हा मराठी साहित्य, कविता, कथा, ललित लेख आणि सामाजिक विषयांवरील विचारमंथन यांसाठी एक उत्कृष्ट मंच आहे. येथे तुम्हाला भावस्पर्शी प्रेमकथा, प्रेरणादायी लेख, राजकीय विश्लेषण, तंत्रज्ञानविषयक माहिती आणि साहित्यिक चर्चांचे वैविध्यपूर्ण लेखन वाचायला मिळेल. मराठी भाषा आणि संस्कृती जोपासण्याचा आमचा प्रयत्न असून, नवोदित लेखकांसाठी हे व्यासपीठ खुले आहे. नवीन साहित्य वाचण्यासाठी आणि तुमच्या प्रतिक्रिया द्यायला आजच भेट द्या!
मराठी ब्लॉग, कथा आणि कविता, मराठी साहित्य, ललित लेख, प्रेरणादायी लेख,मराठी वेबसाईट
मनोज जरांगेचा जीव महत्वाचा: आरक्षणाच्या लढ्याचे नायक
मनोज जरांगे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा, आज केवळ एका व्यक्तीचा नाही तर लाखो मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या आवाजाचा प्रतीक बनला आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून आंदोलनाचा एक सशक्त लढा उभारला आहे. त्यांच्या या संघर्षामुळेच मराठा समाजाचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारवर मोठा दबाव आला आहे.
जरांगे यांनी आपल्या आंदोलनादरम्यान केलेल्या उपोषणामुळे शारीरिक अवस्था खालावली, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, त्यांचा जीव फक्त त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नसून, मराठा समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. जरांगे यांचा जीव सुरक्षित राहणं म्हणजे मराठा समाजाच्या संघर्षाचं चालू राहणं आणि त्यांच्या मागण्यांसाठी लढण्याची शक्ती कायम राहणं होय.
जरांगे यांचा जीव महत्वाचा आहे कारण त्यांची लढाई फक्त एका समाजापुरती मर्यादित नसून, हा लढा सामाजिक न्यायासाठी आहे. त्यांच्या नेतृत्वाने मराठा समाजातील असंतोषाला आवाज दिला आहे आणि त्या समाजाच्या संघर्षाला एक नवी दिशा दिली आहे.
"मृत्युंजय" ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे, जी महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. ही कादंबरी कर्णाच्या जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते आणि त्याच्या संघर्षमय जीवनाची कथा सांगते. कर्णाच्या दृष्टीकोनातून लिहिलेल्या या कथेच्या माध्यमातून लेखकाने समाजातल्या विषमतेविरुद्धचा त्याचा लढा, त्याची दुःखे, त्याच्या नैतिकता आणि त्याचे विचार यांचा सखोल अभ्यास केला आहे.
कथानक:
"मृत्युंजय" कादंबरी सात भागांमध्ये विभागली आहे, आणि त्यामध्ये कर्णाच्या जीवनाचे विविध टप्पे उलगडण्यात आले आहेत. कादंबरीत मुख्यतः कर्णाचा संघर्ष, त्याचे दानवीरपण, त्याची मैत्री, त्याचे राजनिष्ठा आणि त्याच्या आयुष्यातल्या विविध घटना यांचा समावेश आहे.
कर्णाला जन्मतःच समाजाने नाकारले, कारण त्याच्या जन्माची गोष्ट गुप्त ठेवली गेली होती. सूर्यदेवाचा पुत्र असूनही त्याला समाजात स्थान मिळाले नाही. त्याच्या अंगावर कवच कुंडले असतानाही तो आपल्या जन्माच्या सत्यामुळे अपमानित होत राहिला. मात्र त्याने स्वतःच्या सामर्थ्याने आणि निष्ठेने आपली ओळख निर्माण केली.
कर्णाच्या जीवनातील मोठी घटना म्हणजे त्याची दुर्योधनाशी मैत्री. दुर्योधनाने कर्णाला स्वीकारले, आणि कर्णाने त्याला आपल्या मित्र म्हणून आपले जीवन समर्पित केले. दुर्योधनासाठी कर्णाने अनेक मोठे त्याग केले. कादंबरीत कर्णाच्या मैत्रीला, त्याच्या निर्णयांना आणि त्याच्या भावनात्मक संघर्षांना मोठे स्थान आहे.
साहित्यिक वैशिष्ट्ये:
शिवाजी सावंत यांनी "मृत्युंजय" मध्ये कर्णाच्या भावनात्मक प्रवासाला खूप सुंदर शब्दात मांडले आहे. त्याच्या विचारसरणीचा आणि निर्णयांचा खोलवर अभ्यास केला आहे. लेखकाने महाभारतातील इतर पात्रांच्या भूमिकाही या कथेच्या माध्यमातून उलगडल्या आहेत, ज्यामुळे कादंबरी अधिक व्यापक आणि प्रभावी बनते.
निष्कर्ष:
"मृत्युंजय" कादंबरीतून कर्णाचा जीवनसंघर्ष, त्याची मानवी प्रवृत्ती, त्याचे नैतिक द्वंद्व आणि त्याच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना सुंदरपणे मांडण्यात आल्या आहेत. कादंबरी महाभारताच्या कथेचा एक नवीन पैलू उलगडते, ज्यामुळे वाचकांना कर्णाच्या जीवनाची एक वेगळी आणि सखोल दृष्टी मिळते.
सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गरज नसते.सरकार हे आपल्याला घटनेशी प्रामाणिक राहूनच चालवायचे असते.घटनेतील उद्देश्यासाठी सरकारने प्रमाणिक काम करावे अशी अपेक्षा घटनेची आहे.सरकारने काय करावे,काय करू नये याचे नियम आहेत.कायदे आहेत.या देशात घटनेपेक्षा कुणी ही मोठा नसतो.जेव्हा कायद्याचा,पदाचा गैरवापर केला जातो आणि स्वायत्त संस्था जेव्हा सरकारच्या हाताच्या बटीक बनतात तेव्हा देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभा असतो.या स्वायत्त संस्थेच्या खांद्यावर बंदूक ठेऊनच हुकुमशाही आपले पाय हळूहळू पसरत जाते.आपला झेंडा रोवत असते हे सा-या जगाने पाहिले आहे. हुकुमशाहीची सुरूवात घटना आपल्याला हवी तशी लवचिक करूनच होत असते.आपण लोकशाहीचे किती सुंदर गीतं गायली तरी हुकूमशाही आपली मूळं खोलवर रूजवत जात असते.एक कंपूशाही निर्माण होत जाते.दुर्बल,भित्रे,लाचार लोक कंपूशाहीत सामिल होऊन आपली जागा तयार करून घेतात.सोन्याच्या पिंजरा त्यांना महाल वाटु लागतो.त्यांना गुलामीची जाणीव होतेच असं नाही.झाले तरी ते हतबल असतात.
भारतीय लोकशाही ही सांसदीय लोकशाही आहे.सध्या दोन तीन दशका पासून घटनेचा हा ढाचा जाणीवपूर्वक बदला गेला आहे.पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला जातो आहे. तो जाहीर केला जात आहे.दोन राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची तुलना करत लोकांचं मत तयार केले जात आहे.संसदीय पक्ष त्यांचा नेता निवडत असतात.दोन किंवा अधिक पक्षांची तुलना करत लोकांचं मतदान होणे आवश्यक असते.एखादया व्यक्तीला महत्व येणे हे संसदीय लोकशाही साठी भयंकर गोष्ट असते.लोकशाहीचा ढाचा पायदळी तुडवण्या सारखंचं हे आहे. अशी तुलना का? संविधान बदलाची ही नांदी आहे. हे अनेक दशके चालू आहे पण कुणीचं गंभीर घेत नाही.
एका पक्षाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला की आपण दुस-या पक्षाकडून तशीच अपेक्षा करतो. हे भारतीय लोकशाहीच अपयश आहे.ही सुरूवात आहे.आपण हळू हळू घटनेचे साचे तोडत तर जाणार नाहीत ना? प्रचंड भिंती वाटते आहे
धर्म आणि जातीच्या नावाने पक्ष संघटना निर्माण होताहेत. भेदाच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत.सा-याचं निवडणूका या भेदावर बेतल्या जात आहेत.
संविधान बचाव..बचाव म्हणुन त्रागा करून संविधान वाचवलं जाऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्येक नागरिकानी सजग होणे आवश्यक आहे.
त्या अंबानींच्या पोटयाचं प्रि-विडींग लयईचं गाजलं.नट नि बीटं ,नट्या न् बिटया...सा-या जगातलं टाॅपची सेलेब्रिटी तिथं आल्ते जणू. आपल्याला काय आमंत्रण बिमंत्रण नव्हतं.असल्या एकदम मोठ्या लोकांच्या लग्नात गावोगावी पंक्ती उठाया पाहिजेत. अन्न दान करायला पाहिजे.उग म्या आपली आपेक्षा केली. तसल्या झंझटीत तसली मोठी लोकं कशाला पडतेलं?
काही का असेना मला मात्र मेरा देश महानच्या खळाखळा उकळया फुटल्या हायती. त्याचं कारण मी तसंच हाय. हे अंनतरावाचं प्री -विडींग सइम्पलं प्रोग्रॅम नाय.त्या प्रोग्रामनं देशाचं नाक भलं मोठं उंचावलयं. हलक्यात घेऊ नका.
आपल्या देशास कमी समजण्याची टाप कुणी करायचं नाय.त्या भिकारडया पाकिस्तानात तर असं ग्रेट लगन पण कधी झालं असलं का? कवा होईल का? प्री-विडिंग तर सोडाचं. म्या तर नुसते ह्या प्रोग्रमचं फोटू पाकिस्तान्यांना टॅग करणार हाय.
एक हजार कोटी का काय? नुसता खर्च झालाय जणू. या प्री-विडींगचा.जोक हाय काय? बजेट नसेल पाकडयांच इतकं.
मला लग्नात जायला भेटलं नाय म्हणून खंत नाय.आपला शाहरूख खान गेल्ता ना तिथं. आपण त्याचं फॅन हायत बरं का? लयं जबराटं फॅन हायत आपण त्याचं.काही जण उगीच त्यांच्यावर डक धरून असत्यात.तेव्ह तिकडं जेवला तरी आपलं प्वाटं भरलयं इकडं.
आडीच हजार का काय नुसतं पदार्थ होतं जणू तिथं खायला.इतुक्याश्या बारीक बारीक पोटात एवढी समदी पक्कावन्न कशी ढकलायची? मला उगीच प्रश्न पडला? उग घडीभर टेन्शन भी आल्तं पण नंतर मपलचं मलाच कळलं आपल्याला कुठं खायचे आहेत ते पक्कावन्न. जे खाणार ते बघून घेतेलं.आंबानी सेठ सोता वाढीत होतं. उग प्वाटं फुटायचं एखाद्या खादाडाचं.
अंनत आबांनीच्या फ्री व्हीडींगच मला तर लयं अभिमान वाटुतुया. तीन खान तिथं गेलं भी.नाचल भी.फुटू भी काढलं. हिंदूच्या लग्नात हे थ्री खान जाणंं म्हणजे मोठी राष्ट्रीय घटना हाय ती.राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीकच म्हणायचं ना?बरं शारूख तिथं स्टेजवरून जय श्रीराम पण बोल्ला. जयश्रीरामवाल्याचा भी राग कमी झाला आसणं. या प्री विडींग मुळं देशाच्या दृष्टीने ही महत्वाची घटना घडली की. तेव्हां भी लयं डांबरसं. जयश्रीराम म्हणतच नव्हता. देशाचा माहोल झालाय.बच्चा असता है.राम आता है. ह्यो शारूख म्हणायचं नव्हता.त्या प्रोग्राम मधी तेव्हं म्हणाला.जयश्रीराम....!! प्रश्नच सुटला ना?
'मेरा देश महान... !!' असं वाटून वाटून मव्हं छाताड फुगून टम्म झालयं बघा.कमून म्हणून इचारा ना?ती पाप स्टार रिहाना.नाचवली आंबानीन.जगातली टाॅपची नाची हाय ना ती? ती मागे आपल्या देशाला गरीब देश म्हणली होती..शेतक-याचं ते आंदोलन बघून तिन तसं टिव्टं केल्तं.भारत देशात शेतकरी गरीब हायत म्हणून काय समदा देश गरीब समजायचा का? देशात टाॅपची श्रीमंत माणसं भी हायत की.तिला काय माहित? आमच्या देशाचं जे पंतप्रधान हायीत का त्यांना पण शेठ म्हणत्यात. तू या देशाला गरीब म्हणायचं नाही.किमत बोल तुझी? एका तुह्या डान्सला चौ-याहत्तर कोटी दिलं आमच्या आंबानी सेठनं. बैलापुढं गौतमी पाटील नाचणारी आम्ही ग्रेट माणसं आहोत.आता तरी अंबानींच्या प्री-विडींग मध्ये तुला नाचविल. बैलांचं पण लग्न असतं आमच्या देशात.एखादा सेठ किंवा आमचा पुढारी डायरेक्ट तुला बैला पुढं नाचील. नाद नाय करायचा इंडियाचा.आमच्या देशाला गरीबाचा देश म्हणती व्हय? मोदी सेठच्या पुरं हे ध्यानात असलं.त्यांनी मुद्दामच आंबानींला तिलाच नाचायला बोल्येव असं सांगितलं आसलं.पैशाचं काय टेन्शन? मोदी सेठ आणि आंबांनी सेठ जानी दोस्त हायीत. ही दोस्ती तुटायची नायं.
अंनतरावांच भाषण लयं भारी झालं जणू.आपल्याला लयं कळालं नाही.ते इंग्लिश मध्ये ह़ोतं.बाप रडला राव. चक्क डोळ्यात पाणी आलं त्याचं.माणूस किती मोठा असला तरी बापाचं काळीजचं असतंचं की त्याला. बाप म्हणून तेव्हं रडू नाही थोपू शकला.त्याजवळ बक्कळं पैसा. त्यांनी खर्चीला भी. पोराची हौस नाय करायची तर कुणाची करायची?पैशाचं तरी काय करायचं? थोडाचं नदीला तुंब टाकता येतो पैशाचा? बाप आणि लेकाचं नातं पाहून आपण तर पुरं इम़ोशनल झालोत बुवा.आसला चिक्कार पैसा असलेल्याची प़ोरं लयं मोकार असत्यात. सारा देश बापलेकाच्या या भव्य दिव्य नात्यात पार इरघळून गेला असतानी आमचा रम्या इतका जळतोय त्या प्रि विडींगवर इचारुचं नका. दुस-याचं सुख पाहिलं की आपलं दु:ख उंचबळून येत. तसचं झालं असलं राम्याचं भी.
तेव्हां म्हणतोय.त्या अंनतरावाला पोरगी भी लयं चिकणी भेटली.पोरीना फक्त पैसा पाहिजे.तसली नटीवाणी नाय पण काळी बेंद्री कसली तरी आपल्याला पोरगी भेटली पाहिजे.एखाद्या मंदिरात बिंदिरात तरी गरीबांची लग्न व्हायला पाहिजेत. काय अंनतरावाचा बाप नि काय आमचा बाप? तीस उलटून गेलं तरी म्हया बापाला काळी-बेंद्री,नकटी- धुकटी कसली तरी प़ोरगी सून भेटाना. काय खरं?इतकं भी दरिद्री असू नाही बाप.
"आर,वाहतील तुझं भी लगन. लयं अवघड असणया उमगआयआ बाप रं.." म्या आपलं गाण्याच्या ओळीच गायल्या.क
"कसलं होत डोंबल्याचं ? मोदीसेठला केलयं पंतप्रधान.त्याला नाय बायको.बायकू नसल्याचं दु:ख त्यांना भी कळाना. गरीबांच्या लग्नाची गॅरंटी मोदीसेठ घेतील काय?"राम्याचं असलं डायलॉग ऐकून मला तर हसूच आलं.रम्याचची अपेक्षा भी फालतू नाय.प्रश्न गहनच हाय की या देशात? मोदींच्या कानावर घातला पाहिजे."आयला,प-या इथून पुढं गरीबांची लग्नं होतील का नाय रं? रहियाना नाचली म्हणून देशातल्या गरीब थओडएचन श्रीमंत होणारेत. मही देश अभिमानानं टम्म झाल्याली छातीत धस्सं झालं.
आज नवीन वर्षाचा पहिला दिवस.रात्री वर्ष २०२३ गेलं.वर्ष २०२४ आलं.बाय बाय २०२३ व वेलकम २०२४.. रात्री बारा वाजता घसाफोड ही झाली.नाचून झाल.गाऊन झालं.
जग कैफात बुडालं.
भिंतीवरलं एक कॅलेंडर गेलं नि नवीन कोर करकरीत कॅलेंडर आलं. बस्सं एवढच घडलं.
उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून प्रसवणारा प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परिवलन व भ्रमणगतीत काहीचं फरक पडतं नसतो.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो.फक्त नव्याचा भास असत़ो.
प्राणी पक्षी कीटक यांना नविन वर्षांचं भान नसतं.माणसाला मात्र २०२३ सरलं म्हणून दु:ख होतं.वर्ष २०२४ आलं म्हणून आंनदी ही होतो.काळ तशी मानवी कल्पनाचं. माणसांन त्याला ही आकार दिला.उकार दिला.आपला सखा-सखी करून माणूस त्याच्या प्रेमात ही पडला.
नविन सालकडून तर किती अपेक्षा....!! निरपेक्ष प्रेम हल्ली कुठं राहिलंय?
सारं शुभ मंगलच घडावं अशी अपेक्षा.अशुभ आमच्या ओंजळीत टाकू नको रे बाबा...!!
खरंतर अनंत ब्रम्हाडांत दिवस उगवत नाही.दिवस मावळत नाही.काळाच्या अनंत रेषेवर ब्रम्हांड सरकते आहे.असेच सरकत राहणार आहे अनंत काल.
आपल्याला मात्र वाटतं की.नवं वर्षाचं हे बाळं रांगत या सृष्टीचा कब्जा घेत पण आपण स्वागतच नाही केलं तर? नवं वर्ष रूसून बसेल का? खूप नाचून नाचून स्वागत केलं तर ते वर्ष माणसांना प्रसन्न होत असेल.आपण नाचत राहतो.नशेत, धुंदीत बुडतं राहतो.आपण स्वागतात कसूर करत नाही. कसूर आपल्याला करायचा पण नसतो.
रांगोळ्या काढतो.डीजे वाजवतो.घरावर रोषणाई करतो.लेजरचे शो करतो. दारू ढोसत राहतो हे नविन वर्षीला आवडतं म्हणून आपण करत असतो का? छे.!छे !!
काळचक्राला कुठं ज्ञानेंद्रिये असतात?
आपल्याला प्याची असते म्हणून आपण पितो. आपल्याला नाचायचं असतं म्हणून आपण नाचतो.आंनद साजरा करण्याची ती आपली पध्दत असते.जो तो आपआपल्या आवडीप्रमाणे सिलेब्रेशन करत असतो.तसा साराच हा भातकुलीचा खेळ असत़ो.खोटं खोटं का असेना पण मज्जा येते ना ? मग खेळायचं.मज्जा महत्वाची.संस्कृती वगैरे गोष्टी पण अश्याच मानवनिर्मितच आहेत ना? कशाला टेन्शन घ्यायचं?
आयुष्य सा-यांनाच असते पण आयुष्याची लांबी सां-याची सारखी नसते.कुणाचं लांब असतं.कुणाचं आखूड असते.जे क्षण आपल्याला वाट्याला येतात.ते फक्त आपले असतात.त्यांना कवेत घेण्याचं काम आपलं असतं.सुख दु:खाचे कण क्षण पाठीवर घेऊन आपल्या वर आदळत असतात.
जगणं म्हणजे एक प्रणयच असतो हवाहवासा, नाही का? दु:ख असून ही सुखाच्या झुल्यावर झुलत ठेवणारा.आपला भुतकाळ आपण बदलू शकत नाही पण वर्तमानाला आपणं भिडवू शकतो.जिंकू ही शकतो.आपण भविष्यकाळ सुंदर सुंदर स्वप्नांनी व संकल्पनानी सजवू शकतो.नटवू शकतो. सागराच्या किना-यावर नाही का आपण खोपे करतं?
एक लाट आली की सारं होत्याचं नव्हतं होतं. आपण पुन्हा खोपा करतोचं. राहवत नाही.थांबवत नाही.
काळाच्या लाटेत ही सारं अथांगतेमध्ये मिसळणार असतं पण ते आपण करतचं असतो.करावं लागतं.दुसरं काय करणार ?
आपल्या हातातच काय आहे?आपलं भविष्य सुंदर स्वप्नांनी सजवू शकतो आपण.सुंदर सुंदर संकल्प करू शकतो.आयुष्य सुंदर करण्याचा प्रयत्न करू शकतो.त्यासाठी प्राण पणाला लावू शकतो.स्वप्नांच्या झालरीनं हे आयुष्य आपण अधिकचं सुंदर करू शकतो. रंगवायचं हे आयुष्य रंगीबेरंगी स्वप्नांनी..संकल्पांनी.दृढनिशचयांनी आखून घ्यायची ही आयुष्याची पायवाट.
एकमेकांसाठी शुभेच्छांनी ओसंडून जायचं.तुटुंब भरून यायचं. एवढं तर नक्की आपण माणसं एकमेकांसाठी करू शकतो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....नव्या स्वप्नासाठी...आपलं आयुष्य सुंदर सुंदर स्वप्नांनी व संकल्पांनी बहरून यावं.आंनदाचे डोह...आणि तृप्तीचा सागरात तुम्ही आकंठ डुंबत राहो हीच शुभेच्छा....!!
माणसाच्या आयुष्यात मैत्रीला फार महत्व असतं.वंशाच्या,कुळाच्या,गावा -शिवाच्या,रक्ताच्या,नात्यापेक्षा ही मैत्रीचं नातं फार महत्वाचं असतं.ऐश्वर्य आणि दारिद्रय, सौंदर्य-कुरूपता, बुध्दी आणि मंद बुध्दी,जाती-पाती,धर्म ,देश- परदेश ,वय लिंग वगैरे हे असले कृत्रिम भेद झुगारून ख-या मैत्रीचे धागे अधिक घट्ट होत जातात.हया भेदाच्या सीमा मैत्रीला अडवू नाही शकतं.
मैत्रीचे धागे आपल्या मतलबाच्या चिकट लगदाळीने गुंफणारी माणसं ही कमी नसतात.अगदीच नाही असे नाही.ह्रदयातून निखळ मैत्रीचे झरे ही खळखळत असतातच की.
आपल्या स्वार्थासाठी माणसं वापरण्याची वेगळीच पंरपरा हल्ली समाजात निर्माण झाली आहे.मैत्रीच्या बेगडात स्वार्थाचा चेहरा दडवणारे माणसं ही कमी नाहीत.मैत्री ही एखादा व्यवहार नसते. ती कुठे हिशोब ठेवते?
निखळ,जीवापाड मैत्र जपणारं कुणीतरी असावे असं सर्वांनाचं वाटतं असतं.तशी आपली सर्वांची एक फॅंटन्सी ही असतेच की.
मैत्र जीवाचे शोधत आपण जगत असतो. जगभर वणवण भटकत असतो. ज्याच्या जवळ आपलं ह्रदय उलगडून दाखवावं अशी माणसं कमी भेटतात.ते विरळचं असतात.
जे भेटले ते प्रामाणिक असतातचं असं नाही.अनेकदा ह्रदय ज्याच्या जवळ उलगडले. त्यांनीच ते वेशीला टांगले. असे ही अनुभव असतात.
आपण ही कुणाचं जीवाच जीवलग असावं असं ही वाटतं की माणसाला. कुणाला आपण जीवलग वाटतं असलो तर ते मैत्र ही आपल्याला जपता आलं पाहिजे.
बाॅयफ्रेंड, गर्लफ्रेंड अश्या मैत्रीच्या नवीन फ्रेम तयार झालेल्या आहेत.त्या चौकटीत ही अनेक मैत्री जुळतात.बहरतात ही...तुटतात.विखुरतात.निखळ मैत्रीची सर्वांची मागणी असते.स्त्री-पुरुष हे भेद विसरून मैत्र जपणं तितकसं सोप ही नसतं.ते जपलं जाऊ शकतं.जपतात ही काही लोक.
आयुष्यात अनेक मित्र भेटले.ते जपले ही अनेक.जीवाचे मित्र काही शत्रू ही झाले. काही दशकांपूर्वी मैत्रीचे धागे गुंफले गेले ते अजून ही वरचेवर घट्ट होत आहेत.खांदयावर डोकं ठेऊन रडू शकेल अशी अनेक जीवलग आहेत माझ्या आयुष्यात. ह्रदयात उगाळून लागावं त्यांना असे अधिकार आहेत माझ्यावर त्यांचे.अजून ही माणसं भेटतात. सारेच मित्र नाही होतं.सूर जुळून मैत्रीच गाणं ही जुळत अधुन मधुन. हे सारं चालूं राहील.सुख-दु:खाचं देणं घेणं सुरूचं राहिलं.त्या शिवाय मैत्री कसं जपलं जाईलं?
आज आठवतात ते मित्र.जे या काळाने कायमचे हिरावून नेलेत माझ्यापासून. डाव मोडलेत अर्ध्यावर त्यांचे.
माझ्या आठवणींच्या झुल्यावर त्यांना झुलतं कायम ठेवले नियतीने.
काही मित्र दूर गेलेत.भेटू पुन्हा...म्हणून जे गेले ते अजून ही भेटत नाहीतं.त्यांच्या भेटण्याची मनी आसं आहे. त्यांचा शोध सुरू आहे. अजून ही ते भेटतं नाहीत?
माणसाच्या ह्रदयावर मैत्रीचा असा काही शिलालेख कोरला जातो असेल का? जो दशकोनोदशके पुसला जात नाही.
आज दिवसभर आठवतोय माझा एक मित्र.सोनवणे सुधांशू... जीवाचा जीवलग.तीन दशकांपूर्वी बीड मध्ये पाॅलटेक्निकला असताना भेटला होता. आता कुठं तो ? सध्या काय करतोय? कसं चाललेलं असेल त्याचं मला काहीच माहिती नाही.
माझं मज्जेत चाललंय हे त्याला सांगायचं एकदा पण मी त्याला कसं सांगू? आता तो भेटतं नाही.माझ्या दु:खाची,माझ्या संघर्षाची व दारिद्रयाशी मी देत असलेल्या झुंजीची त्याला जाणीव होती. त्याच्या डोळ्यात मला माझ्याविषयीचा एक आपुलकीचा कणव होता. तो कणव मला पुसून टाकायच्या त्याच्या डोळयातला.कसा पुसू? तो भेटतचं नाहीये.
सुधांशू, मी आता मज्जेत आहे यार.तुला माझ्या चेह-यावर हसू पाहायचं आहे ना? मग ये ना.बघ, मी हसतो चक्क मज्जेत..!!!
आज मैत्री दिनांच्या निमित्ताने आठवणी ताज्या झाल्या आहेत. अनेकांना
भेटावसं वाटतंं पण भेटतं नाहीत काही जीवलग...
आपल्या गुणदोषा सहित आपला स्विकार ज्याच्या ह्रदयात सुरू आहे ना? तो आपला सच्चा मित्र असतो.
बाकी आपल्या ह्रदयाचं खेळणं करणारे, बाजार भरवणारी कमी नाहीत या जगात.मैत्र जीवांचे... सापडत नसतात.त्याचे धागे असतात.ते गुंफावे लागतात.
काही माणसं आपल्याला भेटलेली नसतात.पाहिलेली ही नसतात तरी ते काळजात खोल तळाशी कुठतरी रुतलेली असतात. नकळत रुजलेली असतात.त्यांच आपलं एक अनोखं नातं नकळतं तयार होतं.त्या नात्याला आपण नावं नाही देऊ शकतं पण ते असतं उत्कटं आणि ओतप्रोत प्रेमात चिंबलेले...आपल्या मनाशी घट्ट गुंफले गेलेले. नात्यांच्या कृत्रिम फ्रेम मध्ये आपण त्याला बंदिस्त नाही करू शकतं. फ्रेमचं नाही करू शकलो की त्याचा शो पीसं करणं तर अशक्यच असतं.तसंच एक नावं आहे.ना.धो.महानोर.मनाच्या तळाशी एक अनोखं नातं कोरले गेलेले.
कविता गाणी वाचू लागलो.गुणगुणू लागलो तसं ना.धो.महानोर मनात ठसतं गेले.शाळेतल्या पुस्तकातील कवितेतून ते सर्व प्रथम भेटतं गेले.निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य ते उलगडत गेले.सौंदर्याचे पण पदर असतात का? अलवार ते फेडतं गेले की रूपाचं चांदणं पसरतं जाणारे? महानोरच्या शब्दांनी भारावून टाकलं होतं आमचं तारूण्यं...
रान,शिवाराचं अनोख वेडं ते माणसाच्या मनात पेरतं गेले. निसर्ग आणि सौंदर्य.सौंदर्य आणि प्रेम याचं एक नाजुक बंध असतात.मनात आपसुकचं विणले गेलेले.आभाळ दाटून आलं की मनभर महानोरांचे शब्द थुईथुई नाचू लागतात.मनं रानावनात,शेतात हुंदडतं राहतात.
नभ उतरू आलं
चिंब धरताडं ओलं.
पाऊस..म्हणजे धरती आणि नभाचा प्रणय सोहळाचं की.
या नभाने या भुईला दान द्यावे.
या मातीतून चैतन्य गावे.
पाऊस पडू लागला की पावसानं चिंब ओली रान..
त्यांची गाणी आठवतं राहतात.
दूरच्या रानांत,केळीच्या बनातं
हळदीचे उन्हं कोवळे....
हे शब्द माणसाला ठार रानवेडं करतात.
चिंब भिजलेली प्रिया...आणि झिमझिमणारा पाऊस... प्रणय धूंद मनात महानोरचे शब्द अलवार मोरपीसासारखे फिरत राहतात.शब्दांना पण स्पर्श असतो का? नाहीतर महानोरचं शब्द कानावर आदळतो राहिले की अंग भर शहारे कशाला उमटतं राहिले असते.
पावसाप्रमाणेचं उत्कटतेच्या डोहात डुंबत आलेली प्रिया आठवतं राहते.ओढ,हुरहूर ही निसर्गाच्या कणाकणात भेटतं राहते.इतके आपले असणारे शब्दं हा कवी कसं काय लिहू शकतो? असा भाबडा प्रश्न आपल्याला आपसुकचं पडतं राहतो.
शब्द काळजातून कागदावर उमटतं गेले की त्याची जिवंत कविता तयार होते.तिचं तर मनाचा ठाव घेते.आज ही रानांत गेलं की महानोर चे शब्द मनात घोळत राहतात. हिरव्यागार रानात, पिकं तरारून आलेल्या शेतात ,उनाड वारा अंगाशी लगट करताना महानोरांचे शब्द मनात तरळले नाहीतर नवलचं म्हणायचं.
मला हे कळतं नाही.माझ्या आण्णाच आणि महानोरचं काय नातं असू शकेल? रानांत गेले की महानोरचे शब्द आठवतात नि शब्द आठवले की फाटक्या कपडयातील तुटक्या झोपडीतील माझे आण्णा...!! रानावनात जातं गेलेल्या माणसाचं दु:ख वेदना त्यांचे शब्द नक्कीचं प्रसवत असतील.
या रानांत गुंतलेले प्राण माझे...
तुटकी झ़ोपडी काळीज माझे.
त्यांच्या झोपडीचे नव्हे तर काळजाचे लक्तरे लोंबकळत आहे असे भास होतात. शेतक-याचं जीवन किती कष्टप्रद असलं तरी महानोरच्या शब्दांत त्याची एक वेगळीच श्रीमंती आपणास अनुभवायला मिळते.
माणसाच्या मनात शब्द असे इतकं खरं वाटू शकेल असं साम्राज्य उभे करतात?शब्दांना पण एक अनोखं ऐश्वर्य असतं. दूरच्या रानांत,केळीच्या बनात... गर्द हिरव्या रानात..हे गाणं ऐकलं आणि रानाची ओढं निर्माण झाली नाही असा माणूस विरळच.
रान,शेती,शेतकरी आणि त्यांच्या वेदनांना ते शब्द देत राहिले. काळीज अंथरत राहिले.शब्दगंधेला बाहूत घेण्यासाठी तरसणारा हा प्रेमी काळाच्या कुशीत कायमचा विसावला.
हे पटतं नाही.रुचतं नाही. मरणं कुणाला टाळता येत नाही पण असं अचानक त्यांना आपल्यातून असं घेऊन जाणं मनाला चटका देणारं आहे.आता ते या जगात नसतील पण त्यांचे शब्द...कायम आपलं काळीज टोकरीत राहतील....जखमचं फक्त भळभळतात असं नाही.आठवणीचं पण भळभळ असतेंच की...अनावरं.