गुरुवार, १९ जानेवारी, २०२३

द्यावा सुगंध सारा उधळूनी

 ||आपुलाच संवाद आपुल्याशी||



इथं प्रत्येकालाचं बहरायचं असतं.फुलायचं असतं.आपलं अंतरंग उधळायचं असतं.स्वतःला सिध्द करायचं असतं.प्रत्येक जण आपलं रंग ,रूप आणि गंध घेऊन बहरत असतो.अविष्कारत असतो. नटणं व सजणं तरी दुसरं काय असतं?आपलं व्यक्त होणंच असतं की.

या विशाल आणि विलोभनीय जगाला आपल्याला अधिकचं सुंदर करायचं असतं पण जग किती कंजूष असत?प्रत्येक क्षूद्र फुलाची दखल घेतचं असं नाही.

दखल नाही म्हणून

फुलांनं कधी फुलणं सोडलं नाही.बहरणं थोपवल  नाही.फुलणं असेल किंवा जगणं असेल ते  अटळचं असतं.फक्त आपलं अविष्कारनं सुंदर असावं. गुण आणि दोषाचं मिश्रण असतो माणूस.आपल्या गुणाचे रंग अधिकचे ठळक करायचे.झालं.एवढचं तर करायचं.

"दयावा सुगंध सारा या जगास उधळूनी.

घेऊन निशिगंध मज मान्यता मिळावी."

    चला,अंतरंग उधळून देऊया. ही सकाळ अधिकची सुंदर करूया. 




                     परशुराम सोंडगे

                || Youtuber||Bloger||

शुक्रवार, १३ जानेवारी, २०२३

कधी कधी खरं बोलूया

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी ||


कधी कधी खरं बोलूया.

*************************



 शालेय जीवनात अनेक सुविचार आपल्या कडून गोठून घेतले जातात.घरात ही माणसं मुलांवर चांगले संस्कार करायचे म्हणून सदैव उठता बसता संस्काराच्या उपदेशाचे डोस पाजत असतात.त्यात 'माणसांनं खोटं बोलू नाही.' हा सुविचार प्रामुख्याने सांगितला जातो.

मुलांचं मन निर्मळ असतं.ते निरागसं असतं. कोवळ मन नाजूक असतं.थोडक्यात काय तर मुलांची मन संस्कारक्षम असतात.काही संस्काराचे बीज आपण त्यात पेरले तर उगवू शकतात.खरं बोलणं हा सुविचार माणसाच्या मनात का रूजतं नाही?मूलं जसं मोठं मोठं होतं जातं तसं तसं ते अधिक लबाड बोलत राहतं. खोटं बोलण्याची एक कला आहे .ती हळूहळू आत्मसात करत राहतं.

     खोटं  बोलणं हे एक चातुर्य समजलं जातं.जी माणसं सराईतपणे खोटं बोलतात त्यांना हे जग व्यवहार चातुर्य समजत. खरं बोलणारांना अर्थातच मूर्ख समजलं जातं.आपण मूर्ख आहोत हे मान्य करणारा सज्जन माणूस अजून या पृथ्वीतलावर अवतारायचा आहे.त्यामुळे या जगात जिकडे तिकडे सदैव सातत्याने कारण असताना ,काहीच कारण नसताना ही माणसं खोटं बोलत राहतात.

           कधी कधी तुम्ही काही मिनिटे ही खरं बोलून बघा.कसला गजब होतो. काही मिनिटे ही तुम्ही खरं खरं बोलू शकत नाहीत.अनुभव घ्या.हे जग फक्त माणसं खोटं बोलू शकतात या एकाच गोष्टींवर चालते आहे याचा दिव्य अनुभव तुम्हाला येईल.

आश्चर्य याचं वाटतं की माणसं सदैव खोटं बोलत राहतात पण खरं बोलण्याचा आग्रह  कायम धरत असतात.इतकं पण खोटं बोलू नाही अशी माफक सज्जनतेची आवं पांघरणारी  अपेक्षा ही हल्ली करतात.

मापात,पचलं असं खोटं बोलावं  अशी इच्छा करतात.पचवू शकालं इतकं खोटं बोलणं अपेक्षित असते.

बाबांना खोटं बोलला म्हणून मुलांचं कौतुक करणारी आई याचं जगात आहे.वरिष्ठांना खोटं बोलून आॅफीस मधल्या गोष्टी लपवून ठेऊ शकला म्हणून पार्टी देणारी घेणारी माणसं ही असतात की.छान आणि पचलं इतकं खोटं बोललं म्हणून कोतुक करणारी गुरुजी तुमच्या आयुष्यात आलेच असतील. बाॅयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड असत्याचे निस्सीम भक्त असतात.

सत्याच्या बेगडात  खोटं गुंडाळून ते आपल्याला बाजारात विकायचं असतं म्हणून हे जग खोटं बोलते आहे. बोलत राहणारं आहे.

बरं,खोटं बोलण्याचं काही परिमाण नाही. त्यामुळे माणसं किती खोटं बोलतात हे मोजता येत नाही.माणसं किती ही  स्पेशलं खोटं बोलू शकतात! 

 माणसं खोटं का बोलतात ? प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कधी कधी माणसं काहीचं कारणं नसताना ही खोटं बोलतात.उगीचं खरं काय बोलावं म्हणून माणसं खोटं बोलतात.फोनच्या संवादामध्ये  सर्वाधिक खोटं बोल जातं.खरं बोललं तरी काही हरकत नसते  तरी माणसं स्पेशल खोटं बोलतात. सामुहिकपणे एका सुरात खोटं बोल जातं.पक्षाचा नेता खोटा बोलला की सारा पक्ष तेचं बोलत राहतो.मिडीयापणे एका सुरात खोटं बोलत राहते.

 राजकरणात माणसांनं खरं बोलू नाही असा एक राजकरणचा मंत्रच आहे.खरं बोलणा-या माणसांनी राजकरणात पडू नाही असा ही एक सल्ला  दिला जातो.

या जगात एकदम खरं बोलणारा माणूस असण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे जगातील सर्व  लोक राजकारण प्रिय आहेत.राजकारणी आहेत.घराघरात काय कमी राजकारण असते?

राजकारणात फेकू आणि  नौटंकी करणा-या माणसांचा सक्सेस रेशव  जरा जास्त आहे. सहसा लबाड आणि नटवं बोलणारी माणसं राजकरणात यशस्वी होतात.

    ही माणसं लबाडं बोलतात हे माहीत असून ही  लोकं त्यांना डोक्यावर घेतात.आपला नेता मानतात.

  'माझे सत्याचे प्रयोग' हे म.गांधीचं पुस्तक तुम्ही वाचलं असेलच? खरं बोलणारी आणि वागणारी माणसं या जगानं चक्क खोटी करून टाकली आहेत.

खोटं बोलण्याची सवय लागली आहे माणसांना. 

माणसं किती ही खोटं बोलत असली तरी विजय सत्याचा होतो.सत्य अजिंक्य असतं. आपल्या देशाचं ब्रीदचं सत्यमेव जयते आहे.ते उपनिषदांतून घेतलेले आहे.सत्याचा आग्रह हा फार प्राचीन आहे.युधिष्ठराला ही खोटं बोलायला लावणारा सर्वज्ञ भगवान परमात्मा आपलाचं देव आहे.आपण त्याचेच अंश आहोत.

देशाचं ब्रीद आहे 'सत्यमेव जयते 'म्हणून या देशासाठी थोडं थोडं खरं बोलण्याचा सराव सुरू करू आज सकाळ पासून. 

जपून हं. सत्य कडू असतं.खरं बोललं की सख्ख्या आईला पण राग येतो.

 सुप्रभात....!!!

              परशुराम सोंडगे

             ||Youtuber||Blogger||

रविवार, ८ जानेवारी, २०२३

माणसा़चा धर्म


||आपला चं संवाद आपुल्याशी||

माणसाचं तीनचं प्रकार आहेत. देव मानणारी माणसं,देव न मानणारी माणसं व देव आहे की नाही हे ठरवताच न येणारी माणसं.

   देव ही  मानवी कल्पना आहे.सा-याचं कल्पना,स़ंकल्पना मानवनिर्मितच असतात.तर्कशक्ती व कल्पना शक्तीच्या आधारे माणसं  या जगाचं आकलन करत आहेत. आकलन ही प्रक्रिया आहे.ती अख़ंडपणे चालूच़ राहणारी आहे.आकलन हे अक्कलीवर अवलंबून असते. जशी व जितकी अक्कल तसं हे जग असतं.असणारं आहे. त्यामुळे तर प्रत्येकाचं जग वेगळं असतं.

तर्कशक्ती व कल्पना शक्ती मानवाला मिळालेल्या देणग्या आहेत.

 आपले देव, देवता सुंदर, बलवान,दयाळू,क्षमाशील, पराक्रमीचं  असतात.कुठलीचं देवता -देव कुरूप नाहीत.आपणं सुंदर असावा ही माणसाची उपजतचंं इच्छा राहिलेली आहे. त्यामुळे माणसाचे देव-देवता सुंदर  व आकर्षक असतात.राक्षस कुरूप आणि दूष्टं असतात.

 कल्पना करा की इतर प्राण्यांनी ही धर्म स्थापन केले असते तर?  गायीचा धर्म वेगळा,सिंहाचंं धर्म वेगळा.... गायींनी जर तत्वज्ञान मांडलं असतं तर या सृष्टीतले सारे देव गायीसारखे बैलासारखे शिंगे आणि शेपटी असलेले असते.

 माणूस सोडून इतर प्राणी देव मानत असतील का? मानत असले तरी ते आपल्याला कळणार नाही कारणं पशूपक्ष्यांची भाषा आपल्याला कळतं नाही.आपण जसे रेडया़ना वेद बोलायला लावले तसा प्रयत्न कोणत्याचं प्राण्याने अद्याप केलेला नाही.आपलं तत्वज्ञान दुस-याच्या गळी उतरवण्याचा  साधा प्रयत्न ही अजून तरी केलेला नाही.

  देव ही या जगाची भौतिक गरजा कधीच राहिलेली नाही.देव ही माणसाची मानसिक गरज राहिलेली आहे.आपलं सारं ऐकुन घेणारा, संकट काळी मदतीला येणारा.मानवी मर्यादा संपल्या की आपण पुढील सारे प्रश्न देवाच्या हवाली करतो. सुख - दु:ख देवाची देणं म्हणून पदरात घेत राहतो.

      संतानी देवाला मानवी नात्यात गूंफून घेतलं आहे.कुणी त्याला सखा मानतं.कुणी सखी,कुणी सांगाती.कुणी माता,कुणी पिता, जेव्हा तुम्ही हताश होता तेव्हा देवा समोर  व्यक्त  होण्याचा एक पर्याय उपलब्ध असतो. एकंदरीत काय तर ? आपल्याला माणसासारखा देव हवा असतो.तिचं तर आपली गरज आहे.देवासारखी काही माणसं ही आपल्या भवती असतातच की.

     आता हे तर आपल्याला ठरवावं लागेल की माणसा सारखा देव शोधत बसायचं की देवा सारखी माणसं?

हा शोध प्रवास सोपा नाही पण सुरूवात तर करूया आज. या सकाळी.

सुप्रभात

              परशुराम सोंडगे

       ||Youtuber||Blogger||

नवं वर्षाच्या शुभेच्छा आणि बरचसं काही.....!!

 ||आपलाचं संवाद आपुल्याशी|

नवं वर्षाच्या शुभेच्छा आणि बरचसं काही.....!!

आज  नवीन वर्षाचा पहिला दिवस.काल वर्ष २०२२ गेलं.वर्ष २०२३ आलं.भिंतीवरलं एक कलेंडर गेलं नि नवीन आलं.

उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून निथळणारा प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परीवर्तन व भ्रमण गतीत काहीचं फरक पडतं नाही.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो.

फक्त नव्याचा भास असत़ो. सारं सारं नवं नवं वाटायला लागतं.हातातलं बरचसं निसटून गेल्यासारखं वाटतं.आयुष्याची ओंजळ हातात घेऊन आपण उभे असतो. ओंजळ ओली असते पण रितीच असते. काही क्षणांच्या अस्तित्वाची ओल सांभाळत. एक एक क्षण क्षण अलगद निखळून पडतात.गेलेले क्षण परतं येत नाहीत.आपल्याला हवे असलेले क्षण आपण पकडून ठेऊ शकत  नाहीत.नको असलेले क्षण रोखू शकत नाहीत.

 या सृष्टी चक्रात तुम्ही भिंतीवरच कलेंडर बदल म्हणून काहीच घडणार नसतं.जे घडतं ते आपल्या मनाच्या अवकाशात. ते भास असतात.काही अभास असतात.नाहीतरी हे जग अभासाच्या हिंदोळयवरच झुलत असते.त्यात आनंदाचे,दु:खाचे क्षण आपण गोळा करत राहतो.काही क्षणांचे ठसे आपण मनावर छापून ठेवलेले असतात.काही क्षण मनावर ओरखडे उमटवून जातात.

     खरंतर अनंत ब्रम्हाडांत दिवस उगवत नाही.दिवस मावळत नाही.काळाच्या अनंत रेषेवर ब्रम्हांड सरकते आहे.असेच सरकत राहणार आहे.

 गमंत अशी की, आपण मात्र घड्याळाच्या काटयावर आयुष्य बेतून घेतो.त्या घड्याळाला ही आपण आकार दिला.उकार दिला.देवासारखा माणसानं काळाला सुंदर केलं.नटवलंयं,सजवलयं.हे वर्ष आपण जवळचा सखा मित्र, आप्तेष्ट करून टाकलं. बाय -बाय २०२२ व वेल कम २०२३ अश्या रांगोळ्या तुम्ही पाहिल्याचं असतील.बाय बाय ,वेल कमी असं घसाफोड सुरुच असते. घराघरावर केलेली रोषणाई. चौकाचौकात वाजणारे डीजे नवं वर्षाच्या स्वागताला सज्ज असतात.एका अनोख्या धूंदीत जग बुडालेले असते.बेधूंद...बेभान होतात माणसं.

 नव्या वर्षाचं स्वागत.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर जगाचं लक्ष असतं. नवं वर्ष आलं की एकच जल्लोष.

     नवं वर्षाचं बाळं रांगत या सृष्टीचा कब्जा घेत पण आपण स्वागतच नाही केलं तर? नवं वर्ष रूसून बसेल? खूप नाचून नाचून स्वागत केलं तर ते वर्ष माणसांना  प्रसन्न होत असेल का? असं  काही होणार नसतं तरी आपण स्वागतात कसूर करत नाही.कसूर करायची नसते.माणसं एखाद्या संकल्पनेच्या किती प्रेमात पडतात,नाही?

रांगोळ्या काढतो.डीजे वाजवतो.घराघरावर रोषणाई करतो.लेजरचे शो करतो. हे नविन वर्षीला आवडतं म्हणून आपण करत नाहीतर आपल्या ते आवडतं.आपल्याला प्याची असते आपण पितो.आपल्याला नाचायचं असतं आपण नाचतो.आनंद साजरा करण्याची ती आपली पध्दत आहे.जो तो आपआपल्या पध्दतीने करत असतो. निमित्त हवं असतं.

   तसा साराच हा भातकुलीचा खेळ असत़ो.खोटं खोटं का असेना पण मज्जा येते ना ? मग खेळायचं.मज्जा महत्वाची.संस्कृती वगैरे गोष्टी पण अश्याच मानवनिर्मितच आहेत ना? कशाला टेन्शन घ्यायचं?

      आयुष्य सा-यांनाच असते पण आयुष्याची लांबी सां-याची सारखी नसते.कुणाचं लांब असतं.कुणाचं आखूड असते.जे क्षण आपल्याला वाट्याला येतात. ते फक्त आपले असतात.त्यांना कवेत घेण्याचं काम आपलं असतं.सुख दु:खाचे कण क्षण पाठीवर घेऊन आपल्या वर आदळत असतात.जगणं म्हणजे एक प्रणयच असतो हवाहवासा, नाही का? दु:ख आणखी सुखाच्या झुल्यावर झुलत ठेवणारा.

आपला भुतकाळ आपण बदलू शकत नाही पण वर्तमानाला आपणं भिडवू शकतो.जिंकू ही शकतो.आपण भविष्यकाळ  सुंदर सुंदर स्वप्नांनी व संकल्पनानी सजवू शकतो.नटवू शकतो. सागराच्या किना-यावर नाही का आपण खोपे करतं?काळाच्या लाटेत सारं  अथांग सागराची मिसळणार असतं पण ते आपण करतचं असतो.करावं लागतं. दुसरं काय करणार ? आपल्या हातातच काय आहे?

आपलं भविष्य सुंदर स्वप्नांनी सजवू.सुंदर सुंदर संकल्प करू. आपलं आयुष्य आपणचं सुंदर करण्याचा प्रयत्न करूया.त्यासाठी प्राण पणाला लावू.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

         परशुराम सोंडगे

     ||Youtube||Blogger||

रविवार, १ जानेवारी, २०२३

गौतमी पाटील – मराठी लावणीची सळसळती ऊर्जा..!!!





सध्या महाराष्ट्र गाजतो आहे एकाच नावानं.गौतमी पाटील.सबसे कातिल गौतमी पाटील.सोशल मीडियावर लोकांना सदैव काहीतरी चघळयाला हवं असतं.काही ना काही गाजणारचं असतं.चघळलं जाणारचं असतं.त्यात गौतमी पाटीलची लग गयी लाॅटरी...!!! तिचं नाव आणि तिचे स्टेज शो.प्रचंड व्हायरलं होत आहेत.तिच्या डान्स शोला अक्षरशःउधाण आलं आहे.सोशल मिडीयावर असंख्य रिलस् आणि शार्ट व्हिडिओने धुमाकूळ घातलेला असतो.रीलस्चा तर नुसता पाऊसच  पडतं असतो ना?गौतमी पाटीलनं तर कहरचं केला आहे.(गौतमी पाटील हे नुसतं नाव या महाराष्ट्राचा किती जीबी डाटा खर्च करत असेल?  मला एक पडलेला भाबडा प्रश्न.) या महाराष्ट्रातील तरूणं मुलं इतकी कलासक्त असतील,इतकी कलारसिक असतील असं  कधीचं वाटलं नव्हतं.तरूणाई कलेच्या बाबतीत उदासीन होत आहे असं म्हटलं जातं. तसाच सूर सा-यांचा होता.गौतमी पाटीलच्या शोजस्ना रेकार्ड ब्रेक गर्दी होते आहे याचं कारणं काय आहे?जे तरूणाईला हवं तेचं तर ती देते आहे ना? इंदूरीकराच्या किर्तनाला सुध्दा तरूणांची गर्दी होत असे. तरूण श्रोते त्यांनी खेचून घेतले होते.तरूणाईला जे हवं ते मिळालं की ती उसळतचं असते.सध्या तरी गौतमी पाटलाच्या नावाचं तुफान आलं आहे.गौतमी महाराष्ट्रातील तरूणांची दिलं की धडकन झाली आहे.महाराष्ट्राच्या तमाम ह्लदयावर तिनं कब्जा केला आहेच.तरूणाईच्या म्हणा किंवा  रसिकांच्या म्हणा.दिलावर कुणी तरी कब्जा करणारंच असतं ना?  असल्या ललना त्यावर विराजमान होणारचं असतात.काल दुसरी कुणी होती.आज गौतमी आहे.उदया तिसरी कुणी असेल. हिरो आणि हिरोनीला समाज माध्यमांवर कमी नाही. नुसता ऊत आलाय.चार आठ दिवसं इथल्या तरुणाईला थिरकायला लावलं की दुसरा चेहरा येणारं असतो.इथं व्हरायटीजला कमी नाही. भरपूर पर्याय उपलब्ध असतात.गौतमी पाटील नुसते नाचते का ? नाही .ती फक्त नाचत नाही.ती नाचवते आहे.ठेका धरायला लावते आहे.सक्रिय सहभागी करते आहे प्रेक्षकांना.कदाचित हेच गौतमी पाटीलच्या रेकार्ड ब्रेक शोचं कारणं असू शकेल.

          गौतमी पाटीलच्या शो ला लावणी म्हणावी का नाही?अनेक लावणी सम्राज्ञीच्या मते ती लावणी सादर करत नाही.तिच्या डान्सला लावणी म्हणता येत नाही.ते कॅफे टाईप डान्स आहे.ती लावणी डान्सर नाही तर बार डान्सर आहे.तुम्ही काय म्हणता किंवा काय म्हणत नाहीत याचं तिच्या चाहत्यांना काही देणं घेणं नाही.साखरेला गूळ म्हटलं काय किंवा खडीसाखर म्हटलं काय ? चवीत काय फरक पडणार? तसचं हे. गौतमी पाटीलचे प्रेक्षक हे काय लोक साहित्याचे अभ्यासक किंवा समीक्षक नाहीत.व्याख्या पाठ करून आपली अभिरूची ठरवायला.



       लावणी ही सभ्य  व सज्जन माणसाची रूची आज ही समजली जातं नाही.गावकुसा बाहेरचं लावणीच्या फडाला जागा होती.तमाश्याच्या प्रेक्षकाला आज ही सज्जन आणि सभ्य समजलं जातचं नाही.आंबटशौकिनचं लेबलं त्यांना आज ही चिकटवल  जातचं की.बैठकीची लावणी चोरूनचं पाहिली जाते की.(पिकल्या पांनाचा देठ की हो हिरवा... असेल किंवा राजसा...नटले तुमच्यासाठी असेल. कारभारी दमानं....या बैठकीच्या लावण्या स्टेजवर साज-या केल्या त्या सुरेखा पुणेकरांनी तेव्हा लोकांनी तुफान गर्दी केली होती. सुरेखा पुणेकराचे पण शो असेच लोकांनी हाऊस फुल्ल केले होते.गौतमी पाटीलच्या शोलाच गर्दी होते आहे असं नाही.सुरेखा पुणेकर यांचे पण लावणीचा कार्यक्रम रेकार्ड ब्रेक होतं असतं.नटरंगी नार उडवी लावणीचा बार.गेल्या दोन दशकात अक्षरशःधुमाकूळ घातला होता.लावणीच्या सादरीकरणचं व्याकरण कुठं असली गर्दी  समजून घेत असते का?आता अदा आणि इशारे यात काय फरक असेल बरं?इशारे चावट आणि अदा साजूक असतात काय?डोळा मारीत लावण्या सादर करताना अनेक नृत्यं सम्राज्ञी आपण पाहतोच की.इशारे नाहीत.खाणाखुणा नाहीत.चावटं इशारे नाहीत अशी सपक लावणी कोण  बघेल बरं? लावणीचा पण एक ठसका असतो.ठसकेदार लावणी हवी असते सर्वांना.या महाराष्ट्रात राखी सावंतच्या पण तसल्या डान्सने एकेकाळी धुमाकूळ घातला होता.नाचणारं कुणी असेल तर लोक पाहणारचं.कपडे काढून जरी कुणी नाचलं तरी लोक डोळा मटकावतं ,जिभल्या चाटतं ते पाहणारचं.नकटी राखी सावंत सुध्दा लोकांनी चवीनं पाहिलीच की.महाराष्ट्रात सपना चौधरीचे ही शो लोक पहतातचं आले आहेतं.गावोगावी ही  लोककला केंद्र चालूच आहेत की.त्यात वाजली जाणारी गाणी कसल्या लावणीचा प्रकारात मोडतात? स्टेजवर सादर होणा-या तमाशातून ही टिप टीप बरसा पाणी  हे गीत सादर करताना ओलेचिंब  ललना  पाहण्याचं भाग्य वाटयला आलेले प्रेक्षक ही असतीलचं की.

 मराठी गाण्यांनी तर कहर केला आहे.आंटी माझ्या झोपडीत ये. लाडा लाडानं पेललं दारू ,पोरी जरा हातानं दांड धर, तुझी चिमणी उडाली भूरृर.. अशी गाणी आवडणारी लोक असतात.

 गौतमी सादर करते ती गाणी सभ्य व चांगली नसतील ही पण महाराष्ट्र ने डोक्यावर घेतलेली तर आहेत ना? गाण्यात काहीच अश्लीलता नसते का?फक्त तिच्या डान्सवरचं का  आक्षेप आहेत.तिचं सादरीकरण जरूर साजूक नाही.सभ्यतेच्या कपडयात गुंडाळलेली लावणी कुठं अशी गर्दी करून पाहिली जाते असते का? तमशाला ही आंबट शोकीनांची गर्दी असते.तमशाचे द्विर्थी संवाद असेल किंवा एकंदरीत  ते अंगविक्षेप असतील हे अश्लील नसतात का? नान्व्हेज जोक तर जागरण गोंधळात ही असतात की.सहकुटुंब ते पाहिले जातात.

  हे सारं सांगायचं म्हणजे गौतमीच्या डान्सला समर्थन करायचं नाही.तिला अजून पाणी अंगावर ओतून ओलेती डान्स करायला भाग पाडायचे नाही. गौतमी पाटीलला  होणारा  विरोध  हा पारंपारिकच आहे.त्यात  नवीन काही घडतं नाही.आपण तरी कशाला टेन्शन घ्यायचं ?हे सार जुनचं आहे.

  गौतमीचं काय कुणी तरी नाचतं आहे म्हणून तिला पाहयाला लोक येणारंचं असतात. व्यवसायीक गरज म्हणून ती जास्त बोल्ड होत आहे.ती तशी नाचते म्हणून लोक गर्दी करतात.डान्स शो करणारे कलाकार काय कमी नाहीत? गौतमीच्या शोलाच का गर्दी होते आहे?नाचणारं कुणी ही असेल तर ते पाहिले जाणारचं आहे... तुम्ही मैदानात पाहून नाही दिले तर...लोक चोरून पाहतील.नाद असतो तो.असा तसा जातं नसतो.

     ग़ौतमी पाटीलची लोकप्रियत्ता कायम अशीच राहणार नाही.दुसरी एखादी फटाकडी पोरगी वेगळं नाचायला लागली की हिचा बहर ओसरेल. लोकं तिला डोक्यावर घेतील. संस्कृती च्या गप्पा वगैरे मारल्या जातील. हे असंच चालू असतं.

       परशुराम सोंडगे

       बीड







रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

आशा आणि त्याग

 ||आपुलाच संवाद आपुल्याशी||

या जगातील माणसाच्या दुःखाचं कारण आशा आहे.बुध्दांने शोधलेले मानवी दुःखाचं मूळ.आशेची पाळंमूळं खणून काढण्यासाठी  माणसाची तडफड आपण अनेक धर्म ग्रंथाच्या पानापानावर  पाहतच आलो आहोत.आशेशिवाय जीवन अशक्य आहे.वैराग्य,निरपेक्ष कर्म,अश्या अनेक संकल्पनाला माणसांनी जन्म दिला.त्यांची उकल करण्यातच आयुष्यभर माणूस झिजत राहिला.वैराग्य,निरपेक्ष कर्म यांचा अनुभव कुणी घेतला असेल बरं?कर्मकांडाचे जोखड आपल्या अंगावरती ओढून माणूस आशा नष्ट करण्यासाठी झुंजत राहिला.कुठल्याचं जीवाची पिच्छा आशा सोडत नाही.जीव जीवनलोलूप असतो.मरण कुणालाचं नको असते.ते किती ही अटळ असलं तरी ही. त्याला हजारोवाटा असल्यातरी.

जगण्याची  लालसा जीवाला संघर्षाच्या चरक्यात कोंबते.दुःखाची डोंगरची डोंगर अंगावर कोसळत असतानाही माणूस सुखाच्या क्षणासाठी धडपडत राहतो.तुम्ही  असा प्रसंग कधी पाहिला आहे का? नागाच्या जबडयात सापडलेला बेडूक.आपण जबड्यात असून ही समोरचा किटक पकडण्याचा त्याचा प्रयत्न.प्रयत्न केविलवाणा असला तरी जगण्याची लालसा जीवला जुंपून ठेवते. त्या बेडकाच्या जीभेवर वळवळणारी असते ना? ती  आशा  असते.आशाचा समूळ नाश अशक्य आहे पण आशा कमी करू शकतो.इच्छा नष्टं नाही पण इच्छेची तीव्रता कमी करू शकतो. छाताडावर गोळया झेलतं मरणाला ही शरण आणणारे अतुलनीय शौर्य आपण पहातोच की.आशेचा त्यागाकडे प्रवास शक्य आहे.त्यागातून ही आनंद मिळतो. त्याग आनंदाचे साधन आहे.

मित्र हो,सोप्पं की मग आनंदाचा मार्ग.आपण योगी नाही पण  जरा त्यागी तर होऊया.बघूया ना आज जमतयं का?

 सुप्रभात...!!!

                परशुराम सोंडगे

          Youtuber|| Bloger||

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

सकारात्मक उर्जा

 || आपुलाच संवाद आपुल्याशी ||

 

माणसाच्या पाणी,अन्न,वस्त्र व निवारा या मुलभूत गरजा आहेत.

गरजांचा प्राधान्यक्रम आपल्याला योग्य ठरविता आला की आयुष्याचं पलॅनिंग जमलच की. 

हल्ली गरजांचा प्राधान्य क्रम ठरविताना आपला संभ्रम होतो आहे.आपण नेमकं इथचं  गोंधळून जात आहोत.

या मुलभूत गरजा इतकचं सकारात्मक विचारांनाही आपणं प्राधान्य दिले पाहिजे.श्रींमतीत व ऐश्रर्यात लोळत असलेली व शरीराने धष्टपुष्टं असलेली माणसं ही  मनानं खचलेली असतात तर भिकारी,दरिद्री व विकलांग ही उत्तूंग स्वप्न उराशी बाळगून जग जिंकण्यासाठी धडपडत असतात.

विचारांची उर्जा बाहेरून लपेटता नाही येत.सकारात्मकतेची कॅप्सूल किंवा टॅब्लेट नसते बाजारात.ती अंतरंगातूनचं उसळावी लागते.मानवी पण हे प्रचंड उर्जेचा स्त्रोत आहे. मन ती उर्जा बाहेर फेकत असते.तिच उर्जा माणसाला आतून पेटवते,तेवत ठेवते.प्रखर करते.चकाकी आणते. 

 उलट नकरात्मक उर्जा माणसाला  काळवंडून टाकते.काजळून टाकते.ग्रासून टाकते. निस्तेज करते. शेवटी माणसाच्या विझण्याचे कारण ठरते.

  सुविचार वाचून माणसं सुविचारी होत नाहीत.शाळकरी जीवनात काय आपण कमी सुविचार पाठ करतो? चांगला विचार करणा-या सवयीचं गुलाम व्हावं लागतं.तीच गुलामी माणसाला या जगाचं सिंकदर करत असते.

सकारात्मक विचारच माणसाला आकाश कवेत घेण्याचं बळ देतो.नकारात्मकता माणसाच्या जीवनातील आनंद गोठून टाकते.पंखातले अवसान गिळुन टाकते.नकारात्मकताच माणसाला नैराश्यीच्या गर्तेत ढकलते.सकारात्मकता माणसाला यशाचं शिखरावर घेऊन जाते. सकारात्मकता व नकारात्मकता माणसाच्या विचार करण्याच्या  पध्दती आहेत.फक्त कोणती ही गोष्टं सहज आणि सकारात्मकतेनं घेणं जमलं पाहिजे. ते तेज विलोभनीय असतं.  या शिवाय सक्सेस पासवर्ड  दुसरा नाही.जादूची कांडी हीच तर असते.

 चला,आज सकारात्मकतेने ऊर भरून घेऊया. 

सुप्रभात 

                           परशुराम सोंडगे

                    || Youtuber||Bloger||

रविवार, ३० ऑक्टोबर, २०२२

वीरचक्र विजेते माळी साहेब -अमर रहे


 वीरचक्र विजेते तालुक्याचे भूषण माळी साहेब आपल्यात नाहीत ही गोष्टचं फार वेदनादायी आहे.संपूर्ण स्वच्छता अभियान मध्ये काम करत असताना त्यांच्या सोबत काम करण्याची संधी भेटली. वय झालं तरी कमालीची धडाडी व सकारात्मक विचारांची उर्जा त्यांच्या अंगी होती.त्यांच्या गावाच्या व  पाटोदा तालुक्याच्या स्वच्छता चळवळीला गती देण्यामागे त्यांचा फार मोठा वाटा आहे. 

  आजची सकाळ शुभ नाही. माळी साहेब आपल्या नाहीत.ही अतंत्य दुंखद घटना आहे.मृत्यू जरी अटळ असला तरी आपल्या तून आपल्याचं एका माणसाला घेऊन जातो ही बाब  जीवनाची क्षणभंगूरताच अधोरेखीत करते.मानवी जीवनाची ही पराधिनता सांगून जाते.

  माळी साहेब शरीराने आपल्यात नसतील पण त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील.तारूण्य ओसरलं तरी घडाघडी आणि जिद्द कशी उरात तेवत ठेवायची ,आपणच आपल्याशी प्रमाणिक कसं राहयच हे  त्यांच्याकडून शिकायच. मी एकदा त्यांना विचारलं होत," वीर चक्र भेटलं यासाठी तुम्ही अतुलनीय शौर्य दाखवलं असेलच ना?"

ते हासत हासत म्हणाले," सरजी असं काही नाही.मी माझं काम प्रमाणिकपणे केले.अतुलनीय वगैरे काही नाही.मी लढाईत खेळत नव्हतो.मी लढाई लढत होतो.माझ्या समोर माझे नाहीतर देशाचे शत्रू होते.माणसानं आपलं काम प्रमाणिकपणे करावं.लोक तुलना करत असतात.कुणाला पायाशी,कुणाला डोक्यावर,कुणाला ह्दयात जागा देत असतात.दुस-याच्या ह्रदयात  जागा मिळणे ही सात भारविकत घेण्या इतकी सोपी गोष्ट नक्कीच नाही.

त्यांच्या विचाराने आठवणीने ते कायम मानाच्या गाभा-यात तेवत राहतील.

माळी साहेब  अमर रहे

शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०२२

मरगळ


दिवा जळत राहतो.प्रकाश उधळत राहतो.निरतंर. जळता जळता दिवा काजळत जातो.नकळतं.त्याचं त्यालाच कळतं नाही.हळू हळू अंधूक होतो.काजळी त्याच्याच शरीराचा काही अंश असते.तोच अंश त्याचं तेज गिळतो. ती काजळी झाडली की तो पुन्हा नव्याने पेटतो.प्रकाशाने फुल्लारून येतो.पुन्हा जळत राहतो.अंधाराच्या उरावर प्रकाश रेषा अधिक गडद करत राहतो.



माणसाचं भी तसचं आहे ना? माणसाला येणारी मरगळ म्हणजे काजळीच की.

अधिकचं प्रकाशमान होण्यासाठी,तेवण्यासाठी  अंग झटकावचं लागतं ना? ती जगण्याची अपरिहार्यताच असते.आपल अंग झटकून पुन्हा तेवत राहवचं लागतं. आपल्याला काजळीने वेढलं तर गेलं नाही ना? अंग तर झटकून पाहूया.कालच्या पेक्षा आज अधिक प्रखर तेवायचं आहे ना? आपलं असणं अधिकचं ठळक करूया.

             शुभ प्रभात.

                                 परशुराम सोंडगे

 भेट दया :prshuramsondge.blogspot.com

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

ह्रदय गुंतता ह्रदय हे.(भाग 4)

 


रात्रीचे दहा तरी वाजलं असतील. तृप्ती नि निलेश मार्केटमधून घरी परतत होते.आज निलेशचा मूड ही चांगला होता. बराच वेळ फिरल्यामुळे एक थकवा आला होता.एका हॉटेल जवळ त्यानं गाडी पार्क केली. ते हॉटेलात शिरले. जेवायचं की नुसतं कॉफी घ्यायचं हे त्यांनी काहीच ठरवलं नव्हतं. तसं बाहेर येण्याचं काही प्लॅन नवहता.दोघ ही गप्पात मग्न होते. समोरच्या टेबला वर एक कप्पल होतं. अर्थात त्यांच्याकडं याचं लक्ष नव्हतं.ती बाई सारखं तयांच्याकडं पहात होती. तृप्तीचं लक्ष ही गेलं पणतिनं ते इग्नोर केलं. ती दोघाकंड पहात आहे की एकटया निलेशकडं पहात आहे याचा अंदाजला घ्यावासा वाटला.तिच्या समोर जो माणसू बसला होता. तो नक्की कोण असावा तिचा? नवरा की वडील? समोर छान्‍ अक्क्ल पडलं होतं. देह कसा बसा खूर्चीत मावला होता. इतकं तंतोतंत तो कसा काय खूर्चीत बसू शकला असेल? तृप्तीला प्रश्न पडला.


             जास्त वेळ त्याच्या कडं पाहण्याचा प्रयत्न तृप्ती करणार नव्हती. ते बावळट पुन्हा पहात बसायचं आपल्याकडं. आपल्या बायका, पोरी बरोबर आसल्या तरी बरीचं थोराडं माणसं दुस-याच्य बायकाकउं पहात बसतात. तृप्तीचा अनुभवच होता तसा. आज ती सावध होती. निलेश त्या गर्दं लाल.. वहईटं कलरचा स्कर्टं घातलेल्या त्या पोरीकडं पाहत होता. रेड व व्हईट कलर कॉम्बीनेशन जबरदस्त वाटतं होतं. ती आकर्शक दिसतं होती. निलेशला ही चूक ती करू देणारचं होती. निलेश वर सूड नाही उगवू शकली तरी त्यावर तोंड सूख घेणं तरी शक्यं होतं.


“फक्त कॉफीच की काही खायला मागवू?” निलेश असं म्हणतं आसला जरी त्याचं लक्षं तृप्तीकडं नव्हतचं.


“नको नको.. फक्त कॉफीचं.”


“का?एवढी का घाई करतेस?”


“का म्हणजे घरी कामं पडलीत.माझी वाट बघत.”


“ ऐ जाऊ दे. उग मूड नको घालवू?”


“ आता कसला मूड तुझा?”


“मूड कसला? थोडसं रिलॅक्स…”


“ बरं.. ठीक.. “ तृप्ती उठली नि उभी राहीली.तिला जागा बदलायची होती. आपल्या नव-याकडं कुणी स्त्री बघत असेल तर? कोणतीच स्त्री ते फार वेळ सहन करू नाही शकत. तृप्नं निलेशला उठवलं. त्याच्या जाग्यावर ती बसली.


“ का?


“तुझ्याकडं कुणी अस पहात असेल तर मला नाही आवडतं.”


“असं का?” निलेशनं वेडयाचं सोंग घेऊन पेंडगावाला गेला.त्यानं ओठात थोडसं हासू फुलवलं.


“आता तू काही वेळ रिलॅक्स.. बसू शकतो.” तृप्ती आपली नजर तयाच्या डोळयात रोखत बोलली. निलेशनं काही बोलण्यापेक्षा  गप्प राहणचं पंसत केल.


“असं काय पहातेस? वेडीस काय? लोक बघतील ना?”


“बघू दे. बायको मी तुझी? कुणी परकी नाही?”


“असं. अश्या ठिकाणी?


“लायन्सनं माझ्याकडं?” गळयातलं मंगळ सुत्रं त्याला दाखवत तृप्ती बोलली. त्याच्या बघत त्या मुलीकडं ही ती पहात होती.


“लायन्सं आहे मग विचार काय तुझा?”


“जी चाहता है.कीस लू.तिनं फलाइंग कीस केला. कीस त्याच्याकडं नि नजर त्या मुलीकडं रोखत ती बोलली. ती मुलगी उठून तरा तरा चालत आली. फरशीवर सॅडलचा आवाज आला. सा-याच्य नजरा रोखल्या. निलेश ही तिच्या चेह-यावरली भाव वेचत राहीला. कंबरेवर हात देउन त्या दोघासमोर उभी राहीली.


“निलेश तू?” त्याच्या डोळयात डोळा मिसळत त्या मुलीनं विचारलं.


“रेवा.. तू?” निलेशचं तोंड आश्चर्यानं वासलं होतं. तृप्ती नुसती पहात राहीली होती. तिला बसा म्हणण्याऐवजी हाच उठून उभा राहीला. तृप्तीला कळत नव्हतं आपण उभा राहवं की बसावं?  ती गोंधळली पण तशीच बसून राहीली. ही नक्की कोण? निलेशला नावासह कशी बोलू शकते. ते पण ऐकेरी.


“अरे,ही कोण? लग्न तर केल नाहीस ना?”


“येस, यु आर राईट. ही माझी बायको.तृप्ती.” रेवा हासली.छान हासली.आता समोरचं हासलं की आपल्याला पण हसावंच लागतं. तृप्ती ही हासली.


“तृप्ती, ही रेवा. आम्ही एका कॉलेजात शिकत होतो.”


“एका वर्गात पण असालच ना?” तृप्तीनं अंदाज सांगितला.


“नाही, आम्ही एका वर्गात नव्हातो. हा बदमाश सिनिअर मला.” भाडया म्हणाली नी खळखळून हासली.


“हा बदमाश? मला नव्हतं माहीत.” तृप्ती नटवं बोलली.


“कळेल. तसा तो कळयाला वेळ लागतो. हा दिसतो गोरा गोमटा पण ॲक्चयूली ही इज शॅमेलॉन.”


“शॅमेलॉन?” ही आपल्या नव-याला शॅमेलॉन म्हणते नि आपण खूशाल ऐकतो. निलेश खुशाल दात काढतोय. तृप्तीनं तिला बसायला शेजारची खूर्ची दिली.


“ऐ, व्हॉट सेक्सी चॉईस? व्हेरी क्यूटं..!!”ती इतकं बोलंल तरी निलेश फक्त हासला.एका स्त्रीनं दुस-या स्त्रीचं असं सौंदर्यं मान्य करणं जगातील दुर्लभ योग.तृप्तीला ही नवलं वाटलं. एवढं सुखद का बोलतेय ही?


“लव्हं मॅरेज की ॲरेंज…?” तृप्ती कडं बघत ती म्हणाली.तृप्ती तिच्याकडं पहात होती.


“तुला काय वाटतं?” खूर्चीवर टेकत तो बोलला.


“तू गटवल असणार हिला?”


“राँग. हीनंच प्रपोज मारलं मला.” आपली कॉलर ताटं करत निलेश बोलला.


“काय म्हणू तूला?  नुसतं तृप्ती म्हणू?”


“दॅटस्‍ ओके.“ ती नुसती हासली.


“खरं बोलतोय हा? तू प्रपोज मारल त्याला?”


“नाही?ॲरेजं आमचं.” तृप्तीनं अर्धंवटच बोलणं पसंत केलं. थोडसं हासून पाहीलं.


“कॉलेजात भेटला असता तर केल असतं प्रपोज?”


“ ऑफकोर्सं…”


“रेवा काय हे? काय बोलतेस? बायको माझी ही.”


“असेल तुझी बायको पण माझी कुणीच नाही का?”


“तुझी पण आहे ना”


“कोण माझी?” त्याच्या चेह-यावर नजर स्थिरं करत ती बोलली.


“तुझी कोण?” निलेश थोडा कन्फयूज झाला. त्याला काहीचं कळतं नवहतं.


“ बुध्दू, मी कोण तुझी. फ्रेंङ..फ्रेंडच्य बायकोला काय म्हणायचं…”तिनं पण बराच वेळ डोकं चालवून पाहील. उत्तर नाही सापडलं.


“अशी काही नाती असतात त्यांना आपण नावं नाही देऊ शकत. नाव नाही देता आलं म्हणजे नातं नसतचं असं नाही?” तृप्तीनं त्यांची कोंडी फोडली. अजून जास्त त्यांची फजीती करायची नव्हती तिला.


“जाऊ दया ते. आम्ही दोघी फ्रेंङ” रेवानं तृप्तीचा हात हातात घेतला.तिचा हात गरम होता. ताप जाणवा इतका उष्णं होता. दोघानी ही आगह केला.  कॉफीची ऑडर पण झाली. इकडचंतिकडंच बराच वेळ ते बोलत राहीले. अर्थात.. त्या  दोघांच्या ही चेह-यावरील सूक्ष्म भाव तृप्ती टिपतच होती.


“अरे ,आपण इथं असं बसलोत. ते एकटेच…” तृप्तीनं रेवाच्य नव-याची काळजी केली. ही त्याला आपल्याज जॉइन का करत नाही? तृप्तीला प्रश्न पडला.


”रेवा,ओळख नाही करून देणार तुझ्या नव-याची?”


“नाही? ते नाही येणार.तो नवरा नाही माझा…”


“मग?”


“पुरूष फक्त कुणाचा तरी नवराच असतो, असं नाही?”


“बॉय फ्रेंड?”


“काही नात्यानं लेबल लावता येत नाहीत नि काहीनां आपण ते चिकटू शकत नाहीत.”.


“ तू स्पष्टं नाही बोलू शकत?


“निलेश… सा-याचं गोष्टी स्पष्टं नाही करता येत माणसाला.सॉरीं..!! मी तुम्हला डिस्टर्ब केला. भेटू पुन्हा .. बाय..” ती दोघाकडं पाहून  गोड हासली. अर्थात ते अस्स्लं नव्हतं. नटवं होतं.मन आतून चिरतं गेलं तर हासणं तरी कसं गोड  राहू शकत? तृप्ती व निलेश त्यांच्याकडं पहातच राहीले.आता  रेवा त्यांच्याकडं पाहणारचं नव्हती. तसं ठरवलचं होतं तिनं.  तृप्तीचं व निलेशेचं ही पाय जड झालं होतं. तृप्तीच्या मनात असंख्य प्रश्न उठले होते.


                      बाईकवर ते घरी आले. तृप्ती अबोल झाली होती. निलेशला अनेक प्रश्न तिला विचारायचं होतें. तो त्याची उत्तर देईल की नाही .काही माहीत नव्हत. आता घरात आल्यानंतर असे प्रश्न  विचारणं शक्यं नवहतं. सार्वजनीक ठिकाण जो एकांत भेटतो तो  घरात शोधवा लागतो. एकांतीची वाट पहावी लागते. रात्रच्या अकरा वाजत आल्या होत्या. निलेशच्या डोळयात झोप तरळली होती. तृप्ती जवळ आली तस तिच्या कुशीत शिरण्याचा प्रयत्न त्यांन केला.तिनं तो हाणून पाडला. गालाचा चंबू केला. बायकांचा हा नखरा लोभस आसला तरी अश्या एकांतात  फारसा सहन होत नाही. निलेश हताश झाला होता.तृप्तीनं सुरक्षीत अंतर घेऊन त्याला विचारलं,” कोण ती?”


“आम्ही कॉलेजाला होतो एकत्र. अर्थात.. ती आमच्या वर्गात नवहती.”


“वर्गात नसेल ही.. पण."


“मग पण काय?”


“कोण ती?”


“तू समजते आहे तसं काही ही नाही."


“मी काहीच समजत नाही. मला खरचं काही समजेनास झालं.”


“जाऊ दे ते.ती नको होती भेटायला.”


“तो तिचा नवरा पण नव्हता? मग कोण होता तिचा तो?”


“जाऊ दे ते. मी तिच्या बाबत एवढचं सांगू शकतो. ती अनेक दुदैवी मुली या जगगात आहेत. असतात तशीचं ती एक अभागी मुलगी आहे. बस्सं.”


“अभागी?"


“तो तिचा नवरा नव्हता.”


“बॉय फ्रेंड सोबत फिरण्या इतकी ती लहान पण नाही.”


“तो तिचा बाय फ्रेंड पण नव्हता.”


“मग कोण होता?"


“तो कसटमर असेल तिचा.”


“क्काय? तसली थर्डं क्लास ती? तसल्या बाया बरोबर  ओळखीत तुझ्या?”


“आमच्या कॉलेजीची हुशार पोरगी होती ती.”


“निलेश कळत का तुला? कसल्या बाई बरोबर ओळाख तुझी? म्हणे हुशार पोरगी होती."


“आपण आपला भुतकाळ  नाही पुसू शकत.बिच्चरी रेवा…” निलेशचा स्वरं गहिरा झाला होता. नुसतं एक पुरूषाकडं पाहीलं म्हणून आपलं थोबाडं रंगवणारा निलेश इतका इमोशनल होऊ शकतो?


“खरचं ना तुझं प्रेम नाही ना तिच्यावर..?”


“ तृप्ती, काळजाचा पार चेंदामेंदा झालाय तिच्या.ती कधी कुणावर प्रेम तरी करू शकेल का?”


“ मग का बघत होतास तिच्याकडं…”


“नजरेत फक्त प्रेम नि वासनाच नसते..कारूण्याचा पाझर ही डोळयातूनच झरू शकतो.”


“ असलं कारूण्यं ही तुझ्या डोळयातून नाही पहावत मला.”


“ का?”


“का म्हणजे मी बायको तुझी? फक्त माझा तू.. फक्त माझा.” हे बोलताना ती त्याच्या छातीशी बिलगली. अजून त्याला तिचं करण्यासाठी त्याच्या हवाली झाली. दोन शरीर एक झाले तरी मन मनाचं मिश्रण होतचं असं नाही.तिनं शरीर निलेशच्या हवाली केलं पण मनात अनेक गोष्टींच्या लहरी उठत राहील्या. रेवा,तिचा ढेरीवाला कस्टमर…  निलिश नि  रेवाचं नेमके संबंध कसें असतील? या संशयाचं प्रंचड वेगाने धावणारे विषाणू..  तिचं डोकं  खाऊन टाकतील की काय? असं वाटलं.खिडकीतून डोकवणारा अकाशतील चंद्र.. चांदण्या…  आदित्य.. त्याची मृत्यीशी चालू असलेली  झुंज.आदित्यचा चेहरा तिच्या डोळया समोर आला. आदित्य असा.. यावेळी तरी नको आठवायला.. मनातलं कुणाला कळत? आपल्या डोळया समोर जसा आदीचा चेहरा हालत नाही तसाच रेवाचा चेहरा… निलेशच्य मनात असेल का? का दुस-या कुणाचा?निलेशची मिठी अजून ही सैल नव्हती झाली.


 (पुढील भाग लवकरचं )

संशयाचा व्हायरस

  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या न...