म्हणतोय आता.?" "ते कशाच काय म्हणतयं ? नुसतं दाताड काढतं .राजकारण असंचं असतं म्हणतयं.तुम्हाला नाय कळायचं."
"असं म्हणतयं ?मग ....कळतय की नाय? "
"नाय बाबा.अस्सलं राजकारण नाय कळतं. कुणाचं वासरूआणि कुणाला पेत.काहीचं मेळ नाय."
"मग जाऊ दया.... नाय मेळ तर नाय."
"आता हे झालं माझ...पण निल्याची आय. दम काढती व्हयं ? ते तर येड नुसंत रडतं . मवा निल्या..मवा निल्या .. "
" काका. आईचं ह्रदय ते. तडफडणाराचं "
"आर, सारं खरं पण मी तरी काय करू ? माझा जीव तडफडत नाय काय ? ते एक झालेत म्हणल्यावर....कोण लक्ष देत आता या घाबडयाकडं. आपलं नाय शहाणं ...दुस-यावर कशाला टेपूरा." शामा काका हताश वाटला. त्याचं डोळे पाणवलं होतं. गळयातलं भगवं उपारणं काढलं. डोळं पुसलं. त्याचा हुंदका अनावर झाल्ता. त्यानं तो तसाच दाबला. मला ही त्याच्या जखमेवर अजून मिठ चोळायचं नव्हतं.
"येतो ...गाडी लागली आसलं."
माझ्या पासून तरातरा निघून गेला.मी विचार करत बसलो.राजकारण असं कसं झालं. शामकाकाच्या डोळयातील पाणी मला पाहवलं नाही. अगदी आमने सामने लढणारी नेते एक कसं होतात ?पक्षाची तत्व, जाहीरनामा, विचार यांना काहीच महत्व नसतं का ? एका एका मतावरून सरकार पडलेली याचं डोळयांनी पाहिली. तत्त्वला महत्त्व दिलं गेलं. आता तत्त्वापेक्षा विकासाला महत्तव आलं. विकासाठी एक आलोत. असं ते ठासून सांगत असतात.आता विकास....तर.आपण पहातोच अहोत की....सत्तेसाठी काय पण... हेच होणार असेल.लुटूपुटूचे भांडण होणार असतील.तर आमच्या शामा काकाच्या निल्याचं का व्हावं? सत्तेवर मिळून जाऊ.दोघ मिळून खाऊ.याचसाठी राजकारण असेलतर ....? नागरिकशास्त्रातले शिकलेल्या धडयाचं काय करायचं? बरं.हे कुठं ग्राप....पस...जिपला झालं तरी समजू शकतं.पण डायरेक्ट विधानसभेतचं...अशी तत्व खुटीला अडकवून ठेवू लागल्यावर....लोकशाही चं काय ? आता जन्माची वैरी गळयात गळा घालून फिरायला लागल्यावर... चेल्यांनी...पिल्यांनी काय करायचं? चमचे फिरतील इकडून तिकड... त्यांच काय कसं जमतयं.पण निष्ठावंताचं काय ? निल्याला राजकारण कळत असेल पण त्याच्या आईला हे कसं कळणार? तिनं आपल्या पोराचं आयुष्य...भविष्य उध्दवस्त होतानी कसं पहायचं. असलं राजकारण त्या भोळया मायला थोडचं कळत असतं ? आपल्याला निल्याचं नाही पण त्याच्या आईचं जॅम टेन्शन आलं बुवा...!
परशुराम सोंडगे,पाटोदा,( बीड)
9673400928
sahitygandha.blogspot. com
"काय शामा काका ....कुणीकडे इकडं.?"
"आता लयं ताप झालायं. तुम्हाला नाही का माहित?"
"...नाय बुवा.काय झालय?"
"तेच..ते..इलेक्शनचा राडा."
"इलेकशनचा राडा...कसला...?"
"निल्या टाकलायना आत ..."
"आत...निल्या..?"
"पोलसाडचं जिप्पडचं आल्लतं.उचल्लं पोरगं त्यांनी रातचंच." "पण कमून...?"
"दुसरं काय राजकारणच."
"आर, राजकारणचा तुझा काय सबंध ?"
" कमून थट्टा करता गरीबाची?तुम्हाला माहित नाय व्हयं? घाबडं ....राज्या माग फिरतं होतं. त्याचाचं कुसूर काढला त्यांनी..."
" आत्ता हे राज कोणतं बुवा...?"
"ते...निखीलराजे कसबे पाटील...पाटल्याचा नातू...प्रतापरावचं पोरगं..?"
"प्रतापरावच पोरगं..राजं झालय काय..?"
"तेच..ते...लयं बेस्ट गडी...हवा भी लय केली त्यांनी. वट भी जणू त्याचा. नुसती पोरचं माग त्याच्या. गडी आला की पाच पन्नस नव्वाट पोरग गोळा व्हतंय."
"मग...?"
"मतदानाच्या दिवशी नव्हता उल्लीकसा राडा झाला.बूथावर... त्यांच्या वरूनच बारा पोरं पोलसाडानं उचल्ली. त्यांच झालं राजकारण पण लयं पोरं पिसल्लीत.... पोलसाडचं ती ! त्यांना कुठं दया मया असती व्हयं ? नुसत्या आकडं झाल्लीत. निल्यात पारचं गारं झालंय."
"मग ते राज नाय काय सोडीत?"
" त्यांच्या कडचं आल्लतो.सुटत्यालं म्हणतेतं...पाच सहा दिवसात. सुटूनशान तरी काय करतील ? लंय्यं काम करत्याय काय? उग टॅन्शॅन नका घेऊ.उग गप्प मरा".
"मरा की गप्प.."
"निल्याची आय दम खातीयं व्हयं.? ते तर येडचं. हायच खाल्ली. असल्या टायमाला हाय खाऊन जमत का ? राजकारणात अशा कुरघोडया....डाव असत्यातचं. तस्स त्याला काय कमी...?डब्ब बिब्बं जातेतय..बाहेरून..."
"मग काय...सुटलचं ना ...आज उदया...करतेलं जामिन.सारं...मॅनेज करतेलं.सत्ता...पैसा.. त्यांच्याकडं काय नाय..?."
" त्यांचं काय करायचं....आपल्याकडं काय ?म्या कधी असल्या लफडयात नाय पडलो बुवा. पोरानी पार मथुरा पाण्यात घातली. असली पोरं मेलेलो बरं."
" असं त्रागा नका करू. सुटलं...होत असतं. समोर चं भी पडलेले असतेत.पैस गेलेलं असतेत.राग असतोचं. व्हयील कमी."
"ते टेलर तसचं म्हणत व्हतं "
"कस्स?"
"आता पुढचं जे इलेक्शॅन झालं त्यात.या दोन्ही पार्टया एकचं झाल्यात जणू.... काॅप्रमाईज काय ते झालयं जनू."
"झालं असेल विकासाठी.विकासाच्या मुद्द्यावर एक व्हावचं लागतं. "
"कसला इकास अन् बिकास..वर सारं एकचंअसत्यात.दाखवायचं दात अन् खायचं दात येगळचं असत्यात. आपूनचं येडेत म्हणायचं अन् काय."
"असं कसं म्हणतोस...आर ते पक्षच वेगळे."
"मलात काय भी कळत नाय.टकले यांनी केस केली.पोरं जित्राबावाणी पिसल्लेत .ते आणि कसबे राजे एकचं झाल्यात.तसलं कसलं व्हृटस अप काय असतं त्यावर आल्त जणू. दोघ एका ताटात जेवतेत जनू "
"मग..निल्या का म्हणतोय आता.?" "ते कशाच काय म्हणतयं ? नुसतं दाताड काढतं .राजकारण असंचं असतं म्हणतयं.तुम्हाला नाय कळायचं."
"असं म्हणतयं ?मग ....कळतय की नाय? "
"नाय बाबा.अस्सलं राजकारण नाय कळतं. कुणाचं वासरूआणि कुणाला पेत.काहीचं मेळ नाय."
"मग जाऊ दया.... नाय मेळ तर नाय."
"आता हे झालं माझ...पण निल्याची आय. दम काढती व्हयं ? ते तर येड नुसंत रडतं . मवा निल्या..मवा निल्या .. "
" काका. आईचं ह्रदय ते. तडफडणाराचं "
"आर, सारं खरं पण मी तरी काय करू ? माझा जीव तडफडत नाय काय ? ते एक झालेत म्हणल्यावर....कोण लक्ष देत आता या घाबडयाकडं. आपलं नाय शहाणं ...दुस-यावर कशाला टेपूरा." शामा काका हताश वाटला. त्याचं डोळे पाणवलं होतं. गळयातलं भगवं उपारणं काढलं. डोळं पुसलं. त्याचा हुंदका अनावर झाल्ता. त्यानं तो तसाच दाबला. मला ही त्याच्या जखमेवर अजून मिठ चोळायचं नव्हतं.

"येतो ...गाडी लागली आसलं."
माझ्या पासून तरातरा निघून गेला.मी विचार करत बसलो.राजकारण असं कसं झालं. शामकाकाच्या डोळयातील पाणी मला पाहवलं नाही. अगदी आमने सामने लढणारी नेते एक कसं होतात ?पक्षाची तत्व, जाहीरनामा, विचार यांना काहीच महत्व नसतं का ? एका एका मतावरून सरकार पडलेली याचं डोळयांनी पाहिली. तत्त्वला महत्त्व दिलं गेलं. आता तत्त्वापेक्षा विकासाला महत्तव आलं. विकासाठी एक आलोत. असं ते ठासून सांगत असतात.आता विकास....तर.आपण पहातोच अहोत की....सत्तेसाठी काय पण... हेच होणार असेल.लुटूपुटूचे भांडण होणार असतील.तर आमच्या शामा काकाच्या निल्याचं का व्हावं? सत्तेवर मिळून जाऊ.दोघ मिळून खाऊ.याचसाठी राजकारण असेलतर ....? नागरिकशास्त्रातले शिकलेल्या धडयाचं काय करायचं? बरं.हे कुठं ग्राप....पस...जिपला झालं तरी समजू शकतं.पण डायरेक्ट विधानसभेतचं...अशी तत्व खुटीला अडकवून ठेवू लागल्यावर....लोकशाही चं काय ? आता जन्माची वैरी गळयात गळा घालून फिरायला लागल्यावर... चेल्यांनी...पिल्यांनी काय करायचं? चमचे फिरतील इकडून तिकड... त्यांच काय कसं जमतयं.पण निष्ठावंताचं काय ? निल्याला राजकारण कळत असेल पण त्याच्या आईला हे कसं कळणार? तिनं आपल्या पोराचं आयुष्य...भविष्य उध्दवस्त होतानी कसं पहायचं. असलं राजकारण त्या भोळया मायला थोडचं कळत असतं ? आपल्याला निल्याचं नाही पण त्याच्या आईचं जॅम टेन्शन आलं बुवा...!
परशुराम सोंडगे,पाटोदा,( बीड)
9673400928
sahitygandha.blogspot. com
रविवार, ४ मार्च, २०१८
लोकशाही झिंदाबाद
आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या.गाव गावचं पुढारी निवडण्यात आलं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत आली.नात्या गोत्यात,पावण्या -रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू-सुना आमने सामने आल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या.बाप-लेक एकमेकांची उणी धुणी काढु लागले.बाधांवरल्या दुशमन्या गावाचे मोठे प्रश्न झाले.गावातल्या पोरा पोरीची लफडे,मोठयाला माणसाची जुगाड प्रचाराची मुद्दे झाले.जातीजातीचे गटाव झाले.भावकीचे गटाव झाले.तालुक्यातील,परिसरातली नेते मंडळी आपआपला पाऊर वाढण्यासठी गावागावात चकरा मारू लागले.डावपेच रंगलं.कुणी खुटया हाणू लागलं.कुणी गुंडया मनात धरू लागलं.सारं रोडची धाबे फुल्लं चल्लु लागली.पंग झालेली माणसं प्रचार करू लागली.इरोधातल्याची आयमाय उजारू लागले.पापंलेटी,बॅनरं झळकू लागले.गावातली हुशार माणसं बेरजा करू लागले.एक्झीट पोल सांगू लागले.कशाच्या ही वावडया उठया लागल्या.साध्या साध्या गोष्टीवर माणसं हमरी तुमरी येऊ लागले. वातावरण तंग झाले.कवा काडी पडणं कवा भडका उडलं.याचा नेम राहीला नवहता.रातच्या बैठका रंगू लागक्या.एकदंरीत वातावरण चांगलचं तापलं होतं.
अशाच एका संवेदनशील बूथ असलेल्या गावात निवडणूकीत मतदान अधिकारी म्हणून माझ्या एका मित्रांची निवड झाली होती.त्यानं सांगितलेली ही घटना आहे.त्यानं सांगितली पण आपल्या सभोवती सरार्स या घटना घडत असतात.आपण तसे याबाबतीत एवढे गंभीर नसतोत.गंभीर तर नसतोतच पण बेजबाबदार ही असतोत.
मतदाराला मतदान स्वतंत्रपणे व निर्भीडपणे करता यावे असा प्रशासनाचा प्रयत्न असतो.ते अधिकारी याचा कसून प्रयत्न करत होते.अनेक उत्साही कार्यकर्ते नियमाचं उल्लघंन करण्याचा प्रयत्न करत होते.अर्थात त्यात स्टंटचबाजीच जास्त असते.मोठयाने आवाज करणे,उगच शिव्या देणं,समोरच्यावर आक्रमण करणे.हे सारं उगचं करणं.दहशत पसरविणे हा त्यांचा उद्देश असतो.कधी कधी आपणच फक्त प्रमाणिक आणि आक्रमक कार्यकर्ता आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
ती त्यांची गरज ही असते.प्रत्येक धंदयाचं एक कौशल्य असत.राजकारण हा जर धंदा मानला तर अशी नाटक करणं आवश्यकच असते.अभिनय उत्तम करावा लागतो.एखादया कसलेल्या कलाकारापेक्षा ते ग्रेट असतात. नेत्यांना ओरिजनल स्टेज असते. इतर पात्र ही खरे खुरे माणसं असतात.त्यांच्या भावना नाटकी नसतात.ओरिजनलं स्टेजवर हा अभिनय करावा लागतो.एकटयालाच हे करावं लागतं.
असा' शो 'च असतो पण गोंधळ खरा होतो.तो खरा गोंधळ होतो.पोलिस शिपायाची दमछाक होते.अनेक लोक पळत ....पुन्हा येत.मतदान केल्यानंतर तिथचं थांबत.आपल्या मतदानाचा अधिकार बजावून शांत जाणारे मतदार दुर्लभ असतात.गावातील झाडून माणसं मतदानाला आणण्याचा प्रयत्न जो तो करत होता.म्हतारे कोतारे,रानातून छप्परातून आणले जात होते.कुणाला गाडीवर. ...कुणाला चालत,तर कुणाला चक्क पाटकोळी....त्यांना अंधाळे दाखवून मतदान घरातले लोकच ठोकत होते.या वेळी मात्र दोन्ही पार्टया समजदार होतात.विधानसभेत नाही का सारे आमदार एक होऊन स्वत:चं मानधन व भत्ते वाढवून घेत.बहुमताने नव्हे तर सर्वानुमते.
असाच बराचं वेळ गेल्यानंतर एक जर्जर म्हतारी आणली गेली. तिला चक्क उचलूनच आणलं होतं.एका तरूणाने त्याला अजून मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला नसावा .तो इतका लहान वाटत होता.त्याला नुकतचं मिसरूड फुटलं व्हतं.त्याचं तिथ यायचं काहीचं कारण नव्हतं. तो म्हतारीचा सोबती म्हणून आला होता.त्यालाच म्हतारीच मतदान ठोकायचं होतं.आता ज्यालाच मतदानाचा अधिकार नाही त्याला दुस-याच मतदान करण्याचा अधिकार कसा दयायचा? हा प्रश्न अधिका-यासमोर असताना तेवढयात दुसरा ही मुलगा पळतच आला.तो ही म्हतारीचा नातू होता.हा ही नातूच होता.मीच मतदान करणार म्हणून त्यांनं लांबूनच डरकाळी फोडली.जो घेऊन आला होता.त्यान तर अगोदरच दावा केला होता.आता दोघांची तिथचं जुंपली.अर्थात दोन्ही पार्ट्यांचा नेहमीप्रमाणे काही आक्षेप नव्हता.ते म्हतारीचे नातूच होतॆ.अधिका-याने उलट घराच्या भांडणात पडायला नको.त्यांचे आपापले सपोर्टर ही बोलू लागले.प्रश्न हा होता की कोणत्या नातवाला मत ठोकू दयायचे? एकच कालवा झाला.मतदान अधिका-याकडं प्रकरणं आलं.
असाच बराचं वेळ गेल्यानंतर एक जर्जर म्हतारी आणली गेली. तिला चक्क उचलूनच आणलं होतं.एका तरूणाने त्याला अजून मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला नसावा .तो इतका लहान वाटत होता.त्याला नुकतचं मिसरूड फुटलं व्हतं.त्याचं तिथ यायचं काहीचं कारण नव्हतं. तो म्हतारीचा सोबती म्हणून आला होता.त्यालाच म्हतारीच मतदान ठोकायचं होतं.आता ज्यालाच मतदानाचा अधिकार नाही त्याला दुस-याच मतदान करण्याचा अधिकार कसा दयायचा? हा प्रश्न अधिका-यासमोर असताना तेवढयात दुसरा ही मुलगा पळतच आला.तो ही म्हतारीचा नातू होता.हा ही नातूच होता.मीच मतदान करणार म्हणून त्यांनं लांबूनच डरकाळी फोडली.जो घेऊन आला होता.त्यान तर अगोदरच दावा केला होता.आता दोघांची तिथचं जुंपली.अर्थात दोन्ही पार्ट्यांचा नेहमीप्रमाणे काही आक्षेप नव्हता.ते म्हतारीचे नातूच होतॆ.अधिका-याने उलट घराच्या भांडणात पडायला नको.त्यांचे आपापले सपोर्टर ही बोलू लागले.प्रश्न हा होता की कोणत्या नातवाला मत ठोकू दयायचे? एकच कालवा झाला.मतदान अधिका-याकडं प्रकरणं आलं.
अधिकारी: "आजी,खरच दिसत नाही का ?"
आजी:" म्या काय दाटून म्हणतेयं काय ? पारं डोळयाचं खाचा झाल्यात की."
अधिकारी:"हे बोट किती?" तीन बोट म्हतारी पुढं दाखवत ते म्हणाले.म्हतारीनं थोडा वेळ घेतला.पटकन उत्तर दिलं.
'पाच"तसं त्यातलचं एकजण आराडलं,सायेब,म्हतारी काय लबाड बोलती काय? खरच तिला दिसत नाही." सायबाची भी खात्रीच झाली होती.त्यांनी पुढच्या प्रश्न विचारला,"हे दोघ कोण आहेत ?"
आजी:" हा थोरल्याचं नि हा धाकल्याचायं."
अधिकारी:मतदान कुणाला करू दयायचं ?"
आजी:"या धाकल्याच्याला.इकासला".असं ती म्हतारी म्हणल्या बरोबर थोरल्याचं ते पोरग पारं म्हतारीच्या अंगावरच धावून गेलं आणि म्हणालं,"म्हतारे काय म्हणालीस ?"
आजी :"काय नाय बाबा तुला देते ना निम्मे.तेव्हचं नातू नि तू नाहीस काय ?"
नातू :"बघ इचार कर.मतदान मला करू दे."
तो पोरगा डायरेक्टचं दम टाकत होता.हा काय तमाशा आपल्यामुळे झालाय याचं प्रेशर त्या म्हतारीला आलं होतं.तो नातू नंबर दोन जास्तच कालवा करत असल्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आलं.तवा मात्र दोन्ही पार्टया हातघाईवर आल्या.तेव्ह कराकरा दात ओठ खातचं बाहेर गेला.ते पण मोठं रगील होतं.मागं गुरकू गुरकू बघ.
सर्व प्रोसीजर झाल्यानंतर त्या नातवांन मतदान केल.मतदान केल्या नंतर तेव्ह खूश झाला होता.ते खुशीतच पळालं बाहेर.म्हतारी राहिली तिथंच.आता म्हतारीला चालता येईना,उठता येईना.ती तिथचं आरडू लागली.बाकीचे म्हतारीला घेऊन बाहेर नेऊ लागले.म्हतारी जाईना."अगोदर त्याला बोलवा.महया इक्कासाला बोलवा."असं ओरडू लागली.इक्कासला मोठयाने चार पाच जणानी हाका मारल्या तवा तेव्ह आला.म्हतारीला हाताला धरून घेऊन जाऊ लागला.म्हतारी तरी जायला राजी होत नव्हती.आता सा-यांनाच काही कळेना की म्हतारीचा असा हट्ट का?
"तू अगोदर त्या दोन नोटा दे."
"चल बाहेर देतो"
"नाय आता दे.इथच दे.त्या सुभ्याला लगेच माझ्या हाताने देते.तेव्ह आताच डाफरून गेलाय.उग कशाला भांडणाचा कहारं."ती सर्व लोकांकडे पाहत पाहत म्हणाली.लोकांचा काहीच आक्षेप नव्हता.अर्थात तो पण त्याचा घरगुती मुद्दाच होता.फक्त त्यांनी तो घरी मिटवावा एवढीच अपेक्षा होती.
बबळच इक्काश्या ओढू लागला.म्हतारी कावाली.
""तू दे आधी...त्याची भी अन् तुझी पण आजीच त्यांनी दिलेत मताला पण मला कोण देतेय.मत माझं आणि मालक हे झालेत.म्हतारी साराचं पोलखोल करील म्हणून त्या नातवानं एक शंभराची नोट काढली.तशी म्हतारी ओरडली,"म्या काय आंधळी काय?पाचश्याची दे" तसा तो विकास नावाचा नातू तिला ओढीतच घेऊन गेला.प्रश्न हा होता म्हतारीला दिसतं होत.ती आंधळी नव्हती.मग ती खोट का बोलली? इक्कासने हे डील केल असेल.म्हतारीच मतदान करून घेतो अस सांगून तिन्ही ही पार्टयाकडून पैस उकळले असणार.लय्यीचं चाप्टर गडया.त्याच्या चाप्टरपणा बाबत सा-यांच एकमत
झालं होतं.मतदानाचा अधिकार नसलेला इक्कसही आजच मतदान विकत घेण्याच व्यवहार करतो.त्याला हा देश व्यवहारचतुर म्हणतो.मताचा निलाव केला जातोय.हे सारेच बघतात.नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शिकलेले अधिकार आणि कर्तव्य कुठे शोधायचे?तेव्ह इक्कस मोठा नेता होणार.हे निश्चितच आहे.असे इक्कास गावागावातून शेकडयांनी तयार होत आहेत.भारतीय नसगरिक 'भारत माझा देश आहे'ही प्रतिज्ञा म्हणत लोकशाहीचं ही झिंदाबाद करत राहतील.कुणाला काही डाऊट?
परशुराम सोंडगे,पाटोदा
sahitygandha.blogspot.com
बळीराजा, कर्जमुक्ती आणि कर्जमाफी वगैरे
कथा आणि व्यथा
चालता फिरता रामू आण्णा आजारी पडला.ताप आला .काय केल्या ताप उतरेना .म्हतारी शांता काकू घाबरून गेली.आता सा-याला कळलं होतं म्हतार हलवायला पाहिजे .रामूआण्णाचे दोन लेक नोकरीला पुण्याला होते. कोणी न्याचं दवाखान्यात ? शांता काकून फोन करून कळवलं .पण दोघ ही काही काही कारणं सांगायची .
"सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा.
थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? "
धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ."
रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं .
शेवटी दोघ आले .
थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं "
धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत"
थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला पाहिजे.बघ दादा फिल्टर आणलं ."
धाकटा: ."लय घाण दारात .आजार होणारच.मी पैस देतो. शौचालयच बांधून देतो. "
म्हतारी सारं ऐकत व्हती .ती जरा सटकली म्हणाली , "आरं शाहण्यावं, म्हता-याला दवाखान्यात न्यायचं सोडून हे काय लावलं ?फिल्टारच काय आणताय? संडास काय बांधता ?सारी नाटकचं का ? दवाखान्यात न्या नाहीतर म्हया राजाच्या मातीला सुद्दीक येऊ नका ."
कथेतल्या पोरांसारखंच सरकार निष्ठूर झालं आहे. शेतक-यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि हे धोरण आखताहेत शेतक-याची कर्ज माफी ,कर्ज मुक्तीची मागणी असतानी मुख्यमंञ्याला कशा सुंदर कल्पना सुचतात ? कसे भयकर उपाय सुचतात ? या पेक्षा निष्ठूर कोणं असू शकेल बरं ? काय शेतक-याची व्यथा आहे आणि काय कथा झाली आहे.
"सुट्टी नाही ",धाकटा म्हणायचा.
थोरला म्हणायचा," धाकटा आला का ? "
धाकटा म्हणायचा ." त्यानं जायला पाहीजे .मला रजा नाही .मी फार केलं त्यांनी सेवा केली पाहिजे ."
रामा आाण्णाला वाटायचं पोरं येतील दवाखान्यात नेतील .पण पोर कसली येतत? म्हतारीचा जीव खालीवर होऊ लागला. गावातल्या पुढा-यांनी फोन केला . आरं बापा कडं पहा जरा .तू तू मी मी नका करू . सारं विसरून जा" पण छया...छया...!! काही फरक पडला नाही .म्हतारं बेशुध्द झालं .
शेवटी दोघ आले .
थोरला: "दादा मी आलो .उठ बर.मी केळ आणलीत चिक्कू आणलेत .खा बर थोडं "
धाकटा: "दादा बघ बदाम आणलेत .बिस्किट आणलीत बघ कपडे आणलीत"
थोरला: "पाणी चांगल शुध्द प्यायला पाहिजे.बघ दादा फिल्टर आणलं ."
धाकटा: ."लय घाण दारात .आजार होणारच.मी पैस देतो. शौचालयच बांधून देतो. "
म्हतारी सारं ऐकत व्हती .ती जरा सटकली म्हणाली , "आरं शाहण्यावं, म्हता-याला दवाखान्यात न्यायचं सोडून हे काय लावलं ?फिल्टारच काय आणताय? संडास काय बांधता ?सारी नाटकचं का ? दवाखान्यात न्या नाहीतर म्हया राजाच्या मातीला सुद्दीक येऊ नका ."
कथेतल्या पोरांसारखंच सरकार निष्ठूर झालं आहे. शेतक-यांच्या रोज आत्महत्या होत आहेत आणि हे धोरण आखताहेत शेतक-याची कर्ज माफी ,कर्ज मुक्तीची मागणी असतानी मुख्यमंञ्याला कशा सुंदर कल्पना सुचतात ? कसे भयकर उपाय सुचतात ? या पेक्षा निष्ठूर कोणं असू शकेल बरं ? काय शेतक-याची व्यथा आहे आणि काय कथा झाली आहे.
. . . . . . . . . परशुराम सोंडगे, पाटोदा
sahitygandha.blogspot. com
https://www.misalpav.com/node/39191या वर ही कथा वाचता येईलगरिबी अाणि जिद्द
कथा आणि व्यथा
गरिबी आणि जिद्द
यवतमाळ शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.
आम्ही थांबल्याबरोबर ती सारीचं माणसं आमच्याकडं पाहू लागली.कारण ही तसचं होतं.आम्ही सारे नटून थटून आलो होतो. पुढी-या टाईप. एकदम पाॅश...आम्ही तिथचं बाकडयावर टेकलो. बाकडांनी आमचं कपडे मळू नाहीत म्हणून सावध बसलो. अल्लाद...
" तीन चाय दे लवकर." मी आॅडर सोडली.
तो हाॅटेलवाला पाण्याचा जग घेऊन आला.
पलीकडं काही कागद पडले होते. काही खरकट सांडलं होतं.त्याच्या हातात जे ओलं फडकं होतं.त्यानं पुसून घेतलं. सापसूप करून घेतलं.
"सायब पाणी...!!" मी आणि माझ्या मित्रांनी त्याच्याकडं पाहिलं.त्या नजरेत थोडी तुच्छता नि राग होता. गि-हाईक आलं की त्याला पाणी दयावं नंतर आॅर्डर घ्यावी अशी रीतच असते. त्यात रागण्यासारख काय होत ? त्या मघाकडं आम्ही तुच्छ नजरेनं पाहिलं.
"सायब तुम्हाला बिसलरी हवी का ? पण ती माझ्याकडं नाही.समोरून आणून देऊ का ?"
"एवढं मोठं हॉटेल आहे नि बिसलरी नाही? "
"सायब त्याला फ्रिज पायजे की "
"मग ठेवायचं की?"
" इथं असं रस्त्यावर...? " तो हासला आणि पळतचं मेडीकल मध्ये गेला . त्याला कळून चूकलं होतं हे आपली मज्जा घेत आहेत. तो पाण्याची बाटली घेऊन आला. मला देत तो म्हणाला,
"सायब पाणी नाय ठेवत मी पण चहा असा फक्कड बनवतो ."
"स्वच्छता भी पायजे.नुसतं फक्कड नि बिक्कड" काय कामाचा ?" मी उगच उपदेशाचा डोस दिला.असा डोस देण्याची संधी आली तर सहसा मी सोडत नाही. स्वच्छता शब्द एेकल्यावर तो बारिक हासला. तिथं जी माणसं होती. ती घटाघटा पाणी पित. चहा पित.वचावचा खात.मी कुतुहलाने पहात होतो.ते इतकं घाणरेडे खात आहेत. धूळ बसलेले अन्न खात आहेत.इतकं अशुध्द पाणी पित आहेत.यांच्या पोटात इतके विषाणू जात असतील.जंतू जात असतील.यांना कसं काही होत नाही?रोग गरीबांच शरीर निवडत नसतील काय ?
माझा मलाच भाबडा प्रश्न पडला.
आमच्यासाठी स्पेशल चहा बनत होता.तेवढयात तिथं एक कप्पलं आलं. त्यांच्या सोबत त्यांच एक पिल्लू पण होत. त्या गडयाचे केस वाढलेले...विस्कटलेले...थोडे थोडे पिकायला लागलेले.दाढीचं खूट वाढलेले. जीन्स होती पण फाटलेली..मळलेली...त्यानं किमान आठ दिवस तरी अंघोळ केली नसेल.गाल पार चपटे झाले होते. त्याची बायको पण तशीच अवतार उतारलेली होती. तिचं वय तीसच्या आतचं असावं .जांभळया गर्द रंगाची साडी.कळकटलेल हिरवट रंगाचं पोलकं... ते पण विरलेलं होतं.त्यातून तिचं अंग दिसतं होतं. तिचा ते पदराने झाकण्यासाठी केविलवाणा प्रयत्न चालु होता. . केसाचा झाप झालेला...पायात तुटकी चप्पल...ते लेकरू कडाला. त्याचं अंग मळलेलं...शेंबडाच्या वाळून गेलेल्या रेषा.. ते पण हं ते तिला तोडीत होतं.तिनं तिला पाजलं होत की नाही ? ते भुकेलेले असावं. तिनचं जर काही खाल्ल नसल्ल तर ? ती काय करू शकत होती. बाकी ती सुंदर नाही पण आकर्षक होती. तिची आकर्षकता तिच्या तारूण्यात असावी.तिला पाहिलं की मला जरा कळवळून आलं. ह्रदय माझं कणव पाझरू लागलं. ते सारे आमच्या पुढयात येऊन उभे राहिले.
" ती खिचडी दे एक प्लेट" त्यानं आॅर्डर दिली.
" पैसं आहेत का ?"
" दहा....हायेत "
"आरं मग ...पाच ?"
"देऊ की दादा .... त्यानं विनवणी केली.
"असं रोजचं कमी कसं ?"
" दे दादा ...आज देऊ तुझे .लेकरू लयं भुकेल"
हाॅटेलवाल्यांन लगेच एक प्लेट घेतली.खिचडी टाकली.त्यावर हरभरा उसळ टाकली .कांदा कापला.कोंथिबर टाकली तिच्या हातात दिली.
"बस्स..एकचं.तुम्हाला नको का?"
"आम्हाला नको .आज लग्नात जातोय.तिथचं खाऊ ." तिनं सपष्टीकरणं दिलं.
" त्यांना कशाला सांगायचं लग्न बिग्न...."तिनं सपष्टीकरण देणं त्याला आवडलं नव्हतं.
तिथचं झाडाच्या सावलीला बसले. आमचा चहा आला.फुरके मारीत चहाचं पिऊ लागलोत.चहाला भारी चव होती.पाॅश हॉटलात चहात अशी चव नि मज्जा नाही कधी सापडली.
माझं लक्ष त्या कप्पलं कडेचं होतं. ती त्या लहानग्याला भरवित होती.ते लहानग अधाशापणे खात होते. हा तिथचं बसून होता. बोलता बोलता तो एकदा घास तोंडात टाकायचा.तशी ती ओरडायची ...त्याच्यावर खेकासायची..
"लेकराला खाऊ दया." तो नुसता हसायचा. दाताड काढयचा. तो जीभल्या चाटत होता.
तिच्या ही त्वांडाला पाणी सुटलं होतं.ते मी सपष्ट पाहू शकत होतो.मी त्यांच्याकडं पहातचं होतो. तेवढयात तिची नि माझी नजरा नजरा झाली.ती जरा संकोचली. तो फटकाचं पदर तिनं नीट केला. हे मी माझ्या मित्राला दाखवलं. मला त्यांच्याबद्दल प्रंचड सहानुभूती होती .मित्र पण ते दृश्य पाहू लागलं. आम्ही सारे त्यांच्याकडं पहात होतो.तिनं हळूचं तिच्या नव-याला सांगितल असावं .तो जरा सावध बसला.आपल्या दारिद्रायचं प्रदर्शन कुणाला हवं असेल बरं ?
माझ्या एका मित्रांनी ते करूण दृश्य कॅमे-यात बंध करण्याची उत्कट इच्छा झाली .एक बरं होतं.त्याला सेल्फी काढण्याची तीव्र इच्छा झाली नाही. त्यानं मोबाईल काढला नि फोटो काढले. त्यांनी फोटो काढलेले तिला कळले.ती ताडकून उभी राहिली.त्या लहानग्याला भरवण्याचं बंद केल.तिथूनचं ओरडली," फोटो का काढला काय ? आम्ही काय वेडे वाटलोका ?"
तिला फार राग आला होता. आमची सा-यांची चीड आली होती.
" तुझा नाय फोटो काढला मी" मित्र घाबरून गेला. हासत हासत मागे सरकला. मोबाईल खिशात ठेऊन दिला. उग सुरक्षीत ...
ती पुन्हा पलीकडं गेली.त्या लहानग्याला खाऊ घालू लागली. हॉटेलवाला मित्राकडं बघून मुरक्या मुरक्या हासला.
" मी सहज फोटो काढयला गेलो.बाई पार जहाल दिसते बुवा"
" तुम्ही कशाला काढयचा फोटो?"
"उग आपला सहज...."
" गरीबी खूप वाईट असते. ती अशी फुटू नाहीत मावायाची."
" तसं नाही रे..."
" मग कसं ?"
" ती उपाशी राहते पण भीक नाही मागत. काम करते तेवढचं खाते.तो मात्र पैसा आला का मुत पितो."
"राहते कुठं ?"
" त्या तिथचं पुलाच्या खाली. सायब तिचं घर संसार... पण लयं इमानी .उधारी नाही ठेवत."
"पण ती इथं कशाला आली?"
"आली.कुणाला कोणतं भोग दयायचं त्याच्या हातात सायब .ती लय्यं मोठी स्टोरी हाय."
"लव्ह स्टोरी तर नाही ना ?"
"तसं...चं हाय." तो खळखळून हासला. सारे हासले. मला हासू नाही आलं.
" कसं? सांग तरी."
"एका प्राघ्यापकाची पोरगी सायब ती. त्याच्यात जीव गुंतला.आली सारं घर दार सोडून.आणि या माठयांनी ठेवली आता पुलाच्या खाली.”
“तशीचं असलं ती.” आमच्यातला एक जण म्हणाला"असं नका म्हणू सायब. ती मला भाउ मानते.
ती तुला भाऊ मानते पण तू मानतो का तिला बहीण..."माझा खोचक प्रश्न.
"मानतो सायब.ती लय्यचं जिद्दी नि खंबीर ..."
मला त्याची छाती तिच्या गर्वानं फुगून आल्यावाणी वाटलं. ती आमच्याकडं पहात होती.
त्यानं तंबाखूचं पुडी काढली. त्यानं घेतली.तिला दिली चिमूटभर... दोघांनी चोळली .तोंडात टाकली. लेकराला कडेला घेतलं. तिनं त्याचा हातहातात घेतला व त्याला अधिकचं बिलगली.आमच्यकडं पाहिलं. विजयी मुद्रेने ती हासत गेली
परशुराम सोंडगे,पाटोदा
sahitygandha.blogspot. com
prshuramsondge.blogspot.com
गरिबी आणि जिद्द
यवतमाळ शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.
आम्ही थांबल्याबरोबर ती सारीचं माणसं आमच्याकडं पाहू लागली.कारण ही तसचं होतं.आम्ही सारे नटून थटून आलो होतो. पुढी-या टाईप. एकदम पाॅश...आम्ही तिथचं बाकडयावर टेकलो. बाकडांनी आमचं कपडे मळू नाहीत म्हणून सावध बसलो. अल्लाद...
" तीन चाय दे लवकर." मी आॅडर सोडली.
तो हाॅटेलवाला पाण्याचा जग घेऊन आला.
पलीकडं काही कागद पडले होते. काही खरकट सांडलं होतं.त्याच्या हातात जे ओलं फडकं होतं.त्यानं पुसून घेतलं. सापसूप करून घेतलं.
"सायब पाणी...!!" मी आणि माझ्या मित्रांनी त्याच्याकडं पाहिलं.त्या नजरेत थोडी तुच्छता नि राग होता. गि-हाईक आलं की त्याला पाणी दयावं नंतर आॅर्डर घ्यावी अशी रीतच असते. त्यात रागण्यासारख काय होत ? त्या मघाकडं आम्ही तुच्छ नजरेनं पाहिलं.
"सायब तुम्हाला बिसलरी हवी का ? पण ती माझ्याकडं नाही.समोरून आणून देऊ का ?"
"एवढं मोठं हॉटेल आहे नि बिसलरी नाही? "
"सायब त्याला फ्रिज पायजे की "
"मग ठेवायचं की?"
" इथं असं रस्त्यावर...? " तो हासला आणि पळतचं मेडीकल मध्ये गेला . त्याला कळून चूकलं होतं हे आपली मज्जा घेत आहेत. तो पाण्याची बाटली घेऊन आला. मला देत तो म्हणाला,
"सायब पाणी नाय ठेवत मी पण चहा असा फक्कड बनवतो ."
"स्वच्छता भी पायजे.नुसतं फक्कड नि बिक्कड" काय कामाचा ?" मी उगच उपदेशाचा डोस दिला.असा डोस देण्याची संधी आली तर सहसा मी सोडत नाही. स्वच्छता शब्द एेकल्यावर तो बारिक हासला. तिथं जी माणसं होती. ती घटाघटा पाणी पित. चहा पित.वचावचा खात.मी कुतुहलाने पहात होतो.ते इतकं घाणरेडे खात आहेत. धूळ बसलेले अन्न खात आहेत.इतकं अशुध्द पाणी पित आहेत.यांच्या पोटात इतके विषाणू जात असतील.जंतू जात असतील.यांना कसं काही होत नाही?रोग गरीबांच शरीर निवडत नसतील काय ?
माझा मलाच भाबडा प्रश्न पडला.
आमच्यासाठी स्पेशल चहा बनत होता.तेवढयात तिथं एक कप्पलं आलं. त्यांच्या सोबत त्यांच एक पिल्लू पण होत. त्या गडयाचे केस वाढलेले...विस्कटलेले...थोडे थोडे पिकायला लागलेले.दाढीचं खूट वाढलेले. जीन्स होती पण फाटलेली..मळलेली...त्यानं किमान आठ दिवस तरी अंघोळ केली नसेल.गाल पार चपटे झाले होते. त्याची बायको पण तशीच अवतार उतारलेली होती. तिचं वय तीसच्या आतचं असावं .जांभळया गर्द रंगाची साडी.कळकटलेल हिरवट रंगाचं पोलकं... ते पण विरलेलं होतं.त्यातून तिचं अंग दिसतं होतं. तिचा ते पदराने झाकण्यासाठी केविलवाणा प्रयत्न चालु होता. . केसाचा झाप झालेला...पायात तुटकी चप्पल...ते लेकरू कडाला. त्याचं अंग मळलेलं...शेंबडाच्या वाळून गेलेल्या रेषा.. ते पण हं ते तिला तोडीत होतं.तिनं तिला पाजलं होत की नाही ? ते भुकेलेले असावं. तिनचं जर काही खाल्ल नसल्ल तर ? ती काय करू शकत होती. बाकी ती सुंदर नाही पण आकर्षक होती. तिची आकर्षकता तिच्या तारूण्यात असावी.तिला पाहिलं की मला जरा कळवळून आलं. ह्रदय माझं कणव पाझरू लागलं. ते सारे आमच्या पुढयात येऊन उभे राहिले.
" ती खिचडी दे एक प्लेट" त्यानं आॅर्डर दिली.
" पैसं आहेत का ?"
" दहा....हायेत "
"आरं मग ...पाच ?"
"देऊ की दादा .... त्यानं विनवणी केली.
"असं रोजचं कमी कसं ?"
" दे दादा ...आज देऊ तुझे .लेकरू लयं भुकेल"
हाॅटेलवाल्यांन लगेच एक प्लेट घेतली.खिचडी टाकली.त्यावर हरभरा उसळ टाकली .कांदा कापला.कोंथिबर टाकली तिच्या हातात दिली.
"बस्स..एकचं.तुम्हाला नको का?"
"आम्हाला नको .आज लग्नात जातोय.तिथचं खाऊ ." तिनं सपष्टीकरणं दिलं.
" त्यांना कशाला सांगायचं लग्न बिग्न...."तिनं सपष्टीकरण देणं त्याला आवडलं नव्हतं.
तिथचं झाडाच्या सावलीला बसले. आमचा चहा आला.फुरके मारीत चहाचं पिऊ लागलोत.चहाला भारी चव होती.पाॅश हॉटलात चहात अशी चव नि मज्जा नाही कधी सापडली.
माझं लक्ष त्या कप्पलं कडेचं होतं. ती त्या लहानग्याला भरवित होती.ते लहानग अधाशापणे खात होते. हा तिथचं बसून होता. बोलता बोलता तो एकदा घास तोंडात टाकायचा.तशी ती ओरडायची ...त्याच्यावर खेकासायची..
"लेकराला खाऊ दया." तो नुसता हसायचा. दाताड काढयचा. तो जीभल्या चाटत होता.
तिच्या ही त्वांडाला पाणी सुटलं होतं.ते मी सपष्ट पाहू शकत होतो.मी त्यांच्याकडं पहातचं होतो. तेवढयात तिची नि माझी नजरा नजरा झाली.ती जरा संकोचली. तो फटकाचं पदर तिनं नीट केला. हे मी माझ्या मित्राला दाखवलं. मला त्यांच्याबद्दल प्रंचड सहानुभूती होती .मित्र पण ते दृश्य पाहू लागलं. आम्ही सारे त्यांच्याकडं पहात होतो.तिनं हळूचं तिच्या नव-याला सांगितल असावं .तो जरा सावध बसला.आपल्या दारिद्रायचं प्रदर्शन कुणाला हवं असेल बरं ?
माझ्या एका मित्रांनी ते करूण दृश्य कॅमे-यात बंध करण्याची उत्कट इच्छा झाली .एक बरं होतं.त्याला सेल्फी काढण्याची तीव्र इच्छा झाली नाही. त्यानं मोबाईल काढला नि फोटो काढले. त्यांनी फोटो काढलेले तिला कळले.ती ताडकून उभी राहिली.त्या लहानग्याला भरवण्याचं बंद केल.तिथूनचं ओरडली," फोटो का काढला काय ? आम्ही काय वेडे वाटलोका ?"
तिला फार राग आला होता. आमची सा-यांची चीड आली होती.
" तुझा नाय फोटो काढला मी" मित्र घाबरून गेला. हासत हासत मागे सरकला. मोबाईल खिशात ठेऊन दिला. उग सुरक्षीत ...
ती पुन्हा पलीकडं गेली.त्या लहानग्याला खाऊ घालू लागली. हॉटेलवाला मित्राकडं बघून मुरक्या मुरक्या हासला.
" मी सहज फोटो काढयला गेलो.बाई पार जहाल दिसते बुवा"
" तुम्ही कशाला काढयचा फोटो?"
"उग आपला सहज...."
" गरीबी खूप वाईट असते. ती अशी फुटू नाहीत मावायाची."
" तसं नाही रे..."
" मग कसं ?"
" ती उपाशी राहते पण भीक नाही मागत. काम करते तेवढचं खाते.तो मात्र पैसा आला का मुत पितो."
"राहते कुठं ?"
" त्या तिथचं पुलाच्या खाली. सायब तिचं घर संसार... पण लयं इमानी .उधारी नाही ठेवत."
"पण ती इथं कशाला आली?"
"आली.कुणाला कोणतं भोग दयायचं त्याच्या हातात सायब .ती लय्यं मोठी स्टोरी हाय."
"लव्ह स्टोरी तर नाही ना ?"
"तसं...चं हाय." तो खळखळून हासला. सारे हासले. मला हासू नाही आलं.
" कसं? सांग तरी."
"एका प्राघ्यापकाची पोरगी सायब ती. त्याच्यात जीव गुंतला.आली सारं घर दार सोडून.आणि या माठयांनी ठेवली आता पुलाच्या खाली.”
“तशीचं असलं ती.” आमच्यातला एक जण म्हणाला"असं नका म्हणू सायब. ती मला भाउ मानते.
"मानतो सायब.ती लय्यचं जिद्दी नि खंबीर ..."
मला त्याची छाती तिच्या गर्वानं फुगून आल्यावाणी वाटलं. ती आमच्याकडं पहात होती.
त्यानं तंबाखूचं पुडी काढली. त्यानं घेतली.तिला दिली चिमूटभर... दोघांनी चोळली .तोंडात टाकली. लेकराला कडेला घेतलं. तिनं त्याचा हातहातात घेतला व त्याला अधिकचं बिलगली.आमच्यकडं पाहिलं. विजयी मुद्रेने ती हासत गेली
परशुराम सोंडगे,पाटोदा
sahitygandha.blogspot. com
prshuramsondge.blogspot.com
गुरुवार, १ मार्च, २०१८
गुडमाॅर्नींग पथक (कथाकथन)
तहान
कथा आणि व्यथा
******************************
तहान
( जलदिना निमत्त ही कथा लिहीली होती.व्यस्तमुळे प्रसिध्द करता आली नाही.माझ्या काही मित्र च्या आग्रहाखातर पोस्ट करतोय.)
त्यादिवशी दुपारी सहज मी खिडकीत उभा होतो. समोरच्या पटागंणात काही बि-हाड उतरली होती. ऊन मी म्हणत होतं. त्या पटांगणावर नावाला पण झाड नव्हतं. नुसतं वेडपाटं होती.त्याला पानं नव्हती राहिली.लेकर बाळं सारी ऊन्हात तळत होती.
गडी माणसं पालं ठोकत होती. सारे चार पाच पालं असतीलं.त्यात काही लेकरं वाळया ही होत्या.ती लहान लहान पिल्लं नुसती केकत होती. येडया बाभळीच्या झाडावर गोधडी टाकून सावली केली आणि त्या तिथचं बसून लेकरं पाजू लागल्या. बाकी पाच सहा लेकरं नुसती हुंदडत होती. उघडी नागडी पळत होती. त्यातल्याचं काही थोराडं पोरी, बायानं मात्र डर्म, डब्बे, कळश्या बकेटा काढल्या. आता तिथचं संसार थाटणारं होतं. त्यांना पाणी लागणारं होतं. हे कुठून पाणी आणणार ? मलाच प्रश्न पडला.त्या पटांगणात कुठं ही सार्वजनिक नळ नव्हता.हापश्या ही बंद होता. नळाला पाणी यायचं ही पंधरा दिवस बंद झाले होते.टॅकरने पाणी पुरवठा होतं होता.
त्यात वशिल्यावाल्याला... नगरसेवकाच्या जवळच्याला पाणी जास्त दिलं जातं होतं.
टॅकर आलं की महायुध्द सुरू झाल्या सारखा महोल होतो. दोन दिवसापूर्वीच दोन गटात टॅकर मध्ये पाईप टाकण्यावरून तुंबळ हाणामारी झाली होती.त्या हाणामारीला थांबता थांबवता...पोलिसांच्या तोंडाचं पाणी पळालं होतं.कारणं त्या भांडणाला जातीय स्वरूप आलं होतं. जातीय स्वरूप आल्यावर मग काय दुसरं ? दंगलच...
आता यांना पाणी कोणं देणारं ? मलाच प्रश्न पडला. सहा सात बाया पोरी डर्म , कळशा , पात्यालं घेऊन निघाले. त्यांना पाणी हवं होतं.
आता या बापुडया कुठून पाणी आणणार...मलाच प्रश्न पडला.आता इथं जो तो पाण्यांनी परेशान. यांना कोण पाणी देणारं ?
तो सारा ताफा हापश्या जवळ गेला . हापश्याय... तो कधीचं बंद झाला होता. त्याचं दांडकं हालवून बघीतलं. त्यातून कसलं पाणी येतं? सा-याचं हिरमुसल्या. त्या पाण्याची शोध मोहीम सुरू झाली ?
पाणीचं कुठं दिसेना.
आता त्यांनी मोर्चा...काॅलनीतल्या घरांकडे वळवला. अगोदर त्या नुसत्याचं फिरल्या...पाण्याचा त्यांना काही ठाव ठिकाणा दिसतो का हे पाहिलं.ओपन पाणी कुठं दिसतं असत व्हयं ? कुठं आता.त्या जाईत दारं वाजवतं. पाणी मागतं.त्यांना कोण पाणी देतं.जारचं विकतं पाणी घेणारे कुठं फुकट पाणी देतत असतेत का ?
भला मोठा खंडा पाहिला की गपकन दार बंद होईत.काही दारं तर उघडतचं नव्हती. कुणी नुसतं खेकसतं होती.कुत्र्यावर भुंकावं तशी भुंकत.
मला तर प्रचंड दया येत होती पण मी काही करू शकत होतो . दयेचा पाझर काळजात होऊन ही मी काहीच करू शकतं नव्हतो. कधी कधी आपण दयेच्या पाझर करण्या पलीकडं काहीचं करू शकतं नाही. मी हतबल होतो. जेमतेम दोनच बकेट पाणी होतं माझ्याकडं
ते मेटाकुटीस आले.पाणी दिसत नव्हतं...आणी कुणी बोलतं ही नव्हतं.
आता हे काय करणारं ? मला उत्सुकता लागली होती.
देवगावकरचं घर त्यांना दिसलं. तो मात्र दारातल्या झांडांना पाणी घालतं होता. त्याच्या बोअरला पाणी बरं पाणी. त्याच्याकडं मोठा हौद...टॅकर आलं की तो डायरेक्ट भरून घेतो.मोटार टाकून...
त्याचं नाव घेण्याची ही सोय नाही. त्याचा मोठे वशिलेत. नगराध्यक्ष कधी जेवायला त्याच्याकडे असतो.त्यामुळं त्याला
पाण्याला कमी नव्हतं.
आमची सत्ता...आमचं माणसं... आमचं पाणी... असंचं वागणं असतं त्याचं. गल्लीतल्या माणसाला यांन कधी पाणी दिलं नाही. तो या भिका-यांना कधी पाणी देणं शक्य नव्हतं.
पाणी पहायला भेटल्यामुळे ती झुंबड काही पुढे सरकेना. ते सारे नुसतं पाण्याकडं पहात राहिले. टूकमूक ...
लाचार नजरेनं सा-या पाहू लागल्या. देवगावकर...रागानं त्यांच्याकडे पहात होता. त्या हालत नव्हत्या.उलट एकीने पुढं जाऊन धाडसानं ओठं उचकले.
" दादा दे ना पाणी. "
" पळा.. पाणी बिणी काय नाही."
" दे ना रे...एक एक डराम दे फक्स्त..."
" पळा हे पाणी फुकाटचं नाय....
" दे ना रे दादा पाया पडते .हात जोडते. तहानलेरे..."
" आता पळता का कसं .." तो पार मारायला धावला. ते भिकारीच लयं चिवाट....
मग हळूहळू ते पार कंपाऊडच्या एक एक आत शिरले. आता मात्र देवगावकरचा ताबा सुटला. हातातला पाईप खाली टाकला. त्यांच्या माग पळाला तस सारे धूम...एक प्रौढ बाई पळाली नाय.
अरे दादा हाणते काय ? झाडाला पाणी देते अन् माणसाला नाय. दे ना तहानलीरं लेकरं .."
" पळ .भिकारडे.. पाणी फुकटं नायं"
"मग विकते देते काय ,"
" जाती की नाय .आयघाले ..." देवगावकर डायरेक्ट शिव्याचं दयायला लागला. अंगावरच धावला तशी ती तिरकं तिरकं हालली. देवगावकरनं मोटारचं बंद केली.ते मनालाचं लाजलं. घरात गेला.
ते सारे पालावर आली. पाणी नव्हतं .पालं टोकून गडी दमून गेले असतीलं. तहानले असतील. डरम तर सारे रिकामेचं. एक दोघानी त्या रिकाम्या डरमावर...लाथा घातल्या. थोडा कालवा झाला. सारे गप झाले.
मी थोड आत आलो. पाणी प्यालो. माझी तहान तृप्त झाली पण...
त्यांची तहान....? या जगात असे किती लोक असतील...ते पाणी नाही पिऊ शकतं. रानावनात किती प्राणी ,पक्षी किटक असतील त्यांना जिवंत राहण्यासाठी पाणी नाही.
पाणी... आणि ....काही काही आठवत राहिले. दारात आलो तर...
पहातो तर देवगावकरच्या दारातं गर्दी होती. एक पोरगी पकडली होती.तिला चोर चोर म्हणून मारलं होतं. तिनं देलगावकरच्या नळाचं पाणी चोरलं होतं. हिसकावुन घेतलेला ...हंडा .
...सांडलेलं पाणी...माती पाणी माती पितं होती पण तिला पाणी नव्हतं.
तिच्या डोळ्यात प्रंचड चीड आणि चेह-यावर....भंयकर तहान दिसतं होती. ती तहान नक्कीचं पाण्याची नव्हती....ती माणसाच्या रक्ताचीही असू शकते.
पाणी हे जीवन जपून वापरा. ते प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी
आवश्यक असते याचे भान ठेवा.
******************************
परशुराम सोंडगे,
पाटोदा( बीड )
9673400928
******************************
तहान
( जलदिना निमत्त ही कथा लिहीली होती.व्यस्तमुळे प्रसिध्द करता आली नाही.माझ्या काही मित्र च्या आग्रहाखातर पोस्ट करतोय.)
त्यादिवशी दुपारी सहज मी खिडकीत उभा होतो. समोरच्या पटागंणात काही बि-हाड उतरली होती. ऊन मी म्हणत होतं. त्या पटांगणावर नावाला पण झाड नव्हतं. नुसतं वेडपाटं होती.त्याला पानं नव्हती राहिली.लेकर बाळं सारी ऊन्हात तळत होती.
गडी माणसं पालं ठोकत होती. सारे चार पाच पालं असतीलं.त्यात काही लेकरं वाळया ही होत्या.ती लहान लहान पिल्लं नुसती केकत होती. येडया बाभळीच्या झाडावर गोधडी टाकून सावली केली आणि त्या तिथचं बसून लेकरं पाजू लागल्या. बाकी पाच सहा लेकरं नुसती हुंदडत होती. उघडी नागडी पळत होती. त्यातल्याचं काही थोराडं पोरी, बायानं मात्र डर्म, डब्बे, कळश्या बकेटा काढल्या. आता तिथचं संसार थाटणारं होतं. त्यांना पाणी लागणारं होतं. हे कुठून पाणी आणणार ? मलाच प्रश्न पडला.त्या पटांगणात कुठं ही सार्वजनिक नळ नव्हता.हापश्या ही बंद होता. नळाला पाणी यायचं ही पंधरा दिवस बंद झाले होते.टॅकरने पाणी पुरवठा होतं होता.
त्यात वशिल्यावाल्याला... नगरसेवकाच्या जवळच्याला पाणी जास्त दिलं जातं होतं.
टॅकर आलं की महायुध्द सुरू झाल्या सारखा महोल होतो. दोन दिवसापूर्वीच दोन गटात टॅकर मध्ये पाईप टाकण्यावरून तुंबळ हाणामारी झाली होती.त्या हाणामारीला थांबता थांबवता...पोलिसांच्या तोंडाचं पाणी पळालं होतं.कारणं त्या भांडणाला जातीय स्वरूप आलं होतं. जातीय स्वरूप आल्यावर मग काय दुसरं ? दंगलच...
आता यांना पाणी कोणं देणारं ? मलाच प्रश्न पडला. सहा सात बाया पोरी डर्म , कळशा , पात्यालं घेऊन निघाले. त्यांना पाणी हवं होतं.
आता या बापुडया कुठून पाणी आणणार...मलाच प्रश्न पडला.आता इथं जो तो पाण्यांनी परेशान. यांना कोण पाणी देणारं ?
तो सारा ताफा हापश्या जवळ गेला . हापश्याय... तो कधीचं बंद झाला होता. त्याचं दांडकं हालवून बघीतलं. त्यातून कसलं पाणी येतं? सा-याचं हिरमुसल्या. त्या पाण्याची शोध मोहीम सुरू झाली ?

पाणीचं कुठं दिसेना.
आता त्यांनी मोर्चा...काॅलनीतल्या घरांकडे वळवला. अगोदर त्या नुसत्याचं फिरल्या...पाण्याचा त्यांना काही ठाव ठिकाणा दिसतो का हे पाहिलं.ओपन पाणी कुठं दिसतं असत व्हयं ? कुठं आता.त्या जाईत दारं वाजवतं. पाणी मागतं.त्यांना कोण पाणी देतं.जारचं विकतं पाणी घेणारे कुठं फुकट पाणी देतत असतेत का ?
भला मोठा खंडा पाहिला की गपकन दार बंद होईत.काही दारं तर उघडतचं नव्हती. कुणी नुसतं खेकसतं होती.कुत्र्यावर भुंकावं तशी भुंकत.
मला तर प्रचंड दया येत होती पण मी काही करू शकत होतो . दयेचा पाझर काळजात होऊन ही मी काहीच करू शकतं नव्हतो. कधी कधी आपण दयेच्या पाझर करण्या पलीकडं काहीचं करू शकतं नाही. मी हतबल होतो. जेमतेम दोनच बकेट पाणी होतं माझ्याकडं
ते मेटाकुटीस आले.पाणी दिसत नव्हतं...आणी कुणी बोलतं ही नव्हतं.
आता हे काय करणारं ? मला उत्सुकता लागली होती.
देवगावकरचं घर त्यांना दिसलं. तो मात्र दारातल्या झांडांना पाणी घालतं होता. त्याच्या बोअरला पाणी बरं पाणी. त्याच्याकडं मोठा हौद...टॅकर आलं की तो डायरेक्ट भरून घेतो.मोटार टाकून...
त्याचं नाव घेण्याची ही सोय नाही. त्याचा मोठे वशिलेत. नगराध्यक्ष कधी जेवायला त्याच्याकडे असतो.त्यामुळं त्याला
आमची सत्ता...आमचं माणसं... आमचं पाणी... असंचं वागणं असतं त्याचं. गल्लीतल्या माणसाला यांन कधी पाणी दिलं नाही. तो या भिका-यांना कधी पाणी देणं शक्य नव्हतं.
पाणी पहायला भेटल्यामुळे ती झुंबड काही पुढे सरकेना. ते सारे नुसतं पाण्याकडं पहात राहिले. टूकमूक ...
लाचार नजरेनं सा-या पाहू लागल्या. देवगावकर...रागानं त्यांच्याकडे पहात होता. त्या हालत नव्हत्या.उलट एकीने पुढं जाऊन धाडसानं ओठं उचकले.
" दादा दे ना पाणी. "
" पळा.. पाणी बिणी काय नाही."
" दे ना रे...एक एक डराम दे फक्स्त..."
" पळा हे पाणी फुकाटचं नाय....
" दे ना रे दादा पाया पडते .हात जोडते. तहानलेरे..."
" आता पळता का कसं .." तो पार मारायला धावला. ते भिकारीच लयं चिवाट....
मग हळूहळू ते पार कंपाऊडच्या एक एक आत शिरले. आता मात्र देवगावकरचा ताबा सुटला. हातातला पाईप खाली टाकला. त्यांच्या माग पळाला तस सारे धूम...एक प्रौढ बाई पळाली नाय.
अरे दादा हाणते काय ? झाडाला पाणी देते अन् माणसाला नाय. दे ना तहानलीरं लेकरं .."
" पळ .भिकारडे.. पाणी फुकटं नायं"
"मग विकते देते काय ,"
" जाती की नाय .आयघाले ..." देवगावकर डायरेक्ट शिव्याचं दयायला लागला. अंगावरच धावला तशी ती तिरकं तिरकं हालली. देवगावकरनं मोटारचं बंद केली.ते मनालाचं लाजलं. घरात गेला.
ते सारे पालावर आली. पाणी नव्हतं .पालं टोकून गडी दमून गेले असतीलं. तहानले असतील. डरम तर सारे रिकामेचं. एक दोघानी त्या रिकाम्या डरमावर...लाथा घातल्या. थोडा कालवा झाला. सारे गप झाले.
मी थोड आत आलो. पाणी प्यालो. माझी तहान तृप्त झाली पण...
त्यांची तहान....? या जगात असे किती लोक असतील...ते पाणी नाही पिऊ शकतं. रानावनात किती प्राणी ,पक्षी किटक असतील त्यांना जिवंत राहण्यासाठी पाणी नाही.
पाणी... आणि ....काही काही आठवत राहिले. दारात आलो तर...
पहातो तर देवगावकरच्या दारातं गर्दी होती. एक पोरगी पकडली होती.तिला चोर चोर म्हणून मारलं होतं. तिनं देलगावकरच्या नळाचं पाणी चोरलं होतं. हिसकावुन घेतलेला ...हंडा .
...सांडलेलं पाणी...माती पाणी माती पितं होती पण तिला पाणी नव्हतं.
तिच्या डोळ्यात प्रंचड चीड आणि चेह-यावर....भंयकर तहान दिसतं होती. ती तहान नक्कीचं पाण्याची नव्हती....ती माणसाच्या रक्ताचीही असू शकते.
आवश्यक असते याचे भान ठेवा.
******************************
परशुराम सोंडगे,
पाटोदा( बीड )
9673400928
मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८
रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८
पुरस्काराचे खारमुरे
कथा अाणि व्यथा
---------------------
आज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात आमचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.तेआवाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं आपल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात मी गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला."
---------------------
पुरस्काराचे खारमुरे
*************आज सकाळीची गोष्ट.मी घाईत चाललो होतो.तेवढयात आमचा मित्र विकास लांडगेनी मला आवाज दिला.तेआवाज देणं म्हणजे साक्षात बोंबलणंच होतं.लांडगे फार उत्साहात होता.त्याचा उत्साह इतका होता की तो पार धावतच माझ्या जवळ आला.त्याचं आपल्याकडे काय काम असेल किंवा असू शकेल याचा अंदाज काढणयात मी गर्क असतानाच ती स्वारी पार मला येऊन धडकली. हातानेच ऒढू लागला."चल घरी चहाला."
"चहा? कशाला तसदी देतोस वहिनीला."
"त्यात काय तसदी? च्या तर प्यावाच लागेल आज."
"आज काही विशेष?"
"विशेषच आहे.पेपर नाही वाचले का आज? "
"नाय बुवा."
"व्हाॅट्स अप तरी पाहीलं का?"
"नाय बुवा."
"फेसबुक तरी."
"नाय बुवा.टायमच नाय भेटला."
"मग कसं कळेल."
"असं काय झालं की ते मला कळलचं पायजे"
"झालं काहीच नाही.पुरस्कार भेटलाय ."
"आता कसला भेटलाय?"
"समाजभुषण...?"
"कुणाला?"
"मलाच .दुसरं कुणाला? हा साधा नाही.राज्यस्तरीय पुरस्कार."
"राज्यस्तरीय! " मला आश्चर्याचा धक्काच बसला.एवढां महान माणूस अपल्या जवळ असताना आपल्याला त्याचं हे कर्तृत्त्व माहित ही नाही. त्याचा एवढा आनंद बघून मलाच गलबलून आलं.आता एवढी मोठी बातमी तो सांगतोय आणि मी गप कसा राहू शकत होतो.मला त्याचं अभिनंदन करण्याची अतिव इच्छा झाली,"वा. !!काॅंगरेच्युलेशन मित्रा,मला तुझा सार्थ अभिमान आहे." असं एक नेहमीच गुळगुळीत वाक्य मी फेकून दिलं आणि त्याला कडकडून मिठ्ठी मारली.चेह-यावर फारच आनंद झाला असल्याचे भाव आणले. माझा असा जबरदस्त शो चालू असतानाच तो वरमला.इतका इमोशनल वगैरे मी होईल असं त्याला अंदाज नसावा बहुतेक. तो जरा संकोचत म्हणाला,"तसं नाही काही एवढं.भेटलाय आपला."
"असं कसं? मित्रा तू समाजभुषण ..!तू आमच्या शेजारी राहतोस. तुझ्या कार्याची दखल राज्यस्तरावरून घेतली गेली हे कमी नाही.आम्हाला सार्थ अभिमान आहे तुझा."
"चल,घरी. चहा तर घेऊ." कमालीचा आनंद ही माणसाला शब्द सुचू देत नसेल. तो गप होता नि मला तोंड सुटलं होतं.आम्ही दोघ त्यांच्या घरी गेलोत.त्यांची स्तुती करावी म्हणून मला काहीतरी गौरव पर बोलणं क्रमप्राप्तच होतं.उग गप कसं बसावं?
"मित्रा,तू इतकं मोठ काम करतोस आणि कधी सांगितलं नाहीस."
"आता त्यात काय सांगण्यासारखं."
"सांगाया पायजे.तसं कसं माहित होईल."त्यानं पेपर पुढे टाकले.मी ते अधाशापणे वाचत राहिलो.
त्यांच्या समाजाच्या संघटनेचा हा पुरस्कार होता.(ही कथा काल्पनिक नसल्यामुळे समाजाचा उल्लेख व संघटनेचं नाव मुद्दाम टाकलेले नाही.हल्ली सा-याच समाजाच्या भावना अतिशय नाजूक झाल्या असल्यामुळे त्या नुसत्या दु:खूच नाहीतर त्या तुटू पण शकतात. त्यामुळे सर्व समाज भावनाची कदर करून नामोल्लेख टाळलेले आहेत.) बातमी वाचल्यामुळे बरचसं मला कळालं होते.
"ग्रेट यार. ..या गल्लीला तुझा गर्व पाहिजे "
'ग्रेट ... 'वगैर माझे शब्द त्याला झेपत नव्हते.तो गुदमरल्यासारखा करायचा.स्तुती माणसाला अंहकाराचे पंख देते.त्यानं हुरळून जाणं अपेक्षित होत पण तस न होता.त्याला ती स्तुती झेपत नव्हती.अशात आपण कुणाची ही स्तुती करण्यात कसूर करत नाही. बोलाचाच भात बोलाचीच कढी. त्यात कशाला कसूर?
"मी कसला ग्रेट?"
"मग कोण ग्रेट?"
"ते आमचं पाव्हणं.मेव्हणं.हिचा भाव खरा ग्रेट माणूस.तुला म्हणून सांगतो. लय्यीच पाऊर गडयाचा "
"त्यांचा पाऊर....? पुरस्कार तुम्हाला कसा?"
"ते बाॅडीवर आहेत संघटनेच्या.धरली बाजू लावून.तेव्हं निल्या पायतोंडयांचा लय टचून होता. त्याची नाय डाळ शिजली. पाहुण्यांनी लय टाइट फिल्डिंग लावली होती."
"पुरस्कारसाठी ही टाइट फिल्डीग? मला नाय समजलं?" "असं.कस...?लय्य टसली लागत्यात.नुसत्या या पुरस्कारासाठी शंभरच्यावरअर्ज होते. त्यात एकच पुरस्कार दयायचा.स्पर्धा तर राहणारचं"
"काय ?तुमच्या समाजात इतकी माणसं चांगली आहेत ." माझं तिरकस बोलणं त्याच्या लक्षात नाही आलं.
"हे एका पुरस्कराचं झालं.असे दहा पुरस्कार दिले जाणार आहेत.शिक्षणरत्न,साहित्यरत्न,जीवनगौरव...वैगरे"
"मी कसला ग्रेट?"
"मग कोण ग्रेट?"
"ते आमचं पाव्हणं.मेव्हणं.हिचा भाव खरा ग्रेट माणूस.तुला म्हणून सांगतो. लय्यीच पाऊर गडयाचा "
"त्यांचा पाऊर....? पुरस्कार तुम्हाला कसा?"
"ते बाॅडीवर आहेत संघटनेच्या.धरली बाजू लावून.तेव्हं निल्या पायतोंडयांचा लय टचून होता. त्याची नाय डाळ शिजली. पाहुण्यांनी लय टाइट फिल्डिंग लावली होती."
"पुरस्कारसाठी ही टाइट फिल्डीग? मला नाय समजलं?" "असं.कस...?लय्य टसली लागत्यात.नुसत्या या पुरस्कारासाठी शंभरच्यावरअर्ज होते. त्यात एकच पुरस्कार दयायचा.स्पर्धा तर राहणारचं"
"काय ?तुमच्या समाजात इतकी माणसं चांगली आहेत ." माझं तिरकस बोलणं त्याच्या लक्षात नाही आलं.
"हे एका पुरस्कराचं झालं.असे दहा पुरस्कार दिले जाणार आहेत.शिक्षणरत्न,साहित्यरत्न,जीवनगौरव...वैगरे"
"असे प्रत्येक समाजातून असंख्य पुरस्कार दिले जातात. या वरून जगात प्रचंड संख्येने चांगली माणसं राहतात हे सिध्दच होत की.उगच सज्जनाचा तुटवडा असे बोंबलत असतो आपण."
"असं निगेटीव्ह नका घेऊ."
"यात काय निगेटिव्ह ?उलट मी फार पाॅझिटीव्ह बोलतोय."
"पण सरकारी पुरस्कराला मर्यादारेषा असतात.त्यात वशिलेबाजी आली.अधिका-याच्या व पुढा-यांचे चमचे आले.त्यांचे लाॅबिंग आलं. तेच ते पुरस्कर बळकावतात.चांगली माणसं उपेक्षित राहतात."
"असं कसं? सरकारी पुरस्काराचे निकष असतात. त्यांची एक निवड प्रक्रिया असते. एक खास पारदर्शक पध्दत असते."
"असं निगेटीव्ह नका घेऊ."
"यात काय निगेटिव्ह ?उलट मी फार पाॅझिटीव्ह बोलतोय."
"पण सरकारी पुरस्कराला मर्यादारेषा असतात.त्यात वशिलेबाजी आली.अधिका-याच्या व पुढा-यांचे चमचे आले.त्यांचे लाॅबिंग आलं. तेच ते पुरस्कर बळकावतात.चांगली माणसं उपेक्षित राहतात."
"असं कसं? सरकारी पुरस्काराचे निकष असतात. त्यांची एक निवड प्रक्रिया असते. एक खास पारदर्शक पध्दत असते."
"असते ना? सारे मॅनेज होतात.सारे फिक्सींग असते.नुसते शो असतात.तेवढेच नाही राजकारण असते. कमालीचा जातीवाद असतो त्यात. "
"हे फार गंभीर अरोप झाले. "तो फार डेरींगने बोलत होता.
"एका शाळेत सा-यांच शिक्षकाना अादर्श पुरस्कार आहेत.या वर्षी ती शाळा बंद होते आहे."
"का?"
"सारे पोरं इंग्रजी शाळेत. "
"असं कसं ? तसचं हे? पुरस्कार प्राप्त शिक्षक सारे फिरतेत....ना शाळाकडे लक्ष ना पोरांकडं.पालकांना क्वालटी एज्युकेशन पायजे. मग पालक कशाला कुणाचं ऐकतेन?"
"आता लयचं झालं बुवा? "
"जातीवाद असतो.याचे पुरावेतआपल्याकडं .सलग दहा वर्ष झालं एकाच जातीत आदर्श पुरस्कारेत दिले जातेत.कसं शक्य? चांगुलपणा काय जातीवर अवलंबून असतो काय?"
"हे फार गंभीर अरोप झाले. "तो फार डेरींगने बोलत होता.
"एका शाळेत सा-यांच शिक्षकाना अादर्श पुरस्कार आहेत.या वर्षी ती शाळा बंद होते आहे."
"का?"
"सारे पोरं इंग्रजी शाळेत. "
"असं कसं ? तसचं हे? पुरस्कार प्राप्त शिक्षक सारे फिरतेत....ना शाळाकडे लक्ष ना पोरांकडं.पालकांना क्वालटी एज्युकेशन पायजे. मग पालक कशाला कुणाचं ऐकतेन?"
"आता लयचं झालं बुवा? "
"जातीवाद असतो.याचे पुरावेतआपल्याकडं .सलग दहा वर्ष झालं एकाच जातीत आदर्श पुरस्कारेत दिले जातेत.कसं शक्य? चांगुलपणा काय जातीवर अवलंबून असतो काय?"
"असं कसं? हे नाही पटत बुवा."
"पटो न पटो .त्यात राजकारण असत. त्यात पुन्हा जातीवाद आलाच.काही लोकांची दखल घेतलीच जात नाही. त्यांच्यावर अन्याय केला जातो.त्यामुळे आमच्या संघटनेने हे काम सुरू केले आहे." ?
"छान उपक्रम....चांग्ल्या माणसाच्या पाठीवर थाप हवी पण इतर जातीच्या चांगल्या पण उपेक्षित लोकांना पुरस्कार देते का तुमची संघटना."
"नाय?आमची काय सेवा संस्था नाही.ही जाती साठी काम करते. सेवा संस्थाचे असतात धंदे पुरस्कार देण्याचे ."
"आता कसले आले धंदे यात. उलट ते पदर सन्मान करतात लोकांचा."
"विकतात पुरस्कर साले ते. भडवे."लांडग्याची मशिन गरम झाली होती.अनेकदा अर्ज आणि प्रयत्न करून ही त्याला पुरस्कार मिळत नव्हता.या त्याच्या खाजगी प्रश्नावर त्यांन उत्तर शोधले होते.मेव्हुण्याच्या माध्यमातून एक पुरस्कार पटकावला होता.संघटनेचा का असेना ?त्याचं मोठ सिलेब्रेशन करायचा मुड होता.त्याला कटाव म्हणून मी उठत म्हणालो, "बरं ते जाऊ दया.तुम्हाला तर मिळाला आहे ना."
"मिळाला कशाचा? मिळावा लागतो.सहजा सहजी इथं काहीच मिळत नाही.काही गोष्टी कराव्या लागतात. इच्छा नसली तरी ही. !" त्याच्या प्रमाणिकपणाचं मला कौतुकच नाही तर गर्व वाटू लागला.
"पाव्हण्यांनी त्यांच काम केलं.आता आपली जबाबदारी वाढली."
"ती कशी?"
"पटो न पटो .त्यात राजकारण असत. त्यात पुन्हा जातीवाद आलाच.काही लोकांची दखल घेतलीच जात नाही. त्यांच्यावर अन्याय केला जातो.त्यामुळे आमच्या संघटनेने हे काम सुरू केले आहे." ?
"छान उपक्रम....चांग्ल्या माणसाच्या पाठीवर थाप हवी पण इतर जातीच्या चांगल्या पण उपेक्षित लोकांना पुरस्कार देते का तुमची संघटना."
"नाय?आमची काय सेवा संस्था नाही.ही जाती साठी काम करते. सेवा संस्थाचे असतात धंदे पुरस्कार देण्याचे ."
"आता कसले आले धंदे यात. उलट ते पदर सन्मान करतात लोकांचा."
"विकतात पुरस्कर साले ते. भडवे."लांडग्याची मशिन गरम झाली होती.अनेकदा अर्ज आणि प्रयत्न करून ही त्याला पुरस्कार मिळत नव्हता.या त्याच्या खाजगी प्रश्नावर त्यांन उत्तर शोधले होते.मेव्हुण्याच्या माध्यमातून एक पुरस्कार पटकावला होता.संघटनेचा का असेना ?त्याचं मोठ सिलेब्रेशन करायचा मुड होता.त्याला कटाव म्हणून मी उठत म्हणालो, "बरं ते जाऊ दया.तुम्हाला तर मिळाला आहे ना."
"मिळाला कशाचा? मिळावा लागतो.सहजा सहजी इथं काहीच मिळत नाही.काही गोष्टी कराव्या लागतात. इच्छा नसली तरी ही. !" त्याच्या प्रमाणिकपणाचं मला कौतुकच नाही तर गर्व वाटू लागला.
"पाव्हण्यांनी त्यांच काम केलं.आता आपली जबाबदारी वाढली."
"ती कशी?"
"पुरस्कार मिळालाय पण कार्यक्रमाला माणसं भी पायजेत ना? पाव्हण्याचा भी वठ वाढयला पायजे संघटनेत."
"मग?"
"तेच चार पाच. जिपा न्यावा लागत्याल.थोडीपार गर्दी झाली पायजे ना?" तेवढयात आमच्या वहिनीची एंट्री झाली.फक्कडं चहा आणला होता.ती एका पुरस्कार विजेत्या ची पत्नी होती.त्यांच्या पण चेह-यावर आनंद मावत नव्हता.
"चार पाच काय म्हणता? जेवढे निघतील तेवढे निघू दया.नुसतं अभिनंदन नका करु, भाऊजी. त्यांच्या नाकावर टिच्चून पुरस्कार दिलाय.मित्राला. हा गौरव सोहळा पाहयाला यावच लागेल." इति.वहिनी.
"नुसतं तूच नाही सारे गल्लॊतले मित्र पण काढावे लागतील ती जबाबदारी तुझी."
त्यांनी दिलेला चहा अक्षरश: मला कडू लागू लागला होता. आता वहिनीसमोर त्याला काही बोलता येईना.बायकोसमोर कुणीकुणाचा अपमान करू नये असा सुविचार आहे .माझी उडालेली भांबेरी त्यांनी हेरली," तस टेन्शन घेऊ नका.ओल सूक...सारचं देऊ."
"देऊ नाही हाॅटेलच बूक करू.लेडीजसाठी एक. नि जंटसाठी सेपरेट. होऊ दया खर्च ." वहिनींनी मन मोठ केलं. बसल्या जाग्यावर माझ्याकडून त्यांनी शब्दच घेतला. कार्यक्रमाला माणसं काढण्याची हमी घॆतल्या नंतर माझी सुटका करणयात आली. मी त्या पुरस्कार देणा-याच संघटनेचे अभार मानले.एक साधा पुरस्कार इंन्सान को कितना बदल देता है। आता निल्या काळतोंडे काही लांबचा नाही.तो आमचा मित्रचं.आमच्याच गल्लीत राहतो.त्याच्या नाकावर टिच्चून संघटनेने असे पुरस्कार का दयावेत?चिमूटभर संघटना नाही ती नि राज्यस्तरीय पुरस्कार देते.आपल्याच जातीच्या माणसाचा सत्कार करावा यासाठी संस्था काम करतात.चागले काम,उत्कृष्ट कामापेक्षा त्या माणसाची जात महत्वाची तेच पाहयचे.आपल्या जातीची माणसं शोधायची.त्यांना डोक्यावर घ्यायचं. दुस-याच्या नाकावर टिच्चून ते पुरस्कार दयाचे. समानतेच्या गप्पा मारत जातीवाद पोसायचा.असा हा कार्यकम. हे तर काहिच नाही ज्या संस्थचे अाॅफिस आमच्या मागच्या गल्लीत आहे. ती संस्था आंतरराष्ट्रीय पुरस्कार देते.तिची ख्याती गल्लीच्या पलीकड अदयाप पोहचली नाही.असे पुरस्कार !उदंड झाले आहेत. कुणी कुणाला ही पुरस्कर्ते देते आहे.महापुरूषांच्या नावाने पुरस्कार दिले जात आहेत.ते योग्य व्यक्तीला दिले जावेत. त्याचे धंदे होऊ नयेत. पुरस्काराचे बाजार बंद कसे होणार? रस्त्यावर जाताना विकत घेतले खारमुरे दयावेत अगदी सहज तसे हे पुरस्कार देऊन कसे जमेल?
"मग?"
"तेच चार पाच. जिपा न्यावा लागत्याल.थोडीपार गर्दी झाली पायजे ना?" तेवढयात आमच्या वहिनीची एंट्री झाली.फक्कडं चहा आणला होता.ती एका पुरस्कार विजेत्या ची पत्नी होती.त्यांच्या पण चेह-यावर आनंद मावत नव्हता.
"चार पाच काय म्हणता? जेवढे निघतील तेवढे निघू दया.नुसतं अभिनंदन नका करु, भाऊजी. त्यांच्या नाकावर टिच्चून पुरस्कार दिलाय.मित्राला. हा गौरव सोहळा पाहयाला यावच लागेल." इति.वहिनी.
"नुसतं तूच नाही सारे गल्लॊतले मित्र पण काढावे लागतील ती जबाबदारी तुझी."
त्यांनी दिलेला चहा अक्षरश: मला कडू लागू लागला होता. आता वहिनीसमोर त्याला काही बोलता येईना.बायकोसमोर कुणीकुणाचा अपमान करू नये असा सुविचार आहे .माझी उडालेली भांबेरी त्यांनी हेरली," तस टेन्शन घेऊ नका.ओल सूक...सारचं देऊ."
"देऊ नाही हाॅटेलच बूक करू.लेडीजसाठी एक. नि जंटसाठी सेपरेट. होऊ दया खर्च ." वहिनींनी मन मोठ केलं. बसल्या जाग्यावर माझ्याकडून त्यांनी शब्दच घेतला. कार्यक्रमाला माणसं काढण्याची हमी घॆतल्या नंतर माझी सुटका करणयात आली. मी त्या पुरस्कार देणा-याच संघटनेचे अभार मानले.एक साधा पुरस्कार इंन्सान को कितना बदल देता है। आता निल्या काळतोंडे काही लांबचा नाही.तो आमचा मित्रचं.आमच्याच गल्लीत राहतो.त्याच्या नाकावर टिच्चून संघटनेने असे पुरस्कार का दयावेत?चिमूटभर संघटना नाही ती नि राज्यस्तरीय पुरस्कार देते.आपल्याच जातीच्या माणसाचा सत्कार करावा यासाठी संस्था काम करतात.चागले काम,उत्कृष्ट कामापेक्षा त्या माणसाची जात महत्वाची तेच पाहयचे.आपल्या जातीची माणसं शोधायची.त्यांना डोक्यावर घ्यायचं. दुस-याच्या नाकावर टिच्चून ते पुरस्कार दयाचे. समानतेच्या गप्पा मारत जातीवाद पोसायचा.असा हा कार्यकम. हे तर काहिच नाही ज्या संस्थचे अाॅफिस आमच्या मागच्या गल्लीत आहे. ती संस्था आंतरराष्ट्रीय पुरस्कार देते.तिची ख्याती गल्लीच्या पलीकड अदयाप पोहचली नाही.असे पुरस्कार !उदंड झाले आहेत. कुणी कुणाला ही पुरस्कर्ते देते आहे.महापुरूषांच्या नावाने पुरस्कार दिले जात आहेत.ते योग्य व्यक्तीला दिले जावेत. त्याचे धंदे होऊ नयेत. पुरस्काराचे बाजार बंद कसे होणार? रस्त्यावर जाताना विकत घेतले खारमुरे दयावेत अगदी सहज तसे हे पुरस्कार देऊन कसे जमेल?
या विषयावर माझी एक कविता..
ग्रेटभेट.
मी पुरस्कारांस एकदा विचारले,
"तू,आदर्शालाच का लेट भेटतो ?"
ते थोड वरमलं.
किंचीत हासलं सुध्दा
नि म्हणालं, "यात काय राजकारण
बिजकारण नसतं पण हल्ली
आदर्शच कुठं उरलीत?
जे आहेत ते पार सांदीत पडलेत...
शोधता शोधत नाहीत
होतो उशीर ....
अंधाराच्या गर्तेतून शेंदूनच काढावे लागतात.
एक एक....
एकदमच नाही असं नाही
होतो कधी माझा भी निलाव
कधी गटातटात..
कधी जात धर्माच्या
चिकट लगदाळीत अडकवतात मला.
बांधतात कधी नालायकांच्या भी गळयात
पण
सोनं ते सोन असतं,भाऊ
नि म्हणालं, "यात काय राजकारण
बिजकारण नसतं पण हल्ली
आदर्शच कुठं उरलीत?
जे आहेत ते पार सांदीत पडलेत...
शोधता शोधत नाहीत
होतो उशीर ....
अंधाराच्या गर्तेतून शेंदूनच काढावे लागतात.
एक एक....
एकदमच नाही असं नाही
होतो कधी माझा भी निलाव
कधी गटातटात..
कधी जात धर्माच्या
चिकट लगदाळीत अडकवतात मला.
बांधतात कधी नालायकांच्या भी गळयात
पण
सोनं ते सोन असतं,भाऊ
ते चकाकतचं.
नि होते ग्रेट भेट ....
जी माझं अस्तिवचं शिल्लक ठेवते
या भंयकर लोकशाही राज्यात ..."
. . . . परशुराम सोंडगे,पाटोदा ९५२७४६०३५८
sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com
जी माझं अस्तिवचं शिल्लक ठेवते
या भंयकर लोकशाही राज्यात ..."
. . . . परशुराम सोंडगे,पाटोदा ९५२७४६०३५८
sahitygandha(साहित्यगंधा).blogspot.com
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
संशयाचा व्हायरस
संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या न...

-
युध्दं पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता. 'युध्द पेटले आहे 'हा बाळासाहेब नागरगोजे यांचा पहिला...
-
धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक परीक्षण : सोंडगे परशुराम , बीड 9527460358 धर्मयोगिनी अहि...
-
पाराकं आरगन वाजल . बॅन्डवाल आलं . ते आलं की सलामी देत्यात . आरगनाचा मोठा आवाज सा - या गावात घूमू लागला . तशी बारकाली पोरं ... पोरी चींगा...