पोस्ट्स

सागरी किनारा ,ती आणि मी

इमेज
 सागरी किनारा ती आणि मी.                              तुम्ही समुद्र कधी पाहिला? नक्की आठवत नाही ना? मी प्रत्यक्ष समुद्र पार उशीरा पाहिला आहे. मात्र समुद्राविषयीचं माझं आकर्षण  फार लहानपणी तयार झालं होतं. मी एक चित्रपट पाहिला होता. तो पण व्हिसीसी आर वर.लहानपणी आमच्या गावात लग्न झालं की वरात साजरी केली जाई. ती वरात म्हणजे अख्ख्या गावांसाठी पद्धतीचं असायची. वरातीत गावक-यांच मनोरंजन करता यावे म्हणून चित्रपट दाखवत असतं. एका वरातीत मी हा चित्रपट पाहीला होता.मुंबईचा फौजदार.त्यातलं हे एक गाणं मनात खोलं रूतून बसलं होतं.त्या गाण्या सोबतचं समुद्र ही मनात घर करून बसलेला.           'हा सागरी किनारा.... ओला सुगंध वारा. ' अथांग सागर, उसळणाऱ्या लाटा आणि तरूण जोडप्याचं ते प्रणय धुंद गाणं... मनात नुसतं रेंगाळत राहिले अनेक दिवस. माझं वय ही तसचं होतं.बालपण सरून तारूण्याच्या उंबरठ्यावर आलेलं.तारूण्याचा बहर तनामनावर मोहरून आलेला.ते शब्द,ते स्वर, संगीत आणि अभिनय मनात सारचं नुसतं रूंजी घालतं होते.ते गा...

समुद्र न पाहिलेला माणुस

इमेज
अण्णांनी समुद्र पाहिला नाही. असचं ते एकदा बोलता बोलता म्हणाले परशु, मी अजून समुद्र पाहिला नाही. "कसं काय?" "आमचा कशाला योग आलाय? रावणाच्या लंकेत जाण्यासाठी  वानर सेनेने  शीळा पाण्यवर तरंग ठेऊन सेतू बांधला होता.समुद्र दरी खोल असते जणू." "७१ टक्के या पृथ्वीचा भाग समुद्रानं व्यापलेला आहे." मी त्यांना माहिती दिली.काय बोललो आहे. हे त्यांना कळणं शक्य नव्हतं.आण्णा निरक्षर होते. "म्हजीं" " बारा आणे पाणी आहे.चाराणे जमीन..." "एवढं मोठं पाणी?" पृथ्वीचं आकार त्यांना काय माहित? पृथ्वी शेषांच्या फण्यावर आहे हे त्यांना माहित होतं.पोथी पुराणातून ते ऐकतं होते.पोथी पुराणात खोटं असू शकत नाही असा त्यांचा दृढ विश्वास.एक ही दिवस शाळेत न जाणाऱ्या  अण्णांचा हा शब्द साठा रामायण,शिशिवलिलमृ व महाभारत अश्या ग्रंथातून आलेला होता "समुद्र पाहिला नाही बघ मी.तुम्ही आत्ताची पोरं किती पाहिला असेल.अशी फोटो पण काढलेत. "त्यांना ते अप्रुप वाटलं होतं. "आपण या वर्षी उन्हाळ्यात जाऊ.मला सुट्टी लागली की." हे आश्वासन देऊन मी मोकळा झालो.ते फक्त हासले. ...

पाऊस आणि आठवणीचं मेतकूटं

इमेज
 रिमझिम गिरे सावन....... पाऊस आणि आठवणींच मेतकूटं पाऊस आणि आठवणींच असं काही मेतकूट आहे की आपण आठवणी आवरू शकत नाहीत.आठवणीं नक्कीच पाऊसाच्या प्रेमात असणारं.तिच्या सोबत भिजण्याचा योग आला असेल तर आठवणी ला वेगळाचं ऱग येतो.पाऊसाचे अंगाला चुंबना रे थेंब आणि अंगावर थरथरता शहारे... आपल्याला या जगातील अत्युच्च आनंदाची अनुभूती देतात.     पाऊस स़ोबत भिजला नसाल तरी कल्पनेचे पंख असतात की त्या रम्य जगात जाण्यासाठी.हे गाणं असचं कुठं तरी नक्की घेऊन जाईल आपल्याला.

संसार दु:ख मूळं

इमेज
  “अवघे गरजे पंढरपूर.” अलार्म वाजला. ते मंजुळ स्वर त्या शांत खोलीत पसरले. महाराज गाढ झोपेतच होते.रात्री जागरण झाले होते.रात्री कीर्तन संपवून ते अहमदनगर वरून रात्री उशिरा आले होते. झोपायला रात्रीचे तीन वाजले होते. अलार्म वाजला. त्यांना जाग आली.. अलार्म् चा राग आला. उठावसं वाटल नाही. झोप डोळयात तशीच तरळली. झोपेला असं अंगातून झटकून नाही टाकता येत ? झोपेची मिठ्ठी असते की नशा ? झोप माणसाला सोडत नाही की माणूस झोपेला सोडत नाही ? अजगाराची मिठ्ठी हळूहळू सैल होत जावी तसी झोपेची मिठ्ठी सैल होत जातं असावी. त्यांच्या नजरेचं पाखरू हळूहळू भिरभिरू लागलं.        चकाचक भिंती  … मखमली मऊ बिछाना… उश्या.. खिडक्यांची मलमली पडदे… भिंतीवर टांगलेली फ्रेम अर्जुनाला गीता सांगताना.. कुरुक्षेत्र अन्‍ दोन्ही बाजूचे विराट सैन्य… रथ, घोडे, हत्ती..       शेवटी बंद खोलीत नजर जाऊन-जाऊन जाणार कुठं ? ती त्यांच्या अंगभर रेंगाळली.. हळूहळू ते आपलच अंग न्याहाळत बसले. स्वत:च मग्न झाले. आपण किती सुंदर आहोत याचा अंदाज बांधण्यातच ते गुंगून गेले. गोर अंग, काळेभोर क...

या देशात चाललं तरी काय?

इमेज
 या देशात नेमक चाललं तरी काय? *************************** स्वातंत्र्य त्यांनी मांडीखालीच काय गांडीखाली लपून ठेवलं. नि धर्मनिरपेक्षतेच्या मखमली झुलीत ते लोकशाही जातीवादाच्या उबीत उबवीत बसलेत. मग  ते तांडेची तांडे  निघालेत उरात जाती जातीची धग पेटती ठेऊन.... द्वेवेषाच्या आवेशान ओठाओठातून भंयकर ज्वाला फेकीत एखादया दैत्यासारखी .... स्वातंत्र्याचा सूर्य गिळायला आणि  ... मानवतेची ,समतेची छान छान फुलपाखर कुठचं कशी दिसत नाहीत ? भूर्र उडून गेलेत की  का धारदार तीक्ष्ण हत्यारानं  ठार केलेत त्यांनी ? ठार केलेत म्हणावं  तर त्यांची प्रेत नाही दिसत इथं कुठेचं. समता व मानवतेचे सुंदर सुंदर मुखवटे घालून  समतेची गाणी तेच बिलिंदर का गुणगुणत आहेत? हातात रंग बेरंगी झेंडे घेऊन..? जाती जातीची गाणी गात . कुठं निघालेत ? तिरंगा तर फडफडतो आहे जोमानं.... सीमेवर लढता लढता छातीवर  गोळया झेलता झेलता  रक्तात न्हालेल्या जवानांच्या हातात आणि ओठात  जय हिंद चा नारा... यां  देशात नेमक चाललं तरी काय ?  . . . . . . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा     ...

पेढयांचे वझं

सांयकाळचं पाच वाजलं असत्याल . फटयावर   जाल्बा नि त्याचं पोरंग तुष - या आलं होतं . त्यांना इथून पुढं बीड गाठायचं होतं . दोघा जवळं भी निबार वझी होती . पिशव्या . बाजकी . म्हतारीनं काही बाही दिलेलं . संगी जालूची बायको नि भी नको नको म्हणून बरचसं वझं केल होतं . दाळी नी दुळीनं . माळवं . काही घरचं काही   दुस - याकडून आणलेलं . दोंघांनी वझी टाकली हूश्य केलं . जाल्बानं रूमालनं सारा घाम पुसला . हाटलात जाउन चौक्शी केली पाची एसटी गेली का तर ? आताच गेली . पाचच मिनीटं झालं आसत्यालं . असं त्या हाटलत्लया पो - यानं सांगितलं . “ आयला , आता पार काशी झाली . आता कसं जायाचं ?” जाल्बाच्या उरावर मोठा दगड ठेवल्यासारखं झालं . माटकुणी खाली बसला . तांबाखूची पिसी काढली नि बसला चोळीत . तुषा - याला काही नव्हतं त्याचं . ते खुशीत होतं . बीडला जायाचं . तिथं राहयाचं . कॉलेजात जायचं . असली चांगली चांगली सपन त्याच्या भोवती नुसतं   फुलपाखरावाणी भिरभिरत होती . ते मनातील मनातचं गुंग झाला होतं . पाचच्या   एस टीनं ...