हा मराठी साहित्य, कविता, कथा, ललित लेख आणि सामाजिक विषयांवरील विचारमंथन यांसाठी एक उत्कृष्ट मंच आहे. येथे तुम्हाला भावस्पर्शी प्रेमकथा, प्रेरणादायी लेख, राजकीय विश्लेषण, तंत्रज्ञानविषयक माहिती आणि साहित्यिक चर्चांचे वैविध्यपूर्ण लेखन वाचायला मिळेल. मराठी भाषा आणि संस्कृती जोपासण्याचा आमचा प्रयत्न असून, नवोदित लेखकांसाठी हे व्यासपीठ खुले आहे. नवीन साहित्य वाचण्यासाठी आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला आजच भेट द्या! मराठी ब्लॉग, कथा आणि कविता, मराठी साहित्य, ललित लेख, प्रेरणादायी लेख,मराठी वेबसाईट
रविवार, १६ मार्च, २०२५
श्रावणी बाळ ,'मला माफ कर 'भावूक फेसबुकवर पोस्ट करत संपवलं जीवन.बीड पुन्हा हादरलं.
गुरुवार, १३ मार्च, २०२५
शिमगा: बोंबलायचा आणि धम्माल करण्याचा सण..!!!
एकाचं एक सण असा होता तो आमच्यावर फुल डिपेंन्ड असायचा.पोरा नि जर शिमगा लयं सिरीअस नाही घेतला तर आमच्या भेटू पाटलांकडून लयं टेन्शन यायचं.लाकडं गोव-या कश्या आणणार.लोक लयीत दिलदार असत्यात.त्यांना म्हटलं कुणी लाकड किंवा गोव-या आणा तर कोण आणतोय. सारं हात हालवली येणार.त्यामुळे पाटलांकडून आमची म्हणजे बाप्पाची व परम्याची गँग लागे.तेव्हा सरकारला नापासाची चिंता नसे.आमचा बाॅस बप्या सलग पाच बा-या नापास झाला होता.त्याच्या बरूबरची पोरं पार दहावीला गेले.हा आमच्याच वर्गात.सा-यात टोंगळा..!! त्याची सरकारला नाही व कधी त्याच्या बापाला ही नापास होतोय म्हणून चिंता वाटली नाही. बप्या तर डेंजरस माणूस होता.
टेन्शन लेने का नही देने का? हा त्याचा मंत्र.
भैरू पाटील देई आम्हाला चिमकून.पाटलाचा पाठींबा भेटला वर आम्हाला कोण आठवीत असतं? तेव्हा कॅलेंडर हा प्रकार नव्हताच.मग शिमगा जवळ आलाय हे कसं कळणार? गोव-याची कलवड व लाकडं लोकांनी लपायला सुरू केले की,आम्हाला क्लिक होणार.शिमगा आ रहा है. करो तय्यारी..!!
आमच्या गँगचा प्रमुख बप्या त्याला टेन्शन येणार गोव-या व लाकडं जर नाही चोरली तर शिमगा कसा होणार? मग काय शाळा सुटली की,आमचं हे धाडसत्र सुरू होणार.कुणाच्या परसात शिर, कुणाच्या गोठयात शिर.कुठून कुठून गोव-या सरपण आणलयंच जायचं.जाताना लपून छपून जायचं.येताना मात्र बोबलत यायचं.आम्ही सारी होळीची लेकरं....
आडव येईल त्याला मूठ मूठ खापरं. बोलला आता..!!
कधी हरताळ खेळत जायचं.लाकड घेऊन यायचं.छत्रपती महाराजांचा गनिमी कावा मास्तर आम्हाला शिकवी.त्याचा उपेग आम्ही शिमग्याच्या सणासाठी वापरतं.गनिमी कावा करूनचं आम्ही हे करत.सुरांची लूट केल्यासारखं आम्हाला ते वाटे.त्यात बाप्या आणि गँग कुणाचा कसूर भी काढत.घराच्या भांडणाचा भी राग निघ.एखादयाचा आख्खा कलवड खल्लास करायचा.बोलायची सोय नाही.होळीचं लेकरं...!!कोण ऐकून घेतेय? गोव-या लाकडं नाही आणलं की होती कशी करणार? आमच गॅग जुळली की अजून एक दोन गँग ही आम्हाला येऊन मिळत.
होळी है बुरा न मानो ही बोंब तर ठरलेलीच असे.
आम्ही असं चोरून गोव-या वगैरे आणतो हे आमच्या घरी ग-हाणं केलं.कुणी टोमणं मारलं,तर मग मर गया वहो. आमच्याशी वाकडं,म्हंजी परसात नाही लाकड . असा पंगा घेणारं कुणी भेटलं तर त्याच्या मागे आम्ही बोंबलत चालणार. त्याला पार जेरीस आणणार.
गावात आम्ही असं मेहनत करीत म्हणून होळी पेटवली जायची. गोव-या लाकडं आणण्यचं कोण? भला मोठा डोंगर रचावा तसा लाकड व गोव-याची होळी रचली जाणार.पाटील ती पेटवणारं.तिचा डोंभ झाला की पोरं...नुसते बोंब मारत. त्या भोवती नाचतं.
एक होत पोरी आणी बाया तिकडं फिरकत नसतं.लयी घाण घाण...शिव्या पोरं देणार. घाण बोलायचं.बोबंलायचं. उड्या मारायचं...!! नुसती मज्जाच मज्जा...!! पोरं शिमग्याची दिवशी लयी भी उंडारू नाहीत म्हणून शाळाला मास्तर सुट्टी देत नाहीत अस आम्हाला पक्कं वाटत होतं. शाळाला सुट्टी नाही दिली तरी आम्ही थोडचं शाळेचं तोंड बघणार असतो.एखादा शाळात गेलाच तर सारे जण त्याला घेरात घेई.त्याला कशाची तलप होणारयं पुन्हा?
लाकडं गोव-या चोरी न करता मागून घ्यावीत बोंब मारू नाही असे छान छान सुविचार आमचे सर सांगत पण आमच्या गावची लोक फार दलिदंर ते सहजा सहजी लाकडं नि गोव-या देत असतेत व्हयं? सरला काय माहितीयं? पाटलांचा भी रेटा असचं की.लाकडं नि गोव-या चोरलची का पण लय भारी मज्जा असते?होळीच्या लेकराला कुणीचं काय म्हणतं नसे.घरी एखादं कलागत व्हायची पण त्याला काय आम्ही जुमानत नसतं.घरी जायचं.पोळी नि दूध वरपायचं? आलेच बाहेर.भारी मज्जा असे.गोकूळया लयं भारी सोंग घेणार. पारध्याचं. झोळी घेणार.. फाटकं तुटक बंडी घालणार." तुकडा वाढं ग माय म्हणणार. पालख्यांच्या आवाज काढणार. त्याच्या मागे चिगुरखाना असे. नुसती फिदीफिदी हसतं.
तेव्हं फक्त भज्याची भीक घेणार. दुसरं काहीचं झोपी घेणार नाही.
"आयला,हयो लयीचं माजुरा पारधी दिसतोय लका." असं कुणी म्हणं.तसं गोकुळात फुगत असे.घरोघर फक्त भजं मागत फिरत चांगल पाचपन्नास घर घेतली की ते साँग कुठं तरी थांब. त्याला रामदास्या हेल्प करी.भजाचं लयी मोठा स्टाॅक त्याच्याकडे होई पुन्हा आमची गँग त्या भजावर तुटून पडे. गोकुळात आमचा बाॅस असे.अशी बोळीतले सोंग सारे मंदिरापाशी येतं.मग ऐका ऐकाच सोंग साजरं होई.ते सोंग म्हणजे नुसता तमाशाचा असे.स्क्रिप्ट नाय आणि ब्रिप्टं नाय.लगेच सुरू.
एखाद्या वर्षी जर ह-या ना-याचा तमाशाला आला तर सोंग आटोपते घेतं.तमाशाला रंग चढे.तारी व वैशी या नायकीणी पारं माणसाला येडं करून सोडीत.त्यांच चावट बोलणं.पोर सोरं- पोरी बाकी म्हतारी कोतारी तरणी ताठी माणसं एन्जॉय करीत.संस्कार बिस्कारं अश्या भानगडीत कुणी पडतं नसे.तमश्या नाही आला की सोंग रंगत जाई.ना-याचं सोंग ठरलेलं असं.ना-या खर तर सालगडी पण सोंगात मालक होऊन राहयचा.त्याचा लयं रूबाब असे.त्याचे तीन सालगडी असत. गडयाच व मालकाचं हे सोंग फारच रंगे.मालक गड्याला नुसतं पळी.गडी भी सटकरं असावी लागतं. नुसता पळू पळूच घाम निघे.
माजं घोंगड कुठे रे? मालक जोरात घोंगड फेकून देई. गड्याने घोंगड आणून द्यायचं तेव्हां गडायाचं लंगोट फिटायचंमाझं लंगोट फिट रे.
माजं गठूठं कुठं रे... मालक भिर्र दिशी गुठंठ फेकून द्यायचा. त्या तीन गडयाची हालहाल करून सोडं. लोकांची मात्र हासून हासून पोटं दुःखाची येळं येई. नुसता हशाच हशा..!!! शिमगा असा फुल्ल एन्जॉय करतं.दुस-या दिवशी तर धुळवडचं.कसले रंगबिंग आलेत.चिखूल, रेंदा आणि गटारचं पाणी यानचं माणस एकमेकाला बरबटून घेतं.सिलव्हर कलर फासून कुणी ही कुणाचं माकडं करून टाकत असे.
गडी माणस ब-यापैकी चंद्रावर गेलेली असतं. ते हवेतच चालतं.त्यात छुटूरमुठूर कलागती भी होतं पण बेवडयाच्या कलागती कोण सिरीअस घेतयं? माणसाला सारं हवं असे.आता यातलं काहीचं राहिलं नाही.सारं सारं संपून गेले आहे. शहर बदली आहेत तसे गावं ही बदली आहेत. गोव-या लाकडं आता पाहयाला भेटत नाहीत.पर्यावरणाचं पण टेन्शन नव्हतं तव्हा.आता सण आला की पर्यावरणस्नेही नावाचे प्राणी येतात जगाची चिंता करत बसतात असले चिंतातुर जंतू फार नव्हते. गावची पंग झालेली माणसं जग बुडत म्हणल्यावर कंबर कसून कामाला लागली असती.नाय तरी हे जग कुणाला पायजे असते?
आता माणसं सोशल मिडीयावर होळी साजरी करतात फेसबुक व व्हाटस् अप वरून शुभेच्छांचा धो धो पाऊस पाडतात.होळीच्या शुभेच्छा देतात. दुर्गुणांचा नाश केला जातो. आपण आपले दोष जाळून टाकण्यासाठी होळी पेटवायची असते.असे सारे म्हणतात.होळी तर दरवर्षीच येते.पेटते पण सद्गुणी माणसं कुठचं दिसतं नाहीत. नेमकं होळीत आपण काय जाळत आहोत?
होळी नि संस्कार ? हे नाय बुवा आपल्याला पटतं.
होळी फुल्लं एन्जॉय करायचा सण..!! उपदेशाचा डोस पिण्याचा नाही.
मस्ती करायचा सण..!!
आता ठरवा.आपुन काय करायचं?
सोमवार, १० मार्च, २०२५
सिनेमाचे पडद्यावरचे पात्र आणि समाजाची भावना: एक वास्तव विचार
बरेच माणसं आता मेंदूचा वापर कमी करू लागले आहेत.
ह्रदयचं त्यांच मेंदूचं काम करू लागले आहेतं.
ह्रदयाला काही बुध्दी नसते.तिथं नुसता भावनांचा कल्लोळ असतो.
मेंदूचं कन्फ्यूज झाला आहे.
त्यामुळे बरीचं माणसं विचित्र बोलतात.वागतात.
त्या जुवेकरचचं घे ना?
तो चक्क अक्षय खन्नाला अजून ही बोलत नाही.
का म्हणून काय विचारता ?
अक्षय खन्नाने औरंगजेबाचा रोल केलाय ना? नुसता रोल करेना का?कुणी कुणाचा ही रोल करते पण इतका हुबेहुब रोल करत असतेत का कुठं?
काय डेंजरस रोल वठवला गड्यांनी? तो खरचं औरंगजेब वाटतोय.
तो रोल केल्यामुळे भयंकर राग आलाय त्या जुवेकरला त्या अक्षय खन्नाचा.त्याने (म्हणजे औरंगजेबाने अक्षय खन्नाने नव्हे) इतका शंभू महाराजाना त्रास दिला.त्याला कसं बोलायचं? नुसती चीड येते हो त्याची.संताप पण.
आता चित्रपटात माणसं रोल करतात म्हणजे...?? ते खरे थोडेच असतात?जुवेकरला हे मान्य नाही. खरचं तो नाही बोलला त्या अक्षय खन्नाला.अजून पण नाही बोलत तो त्या खन्नाला.
त्या विकी कौशल सोबतचं तो राहयचा? असचं नाही.विकी कौशल म्हणजे साक्षात शंभू राजेच त्याला वाटत असतील.असं नक्की त्याला फिलींग येतचं असणार.अक्षय खन्ना जर त्याला औरंगजेब वाटत असेल तर विकी कौशल शंभू राजेच वाटत असणार ना? आणि रश्मिका त्याला महाराणी येसूबाई वाटत असणार.
असं एकटं जुवेकरलाचं होतं असं नाही अनेकांना होतं आहे.
नाटकातली सिनेमातली पात्र खरी वाटू लागतात तेव्हा त्या नाटकाचं त्या सिनेमाचं.खर तर ते यश असतं.त्या अभिनयाचं यश असतं. पूर्वी ही खलनायक स्टेजवर आले की माणसं ओरडतं,त्याला शिव्या द्यायचे.
अमरीश पुरी हे कायम खलनायकचं असतं.त्यामुळे त्याला ही लोक खलनायकचं समजतं. वास्तविक जीवनात त फार हवे होते. तेच शक्तिकपूरचं झालं होतं.अनेक मुली महिला त्याला घाबरतं.तो कायमचं बलात्कार करी.शक्तीकपूर चित्रपटात,असला की एक बलात्कार पाहावासा लागे .रम्मा रेडी नावाचा एक साऊथचं खलनायक होता. त्याचा प्रतिबंध चित्रपटातील नाना स्पॉट हा डायलॉग खूप गाजला होता.तो नुसता पडद्यावर दिसला तरी माणसं थरकाप असतं. रस्त्यावर चालताना लोक त्याच्या गाडी पाहिली की बाजूला होतं. त्या गडयाचा दरबाराची तसा होता.
प्रभू रामचंद्र चंद्राची पात्र करणारा त्रिवेदी असो की द्रौपदी साकारणारा रूपा गांगुली असो कि रामायणातील सीता करणारी दीपिका असू लोक यांची पूजा करतात. नितीश भारद्वाज लोक कृष्ण समजून बसले आहेत.
आमच्या गावाची त-हा विचारूच नका.आमच्या शाळेत सैराट चित्रपटावर एक मुलांनी आणि एका मुलींनी डान्स केला. पोरं झक्कास नाचली.
पंचाईत ही झाली की ती पोरं शाळेत आली की मोठी गंमतच होई. सारं जगाचं त्यांच्या मागे लागे.
पोट्टी नुसती ओरडतं. अर्चीन परश्या...अर्चीन परश्या..!! ते रडकुंडीला येतं.हसावं का रडावं हेच कळत नव्हतं.
नाटकाचा आणि सिनेमाचा आपल्या भारतीय समाजावर फार होतो. सहसा युवा वर्ग सिनेमातल्या हिरोला फॉलो करतात.आज ही मालिकेतल्या कपड्याचे दागिन्यांचे डिझाईन्स महिला फॉलो करतात. तात्पुरतं नाटकाच्या सिनेमाच्या विश्वात आपण वावरत असतो.
ते काही तासांत असावं. माणसानं आपल्या वास्तवात यावं ना? तसं घडतं नाही.माणसं त्याचं व्यक्तीरेखात अडकून पडतात. त्यामुळेच केरला फाईल,काश्मीरी फाईल व अलिकडचा दीघे नंबर एक दीघे नंबर दोन असे चित्रपट राजकीय लोक काढतात व आपली वोट बॅक मजबूत करतात.
त्यात त्यांना यश ही येते.
माणसं भावूक होतात.आपली सदसद्विवेक विवेक बुध्दी विसरून जातात.त्यामुळेच सुपारी बाज इतिहासकार आणि अभ्यासक यांच फावते आहे.
मला या सा-याचं टेन्शन्स नाही मला त्या अक्षय खन्नाचं टेन्शन्स आले आहे.
आता औरंगजेबाच्या कबरीचं ही राजकारण रंगलयं.कबरं येथे का ठेवायची?ती उकडून टाकावी.
औरंगजेब हा आपल्या स्वराज्याचा दुश्मन होता.शंभू राजांना त्यांनी हालहाल करून मारलं.
त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात का ठेवायची? आजही काही लोक तिथे नमाज पठणाला जातात चादर चढवतात.औरंगजेबचं,उदात्तीकरण करणारे लोक आता,असूच कसे काय शकतात? हे प्रश्न काही वावगे नाहीत. आपला
इतिहास आता ख-या खोटयाच्या तावडीत सापडलेला आहे. आता काय करायचं?
हे असचं चालू राहिलं तर?
अक्षय खन्नाचं काय होईल याची मला चिंता वाटते.
त्याला सारेच क्रूर औरंगजेब समजात.
त्याच्या जीवावर ही भूमिका बेतू नाही.
दुसरं काय?
रिश्ते वही सोचं नई...!!
जमाना ही दिलवालों का है|
दिमाग का कोई काम नही.
परशुराम सोंडगे बीड
बुधवार, ५ मार्च, २०२५
मृत्यूही ओशाळला होता…! | संतोष देशमुख हत्या आणि समाजाचा संवेदनाहीन चेहरा"
कालचा दिवस इतक्या दुर्दैवी होता की,मी ते संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहू शकलो.आता ही माझ्या डोळयासमोरून ते दृश्य हालत नाही.डोळयातील आसवांना खंड नाही.मेंदूत चीड,संताप आणि हाताशपण्याच्या लाटा उसळत आहेत.
मीच माझ्याचं चेह-यावर का थुंकत नाही? समग्र माणूस जातीवर ती गिधाडे हासत होती.
पुराणातही राक्षस असाचं मृत्यू एन्जॉय करतं. असं अनेकदा ऐकलं होतं. वास्तवात कुणी इतकं क्रूर असू शकत? ह्या राक्षसाचे चेहरे डोळयासमोर नंगानाच करत होते.
माझी,आज ही नजर त्या रक्ताच्या थारोळ्यात अडकलीय... संतोष देशमुख यांचा निर्घृण खून... त्यांचा पडलेला निपचित देह....!!
...आणि त्याभोवती उभे असलेले ते भावशून्य चेहरे..!! समग्र,माणूस जातीच्या चेह-यावर थुंकणारे ते नराधम.
तो चेहरा कुणा माणसाचा नाही.ते मुत्तेमवार होते इथल्या समाजव्यवस्थेवर,पोलिस यंत्रणेवर.ते निपचित पडलेले प्रेत आहे इथल्या माणुसकीचे.
कुणीतरी फोन काढून फोटो घेत होतं,कुणीतरी "व्हायरल करू" म्हणत होतं, कुणीतरी त्यांच्या जखमांची मोजदाद करत होतं...आणि कुणीतरी निव्वळ तमाशा पाहत होतं.,ते पण ऑन लाईन.ते हसू क्रूर होतं.ते कुठल्याही शस्त्रापेक्षा धारदार होत.काळीज चर्र चिरत गेलयं भाऊ.
हे हात इतके क्रूर का झाले? त्यांची ह्रदय दगडाची का झाली? का आटून गेली माणुसकीची हळवी ओल त्यांच्या ह्रदयातली? मृत्यूचं दान ही का त्या दुर्देवी जीवाला ते देत नव्हते?
सत्तेतून पैसा,पैशातून सत्ता,अंगात माज.सत्ता रखेल झाली. त्या भ्रष्टतेच्या रगीवर,उशीवर हे सैतान पोसत गेली.उन्मतपणा असाच पोसत गेला.
आता सावा सारखं त्यांची फाशीच मागणी तेच करतील. दगडाच्या काळजाने संवेदना ही व्यक्त करतील.
ही सारी जागी जाणती माणसं थुंकतं का नाहीत त्या नराधमावर? सत्तालोलुप त्या गिधाडांवर?
मला नक्की आठवतं.माझी तीस वर्षा पुर्वी ताई वारली होती.तिचा चेहरा....शेवटचा पाहण्यासाठी मला असचं त्या प्रेतापुढे उभं केले होते.मी डोळे झाकून घेतले होते.मला नाही पाहयचा चेहरा तिचा.आयुष्यभर नाही तिचा हा मलूल चेहरा मी माझ्या अंतरंगात साठवू शकत?
का?
मला तिचा कायम चेहरा हसरा चेहरा माझ्या ह्रदयात कोरून ठेवायचा आहे.
त्या वैभवीला ... तिचा वडिलांचा हासरा चेहरा आठवेल का? तिच्या अंतरंगात काय काय चिखल्या गेलयं?
उरात हे धगधगत दुःख घेऊन तिनं असच जगायचं का?
एकेकाळी मृत्यूला शोकांतिका समजलं जायचं. आज मात्र तो केवळ एक "कंटेंट" बनलाय... सोशल मीडियावर शेअर होणारा, मिम्समध्ये रूपांतरित होणारा, आणि काही तासांत विसरला जाणारा... जसा संतोष देशमुख विसरला जाईल. नराधम पुन्हा नंगानाच करतील तुमच्या आमच्या छाताडावर.
संवेदनशिलतेपेक्षा तुम्ही जर सत्तेच्या खुर्च्या उबीत बसणार असाल तर काय होईल?
या देशात नराधमाच्या आरत्या होत असतील तर दुसरं काय होईल?
सोमवार, ३ मार्च, २०२५
स्वारगेटला शिवशाही बसमध्ये झाला तो बलात्कार की लफडं? का पेड सेक्स...??? संशय कल्लोळात महाराष्ट्र.
पहाटेची वेळ आहे.गजबजलेलं पुण्यातील स्वारगेट बस स्टेशन आहे.
एक तरूणी येते आहे. स्कार्पने तोंड बांधलेले आहे.तिला फलटणला आपल्या घरी जायचं आहे.गाडी लवकर येत नाही.बस सहसा वेळवर येत नाहीत हे सर्वांचा अनुभव राहिलेला आहे.त्यामुळे ती बेचैन होते.असं वाट पाहून पाहून थकल्यावर झालं की माणूस हैराण होतो.तसं ती ही झाली.बस येणार आहे की गेली असेल? हा प्रश्न माणसाला फार त्रासदायक असतो.बसच्या वे॓ळा तर विचारूच नका.स्वारगेट स्टेन्शनच तर माझा वैयक्तिक अनुभव फारच वेगळा आहे. असो.
तिला एक तरूण भेटतो.त्याला ती विचारते.,कारण,तिथूनही बसलेले नीटस सांगत नाहीत.कुत्रे जसे भुंकणारे तसे ते येणा-या माणसावर नुसते तुटून पडत असतात. चौकशी कक्षात चौकशी नको रे बाबा..!!
"ही गाडी फलटणाला जाते आहे.अस तो सांगतो.हायसं वाटतं.बस स्थानकावर फक्त तुम्हाला हायसे वाटू शकते. या गुड फिलींग तिथे काय असू शकते?ती गाडी शिरते. बसते. पहाटेचा वेळ आहे.बस रिकामी आहे येतील पॅसेंजर अशी ती वाट पहात बसते.
आपल्यासोबत पुढील काही मिनिटांत काय घडणार आहे हे तिला माहित नाही. तसं ते कुणालाचं कळत नाही.
तिला तरी कसं कळणार? नंतर तो आला.तो लांडगा होता.,तिचे लचके तोडू लागला. एखाद्या स्त्रीसोबत या पेक्षा भयंकर काय घडू शकते.तेच घडले.तिचं सर्वस्व लुटलं.तिला न ओरडता आलं ना बोलता आलं.आपली इज्जत लुटली हे सहज पुढे येऊन कोण सांगते? स्त्री असेल किंवा तिचं कुटुंबातील लोक असतील? हे इज्जतीला फार घाबरतात. अश्या हजारो कळ्यांचे टाहो हुंदक्यातच विरतात. पुन्हा जीवे मारण्याचा दम. ती भितीने थरथरतं बाहेर येते.
ती गाडीतून उतरते.तो नराधम निघून जातो. त्यानं डाव जिंकलेला. ताव मारलेला असतो. ती मस्ती काही औरचं असते.
ती येते पोलिस स्नटेशनला.गुन्हा नोंद होतो.तो कोण माहित नाही.हल्ली पोलिसांवर विश्वास नाही. तिनं गुन्हा नोंदवण्याचा धाडस तरी केले.तिला हे पण माहित नव्हतं की तो कोण आहे? तो कोण असू शकेल? तो भयंकर क्रूर माणूस होता.तो हैवानचं होता. हे तर तिनं अनुभवलचं होतं.त्याच्याशी पंगा घ्यावा लागला.तो मोठ्या लोकांच्या बॅनरवर झळकणारा जीव जंतू आहे.त्याला पळून जाण्यासाठी त्याला इथले बिलंदर पुढारी मदत ही करू शकतात. हे तिला माहित नसतं.तिचा विश्वास होता.इथल्या कायद्यावर पोलिसांवर, घटनेवर...!! ती गुन्हा नोंदते. गुन्हा नोंदवला की,
सुरू झाल्या ब्रेकींग न्यूज.न्यूजचं न्यूज..!!!बातम्या या एन्टरटेनमेंट साठी असतात का? नसतील ही..!! पण आमचा छान करमणूक होते.बोथट झाल्यात जाणीवा आमच्या.एकच सुरू होते. सणसणाटी.
(सौजन:टी.व्ही 9 मराठी)
वाजवा रे वाजवा...!!! बलात्कार झाला आहे.मिडीयावर सध्या सारं असं सुरू आहे.पोलिसांनी त्याची ओळख पटवली.त्याच्या गावातूनच त्याला उचलला.तपास सुरू झाला.बातम्यांचा धुमाकूळ सुरू झाला.
एवढं सारं घडते आहे.चला,त्याचं थोडं राजकारण करू.खेळ सुरू झाला.
बलात्कार करताना ती ओरडली का नाही? हा बलात्कार कुणी पाहिला का नाही? तिचं कपडे फाटले का नाहीत. बचावासाठी तिनं काहीचं प्रयत्न केला का नाही?
प्रश्नचं प्रश्न. !!!
हे सारं पुण्यात घडते आहे. सारख्या बातम्या सुरू आहेत. पुणे पण बदनाम होऊ शकते ना? बीड सारखं? पुण्याच्या नेत्यांना टेन्शन..!! त्या एसटीत जाऊनचं मिडीयाचे कॅमेरे धडकले.काय काय सापडलं त्या एसटीत? ओढणी..कंडम्स...साडया .अजून काय काय?स्वारगेट सारख्या स्टेन्शनची तर पारचं नालास्ती केली. गपा ना यार..!!या शहरांना जिल्ह्य़ांना पण इज्जती कधी चिकटवल्या. कुणी चिकटवल्या त्या ?
प्रत्येक गोष्ट घडली कीच राजकारणी लोकांनी बोललं पाहिजे का?किती बोलतात हे लोक?कायदा,तपास काही असतो की नाही?
अरोपीचे वकील दावा करतात संबंध झाले पण सहमतीने.
आता खरं कुणाचा? तिचं का त्याचं?
बलात्कार झाला की, लफड होते ते..का पेड सेक्स?
एका पुढारनीने तर निकाल देऊन टाकला.
पैशाच्या व्यवहारातून सारं हे झालं.
होऊ दया तपास... लागू द्या निकाल... इतका दम कुणाला?
शनिवार, १ मार्च, २०२५
अनोळखी सखी: जिंदगीची हुरहूर
बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२५
गुंतता ह्रदथ हे..!! भाग 5
भाग 5
तृप्ती हो ना?रात्रं झालीय.” त्याचं लक्षं नव्हतं तिच्याकडं.तृप्ती फ्रेश झाली होती.तिनं कपडे ही चेंज केलं. निलेशचं चित्तं कुठं जाग्यावर होतं? रेवाच्या अनेक छबी त्याच्या डोळया समोरून हालत नव्हत्या. खरतर त्याला यातलं काहीचं आठवायचं नव्हतं पण आठवणीची पण उबळ असेल न थोपवता येणारी.आठवणीची मळमळ त्याला सहन होत नव्हती.माणूस त्या उपसून नाही टाकू शकतं.
रेवाची अनेक वर्षची रूप त्याच्या डोळयासमोर उभी राहिली. हासरी ,लाजरी,भित्री,रागातली,प्रणयातूर,लटक्यारागतली व संतृप्तं.अश्या अनेक भाव मुद्रा तिच्या निलेशच्या मनावर उमटतं. काही क्षण त्याला वेडावत नि अदृश्य होतं. रेवा अशी आज नको होती भेटायला. आपल्याला हवं तसचं सारं नाही होऊ शकतं. ती अचानक भेटली. भेटली तर भेटली पण तृप्ती सोबत असताना तरी नको होती भेटायाला.तिला असं काहीच बोलता आलं नाही.तिच्या डोळयात ही पहाता आलं नाही. डोळ तरी कसं वाचणार? खर तर ती पाहील्यानंतर सुरवातीला प्रचंड भिती वाटली. रेवा येऊन जर काही बोललं तर तृप्तीला काय सांगायचं? सांगायला काहीही सांगू पण तिला ते पडणारं का?
सुरजनं सांगितलं होतं. रेवा अश्या चिखलात फसत गेली.ती आता त्यातनू बाहेर नाही निघणारं. जिथं जाऊन माणूस पडतो तिथचं तो आनंद शोधत राहतो. सुखलालूप असाते माणूस. तिच्या विषयी जेव्हा ऐकलं तेव्हा तेव्हा प्रचंड कणव वाटला होता त्याला. कधी कधी कणव पाझरण्या पलिकड आपण काहीचं करू शकत नाहीत.आज त्याचं रूपात ती भेटली. रेवाला त्याचं काहीचं वाटतं नाही. आपण कोणत्या रूपात भेटतो आहोत याचा थोडा पण संकोच तिला वाटला नाही. अश्या बाया लाज नाकाला गुंडाळून आपल्या अब्रूचं लक्रत वेशीला टांगून टाकतात.
आपल्याला ओळखून ही ती जवळ आली. कसं बिनधास्त बोलली. आपण अश्या एका पुरूषासोबत अहोत. नातं या जगाला सांगू शकत नाहीत. ते नातं आपण ते मिरवू शकत नाहीत. रेवा थोडी पण संकोचली नाही. आपल्या समोर ती त्या पुरूषासोबत होती.काहीचं का नातं नव्हत तिचं नि आपलं? जे शरीर अनेकदा कुशीत घेतलं, कुरवाळलं. ते आज कुणाच्या तरी हातात होतं. काही दिवसापूर्वी फकत जे आपलं होतं. ते आता कुणाचं ही होऊ शकतं. ती असं कसं स्वत:च्या देहाला सार्वजनिक करू शकते? शरीर असं भाडयानं देतात या बाया पण त्यांच मनाचं काय?खरचं तिचं मन कुणात गुंतल असेल? आपण तिच्या सोबत लग्न करायाला हवं होतं का? छे..!! ते कसं शक्यं होतं? तिचं शरीर सोकलं होतं.चटावली होती ती. एका पुरूषासोबत तिला राहणं शक्यं नवहतं. पती व पत्नीचं नात अतुट असतं. सात जन्मं त्यांचा चिरयोग असतो. अश्या बायाना ते कसं शक्यं? काही पुरूषांना तरी ते शक्यं का? आपण आणि रेवा.काही दिवासाचं तरी नातं होतच ना? ते नातं तुटुन जाऊ शकतं पण जे होतं ते मनावरल कसं पुसून टाकायचं? खर तर निलेशला त्या माणसाचा फार राग आला होता. आपल्या पैशाच्या जोरावर तो रेवाला असं उपभोगतोय. ती पैशाला बळी पडतेय. श्रीमंती असं माणसाला विकत नाही घेऊ शकतं. काही मानवी मूल्यं वगैरे काही आहे की नाही? असल्याचं भयंकर वैश्विक चिंता त्याच्या मनात दाटून आल्या.
आपलं नि रेवाचं जसं काही नात. संबध होतं. तसचं तृप्तीच पण असतील काय कुणासोबत? तृप्तीचं सोंदर्यं अनेक पुरूषांना खुणावत. रस्त्यानं चालतानाचं ते लक्षात येतं. अनेक नजरा रेंगाळताततिच्यावर. तिनं ही आपलं सौंदर्य व तारूण्य असचं कुणाच्या हवाली केल नसेल ना? मानानं खरचं ती आपल्यावर प्रेम करत असेल का? मंगळसूत्रं गळयात घातलं की नव-यावर प्रेम जडतचं असेल असं नाही. लग्नं, लग्नं संस्कार ही एक तडजोडचं असेल ना? संशायाचं व्हायरस त्याचा मेंदू पोखरू लागले.
तृप्ती आपली बायको. कुणी तिच्याकडं पाहीलं तरी आपल्याला सहनं होत नाही. तृप्ती फक्त आपली नि आपली असावी असं वाटतं. ती दुस-याची होणं शक्यं नाही. ते आपण सहन ही करू शकत नाहीत. त्या दिवशी तिनं त्या मुलाकडं पाहीलं तर आपण चक्क तिला मारलं.तृप्ती एक स्त्री आहे आपल्या आयुष्यात आलेली. रेवा ही एक स्त्रीच आहे आयुष्यात आलेली. दोघी आपल्या आयुष्यात आल्या. त्यांचे आयुष्यात येण्याचे मार्ग भले वेगळे असतील पण त्या आपल्याचं आहेत ना? तृप्ती आपलीचं आहे. गळयात मंगळसूत्रं आपलं.मगळसूत्रं हे मालकी हक्काचां शिक्का असेल का? आपल्या संस्कृतीमध्ये त्याला फार छान आहे. सौभाग्याचं लेणं. आपलं सौभाग्याचं लेणं गर्वांन फिरवत अनेक स्त्रीया वावरतात. अनेक मगंळ सूत्र घालून ही. आपल्या पुरूषाशी प्रमाणिक नाही राहत. उगीचं त्याला अनेक बायांची नावं आठवू लागली.
रेवा आज मात्रं कुणाची ही होऊ शकते. रेवा कुणाची बायको झाली असती तर बरं झालं असतं. चक्क.. कॉलगर्लं… रांङ.निलेश असं सारं आठवत असताना तृप्ती त्याच्या शेजारी येऊन उभी राहीली हे पण त्याच्या लक्षात नाही आलं.
“निलेश, बरं नाही का तुला?” तृप्तीनं काळजीच्या स्वरात विचारलं. तृप्तीच्या मनात प्रश्न दुसरेच होते पण तिनं ते नाही विचारले. तिला ते विचारयचं ही नव्हतं. मनात जे वाटतं ते सारचं आपण विचारू नाही शकत. काही तरी बोलावं म्हणून ती बोलली.
“तसं काही नाही. आय ॲम ओके.” तो दचकला. सावध झाला. त्याच्या मनात काय चाललं हे थोडचं तृप्तीला कळणारं होतं.
“मग का उभा आहेस असा? आवर ना फ्रेश हो.”तृप्तीनं त्याचा हात हातात घेतं म्हटलं. निलेशनं तिच्याकडं पाहीलं.मोकळे सोडलेले केस.चॉकल्टी कलरचा गाऊन.. अंधारात ही ठळक लक्षात यावा इतका गोरा रंग.अंधारात गोरा रंग..नि चॉकलेटी कलर कसलं जबरदस्त कॉब्मीनेशन असतं. कुणा ही पुरूषाचं भानं हरपून जावं इतकी सेक्सी दिसतं होती तृप्ती. निलेशचं मन कुठं ठीक होतं. अचानक झालेल्या स्पर्शानं तो भानावर आला.तिच्या डोळयात पाहीलं. ती कुशीत शिरली.तिचा तो मलमली उबदार स्पर्श ही त्याचं भानं हरपवू शकला नाही.
“तृप्ती, प्लीज. अस एकटचं राहू दे काही वेळ मला.” तृप्तीच्या डोळयात खोल पहात तो बोलला. रेवा नं तृप्ती या दोघीची तुलना त्याचं मन करू लागलं.रेवा असं कधी शांत कुशीत नाही शिरली.ती आदळायची येऊन चक्क अंगावर. तिला हवं ती ओरबडून घ्यायाची. तृप्तीचं तसं नाही. ती कसं अलगद उलगडत जाते. फुलांच्या पाकळया अपोआप उमलाव्यात तसं. त्यानं तृप्तीला हातानं अलगद थोडसं थोपवलं.
“पण का? आपली एकत्रं यायची वेळ झालीय आता?”
“चूप.तू शांत बसं.” त्यानं तिला झिडकारलं.
“असं का करतोस? एवढा का डिस्टर्बंस तू?”
“ऐ, चूप. काही डिस्टब्र वगैरे नाही.प्लीज थोड एकटं राहयचं मला.”
“निलेश, रात्र झालीये. मी नाही सोडणारं तुला एकटं.”
“का?
“का म्हणजे.. तू नवरा आहेस माझा.असं कसं सोडीनं?”ती त्याच्या अधिक जवळ जात बोलली.मनानं भरकटलेल्या आपल्या नव-याला आपलसं करण्यासाठी अजून दुसरं ती काय करू शकत होती?
“तृप्ती, खरचं आज मूड खराब माझा.”
“मूड खराब..? तू बोलतोस हे? अशी मी समोर आलेली. रात्र ही अबोल थोडी. चांदणं.. हया चांदणया…तुलाचं काहीच वाटत नाही.तुझा मूड चांगला करण्यासाठी मला अजून काय करावं लागेल?”
“तू शांत झोपलीस तरी पुरेसं आहे.” निलेशनं वैतागून म्हणला.
“मला तुझ्या कुशीत झोपायचं. एकटं झोपायची सवय मोडली माझी आता.”
”प्लीज,तृप्ती.“
“असं कोण ती तुझी? तुझा मूड खराब केलाय?”
“तशी कुणीचं नाही. फक्तं जीव तुटतो तिच्यासाठी.”
“निलेश, कॉलगर्लं ना ती?तिच्यासाठी जीव तुटतोय तुझा?”
“अग, तसा नाही जीव तुटतं?”
“मग कसा?
“कॉलगर्ल माणसं नसतात. परीस्थिती फेकते माणसांना त्या किचडंमध्ये. रेवा एक हुशार नि कर्तबगार मुलगी होती. आज कोण त्या रूपात मला तिला पहावं वाटलं. अशी भेटायाला नको होती ती. वाईट मला ती भेटल्याचं नाही वाटतं ती तुझ्यासमार येऊन बिनधास्तं भेटलीयाचं दु:ख झालंय.तिला काहीचं वाटलं नाही. ती खुशाल येउन भेटली मला. थोडा पण संकोच नाही वाटला तिला.”
“असं काय विचार करतोस? धंदा करतेय ती. धंदयात सारेच पुरूष तिचं कस्टमरचं आहेत की. सा-याकडचं ती एक कसटमर महणून पाहणारं ना?तुझ्या वर्गात असली म्हणून काय झालं?”
“तृप्ती असं काही कसं काय बोलतेस?”
“ती अशी एकटीचं कॉल गर्ल नाहीये. अश्या हजारो बायका आहेत.सभ्येतचा बुरखा पांघरूण.अंधारात नागडया होणा-या.त्यातं काय एवढं?निलेश धंदा तो. प्रत्येक धंदयाच्या काही गरजा असतात. रांडाना लाजून नसतं जमत. ज्या जास्तं लाजा सोडतात त्यांना.. जास्तं भांव असतो व जास्तं मागणी पण असते.”
“तृप्ती…???” तो रागवला होता. चिडला होता. अजून जर तृप् काही बोली आसती तर त्यानं तिला मारलं ही असतं.
“पण तू इतका का इमोशनल झालास? ह्रदय तर गुंतलं नाही तिच्यात?” तृप्ती खटयाळ हासली.
“तृप्ती..?” असं म्हणला.पुढ झेपावला. तृप्तीला मिठीत घेतलं. त्यानं सा-याचं गोष्टीला टर्नं दिला.
“आता माझं.. ह्रदय फकत.. इथं गुतंल.”तिला आपल्या छातीशी कवटाळतं निलेश बोलला.तृप्ती जरी निलेशच्या मिठीत आसली तरी मनात असंख्यं प्रश्न उभे होते. निलेशच्या मिठीत शरीर होत. मन थोडचं कुणाला मिठीत घेता येतं? रेवाचं नि निलेशचे नेमके संबध नेमके कसे असतील? रेवा हे नाव खरं असेल की धारण केंलेले नाव असेल? आसल्या बायांची खोटी नावं असतात. पिंकी.गुडडी.इला,सोनी, मोनी.नावातून त्यांची वय कमी असावेत असा भास व्हावा. आपलं वय नि ओळख लपवण्यासाठी असं नाव धारण करतात आसल्या बाया. रेवाचं ही तसचं तर नसेल ना? तृप्तीच्या प्रश्नाला काहीचं अर्थ नव्हता. त्यातला एक ही प्रश्न ती विचारू शकली नाही. पुन्हा ते काहीचं बोलले नाहीत. त्यांचे श्वासचं बरं काही बोलत राहीले आपसांत.
आज तृप्ती प्रसन्न होती. निलेश आज एका कॉन्फरन्ससाठी जात होता. त्याला लवकर निघावं लागणारं होतं. त्यानं आवरायाला हवं होतं पण तो अजून ही लॅपटॉपवरचं होता.लवकर जायचं म्हणजे लवकर आवरायाला हवं. उठून नुसता लॅपटॉपवर बसला होता. लेटं झालं की तो नुसता चीड चीड करतो. तृप्ती त्याला हासून उठू लागली. तर त्याचा मूड रोंमाटीक झाला. सकाळीचं आठ ही वेळ काही रोंमाटीक होण्याची वेळ नाही. सकाळी सकाळी बायांची कसली धांदल उडते. नव-यानं त्याचं फारसं काही देणं घंणं नसतं. निलेशनं लगेच तिला जवळ ओढलं.तिनं खरचं त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला. ते बंध रेशमाचे..!! सुटता सुटेनात.
बाबांच्या औषधांचा वेळ होती. आईच्या पूजेची. त्यां दोंघानी सारं हातात हवं असतं. सारी कामं तृप्तीची वाट पहात पडली होती. निलेशचा रोंमांटिक मूड होता.त्याच्या तावडीतन सुटण्यासाठी ती प्रयत्न करत असतानाचं तिचा फोन वाजला.निलेशच्या मिठीतून सुटायला तिला हे कारण पुरेसं होतं.ती धावतचं किचन मध्ये आली. फोन रिस्व्हं केला. श्रेयचा फोन होता.श्रेयानं इतक्या सकाळी फोन का करावा? ती असेल फ्री पण तृप्तीला कुठं उसंत होती. नोकरी करणा-या बायाचं तेवढं बर असतं. घर कामाला बाया लावता येता. घरच्याच फार तगादा नसतो. त्या कमवत्या असतात.श्रेया असेल निंवात… ऑफीसला दांडी सुध्दा असू शकते तिची.
“हॅलो,गूड मॉर्निंग.. तृप्ती.”
“मॉर्निंग टू यू. थँक्सं. आज एवढया सकाळी फोन?”
“तू,फ्रीस ना पण?”
“मी कसली फ्री? ते शक्यं तरी का या जन्मी.”
“एवढं काय चिडतेस?”
“मी का चिडू? तुझ्यावर नाहीच नाही. निलेशला कॉन्फश्रन्साला जायचं. तो अजून ही उठतं नाही.”
“ त्याला जायचं ना? तू का एवढं टेन्शनं घेतेस? त्याचं त्याला कळू नाही का?”
“ तुला माहीत नाही. लेट झालं की नुसता चिड चिड करतो.”
“ तुमचं चलू दया. तो नवरा. तू बायको. आम्हला तुला फक्त थँक्यू म्हणायच ग.”
“ अग टाक ना म्हणून मग? त्यासाठी का आता मुहूर्त पाहणारेस का? असं काय केलं मी. तू थँक्यू म्हणावस असं?”
“अग,मी नाही म्हणणार? आदीला मानायचेत तुझे आभार.”
“आदी..!! कसा तो आता?” अश्चर्यानतिचा चेहरा फुलून आला.
“घरी आलाय तो रात्री आमच्या. खर तरं त्याची रात्रीचं इच्छा होती तुझे आभार मानायची.”
“मग?
“मग काय? टाळलं मी. रात्रीचं दहा वाजता ही काय वेळ का बायकांना फोन करायची? रात्री बायका फक्त नव-याच्या असतात.”
“ गप चावट कुठली.”
“मी पण एका नव-याची बायको. यात का नवीन आपल्याला? आदिला काय काय कळणार? मासूम ना तो अजून. त्याचं लगन नाही झालं अजून.”
“लग्न न झालेली पुरूष् मासूम असतात?” तृप्ती फोनवर बोलत होती. तेवढयात निलेश मागून आला. त्यांन चक्क मिठीत घेतलं नि म्हणला, “लग्न न झालेली पुरूषं मासूम असतात नि लग्न झालेली खडूस. असचं ना?” तृप्नं त्याला खूणानेच चूप राहण्याचा इशारा केला. निलेश गप राहणं एवढं सोप नव्हत. त्यानं एक गुलाबी ओरखडातिच्या उघडया पाठीवर ओढला. तशी ती शहारून आली. नकळतच शब्दतिच्य तोंडातून बाहेर पडला. ‘आई ग?’
“ का ग? काय झालं?”
“ काय नाही?मांजर आलं किचनमध्ये.”
“ मांजर की बोका?
“बोका.. लांब लांब मिश्यावाला.. “ तृप्ती त्याच्या मिश्यावरून हात फिरवत म्हणाली. आता हे तर निलेशला चँलेजच होतं. त्याला थोपवणं तृप्तीला कुठं शकयं होतं?
“श्रेया, मी तुल पुन्हा कॉ करू का?”
“अग, आदिला तर बोल ना?”
“ऐक ना? निलेशला उशीर होतोय. मी कॉल करते ना नंतर. बाय.बाय..” तृप्तीनं फोन कट केला. फोन चांगला कट झालाय याची खात्री केली. कट करावचं लागला. फोन वर जर आदि बोलू लागला आसता तर? निलेशला लगेच कळलं असत. तृप्तीच्या पोटात प्रचंड भितीचा गोळा उठला होता.तिनं त्यातून ही स्वत:ला सावरलं.
“निलेश तुला काही कळेल का नाही? श्रेयाला सारं कळलं असेलं.”
“त्यात काय एवढं? मी कुठं काय केल?नवराय मी तुझा.”
“नवरा. म्हणून काय….?” पुढील शब्द तृप्ती उच्चारू नाही शकली. कसं उच्चारता येतील? लीप लॉक केलं होते निलेशन. श्वासांचा आवाज व गती ही वाढली होती काही क्षंण.तिनं निलेशला पटापटा आवरून दिलं.त्याला बाय करूनचं ती घरात आली.
बाबा पेपर वाचत बसले होते. आई ..देवळात गेल्या होत्या. निलेश एकदाचा गेला.तिला रिलॅक्स वाटलं.बरं झालं आपण फोन कट केला. आदि कडे फोन दिला आसता तर? निलेशनं तयाचा आवाज ऐकला आसता तर? त्या कल्पानानी सुध्दा घाम फुटला होता.तिनं तो पदरानं पुसला.श्रेयाला पण काही कळत की नाही. असा कशाला फोन करायचा? एक चांगल झालं आदि. सुधारलाय.श्रेयानं पुन्हा कॉल केला नाही हे ही बरं झालं. आदिच्य प्रकृतीत सुधारणा झाली.तो थँक्स म्हणू शकणारं ही बातमीतिच्या मनाला सुखावून गेली. तिच्या डोळयासमोरून आदि हालत नव्हता. कारूण्याचं अमृत कण तिच्या मनात जमा होऊ लागले होते. आता शांत बसण शक्यं नव्हतं.तिनं फोन हातात घेतला.
आदिचा मेसेज होता.
( पुढील भाग लवकरचं.)
सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२५
मराठी साहित्य संमेलन: ‘आम्ही कसे घडलो’ की ‘आम्ही कसे बिघडलो’?
मराठी साहित्य संमेलन हे साहित्य, विचार आणि नव्या दृष्टिकोनांचा मिलाफ असतो. दरवर्षी यात वेगवेगळ्या विषयांवर विचारमंथन होते. यंदाच्या संमेलनात ‘आम्ही कसे घडलो’ या विषयावर चर्चा सुरू असताना, नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे संमेलनाचा रोखच बदलला. ही चर्चा ‘आम्ही कसे बिघडलो’ याकडे वळली आणि साहित्यसंमेलनाला अनपेक्षितपणे राजकीय वळण लागले.
साहित्य संमेलनाचा मूळ उद्देश आणि त्याला मिळालेलं वळण
साहित्य संमेलन हे नेहमीच विचारवंत, लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींसाठी एक महत्त्वाचा मंच राहिला आहे. साहित्य, समाज आणि संस्कृती यावर प्रगल्भ चर्चा व्हावी, नव्या संकल्पना समोर याव्यात आणि विचारांना चालना मिळावी, हाच संमेलनाचा मूळ हेतू असतो. मात्र, यंदा झालेल्या चर्चेने या संमेलनाचे स्वरूप बदलल्याचे जाणवले.
नीलम गोऱ्हे यांनी ‘आम्ही कसे घडलो’ या विषयावर बोलताना शिवसेनेच्या अंतर्गत घडामोडींवर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीवर टीका केली. परिणामी, एका साहित्यिक चर्चेचे राजकीय कुरघोडीत रूपांतर झाले.
नीलम गोऱ्हे यांची भूमिका आणि उद्धव ठाकरेंवरील आरोप
नीलम गोऱ्हे या अनेक वर्षे शिवसेनेशी जोडलेल्या होत्या. त्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक होत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापतीही राहिल्या आहेत. मात्र, पक्षातील गोंधळ आणि मतभेदांमुळे त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.
साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी मांडलेली भूमिका पाहता, चर्चा साहित्याच्या प्रगतीपेक्षा राजकीय नेतृत्वाच्या अपयशावर जास्त केंद्रित झाली.संमेलनाचा मूळ हेतू विचारात घेतला तर ही बाब खटकणारी होती.मराठी साहित्य संमेलन हे केवळ राजकीय व्यासपीठ नाही, ते साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक चर्चांसाठी प्रसिद्ध आहे. तसचं तिथे घडलं पाहिजे.आपल्या राजकीय हितासाठी मराठी साहित्य संमेलनासाठी व्यासपीठ वापरणं एकदम चुकीचे आहे ती नियम गो-हे यांनी केली. एकंदरीतच राजकारणातील लोकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढतो आहे.मात्र,जकीय नेत्यांच्या उपस्थितीमुळे साहित्य संमेलन राजकीय प्रचाराचे साधन होऊ लागले आहे का? हा प्रश्न आता उपस्थित होतो. साहित्यरसिकांना चीड पण येत आहे.साहित्य संमेलनाची राजकीय मालकी वाढते आहे का?
गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनामध्ये राजकीय वाद वाढताना दिसत आहेत.काही वर्षांपूर्वी संमेलनाच्या अध्यक्षपदावरूनही मोठे वाद झाले होते.साहित्य संमेलनात वेगवेगळ्या राजकीय गटांचे प्रभाव वाढत चालले आहेत.विचारमंथन आणि साहित्यिक चर्चा बाजूला पडून राजकीय विचारांचे समर्थन किंवा टीका करण्यावर अधिक भर दिला जात आहे.साहित्य संमेलनाचा पुढील वाटचाल कोणत्या दिशेने जाईल? राजकरणाचा आखाडां जर संमेलन बनवू लागले तर काय करायचं? संमेलनाने साहित्याच्या मुळ उद्देशावर लक्ष केंद्रित करायला हवे. राजकीय चर्चांमुळे संमेलनाची प्रतिष्ठा कमी होऊ शकते. मराठी साहित्य आणि त्याच्या भविष्यासाठी संमेलनाला पुन्हा साहित्यिक चौकट परत मिळणे आवश्यक आहे. राजकीय हस्तक्षेपांपासून मुक्त होऊन, विचारस्वातंत्र्य आणि साहित्याच्या समृद्धीवर भर द्यायला हवा.संमेलन ‘विचारमंथनाचे व्यासपीठ’ राहील की ‘राजकीय प्रचाराचे साधन बनेल हा येणारा काळचं या प्रश्नाचं उत्तर देईल.‘आम्ही कसे घडलो’ या चर्चेने खरेतर ‘आम्ही कसे बिघडलो’ हेच दाखवून दिले.
साहित्य संमेलन राजकीय कुरघोडींसाठी वापरले जाऊ नये, हे लक्षात घेतले पाहिजे. भविष्यात साहित्य संमेलन हे साहित्याच्या विचारमंथनासाठीच राहावे, अन्यथा ते राजकीय आखाडा बनण्याचा धोका आहे.
– शब्दगंधा टीम
शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५
फुटलेला पेपर आणि राजू - मराठी कथा
फुटलेला पेपर आणि राजू
जालना जिल्ह्यातील एका शाळेत, दहावीचा गणिताचा पेपर फुटला.बातमी वा-यासारखी पसरली आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत चमक आली. कोण कुठून पेपर मिळवतोय, याचा शोध सुरू झाला पण राजू मात्र या सगळ्यापासून अलिप्त होता.राजू अभ्यासू मुलगा होता.त्याला लायकीच्या बळावर पास व्हायचं होतं पण त्याच्या समोर मराठीचा फुटलेला पेपर उभा होता.रडका,थोडासा चिंतेत आणि काहीसावैतागलेला.त्याचा अवतार फारच कळा गेलेला होता.रडून रडून डोळे सुजले होते. हा आपल्याकडे का आला आहे हे राजूला कुठं नव्हतं.
"राजू, माझं ऐकशील का रे?" पेपर डोळे पुसतं बोलला.
"अरे, तू बोलतोस?म्हणजे तू बोलू शकतोस? आणि इतका दुःखी का आहेस?फुटलास तूच आणि रडतोस पण तुच.कमाल बुवा तुझी..!!" राजू त्याच्याकडे राग राग पहात बोलला.त्याला बातमी आल्यापासूनच फुटलेल्या पेपरचा राग आला होता.
"मी काय स्वतःहून फुटलो का रे? मलाही कुणीतरी फोडलंच असेल ना?कुणी तरी फोडल्या शिवाय काहीच फुटतं नाही रे. साधं लाॅजिक हे.आता माझ्यावर सगळे ओरडतायत.खासदार,आमदार फुटतात, पक्ष ही फुटतात, लोकही फुटतात... मग मीच का दोषी? फक्त मीच फुटलो का या जगात? सारेचं गद्दार असतात रे." पेपर काकुळतीला येऊन बोलत होता.
"खरंच रे, पण तुझ्यामुळे किती जण नक्कल करून पास होतील,आणि किती जण मेहनत करूनही नापास होतील, याचा विचार केलास का?परीक्षाला काही अर्थच राहत नाही ना? गद्दारी करणं चांगली नाही रे." राजूला आता पाठ केलेले सुविचार सांगण्याची तलप आली होती. तो बडबडू लागला.
"का रे तुम्हाला गद्दार सरकारं चालतात.आमदार, खासदार फोडलेला चालतात मग माझाच का एवढा बोभाटा?" पेपर जरा चिडला होता.
" ते राजकारण असतं.ते तसचं खेळणार रे.तू अनेकांच्या भविष्याशी खेळतोस रे." समजावणीच्या सुरात राजू बोलला. राजाचं खरं होतं. आता परिक्षेत असं राजकारण करणं कितपत योग्य?
"अरे बाबा, मी कुणाला सांगतोय का कॉपी करायला? मलाच फोडतात सारे.तुमचे शिक्षक, पालक,अधिकारी सगळे हात धुवून माझ्या मागे औ. माझ्यावर माया दाखवणारा कुणीच नाही. मला,तरी कुणी तरी माणसं फोडतात ना? मी काय एकटाच फुटतो का? हल्ली कुठल्या ही परीक्षेचे पेपर सहज फुटतात.पण एवढा बोभाटा नाही होत."
"आता फुटल्यावर बोभाटाचं होणार ना?"
"अशी परिक्षा आहे का या महाराष्ट्रात तिचा पेपर फुटतात नाही. जी मेन असेल नाहीतर नीट असेल यांचे पण पेपर फुटतातचं की.खरचं,तूच सांग बरं पेपर नाही फुटला तर पोरं पास कशी होणार?"
राजू गप्प बसला.त्याला पेपरचं दुःख कळत होतं. पण त्याहीपेक्षा,आपल्या समाजाचं वास्तव त्याच्या लक्षात आलं होतं.पेपर बिचारा आपण होऊन कसा फुटेल?माणसंच फोडतात त्याला. हेच सत्यं आहे हे राजूला करून चुकलं होतं.
"पोरं पास तर झाली पाहिजेत ना?नाही अभ्यास करीत पोरं.तुम्हाला सां-यानांच पुळका येतो पोरांचा.मग फोडतात तुम्ही.मी काय करणार? हतबल करतात,मला सारे." पेपर त्याची करूण कहानी सांगत सुटला.
"माणसं अशीच का वागला लागलीत हल्ली हेच मला कळेना?"
" माणसाचं नको विचारू.फुटल्यावर काही आम्ही एन्जॉय नाही करतं ही गद्दारी."
"ते आमदार तर बियर पिऊन भन्नाट नाचले होते."
" त्या नाचणा-या आमदार वर नको जाऊ. नाचत असले तरी बुडाला त्यांच्या आग लागली असते.सारी नाटकं असत्यात त्यांची."
"असं लगेच का फोडतात तुला.पहिल्याच दिवशी असं का फुटलास रे."
"पोरं हुशार करायची पण असतात.परिक्षा पण कडक हव्या असतात. नापासांची चिंता असते सरकारला.मग फुटावंच लागतं आम्हाला.सरकारचं टेन्शन असत,यार.!!!आम्हाला जरी काळीज नसलं तरी वाटत काही तरी करावं या बिच्चा-या पोरांसाठी.सरकार साठी अधिकारी ही झक मारतात आणि आळ आमच्यावर घेतात."पेपरचा चेहरा लालबुंद झाला होता.
"समाज असा वागतोय की,कुणालातरी फोडायचं आणि त्यावर राजकारण करायचं.मग ते परीक्षा असो राजकारण असो, की घरगुती भांडणं..!! जाऊ दे.तू मला का सांगतोस हे माझीशकाहीचं तक्रार नाही यार." राजू सारवासारवी करत बोलला.
" राजू, तू तरी अभ्यास कर.फोडाफोडीचा रोगच झालाय माणसाला." तो तरा तरा निघून गेला.
इतक्यात राजू घाबरून जागा झाला. त्याच्या कपाळावर घाम होता.त्याने उशाशी ठेवलेला अभ्यासाचा पुस्तक उचललं आणि पुटपुटला बिच्चारा पेपर...!!!
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५
"छावा (Chaava) मराठी चित्रपट – बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय!"
संशयाचा व्हायरस
संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या न...

-
युध्दं पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता. 'युध्द पेटले आहे 'हा बाळासाहेब नागरगोजे यांचा पहिला...
-
धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक परीक्षण : सोंडगे परशुराम , बीड 9527460358 धर्मयोगिनी अहि...
-
पाराकं आरगन वाजल . बॅन्डवाल आलं . ते आलं की सलामी देत्यात . आरगनाचा मोठा आवाज सा - या गावात घूमू लागला . तशी बारकाली पोरं ... पोरी चींगा...