बुधवार, १ जानेवारी, २०२५

नविन वर्षाच्या शुभेच्छा व काळ पुरूष वगैरे

 आज  नवीन वर्षाचा पहिला दिवस.काल वर्ष 2024 गेलं.वर्ष 2025 आलं.भिंतीवरलं एक कलेंडर गेलं नि नवीन आलं.काय घडलय?

New Year नविन वर्ष


उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून निथळणारा प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परीवर्तन व भ्रमण गतीत काहीचं फरक पडतं नाही.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो.

फक्त नव्याचा भास असत़ो.सारं सारं नवं नवं वाटायला लागतं.हातातलं बरचसं निसटून गेल्यासारखं वाटतं.आपल्या आयुष्याची ओंजळ हातात घेऊन आपण उभे असतो. ओंजळ ओली असते पण रितीच असते. मकाही क्षणांच्या अस्तित्वाची ओल सांभाळत.एक एक क्षण क्षण अलगद निखळून पडतात.गेलेले क्षण परतं येत नाहीत.आपल्याला हवे असलेले क्षण आपण पकडून ठेऊ शकत  नाहीत.नको असलेले क्षण रोखू शकत नाहीत. खर तरं या विश्वात आपण काहीचं करू शकत नाही.

       या सृष्टी चक्रात तुम्ही भिंतीवरच कलेंडर बदल म्हणून काहीच घडणार नसतं.जे घडतं ते आपल्या मनाच्या अवकाशात.ते भास असतात.काही अभास असतात.नाहीतरी हे जग भास- अभासाच्या हिंदोळयावरच झुलत असते.त्यात आनंदाचे,दु:खाचे क्षण आपण गोळा करत राहतो.काही क्षणांचे ठसे आपण मनावर छापून ठेवलेले असतात.काही क्षण मनावर ओरखडे उमटवून जातात.


    खरंतर अनंत ब्रम्हाडांत दिवस उगवत नाही.दिवस मावळत नाही.काळाच्या अनंत रेषेवर ब्रम्हांड नुसतं सरकतं असते.ते असेच सरकत राहणार आहे. पुढे मागे खालीवर असा देशाचा पसारा कुठं असतो अवकाशात?

गमंत अशी की, आपण मात्र घड्याळाच्या काटयावर आपलं आयुष्य बेतून घेतो.त्या घड्याळाला ही आपण आकार दिला.उकार दिला.देवासारखा माणसानं काळाला सुंदर केलं.नटवलंयं,सजवलयं.

काळ पुरूष  असतो की स्त्री? 

काळाला आपण जवळचा सखा मित्र, आप्तेष्ट करून टाकलं.बाय -बाय 2024 व वेल कम 2025 अश्या रांगोळ्या तुम्ही पाहिल्याचं असतील.बाय बाय ,वेल-कम असं घसाफोड सुरुच असते.घराघरावर केलेली रोषणाई.चौकाचौकात वाजणारे डीजे नवं वर्षाच्या स्वागताला सज्ज असतात.एका अनोख्या धूंदीत जग बुडालेले असते.बेधूंद...बेभान होतात माणसं. का?

माणसाला बेधुंद होण्यासाठी काही तरी निमित्त  हवं असतं?

पिण्यासाठी तर ते नक्कीच  हवं असतं.

नव्या वर्षाचं स्वागत.सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घड्याळाच्या काट्यावर जगाचं लक्ष असतं.नवं वर्ष आलं की एकच जल्लोष होतो.


    नवं वर्षाचं बाळं रांगत या सृष्टीचा कब्जा घेत पण आपण स्वागतच नाही केलं तर? नवं वर्ष रूसून बसेल का? खूप नाचून नाचून स्वागत केलं तर ते वर्ष माणसांना  प्रसन्न होत असेल का? असं  काही होणार नसतं तरी आपण स्वागतात कसूर करत नाही.कसूर करायची नसते.माणसं एखाद्या संज्ञेच्या संकल्पनेच्या किती प्रेमात पडतात,नाही?


आपण रांगोळ्या काढतो.डीजे वाजवतो.घराघरावर रोषणाई करतो.लेजरचे शो करतो. हे नविन वर्षीला आवडतं म्हणून आपण करत नाहीतर आपल्या ते आवडतं.आपल्याला प्याची असते आपण पितो.आपल्याला नाचायचं असतं आपण नाचतो.आनंद साजरा करण्याची ती आपली पध्दत आहे.जो तो आपआपल्या पध्दतीने करत असतो.निमित्त हवं असतं.

   तसा साराच हा भातकुलीचा खेळ असत़ो.खोटं खोटं का असेना पण मज्जा येते ना ? मग खेळायचं.मज्जा महत्वाची.संस्कृती वगैरे गोष्टी पण अश्याच मानवनिर्मितच आहेत ना? कशाला टेन्शन घ्यायचं? 


      आयुष्य सा-यांनाच असते पण आयुष्याची लांबी सां-याची सारखी नसते.कुणाचं लांब असतं.कुणाचं आखूड असते.जे क्षण आपल्याला वाट्याला येतात.ते फक्त आपले असतात.त्यांना कवेत घेण्याचं काम आपलं असतं.सुख दु:खाचे कण क्षण पाठीवर घेऊन आपल्या वर आदळत असतात.जगणं म्हणजे एक प्रणयच असतो हवाहवासा,नाही का? दु:ख आणखी सुखाच्या झुल्यावर झुलत ठेवणारा...!!!

आपला भुतकाळ आपण बदलू शकत नाही पण वर्तमानाला आपणं भिडवू शकतो.जिंकू ही शकतो.आपण भविष्यकाळ  सुंदर सुंदर स्वप्नांनी व संकल्पनानी सजवू शकतो.नटवू शकतो.सागराच्या किना-यावर नाही का आपण खोपे करतं? एक लाटं आली की ती सारं होत्याचं नव्हते करते.तसचं हे काळाच्या लाटेत  आपलं सारं  सारं या अनंत ब्रम्हांडांत मिसळणार असतं पण ते आपण करतचं असतो.करावं लागतं.दुसरं काय करणार ? आपल्या हातातच काय आहे?


आपलं भविष्य सुंदर स्वप्नांनी सजवू.सुंदर सुंदर संकल्प करू.आपलं आयुष्य आपणचं सुंदर करण्याचा प्रयत्न करूया.त्यासाठी प्राण पणाला लावू.

बोला सर्व जण,"नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!! हॅप्पी न्यू इयर...!!


                                    परशुराम सोंडगे

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

अटलजी: एक संवेदनशील कवी

 

Member of Parliament  #prime minister of India

 Lok Sabha.Bajpai.


भारतीय राजकारणातील कुशल नेता अटल बिहारी वाजपेयी हे केवळ एक राजकीय व्यक्तिमत्त्व नव्हते, तर एक संवेदनशील कवी होते, ज्यांच्या कवितांनी मानवतेचा, देशभक्तीचा आणि जीवनाच्या विविध पैलूंचा उदात्त स्वर व्यक्त केला. त्यांचे साहित्यिक मन त्यांच्या प्रत्येक कृतीत आणि निर्णयांत दिसून येत असे. अटलजींच्या कवितांनी केवळ राजकीय विचारसरणी व्यक्त केली नाही, तर त्या समाजाच्या गाभ्याला भिडल्या, विशेषतः भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनाशी.

अटलजींच्या कवितांमध्ये जीवनाचे तत्वज्ञान, संघर्ष, आणि प्रेरणा यांचा मिलाफ दिसतो. त्यांची कविता "हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा" ही केवळ त्यांच्या जिद्दीची अभिव्यक्ती नव्हे, तर देशवासीयांना दिलेला आत्मविश्वासाचा संदेश आहे.

          त्यांच्या कवितांमध्ये मानवी भावना, सामाजिक स्थिती, आणि देशाच्या समस्यांवर एक हळवा दृष्टिकोन दिसतो. त्यांनी शब्दांमध्ये संघर्ष व्यक्त केला, पण कधीही निराशा झळकू दिली नाही. त्यांच्या प्रत्येक ओळीत सकारात्मकता आणि आशेचा संवाद असे 

           भारतीय शेती हा अटलजींसाठी नेहमीच संवेदनशील विषय होता. ते शेतकऱ्यांना भारताचे खरे पोशिंदे मानत. त्यांच्या कवितांमध्ये शेतकऱ्यांच्या श्रमाचं, त्यांच्या संघर्षाचं आणि त्यांच्या आशांंचं प्रतिबिंब दिसतं. त्यांच्या लेखणीतून शेतकऱ्यांच्या श्रमाचं महत्त्व अधोरेखित होतं, तसेच त्यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर प्रकाश टाकला.

त्यांच्या कवितेतून ग्रामीण भागातील परिस्थितीचे चित्रण दिसते:

"धरती मां का कर्ज चुकाने,

हल-बैल संग खेत सजाने,

पसीने की धारों से,

फसलें मुस्कान लाती हैं।"

या ओळींमधून शेतकऱ्यांच्या कठोर मेहनतीला त्यांनी सलाम केला आहे. त्यांना शेती फक्त अन्नधान्य निर्मितीचा स्रोत वाटत नसे, तर ती भारताच्या संस्कृतीचा आत्मा वाटत असे.

         अटलजींनी केवळ कवितांमधूनच नव्हे, तर धोरणांमधूनही शेतकऱ्यांसाठी काम केले. त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या, जसे की पाणी व्यवस्थापन, सिंचन प्रकल्प, आणि ग्रामीण रस्त्यांचा विकास. त्यांच्या "प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजने" मुळे शेती उत्पादनाला बाजारपेठांशी जोडण्याचा मार्ग सुकर झाला.

        अटलजींच्या मते, "शेती हा केवळ एक व्यवसाय नाही, तर देशाच्या संस्कृतीचा एक भाग आहे." त्यांची कविता शेतकऱ्यांच्या श्रमाचं महत्त्व अधोरेखित करते, तर त्यांच्या धोरणांनी त्या श्रमांना योग्य दिशा दिली.

अटलजींच्या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या कोणत्याही एका घटकापुरत्या मर्यादित नव्हत्या. त्यांनी जीवनाचा प्रत्येक पैलू कवितेतून व्यक्त केला. संघर्ष, पराभव, विजय, शांती, आणि सहिष्णुता या सर्व भावनांना त्यांनी आपल्या कवितांमध्ये स्थान दिलं. त्यांच्या कवितांमध्ये एका कवीचं हळवं मन आणि एका नेत्याचं विशाल दृष्टिकोन यांचा सुंदर मिलाफ दिसतो.

त्यांच्या कवितांनी जीवनाच्या संघर्षांमध्ये खंबीर राहण्याचा संदेश दिला.
"जीत की खातिर जिद्दी हूं,

हार नहीं मानूंगा।"

त्यांनी भारतीय निसर्गाचं आणि शेतीचं अप्रतिम वर्णन केलं.

"हरी-भरी धरती का आंचल,

मेरी सांसों में बसा है॥

त्यांची कविता माणुसकी आणि सहिष्णुतेचा संदेश देते.

अटल बिहारी वाजपेयी यांचा कवी म्हणून प्रभाव अमर आहे. त्यांनी आपल्या कवितांमधून फक्त भावना व्यक्त केल्या नाहीत, तर एक राष्ट्र म्हणून भारताला आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासी बनवण्याचा मार्गही दाखवला. त्यांच्या कवितांमधील संवेदनशीलता आणि शेतकऱ्यांवरील प्रेम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची साक्ष देते.

        आजही त्यांची कविता लाखो लोकांना प्रेरणा देते, शेतकऱ्यांना संघर्ष करण्याचं बळ देते, आणि भारताच्या संस्कृतीचा गौरव वाढवते. अटलजी केवळ एक नेता नव्हते, तर शब्दांतून मानवतेचं दर्शन घडवणारे एक अमर कवी होते.


Marathi Quotes | Love Quotes in Marathi | Motivational Quotes in Marathi | Suvichar Marathi | Good Morning Quotes Marathi | Life Quotes in Marathi | Good Thoughts in Marathi | Friendship Quotes in Marathi | Sad Quotes in Marathi | Aai Marathi Quotes | Attitude Quotes in Marathi | Shivaji Maharaj Quotes in Marathi | Mothers Day Quotes in Marathi | Fathers Day Quotes in Marathi | Guru Purnima Quotes in Marathi



सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

तुमचा गाल आमची थप्पडं

 तुमचा गाल आमची थप्पडं

एकांकिका


मी काॅलेजला असताना एक एकांकीका पहिली होती.पूर्वी एकांकिकाचे टायटल फार भन्नाट असतं.सोशल मिडीया नव्हती तेव्हा नाहीतर एका एका टायटेलनं तुफान राडा केला असता  सोशल मिडीयावर....!! 

'तुमचा गालं..!!, आमची थप्पड..!!" अशी भन्नाट  टायटल असलेली सामाजिक  व राजकारणावर भाष्य करू शकेल अशी  एकांकिका एका स्पर्धेत  पाहण्यात आली होती.

एका सामान्य नागरिकाची कशी ससेहोलपट केली जाते या व्यवस्थेमध्ये याची काही प्रसंग मोठ्या कौशल्याने त्या एकांकिकेत गुंफले होते.

आम आदमीची प्रत्येक वेळेला कशी  प्रत्येक टप्प्यावर हारेशमेन्ट केली जाते हे दाखवण्याचा अफलातून  प्रयत्न त्यात केला होता.

या व्यवस्थेचे आणि तुमचं नात काय ?,

तुमचा गाल आणि आमची थप्पड..!!

तुम्ही फक्त  मुकाटयाने गाल पुढे करा....आम्ही एक थप्पड  लावतो.

थप्पड लगावण्यात एक प्रकारचा परमानंद असतो.हा आंनद दुस-याला देताना तुम्ही तक्रार करू नका.हसू नका पण सोसा.रडू नका फक्त कण्हा.

तुमच्या गालात जर कुणी जोरात थप्पडं मारली तर तुम्ही काय कराल? आपल्या चिंतनशीलतेला भरपूर वाव देणारा हा प्रश्न आहे.

एखादा पत्रकार तुम्हाला येऊन विचारू शकतो? आता कसं वाटतय? थप्पड  खाल्ल्यानंतर आपल्याला काय काय वाटू शकत हे याची आपली कल्पना करा.

आमचं एक सरं वर्गात मुलांना शिक्षा देण्यासाठी एक नामी युक्ती करतं.मुलींना मुलाच्या कानफटात मारायला लावतं. आता थप्पड  मारलीचं जाणार आहे हे तर नक्कीच  होतं.आमची एवढीचं अपेक्षा असे की एखाद्या सुंदर मुलीनं आमच्या कानफटात  मारावी.अनेकदा सुंदर मुली या नाजूक असतात.त्यांची थप्पड  म्हणजे गालावर फुलांचा मारा केल्यावाणी असे.कानामागे मुंग्या निघण्यापेक्षा गुदगुल्या होईत.

थप्पडं खाणं चांगलं नसलं तरी पण त्यात एक सुख दडलेलं असे पण हे सुख जास्त वेळ टिकत नसे. त्या गोब-या मऊ मऊ गालावर  सर एक सणसणीत  क आवाज काढणारी थप्पड  मारतं.दिवसाचं चांदण्या पाहण्याचा महत भाग्य ही आम्हाला भेटे.

 आम आदमीचा गाल फक्त थप्पड  खाण्यासाठी असतो.तुमच्यावर सत्ता गाजवणा-या सत्ताधीशासाठी तरी तुमच्या गो-या गोब-या गालाचा दुसरा काय उपयोग असू शकतो?

आता तुम्ही म्हणणार हे काय लावलं थप्पड  पुराणं?

आपले जे राजे,एकटं बाॅस,जंगलाचा शेअर,डाॅन अशी जे नाव धारण करून,आपणचं आपल्या उरावर बसण्यासाठी निवडून  दिले आहेत.त्यांच्या थप्पडा खाण्यासाठी तयार रहा.

थप्पड पे थप्पड  पडणारच आहेतं.

शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

आपण सारे पागल ठरतो तेव्हा...!!!


संसद हे आपलं सर्वोच्च सभागृह आहे.भारतात  संसदेपेक्षा सर्वोच्च असं काही  ही नाही.असं मी नागरिक शास्त्राच्या पुस्तकात शिकलेलो आहे. नागरिकशास्त्र शिकवणारे आमचे शिक्षक भारी शिस्तीचे होते.ते आमचे हात फोडून काढत पण नागरिकाची सनद ,कर्तव्य व अधिकार असल्या गोष्टी पाठचं करून घेत असतं.
एखादा अधिकार आपण त्यांना  सांगितला की ते त्याचं कर्तव्यं विचारतं त्यांच म्हणणं स्पष्ट  असे अधिकार आणि कर्तव्य  हया नाण्याच्या दोन बाजू आहेत.नागरिक आपले अधिकार  मागतात पण कर्तव्य मात्र जाणूनबुजून विसरतात.सुजाण  नागरिक  तोच जे कर्तव्य  विसरत नाही.

                           आम्हास कर्तव्य  सांगता नाही आले की ते चड्डी ओली होई पर्यंत बेजरब मारत असतं.त्यावेळी  सुजाण आणि सजग पालकांच्या टोळया नसतं.त्यामुळे शिक्षकांना आवरायला कुणी नसे.शिक्षणात ही आंनदायी शिक्षण हा प्रकार  तेव्हा सुरू झालेला नव्हता.
जेव्हा मी इतिहासात हिटलर नाव ऐकलं तेव्हा पासून मी त्या सरांना हिटलर समजत असे. ते हिटलर सारखचं वागतं. दिसतं पण.
लोकशाहीच्या धडे देणा-या माणसांनी हिटलर असू नाही अशी माझी अपेक्षा असे पण माझ्या सारख्या गुलामांच्या मताला काहीच किंमत नसे.
बरं मला वाटतं ते तरी व्यक्त होण्याची हिम्मत  माझ्याकडे तरी कुठे होती?कुणाकडेच नव्हती.त्यामुळे गुलामाच्या अपेक्षेला काहीचं महत्व  नसतं.हे सत्य कळायला मला पन्नाशी गाठावी लागली.
नागरिकशास्त्रा शिकवणा-या हिटलरी शिक्षकामुळे मला लहानपणापासून  संसद या शब्दात विषयी कमालीची जिज्ञासा आणि  जिव्हाळा वाटतं आलेला आहे.
संसदेवर दोनदा हल्ले झाले होते तेव्हा पण मी फार भावूक झालो होतो.भावूक होण्यापेक्षा फार भयभीत  झालो होतो.संसदेवर ॲटक म्हणजे काय जोक्स काय? 
आपल्याला वाटतं किंवा कळतं हे सार तसचं असतं असं नाही.खरं तर फारचं भयंकर असतं कधी कधी.आपल्याला काहीचं कळतं ही नसतं. आपण पागल असतो याचा साक्षात्कार  काही घटना आपल्याला करून देतात.
कालपरवा जे संसदेमध्ये घडलं.ती अशीच एक देश वासियांना अक्कल शिकवणारी घटना होती. संसद हे सर्वोच्च  सभागृह  वगैरे काही नसतं. तो एक आखाडा असतो.कुस्त्या खेळायच्या असतात तिथं.झोंबाझोंबी खेळायच्या असतात.नाहीच समोरची गडी रेटले की महिलांना पुढे करायचं.पुढं किती गडी शटकरं असले तरी महिलांना काय करणार? कुणाच्या बांगडया फोडून तुम्ही काय पौरुषत्व  सिध्द करणार?
कसली चर्चा कसली! कसली अर्चा .!!
आज मला भयंकर राग आला आहे.
कुणाचा काय म्हणून विचारता ?त्या नागरिकशास्त्र  शिकवणा-या त्या आमच्या शिक्षकाचा. फुकटातचं त्यानं आमचं हात फोडलं.चड्ड्या ओल्या केल्या.
संसद अशी पण असते हे आम्हा पामराला कुणी शिकवलं नाही.
 हे बरोबर नाही.अध्यक्ष  महोदय...!!

गुरुवार, १९ डिसेंबर, २०२४

ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार

 ग्रेटभेटः सुधीर रसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कार 








पुरस्कार राव,

हे लयं भारी झालयं बघ.गुरूवर्य  सुधीर रसाळला सरांना तू एकदाचं कसतरी गाठलंस.

यार,तू लयचं लेट केलसं.

जाऊ दे ते. लेट पण थेट भेटलास.

हल्ली तू पण हॅक झाल्यासारखा वागतोस.चांगली 

चांगली ग्रेट माणसं तुला भेटतच नाहीत बुवा. उगीच आपलं कुणाच्या भी गळयात पडतो. ग्रेट माणसाला तू शोधलं पाहिजे.तुझं भी इम्प्रेशन डाऊन नाही झालं पाहिजे ना?

काय म्हणतोयस ?गर्दीच लय झालीय..!! 

तुझं भी खरं म्हणा.तू तरी काय करणार? काही माणसांनी तुलाचं कॅपचर करून टाकलयं!

त्यामुळे तुझा भी नाईलाजच असतो म्हणा. तू तरी काय करणार?

आता खारमुरे वाटाव्यात तसचं तुला कुणाच्या गळयात बांधतात म्हणल्यावर गर्दी तर होणारचं ना? देतेत म्हणल्यावर घेणारे येणारच ना? रेवडी पहिलवानाला काय कमी असते?ते तर कवा भी लंगोट बांधून उभीच  असत्यात की.

क्काय..? हौसे नवसे गवसे सारेचं येणार ना?

पण पुरस्कारराव, प्राॅब्लेम काय होतोय. गुरूवर्य रसाळ सारखी ग्रेट माणसं गर्दी कसली घुसतेत?

ते तिकडं फिरकत भी नसतेत.त्यांच काय आडलं तुझ्या वाचून?

त्यांना तुला गळयात घालून तरी फिरायची थोडी हौस असते? ते थोडचं तुला मिरवित बसणार आहेत.

ग्रेट ते ग्रेटचं...!! 

ऐवढं एक लयं झॅक झालयं बघ.तू कस तरी सरांना गाठलस.त्यांच्या गळयात पडलास.

बाबा, धन्य झालास तू.

नाहीतर तुझी काय कमी थू...!! थू ...!!!  सुरू नाही.आपलं भी स्टेटस राह्यलाय पाहिजे ना?

अशाचं ग्रेट माणसाच्या शोधात राहत जा.तुझी भी इज्जत  राहिल.

चांगल्या ग्रेट माणसाची संगत बरी असते.

माकडासोबत खेळतं बसल्यावर....तुझी तरी काय किमती राहणार?

      सर, साहित्यसेवेसाठी केलेल्या अप्रतिम कामगिरीबद्दल आम्हाला तुमचा अभिमान आहे.आपलं हार्दिक  अभिनंदन..!!

आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा!


#साहित्यअकादमीपुरस्कार #सुधीररसाळ #मराठीसाहित्य

बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

पुष्पा-2:- राडाच पण हवाहवासा..!!

पुष्पा-02:- एक हवाहवसा राडा..!!



'पुष्पा-02 तुम्ही  पाहिला का?' हा प्रश्न सध्या जनरली तुम्हाला कुणी ही कुठं ही विचारू शकतं.तुम्ही शाॅकेब्लस् व्हायचं नाही.साधा पिक्चर  आहे तो ..!!  नाही पाहिला तर नाही पाहिला त्यात काय एवढं? असं तर बिलकुल म्हणायचं नाही.मग
'पुष्पा-01चांगला होता की पुष्पा-02 ?'
ओटीवर पाहिला की थेटरात?अशी अनेक प्रश्न तुम्हाला विचारली जाणार मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार? आहे की नाही पंचाईत? पुष्पा-02  न पहाणं म्हणजे दिवाळीच्या सणाला लाडू न केल्यासारखं आहे.गटारी साजरी न केल्यासारखा कमी पणा आहे.
अजून यांनी पुष्पा -2 नाही पाहिला रे.बिच्चारा...!! तुमची अशी कुणी कीव ही करू शकतं.
तुम्ही चहा पितात,नास्ता करता,सिगारेट  ओढता ,जेवण  करता,पानं खाता आणि पुष्पा- 2 पाहत नाही? का पहात नाही तो?
छे..छे..!! तुम्ही एक भयंकर चूक करत आहात.
पुष्पा-2 पहाणं फार अपरिहार्य  करण्यात आलेलं आहे.कुणी केलेयं इतकं अपरिहार्य..??
तुम्ही  मला केलं.मी तुम्हाला केलं.आपणचं आपल्याला.
पुष्पा-2 ने तुफान राडा केला बाॅक्स  ऑफिसवर...!! त्या राडा करणा-या गर्दीत  तुम्ही  नाही? कसं वाटतयं तुम्हाला?
रेकॉर्ड  होत असताना आपला पण खारीचा वाटा पाहिजेना त्यातं..!!
बघा,ना एकदाचा पुष्पा-02
काय त्यात एवढं? असं काय विचारता?
'झूकेगा नही साला' असं म्हणतं  एक गावठी आडाणी उडाणटप्पू पुष्पराज आहे त्यातं.फारच बेधडक वागतोय तो.कधी कधी तो सटकतो पण.
तुमच्या आमच्या मनात असा एक हिरो दडलेला असतो.आपण त्याला दाबून ठेवलेले असते आपल्या आत. तोच उफाळून  येतोवर. तुटून पडतो तो समोरच्यावर... या व्यवस्थेवर
.!!
भौतिकशास्त्राचं सारे नियम झक मारतात त्याच्या पुढे..!! पिक्चरमध्ये रोमान्स भी सपक नाही दाळभातासारखा.पुळचाट..!! पुष्पराज हे असलं डेंजर माणूस आणि ती तसली त्याच्यावर जीव ओवाळून  टाकणारी त्याची ती फटाकडी श्रीवल्ली...!! काय अफलातून  पोट्टी यार...!! बालीवूडमधल्या सा-या नटया मिळमिळ वाटतात सा-या रश्मिका पुढे. ठेचा ती... !! नुसता झणझणीत..!!
झुकेगा नही साला म्हणतं भिडणारा प्रचंड महत्वाकांक्षी माणूस पुष्पराज बघा एकदाचा. तेवढचं रक्त थोडं फार गरम होतं काही वेळा पुरतं.
कुणा पुढं ही शेपट्या घालून गोंडा घोळत बसणारी माणसाची कुत्रे झालेली तर आपण रोजचं पहात आहोत.
काय म्हणता? त्या पुष्पराजची व श्रीवल्लीची जात कोणती आहे? इंटर कास्टं लफडं तर नाही ना ते..आपल्या सैराटमधील अर्ची आणि परश्या सारखं..?
डोंबल आमचं....!! घ्या आता. ते कुठं माहित मला?
हॅशटॅग्स तयार:

#Pushpa2Rocks
#झुकेगानहींसाला
#PushpaRajOnFire
#SrivalliForever
#RecordBreakingPushpa
#ActionKaBaap

गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

सकारात्मक विचारांची कला: अनुमानांच्या पलीकडे एक प्रवास

 सकारात्मक विचारांची कला: अनुमानांच्या पलीकडे एक प्रवास



 जीवनाच्या गुंतागुंतीच्या नृत्यात, आजचा दिवस निव्वळ सट्टेबाजीचा दिवस वाटतो.  मानवी मन हे एक गूढ आहे - गुंतागुंतीचे, अप्रत्याशित आणि खोलवर भावनिक.  सर्व प्रगती असूनही, मानवी हृदयाची प्रवृत्ती मोजण्यासाठी सक्षम असे साधन आपण अद्याप विकसित केलेले नाही.  आणि जरी असे उपकरण अस्तित्वात असले तरी ते भावना, आशा आणि स्वप्नांचे प्रमाण कसे ठरवेल?


मतदान आणि अंदाज: एक सदोष विज्ञान?

लाखो लोकांची सामूहिक मानसिकता समजून घेण्याचा दावा करणाऱ्या पोल, सर्वेक्षणे आणि भविष्यवाण्यांबद्दल आपण अनेकदा ऐकतो.  पण प्रामाणिकपणे सांगू - आपण इतक्या लोकांच्या विचारांचे आणि भावनांचे खरोखर विश्लेषण करू शकतो का?  या पद्धती जरी विज्ञानाच्या वेषात घातल्या असल्या तरी बऱ्याचदा आधुनिक काळातील अंधश्रद्धा वाटतात.

       तज्ञ आणि विश्लेषक अनेकदा आत्मविश्वासाने बोलतात, त्यांचे निष्कर्ष परिपूर्ण सत्य म्हणून सादर करतात.  पण प्रत्यक्षात, या तथाकथित वैज्ञानिक निष्कर्षांवर आपण किती वेळा प्रश्न विचारतो?  बहुतेक लोक, अगदी तज्ञ देखील, बहुसंख्यांचा विरोध करण्यापासून दूर जातात.  शेवटी, जनमताच्या विरोधात जाणे सोपे काम नाही.


कल्पना करण्याची मानवी प्रवृत्ती


 मानवांमध्ये एक आकर्षक प्रवृत्ती आहे: आपण गोष्टींची जशी आपली इच्छा हवी तशी कल्पना करतो.  आपल्या इच्छेशी जुळणारे आणि आपल्याला आनंद देणाऱ्या रंगात जग रंगवणाऱ्या परिणामांचा आम्ही अंदाज लावतो.  कल्पनाशक्तीची ही कृती म्हणजे केवळ इच्छापूरक विचारच नव्हे;  तो आनंद आणि सांत्वनाचा स्रोत आहे.




 वास्तविकता भिन्न असली तरीही, सकारात्मक परिणामाची कल्पना करण्याची केवळ कृती आपल्याला आनंदाने भरते.  ही आपल्या मनाची जादू आहे - आशा आणि आशावादाचा फुगा तयार करण्यास सक्षम आहे.


 सकारात्मक विचारांची शक्ती


 या भव्य विश्वात एक अदृश्य शक्ती आहे जी आपल्या आतल्या आवाजांना ऐकते.  आपण त्याला नशीब, आकर्षणाचा नियम किंवा दैवी इच्छा म्हणतो, ते आपल्या विचारांना आणि हेतूंना प्रतिसाद देते.  जेव्हा आपण सकारात्मक परिणामांवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आपण आपल्या जीवनात चांगल्या गोष्टींना आमंत्रित करतो.


 हा एक साधा मंत्र आहे:


 चांगल्या गोष्टी घडत असल्याची कल्पना करा.


 आपल्या विचारांच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.


 परिस्थिती कशीही असो, तुमची मानसिकता सकारात्मक ठेवा.



 एक उत्तम उद्याची वाट पाहत आहे


 जीवनाकडे आपल्या उर्जेशी संरेखित करण्याचा एक मार्ग आहे.  जर आपण सकारात्मक विचार केला आणि सर्वोत्तम होईल यावर विश्वास ठेवला तर आपण नकळतपणे त्यासाठी मार्ग तयार करतो.  चला तर मग, उत्कर्षाच्या विचारांनी आपले मन भरू या, मोठी स्वप्ने पाहूया आणि आपला विश्वास दृढ ठेवूया.


 कारण, शेवटी, जे काही घडते ते नेहमीच आपल्याला काहीतरी चांगले घेऊन जाते.  चला सकारात्मक विचार करण्याची कला आत्मसात करूया आणि जीवन सुंदर, अनपेक्षित मार्गांनी कसे उलगडते ते पाहू या.


 चांगले विचार करा, चांगले विश्वास ठेवा आणि

 सर्वोत्तम जगा.

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४

मनोज जरांगेचा जीव महत्वाचा: आरक्षणाच्या लढ्याचे नायक

 नोज जरांगेचा जीव महत्वाचा: आरक्षणाच्या लढ्याचे नायक


मनोज जरांगे, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील प्रमुख चेहरा, आज केवळ एका व्यक्तीचा नाही तर लाखो मराठा समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या आवाजाचा प्रतीक बनला आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून आंदोलनाचा एक सशक्त लढा उभारला आहे. त्यांच्या या संघर्षामुळेच मराठा समाजाचे हित सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारवर मोठा दबाव आला आहे.

जरांगे यांनी आपल्या आंदोलनादरम्यान केलेल्या उपोषणामुळे शारीरिक अवस्था खालावली, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, त्यांचा जीव फक्त त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नसून, मराठा समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक बनला आहे. जरांगे यांचा जीव सुरक्षित राहणं म्हणजे मराठा समाजाच्या संघर्षाचं चालू राहणं आणि त्यांच्या मागण्यांसाठी लढण्याची शक्ती कायम राहणं होय.

जरांगे यांचा जीव महत्वाचा आहे कारण त्यांची लढाई फक्त एका समाजापुरती मर्यादित नसून, हा लढा सामाजिक न्यायासाठी आहे. त्यांच्या नेतृत्वाने मराठा समाजातील असंतोषाला आवाज दिला आहे आणि त्या समाजाच्या संघर्षाला एक नवी दिशा दिली आहे.

बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४

कर्णाच्या भावविश्वाचं चित्रण करणारी कांदबरी –मृत्यूजंय


"मृत्युंजय"
ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे, जी महाभारतातील कर्णाच्या जीवनावर आधारित आहे. ही कादंबरी कर्णाच्या जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकते आणि त्याच्या संघर्षमय जीवनाची कथा सांगते. कर्णाच्या दृष्टीकोनातून लिहिलेल्या या कथेच्या माध्यमातून लेखकाने समाजातल्या विषमतेविरुद्धचा त्याचा लढा, त्याची दुःखे, त्याच्या नैतिकता आणि त्याचे विचार यांचा सखोल अभ्यास केला आहे.

कथानक:

"मृत्युंजय" कादंबरी सात भागांमध्ये विभागली आहे, आणि त्यामध्ये कर्णाच्या जीवनाचे विविध टप्पे उलगडण्यात आले आहेत. कादंबरीत मुख्यतः कर्णाचा संघर्ष, त्याचे दानवीरपण, त्याची मैत्री, त्याचे राजनिष्ठा आणि त्याच्या आयुष्यातल्या विविध घटना यांचा समावेश आहे.

कर्णाला जन्मतःच समाजाने नाकारले, कारण त्याच्या जन्माची गोष्ट गुप्त ठेवली गेली होती. सूर्यदेवाचा पुत्र असूनही त्याला समाजात स्थान मिळाले नाही. त्याच्या अंगावर कवच कुंडले असतानाही तो आपल्या जन्माच्या सत्यामुळे अपमानित होत राहिला. मात्र त्याने स्वतःच्या सामर्थ्याने आणि निष्ठेने आपली ओळख निर्माण केली.

कर्णाच्या जीवनातील मोठी घटना म्हणजे त्याची दुर्योधनाशी मैत्री. दुर्योधनाने कर्णाला स्वीकारले, आणि कर्णाने त्याला आपल्या मित्र म्हणून आपले जीवन समर्पित केले. दुर्योधनासाठी कर्णाने अनेक मोठे त्याग केले. कादंबरीत कर्णाच्या मैत्रीला, त्याच्या निर्णयांना आणि त्याच्या भावनात्मक संघर्षांना मोठे स्थान आहे.

साहित्यिक वैशिष्ट्ये:

शिवाजी सावंत यांनी "मृत्युंजय" मध्ये कर्णाच्या भावनात्मक प्रवासाला खूप सुंदर शब्दात मांडले आहे. त्याच्या विचारसरणीचा आणि निर्णयांचा खोलवर अभ्यास केला आहे. लेखकाने महाभारतातील इतर पात्रांच्या भूमिकाही या कथेच्या माध्यमातून उलगडल्या आहेत, ज्यामुळे कादंबरी अधिक व्यापक आणि प्रभावी बनते.

निष्कर्ष:

"मृत्युंजय" कादंबरीतून कर्णाचा जीवनसंघर्ष, त्याची मानवी प्रवृत्ती, त्याचे नैतिक द्वंद्व आणि त्याच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण घटना सुंदरपणे मांडण्यात आल्या आहेत. कादंबरी महाभारताच्या कथेचा एक नवीन पैलू उलगडते, ज्यामुळे वाचकांना कर्णाच्या जीवनाची एक वेगळी आणि सखोल दृष्टी मिळते.



सोमवार, ८ एप्रिल, २०२४

सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!

 सिर्फ देश नहीं, संविधान ही बदल रहा है...!!



सरकारला विचार नसतात.राजकीय पक्षांना विचार असतात. तशी विशिष्ट विचारांची सरकार चालवायला अजिबात गरज नसते.सरकार हे आपल्याला घटनेशी प्रामाणिक राहूनच चालवायचे असते‌.घटनेतील उद्देश्यासाठी सरकारने प्रमाणिक काम करावे अशी अपेक्षा घटनेची आहे.सरकारने काय करावे,काय करू नये याचे नियम आहेत.कायदे आहेत.या देशात घटनेपेक्षा कुणी ही मोठा नसतो.जेव्हा कायद्याचा,पदाचा गैरवापर केला जातो आणि स्वायत्त संस्था जेव्हा सरकारच्या हाताच्या बटीक बनतात तेव्हा देश हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर उभा असतो.या स्वायत्त संस्थेच्या खांद्यावर बंदूक ठेऊनच हुकुमशाही आपले पाय हळूहळू पसरत जाते.आपला झेंडा रोवत असते हे सा-या जगाने पाहिले आहे. हुकुमशाहीची सुरूवात घटना आपल्याला हवी तशी लवचिक करूनच होत असते.आपण लोकशाहीचे किती सुंदर गीतं गायली तरी हुकूमशाही आपली मूळं खोलवर रूजवत जात असते.एक कंपूशाही निर्माण होत जाते.दुर्बल,भित्रे,लाचार लोक कंपूशाहीत सामिल होऊन आपली जागा तयार करून घेतात.सोन्याच्या पिंजरा त्यांना महाल वाटु लागतो.त्यांना गुलामीची जाणीव होतेच असं नाही.झाले तरी ते हतबल असतात.

     भारतीय लोकशाही ही सांसदीय लोकशाही आहे.सध्या दोन तीन दशका पासून घटनेचा हा ढाचा जाणीवपूर्वक बदला गेला आहे.पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला जातो आहे. तो जाहीर केला जात आहे.दोन राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाची तुलना करत  लोकांचं मत तयार केले जात आहे.संसदीय पक्ष त्यांचा नेता निवडत असतात.दोन  किंवा अधिक पक्षांची तुलना करत लोकांचं मतदान  होणे आवश्यक असते.एखादया व्यक्तीला  महत्व येणे हे संसदीय लोकशाही साठी भयंकर गोष्ट असते.लोकशाहीचा ढाचा पायदळी तुडवण्या  सारखंचं हे आहे. अशी तुलना का? संविधान बदलाची ही नांदी आहे. हे अनेक दशके चालू आहे पण कुणीचं गंभीर घेत नाही.

      एका पक्षाने आपला पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर केला की आपण दुस-या पक्षाकडून तशीच अपेक्षा करतो. हे भारतीय लोकशाहीच अपयश आहे.ही सुरूवात आहे.आपण हळू हळू घटनेचे साचे तोडत तर जाणार नाहीत ना? प्रचंड भिंती वाटते आहे

          धर्म आणि जातीच्या नावाने  पक्ष संघटना निर्माण होताहेत. भेदाच्या भिंती उभ्या  केल्या जात आहेत.सा-याचं निवडणूका या भेदावर  बेतल्या जात आहेत.

संविधान बचाव..बचाव म्हणुन त्रागा करून संविधान वाचवलं जाऊ शकत नाही. त्यासाठी  प्रत्येक नागरिकानी सजग होणे आवश्यक आहे.

बघा,आता काय करायचे ते? ढोंग तर सारेच करत आहेत.

                                                       परशुराम सोंडगे

संशयाचा व्हायरस

  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या न...