शनिवार, २१ जानेवारी, २०२३

सत्याचा शोध प्रवास


 || आपलाचं संवाद आपुल्याशी||


हे जग आहे त्याचं एक कारण आहे. कारणाशिवाय काहीचं असू शकत नाही असं गृहीत धरून तेच कारणं युगेनोयुगे माणसं शोधत आहेत.कधी धर्माचं साधन तर कधी विज्ञानाचं माध्यम घेऊन माणसं धडपडत आहेत.

माणूस हाच सर्वात बुध्दीमान प्राणी आहे हे माणसांनं स्वतःजाहिर केलेले आहे. दॅटस् इट्स.

धर्म असेल किंवा विज्ञान असेल दोन्हीच्या माध्यमातून माणसांनी हाच प्रयत्न केलेला आहे.प्रयत्न अजून ही चालूं आहेत.अंतिम सत्य अजून तरी कुणाच्या हाती लागलं नाही.तसा कुणाचा दावा ही नाही.आजच ज्ञान उद्या अज्ञानात रुपांतरित होत जाते. आपण जे खरं समजतं असतो.तेचं काही दिवसांत मिथ्य ठरवले जाते.सत्याचा हा शोध प्रवास अखंडित पणे सुरूच राहणार आहे. 

मलाच  फक्त समजतं,मीच तेवढा शहाणा आहे अशी अतिशहाणी माणसं तुम्हाला पावलोपावली भेटतं असतील.त्यांना पाहून तुम्हाला काय वाटतं? हे महत्वाचं आहे.

              तुम्ही त्यांच्या पेक्षा जास्त हुशार किंवा शहाणे असण्याचा साक्षात्कार होतो की त्यांची दया येते? का तुम्हीचं स्वतः जगात. सर्वात हुशार असण्याची दाटं शक्यता वाटते? खरं  काय ते तपासुन बघा स्वतः:ला. आत्मप्रौढी असणारा माणूस सर्वात जास्त अज्ञानी असण्याची जास्त शक्यता असते.माणसाला आत्मभान असणं महत्वाचं आहे

     स्वत:चे जयजयकार करणारे व टोळी ट़ोळीने खुशमस्करी करणारे असंख्य माणसं पाहून तुम्हीही  स्वतःच्या मोहात पडण्याची शक्यता असते किंवा त्यांना शहाणं करण्याचा तुमचा प्रयत्न  तरी असू शकेल पण

असं  तुम्ही काहीचं करू नका. यावर उपाय एकचं आहे.चंद्रशेखर गोखले यांच्या शब्दांत सांगतो.

इथं प्रत्येकालाचं वाटते

आपण किती शहाणे?

यावर उपाय एकचं

गप बसून पहाणे.

गप बसणे  हा सर्वात सोपा उपाय आहे. पटतं ना ?

आज अतिशहाणा समोर गप राहण्याचा प्रयत्न करू.

                       परशुराम सोंडगे

           ||Youtuber|| Blogger||

शुक्रवार, २० जानेवारी, २०२३

शूभेच्छांची मांदीयाळी

 ||आपुलचं संवाद आपुल्याशी||

आज मक्ररसंक्रांतीचा दिवस.सण आनंदचा,सण समृध्दीचा, सण सौभाग्याचा.सण सुवासिनीचा...!!!

कालपरवा पासूनचं मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा मोबाईल वर येऊन धडकत असतील.शुभेच्छांचा नुसता वर्षाव सुरूच असेल.हल्ली प्रत्येक सणाला माणसं कमालीचं शुभेच्छूक होताहेत.सोशल मिडीयावर धो धो शुभ संदेश कोसळतं आहेत.जे सहज देता येतं ते माणूस देतं.शुभेच्छा....!!

सण म्हटलं की संसाराच्या दगदगीत आलेली थंडगार झुळूकच असते माणसाला.माणसं स्वतः ला कुठं कुठं बांधून घेतात.सण म्हटलं की तेवढच निमित्त...व्यक्त होण्याला.दुसरं काय?असो.

मकरसंक्रांत हा तसा देण्या-घेण्याचा सण.वाण लुटण्याचा सण.वाण लुटू देण्याचा सण.आपल्या शेतात पिकलेले दुस-याला देणे. वाणोळा देणे.वाणोळा घेणे.बोरचं ती पण प्रत्येकाच्या बांधावरल्या बोरीची चव वेगळीच की.वाणोळा म्हणून दोन चार चाखायची.

लहानपणी या सणाचं केवढ अप्रूप असे.काय खावं आणि काय नाही खावं हा प्रश्न असे आम्हा पुढे. सारी रानं पिकानं बहरलेली बावरलेली असतं.काही पिकं रसानं चिकांनं ओथंबलेली असतात.थंडी वाढत चाललेली...सूर्याचं उन्हं ही गारठा घेऊन येणारं...दिवस शिळू झालेले....दिवसांन आपलं थोडं आयुष्य रात्रीला दिलेले. त्यामुळे रात्र  ही थोराड होत गेलेली.

त्या दिवसांत हा मकरसंक्रांतीचा सण हळूच येतो. बोरं,पेरू,ऊस,हुरडा,गाठं,वाल,

गाजर अश्या अस्सल रानमेवांनी घराची पराळं भरून गेलेली असतं.कुणी यावं जे आपल्या नाही ते न्यावं.समृध्दी अशी दारादारातून खळाळून वाहत असे.सुवासिनी नटून थटून वाणं लुटत असतं.घराच्या मालकीण बाईच़ ना त्या  ? काय तो रूबाब ?काय तो तोरा ?सुगडची सुगड भरून वाण दिला जायचा. घेतला जायचा.

घरातलं सारं सौंदर्य, ऐश्वर्य, औदार्य आणि सौभाग्य

घेऊन त्या गावभर फिरत राहयच्या.हळदी कुंकवांने माखलेले सौभाग्यवतीचे कपाळ,भांगं म्हणजे कोण भाग्य असे.आताच्या सारखी घडीघडीला फोटो काढून ठेवायची  सोय नव्हती पण अंतःकरणात आपलं खानदानी सौंदर्य कोरून ठेवलं जायचं.लेकी सूनांना डोळं भरून पाहिलं की मन ही भरून यायचं.आपल्या सुरकुत्या चेह-यावरून समाधानचा पाझर ओसंडून वाहायचा.

तिळाचे गुळाचे लाडू  घरोघर वाटले जायचे.गोड गोड बोलण्याचा आग्रह धरला जाई.नाती,लोभ,मैत्री अधिक स्निग्ध केली जाईत.स्नेहाद्रता वाढली जाई.वाणाच्या वस्तू बरोबरचं माणसांच्या मनामधील प्रेमाचं,आपुलकीचं वाणं ही भरभरून लुटलं जाई.प्रेम आपुलकी  लुटण्याची संधी हा सण देई.

अनेक जणांची जुनी भांडणं थोरं मोठी लोक तीळाचे लाडू भरून मिटवत असतं. सलोख्याचं चांदण असं मुद्दाम होऊन पसरलं जाई.

आता सारंच हरवतं गेलं.

आता वाणांची दुकानं थाटतात.वाणं  ही विकले जातात. वाणोळा कुणीचं कुणाला देत नाही.

खरेदी विक्रीला आपणं वाणं लुटणं म्हणू शकत नाहीत.आपण वाण विकत  आणतो.मालकीणीचा  जो वाण देताना तोरा असतो तो वाण विकत  घेताना कसा असेल? आवं पांघरूणच सण साजरा करावा लागतो.

तेव्हा गोड बोलण्याचा आग्रह असे.लोक कठोर बोलतं.खरं खरं बोलत.ते कडू लागे.काही दुरावलेली मनं जवळ आणण्यासाठी तिळगुळ असे.

आमचा तीळगूळ सांडू नका

आमच्या संगे भांडू नका.

आता माणसं सरार्स गोड बोलतात. हे बरंयं.गोड बोलण्यानं मधुमेह होत नाही.नाहीतर मधूमेहाच प्रमाण वाढलं असतं. किती गोड बोलतात माणसं? भांडत नाहीत पण गेमचं करतात.अबोला धरतात.छोटया छोट्या भांडणातून माणसंचं मन मोकळं होई.रागाचा निचरा होई.राग मनात कोंडून ठेवला की त्यांचं कपटं  होतं.सूडाची भावना   वाढू लागते. सुटाने पेटलेली मनं तीळगूळ घ्या गोडव्यांनं निव्वळत नाहीत.सोशल मिडियावरच्या शुभेच्छा संदेशनं हे कितपत घडतं असेल? जुनी भांडणं विसरून एखाद्याला बोला.फक्त बोलणं आवश्यक आहे.संवाद सुरू राहतो. दुरावलेले संवाद सुरू करू जमलं तर आज.

मकरसंक्रांतीसाठी मेकअप करून मिळेल असे बोर्ड ही हल्ली असतात.मक्ररसंक्रांतीला स्पेशल शुटं ही केलं जातं.

 आता जी साधन उपलब्ध आहेत त्याचा वापर होणारं.त्यांचा वापर करून सण उत्सव साजरे होणार. आंनदाचे कण कण गोळा केले जाणारं.ती खरी  माणसाची गरज आहे.सण साजरा करा पण उत्साहाने.त्या उत्साहातचं आनंदाचं चिमूटभर चांदण घरभर पसरेल.दुसरं काय ?

मकरसंक्रांतीच्या खुप शुभेच्छा...!!

         परशुराम सोंडगे

      ||Youtuber||Blogger||

खरं कधी कधी बोलूया

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी ||


कधी कधी खरं बोलूया.

*************************

 शालेय जीवनात अनेक सुविचार आपल्या कडून गोठून घेतले जातात.घरात ही माणसं मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणून सदैव उठता बसता संस्काराच्या उपदेशाचे डोस पाजत असतात.

त्यात 'माणसांनं खोटं बोलू नाही.' हा सुविचार प्रामुख्याने सांगितला जातो.

मुलांचं मन निर्मळ असतं.ते निरागसं असतं. कोवळ मन नाजूक असतं.थोडक्यात काय तर मुलांची. मन संस्कारक्षम असतात.काही संस्काराचे बीज आपण त्यात  पेरले तर उगवू शकतात.खरं बोलणं हा सुविचार माणसाच्या मनात का रूजतं नाही. मूलं जसं मोठं मोठं होतं जातं तसं तसं ते अधिक लबाड बोलत राहतं.खोटन बोलण्याची एक कला आहे .ती हळूहळू आत्मसात करत राहतं.

     खोटं  बोलणं हे एक चातुर्य समजलं जातं.जी माणसं सराईतपणे खोटं बोलतात त्यांना हे जग व्यवहार चातुर्य समजत. खरं बोलणारांना अर्थात च मूर्ख समजलं जातं.आपण मूर्ख आहोत हे मान्य करणारा सज्जन माणूस अजून या पृथ्वीतलावर अवतारायचा आहे.त्यामुळे या जगात जिकडे तिकडे सदैव सातत्याने कारण असताना काहीच किरण नसताना ही माणसं खोटं बोलत राहतात.

      कधी कधी तुम्ही काही मिनिटे ही खरं बोलून बघा.कसला गजब होतो. काही मिनिटे ही तुम्ही खरं खरं बोलू शकत नाहीत.अनुभव घ्या.हे जग फक्त माणसं खोटं बोलू शकतात या एकाच गोष्टींवर चालते आहे याचा दिव्य अनुभव तुम्हाला येईल.

आश्चर्य याचं वाटतं की माणसं सदैव खोटं बोलत राहतात पण खरं बोलण्याचा आग्रह  कायम धरत असतात.इतकं पण खोटं बोलू नाही अशी माफक सज्जनतेची आलं पांघरणारी  अपेक्षा ही हल्ली करतात.

मापात,पचलं असं खोटं बोलावं  अशी इच्छा करतात.पचवू शकालं इतकं खोटं बोलणं अपेक्षित असते.

बाबांना खोटं बोलला म्हणून मुलांचं कौतुक करणारी आई याचं जगात आहे.वरिष्ठांना खोटं बोलून आॅफीस मधल्या गोष्टी लपवून ठेऊ शकला म्हणून पार्टी देणारी घेणारी माणसं ही असतात की.छान आणि पचलं इतकं खोटं बोललं म्हणून कोतुक करणारी गुरुजी तुमच्या आयुष्यात आलेच असतील. बाॅयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असत्याचे निस्सीम भक्त असतात.

सत्याच्या बेगडात  खोटं गुंडाळून ते आपल्याला बाजारात विकायचं असतं म्हणून हे जग खोटं बोलते आहे. बोलत राहणारं आहे.

बरं,खोटं बोलण्याचं काही परिमाण नाही. त्यामुळे माणसं किती खोटं बोलतात हे मोजता येत नाही.माणसं किती ही  स्पेशलं खोटं बोलू शकतात! 

 माणसं खोटं का बोलतात ? प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कधी कधी माणसं काहीचं कारणं नसताना ही खोटं बोलतात.उगीचं खरं काय बोलावं म्हणून माणसं खोटं बोलतात.फोनच्या संवादामध्ये  सर्वाधिक खोटं बोल जातं.खरं बोललं तरी काही हरकत नसते  तरी माणसं स्पेशल खोटं बोलतात. सामुहिकपणे एका सुरात खोटं बोल जातं.पक्षाचा नेता खोटा बोलला की सारा पक्ष तेचं बोलत राहतो.मिडीयापणे एका सुरात खोटं बोलत राहतात.

 राजकरणात माणसांनं खरं बोलू नाही असा एक राजकरणचा मंत्रच आहे.खरं बोलणा-या माणसांनी राजकरणात पडू नाही असा ही एक सल्ला  दिला जातो.

या जगात एकदम खरं बोलणारा माणूस असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जगातील सर्व  लोक राजकारण प्रिय आहेत.राजकारणी आहेत.घराघरात काय कमी राजकारण असते?

राजकारणात फेकू आणि  नौटंकी करणा-या माणसांचा सक्सेस रेशव  जरा जास्त आहे. सहसा लबाड आणि नटवं बोलणारी माणसं राजकरणात यशस्वी होतात.

    ही माणसं लबाडं बोलतात हे माहीत असून ही  लोकं त्यांना डोक्यावर घेतात.आपला नेता मानतात.

  'माझे सत्याचे प्रयोग' हे म.गांधीचं पुस्तक तुम्ही वाचलं असेलच? खरं बोलणारी आणि वागणारी माणसं या जगानं चक्क खोटी करून टाकली आहेत.

खोटं बोलण्याची सवय लागली आहे माणसांना. 

माणसं किती ही खोटं बोलत असली तरी विजय सत्याचा होतो.सत्य अजिंक्य असतं. आपल्या देशाचं ब्रीदचं सत्यमेव जयते आहे.ते उपनिषदांतून घेतलेले आहे.सत्याचा आग्रह हा फार प्राचीन आहे.युधिष्ठराला ही खोटं बोलायला लावणारा सर्वज्ञ भगवान परमात्मा आपलाचं देव आहे.आपण त्याचेच अंश आहोत.

देशाचं ब्रीद आहे सत्यमेव जयते म्हणून या देशासाठी थोडं थोडं खरं बोलण्याचा सराव सुरू आज सकाळ पासून. 

जपून हं. सत्य कडू असतं.खरं बोलणं की सख्ख्या आईला पण राग येतो.

 सुप्रभात....!!!

              परशुराम सोंडगे

             ||Youtuber||Blogger||

जगजेत्ते जंतू

 ||आपुलचं संवाद आपल्याशी|

हे जग सा-यांच आहे.प्रत्येक प्राण्यांच,कीटकांच,वनस्पतींचं. ज्यांनी ज्यांनी  या पृथ्वीवर जन्म घेतला आहे त्या सर्वांचं हे जग आहे.

फक्त माणसांचं एकट्याचं हे जग नाही.माणूस मात्र हे जग आपलं एकटयांचं आहे असं  समजतो.

कुणी काय समजावं  हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे.

बेडूक सुध्दा त्याच्या जागाचा राजा असतो.भलं आपणं त्याला डबकं समजतं असलो तरी. त्या डबक्याला आपण जग समजतं नाही पण बेडकांची ते जग असतं.

 जंगलाचा राजा सिंह असतो.अर्थात टोळयांनी तर त्यांना पण राहवचं  लागतं.एखादया समुद्रातल्या राजा शार्क मासा असतो.प्रत्येक मोठा मासा लहान माश्याला खात असतो. मासेचं माश्याला खातात असं नाही.बोके ही आपलीं पिल्लं खातो.माणसं ही माणसांचं  शोषण करतात. माणसं माणसाला खातात.(मी बातम्या वाचल्या आहेत. काही हाॅटेल मधून माणसाचं मानस खायला दिले जात होते.) असो.

मोठी माणसं लहान माणसाला गुलाम करतात. शोषण करतात.आपलं वर्चस्व या जगावर ठेवण्याचा प्रत्येक जीव प्रयत्न करत असतो. 

कोणे एके काळी डायनासोरची सत्ता या जगावर होती म्हणे.

    आता दोन वर्षा पूर्वी करोना व्हायरस एका विषाणूने हे जग काबूत केलं होतं.माणूस त्या लढाईत सध्या तरी  अंशतःजिंकला आहे.पूर्णता नाही.जेव्हा दुसरा जीव आपल्या वर आक्रमण करतो तेव्हा  तो जीव एकी करतो.सापावर तुटून पडलेल्या  मुंग्या तुम्ही पाहिल्याच असतील.माणूस ही या लढाईत काही प्रमाणात एक झाला होता.

करोना कालाचं अजून ही घाणरेडं राजकारण माणसं करतचं आहेत.

माणुस हा सदैव अजिंक्यच राहिल असं नाही.त्याचा ही पराभव होऊ शकतो.हे जग कुठला ही जीव जंतू जिंकू शकतो. काबिज करू शकतो.

  परीवर्तन अटळ असतं. परिवर्तन या जगाचा नियम आहे. सत्तांतर होत असते. ग्रमापंचायती ताब्यातून जातात हे तर जग.

मानवतेपेक्षा ही भूतदयेला संतांनी फार महत्व दिलेले आहे. जगाला कुटूंब मानण्याचा आग्रह संतांनी धरलेला आहे.

माणसावर तर प्रेम कराचं पण प्रत्येक जीवावर प्रेम करा.ह्रदय प्रेमाने पाझरू दया. प्रेमाने जग चिंब होऊ द्या.

जग फक्त प्रेमानीच  जिंकता येत नाही, का?

           परशूराम सोंडगे

       Youtuber||Blogger||

संख्या रेषा आणि आयुष्यरेषा

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

विद्यार्थ्यांना शिकवायचं म्हणून मी एक संख्या रेषा फळयावर काढली.शून्यातून दोन्हीही बाजूंनी वाढतं जाणा-या धन आणि ऋण संख्या.

रेषा अनंत असते.प्रतल ही अनंत असते.आरंभ ही अंनत आणि शेवट ही अनंत असलेली रेषा.

भूमितीय संज्ञा समजून घेताना मला नेहमी सारखंचं तत्वज्ञानाच्या काही संकल्पना मनात खुणावू लागल्या.खरचं शेवटचं नाही असं काही असू शकत? फक्त अनंत..???

अंनत विश्वाची, ब्रम्हांडाची किंवा अंनत कालाची कल्पना आपण नाही करू शकत.ती आपल्या बुद्धीची मर्यादा आहे.असो.

      आपलं आयुष्य पण एक रेषाच आहे.काळाच्या अवकाशात वाढत जाणारी रेषा.संख्यारेषेसारखी.भूतकाळ  व भविष्य काल अनंत असलेली. वेदांत तत्वज्ञानाच्या कल्पसिध्दांता प्रमाणे आपण कालचक्राच्या अंनत प्रवासात आहोत.वाढत वाढतं  जाऊन पून्हा शून्य होणारं.शून्यातून पुन्हा हे विश्व व्यापतं जाणार.

मृत्यू  हा कोणत्याचआयुष्याचा शेवट नाही असू शकत.तो एक टप्पा असेल.आयुष्यचा रेषा खंड असतं नाही. मृत्यू हा जीवाचा शैवट नाही तर एका देहातून दुस-या देहात स्थलांतरणंअसते. वैदिक तत्वज्ञानानुसार.विज्ञान तर जन्म मृत्यूचं अजून ही योग्य स्पष्टीकरण ही देऊ शकलेलं नाही.जन्मानंतरच व जन्मापूर्वचं आयुष्य विज्ञान मान्य करत नाही.तसच़ ते नाकारू ही शकलेलं नाही.

         आपलं जन्ममृत्यूच्या फे-यात भ्रमण अनिवार्य असलं तर आपण मृत्यूला का घाबरतो? जीवाच्या बाबतीत मृत्यूपेक्षा भयंकर भीतीप्रद असं दुसरं काय आहे? माणसांनं निर्भय असलं पाहिजे. निर्भयता ही मनाची एक अवस्था आहे.छातीवर गोळया झेलणारे वीर सैनिक,हसत हसत फासावर जाणारे स्वतंत्र वीर.मृत्युला हसत हसत कवटाळून अनंताच्या प्रवासाला जाणारे अनेक माणसं तुम्ही पाहिले असतील.भिती ही कल्पना आहे.कल्पनेचं माणसं खचून जातात. निर्भयता ही जीवनाची आवश्यकता आहे.

 बघा,मन निर्भय बनवा.आयुष्य अधिक सुंदर होईल.

       सुप्रभात

                     परशुराम सोंडगे

               || Youtuber||Blogger||

चेहरा वाचन

 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी||


किताबे बहूत पिढी है तुने |

मेरा चेहरा मी जरा पढो||

बता दे मेरे चेहरे पे क्या क्या लिखा है||



 हे बाजीगर चित्रपटातील गाणं फार लोक प्रिय झालं होतं.मला तर ते खूपचं आवडलं होतं.चेहरा पण वाचला जाऊ शकतो हे मला तेव्हा कळलं होतं.पुस्तकं वाचायचं  सोडून मी चेहरे वाचत सुटलो होतो. अर्थात चेहरे वाचत बसणं सोपी गोष्टं नसते.फार रिस्की कामं असतं. ते काही दिवस मी करण्याचा प्रयत्न केला होता.चेहरे वाचण्याची काही लिपी वगैरे असते का?  लिपी वगैरे काही माहित नाही पण कला मात्र जरूर आहे. त्या माणसाला न कळता आपण त्याचा चेहरा वाचू शकतो.प्रत्येक जणचं ते वाचत असतो. पोलिस खात्यातील लोक चेहरे वाचण्यात तरबेज झालेली असतात. 

ओळखीच्या आणि अनोळखी माणसांचे पण आपण चेहरे वाचत असतो. समोर आला की आपण त्याला स्कॅन करत असतो.मनाच्या मेमरीत ते एकदा. डाऊन लोड केले की पुन्हा पुन्हा त्याला वाचत बसतो.आपल्याला भेटलेली सारीच माणसं लक्षात राहत नाहीत.सारीच माणसं कुठल्याश्या नाजूक नात्यांच्या धाग्यात गुंफली जात नाहीत.ह्रदयातल्या आपुलकीच्या ओलाव्यांन  ओथंबून येतं नाहीत. बोलल्याशिवाय माणसाचं मन कळत नाही आणि दिसणा-या सा-यांच माणसाला आपण बोलू ही शकत नाहीत. सारीच माणसं आपल्याला कशाला बोलत बसतील?आपण नुसतं पाहून ही माणसं समजून घेत असतो. तसाच प्रयत्न असतो आपला.माणसाचे चेहरे  पण बोलके असतात.

              तुम्ही कुण्या नटाच्या किंवा नटीच्या प्रेमात पडलाय का कधी?एखादा खेळाडू,एखादी माॅडेल तुम्हाला जाम आवडली असणार.त्यांना आपण कधी भेटलेलो नसतो.भेटणारं ही नसतो. तरी ते आपल्याला का आवडतात?एखाद्या गर्दीत एखादा चेहरा मनात रूतून बसतो.संपूर्ण अनोळखी गर्दीत सुध्दा आपल्याला काही माणसं प्रेमळ, काही खडूस,काही लबाड,काही क्रूर,काही समजस़ वगैरे वाटत राहतात.अर्थात आपण त्यांना भेटलेलो नसतो.आपला चेहरा वाचला जातोय हे लक्षात आलंयं म्हणून ही काही सावरलेली, बावरलेली माणसं आपण पाहतो.

आपण जरं वाचलं जाणारं असू तर आपण सावध राहायला हवं ,नाही का? चेहरा प्रसन्न, सोज्वळ ठेवावा लागेल.अंतरंगच चेह-यावर उमटतं जातं.ते लपवता येत नाही.अ़तरंग चांगल कसं करायचं?चांगली पुस्तके आणि चांगली माणसं वाचायची. मग सोप्पं की. काय?

 सुप्रभात

           परशुराम सोंडगे

        || Youtuber|Blogger||

रोजची सकाळ

 ||आपलाच संवाद आपल्याशी

  दिवस रोज उगवतो. उगवलेला सूर्य रोज मावळतो.अंधाराचं जाळं फेडत फेडत सूर्य येतो. त्याची चाहूल पुर्वी आपल्या ओठांवर लाली पसरतं देते.पहाटं रंग उमटले की चैतन्य सृष्टीच्या कणाकणांत पसरतं जातं.प्रसन्नताच सकाळ घेऊन येते.अंगास झोंबणारा गारवा असेल.झुळझुळणारा वारा असेल.किलबिलणारे पक्षी असतील.सकाळी सारं कसं मस्त असतं.ताजं ताजं असतं. भेटणारी हवा असेल नाहीतर माणसं...

  सकाळ रोज येते म्हणून उदास वाटत नाही.ती रोजच्या सारखीच येते.नटतं नाही.थटतं नाही. प्रसन्नता व ताजेपणा तिचं वैशिष्ट्यचं असतं.

 सकाळ अल्लड पोरी सारखी निरागस असते.लोभस असते. हवीहवीशी असते.

  ती रोज असते पण आपल्या सर्वांना ती रोज भेटतेच असं नाही.तिच्यासाठी आपल्याला काही वेळ आपल्या खुराडयातून बाहेर  पडावं लागतं? सकाळ कुणाच्या बेडरुम मध्ये नाही येत.त्यासाठी थोडं मुक्त व्हावं लागतं.मुक्त वगैरे म्हणजे  असं  फार काही नाही. मार्नींग वाकला जावं लागतं.बस्सं..

ती आपल्या स्वागताला सज्जचं असते.

  सकाळी सकाळी फिरायला जायचा स़ंकल्प तर  या वर्षी तुम्ही पण केलाचं असेल?मी पण केलाय. बहुतेक जण करतात.अरोग्यासाठी चा़घल असतं. काही अजून पाळत असतील.काहीचा तुटला ही असेल. संकल्प फार नाजूक असतात. ते लवकर तुटतात.ज्यांचा चालू असेल  त्यांचा ही लवकरचं तुटेल.नेहमी असचं होतं.त्याचं कारणं आळस. आळस हा पक्का मानवीय स़ंकल्पद्रोही आहे. लाखो लोकांच्या संकल्पाचं तो भरीत करतो.

आळस हा माणसाचा शत्रू आहे हे आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो आहोत.ऐकत आलो आहोत पण आपण त्याला शत्रू थोडचं मानतो? तो आपला तसा ब-याच जणा़चा जीवलगच असतो. तो आपल्या प्रेमापशात माणसाला पुरता जखडून ठेवतो. त्याची ही मिठ्ठी सोडवत नाही माणसाला.त्याला झटकून टाकला तर रम्य सकाळ आपल्याला भेटते.सकाळच्या हवेत सकारात्मक उर्जा पण  असते. ती आपल्या अंगातून शरीरात प्रवेश करते.मनाचा ताबा घेते. अनुभवातून  हे बोल आहेत.आज तीन दिवस झालयं.मार्निंग वाकला जातोय.तुम्ही जाता का? बघा जमलं तर अवघड पण अशक्य नाही.

     सुप्रभात...!!!

                   परशुराम सोंडगे

        ||Youtuber||Blogger||

स्पेशल माणूस

 ||आपुलाचं संवाद आपुल्याशी ||



 हे जग आपलंच आहे.जगात असंख्य माणसं राहतात.इतक्या माणसाच्या गर्दीत फक्त आपल्यालाचं आवडणारी माणसं असतं नाहीत.आपल्याला आवडणारं माणूस दुस-याला आवडणारचं नाही असं ही नाही.आपल्याला अजिबात न आवडणारी माणस़ ही आपल्या अवतीभवती सगळीकडे असतातचं.

एकच माणूस अनेकां

ना ही आवडू शकतं.आवडण़ ही सपशेल खाजगी गोष्टं आहे.

आपण कुणाला तरी आवडतो ही गोष्ट माणसाला प्रच़ड आनंद देणारी असते.असं झालं की  या जगात उन्हाचे चांदणे होते.आयुष्याच़ एक सूरेल गाणे होते.आयुष्याच्या को-या कागदांवर अनेक रंग सजत जातात.अनेक स्वप्नांचे मोरपंखी दिवस  रेंगळत  राहतात.

  जगात आपलं आणि फक्तं आपलंच कुणीतरी असावं असं वाटतं पण सहसा स्पेशल आपलं असं कुणी असतं नाही.

 आपल्या आवडीचा माणुस आला की आपण स्पशेल चहा करतो,स्पेशल डीश बनवतो.असं म्हणतात की प्रेम ,जीव ओतून जर आपण काही पदार्थ बनवला तर त्याला प्रेमाची चव येते.तसं स्पेशल मनचं बनवलं कुणासाठी तर? मन सुंदर आणि गोड करण्याची पण काही रेसेपी  असते का?

असते की.सदैव हसतमुख रहा.तुम्ही समोरच्यासाठी स्पेशल होऊ शकता.

सुप्रभात

              परशुराम सोंडगे

        || Youtuber||Blogger||

समजासेवेची ढोंगं

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

   आता तुम्ही पाहिलेलं असतील गावागावात  समाज सेवेची संधी मागणारी अतिशय नम्र झालेली माणसं.समाज सेवा करण्यासाठी पण  किती आग्रही होतात माणसं, नाही?किती लाचार आणि लोचटं होतात माणसं? वाघा सारखी गुरगुरणारी माणसं  कुत्र्यासारखा गोंडा घोळतानी पाहिलेच असतील.लोकशाहीची जादू आहे ही.

राजकरणात माणसं खरं बोलत नाहीत. ते भयंकर चांगलं बोलतात.ते कधी कधी इतकं गोड असतं पचत  पण नाही.गद्दारी,फितुरी करणारी माणसं चतुर समजली जातात. राजकरणात असंच असतं हा  सुविचारचं करून टाकला आहे लोकांनी.

निवडून येणं महत्वाचं.कसा आला याला हल्ली लोक फारसं महत्व देत नाहीत.राजकरणाण  कायम शत्रू आणि मित्र नसतात तसचं मार्ग आणि गैरमार्गा हा ही प्रकार मानला जात नाही.

राजकारण हे एक करिअर झालं.व्यक्तीगत स्वार्थाला महत्व दिलं गेले आहे. व्यक्तीगत आणि  समुहाचं तुष्टीकरण सुरू झालं आहे.समुह म्हणजे  जाती आणि धर्म तसेच व्यवसायिक वर्ग उदा. नोकरदार, कामगार, शेतकरी, मजूर, बेरोजगार. तुष्टीकरण ही गंभीर समस्या बनली आहे.शोषणा पेक्षा ही भयंकर  असतं तुष्टीकरण.  मतासाठी फसव्या अभासी अश्वसनांची  खैरात सुरू झाली.सुंदर सुंदर स्वप्नाच्या झालरी फडफडू लागल्या.राजकारणातून सत्ता,सत्तेतून राजकारण. हे चक्र फिरतचं राहणार असतं. त्या चक्रातचं लोक फिरत राहतात.

विचारापेक्षा संधीसाधूपणाला महत्व आलं आहे.व्यक्तीस्तोम माजलं आहे. पक्षातील व्यक्तीच्या पूजा होऊ लागल्या आहेत.राजकरणात असचं असतं.गद्दारीला फितुरीला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं.आमिष आणि प्रलोभन देऊन दुस-याच्या कळपातील माणसं आपल्या कळपात घेणं सुरू झालं.फितुरीचं,गद्दारीचं उदात्तीकरण सुरू झालं आहे. लाॅबिंग सुरू झालं.आपला तो बाब्या....

चुकीचं समर्थन आपण समजू शकतो पण त्या गद्दारीचं  उदात्तीकरणं सुरू झालं. उदात्तीकरणासाठी चालाखपणे त्याचं समर्थन केले जाते.नीतीमुल्याची बेगडं त्यावर लपेटली जातात.स्वार्थ आणि आपला अहंकार कुरवाळणारी माणसं सर्वांनाचं  आवडतात.  अस्मिता हेरून त्यावर बोट लावून राजकीय मंडळी  गुदगुल्या  करत राहतात. त्या गुदगुल्यातूनचं लाचाराची फौजची फौजचं उभी राहते. पक्षातील सत्तेत असलेल्या महवाच्या  व्यक्तीचे पाय चाटतानी अनेक लोक तुम्ही याची डोळा पाहिले असतील.जो आपल्या कक्षेत आपण होऊन येत नाहीत.त्यांना खेचून घेतले जाणार,त्यांना तोडेन मोडून टाकले जाणार हे अपरिहार्यचं असत.राजकरणात असंच असतं म्हणून आपण ही ते स्वीकारणार का? हे सारं लाथाडून ही व्यवस्थाच उलथून टाकणार? 

सुप्रभात

             परशुराम सोंडगे

            ||Youtuber||Blogger||

नटवणं आणि सजणं

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी||

तुम्ही बहरलेली ,डवरलेली झाडं पाहिलीचं असतील?कुणासाठी झाडं नटतात?कुणासाठी थटतात? वेली ही अंगा खांदयावर फुलांचे  झुबके लेऊन सजलेल्या असतात.वसंत आला की झाडांना ही चैत्र पालवीचा मोह कुठे आवरतो? पल्लवीत होणं ही किती अनिवार्य असतं नाही? साधं फुलांचे  गंध, मंकरंदानी ओथंबून जाणं हे लपवून राहत नाही. आपणं आपलं अंतरंग दडून नाही ठेऊ शकतं.साधी फुलपाखरे किती रंगबेरंगी होऊन भिरभिरत राहतात फुला फुलांवर.ढग असुसले बरसायला की मोर ही नयनरम्य पिसारा फुलवून  नाचतात.मोराचं धूंद होणं असेल नाहीतर ढगाचं दाटून येणं असेल सृष्टीतलं हे रम्य आविष्कारचं असतात. नागिनीची सळसळ ही मोहकचं असते ना? हरिणीची चाल? काय कमी  हवीहवीशी असते? कोकीळचे मधूर स्वर कुणासाठी गुंजत असतात? अतिशय नटलेली थटलेली माणसं ही  आपल्या अवतीभवती असतातच की. आपल्या कुणाला तरी आवडायचं असतं.कुणाच्या तरी मनात भरायची असतं. त्यासाठी ही धडपड असते.माणसाच्या नटण्यात ,सजण्यात  मात्र एक कृत्रिमता असते. तसं सृष्टीतल्या इतरांच नसतं.जंगलात कुठं ब्युटी पार्लर ची दुकान असतात. इतरांचे रंग ,गंध घेऊन स्वतः ला पेश करायचे प्रयत्न माणसा शिवाय कुणीच करत नाही.आपणं सुगंधित व्हावं म्हणून अत्तराचे फवारे माणसाशिवाय कोण मारू शकते?फुलांची कत्तल करून केसात माळणा-या ललना ही काय कमी क्रूर नसतात? सृष्टीतल्या सर्वांनाच अधिक सुंदर दिसायचं असतं.अधिक गंधायचं असतं.अधिकचं गोड व्हायचं असतं.आपल्या मध्ये जे जे चांगलं असेल ते ते  सृष्टीत उधळून द्यायचं असतं.अंतरंगातील रंग उसळून  बाहेर कळतं नकळत येतचं असतात. 

   हे जग अतिशय सुंदर आहे आणि  ते सुंदर करण्यात आपला ही  इवलासा वाटा असतोच की.आपला रंग,गंध व रूप घेऊन व्यक्त होणं आपल्या हाती असतं.बहरणं,मोहरणं,फुलून येणं तरी दुसरं काय असतं? ते  एक व्यक्त होणंचअसतं. आपल्यातलं सर्वीत्तम  आहे ते बाहेर उधळून दिलं की अख्खं जग आपोआपच सुंदर होतं असतं. आपणं अधिकच सुंदर व चांगलं होतं राहिलं की जग  सुंदर व चांगलं असणारच आहे.तुम्हाला हे जग सुंदर करून जायचं का? तर मग आपलं सुंदर असणं अनिवार्य आहे.अश्या अनिवार्यता तर  जगण्याला अर्थ देतात, नाही का? आपलं दिसणं, बोलणं,वागणं,हासणं वगैरे सारंच सर्वांना हवंहवंसं वाटेल असं  असलं पाहिजे , नाही का? सर्वांना आपणं हवंहवंसं असं असणं सोपं नाही पण अशक्य थोडचं ?

सुप्रभात

            परशुराम सोंडगे

||Youtuber||Blogger||

संशयाचा व्हायरस

  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या न...