पोस्ट्स

ऐ,प्रभू,तूझं आम्ही मंदिर बांधलयं.

इमेज
  तू देव आहेस तू परमात्मा आहेस आम्ही जीवात्मा.... तूच हे सर्व तूच आहेस ना रे सर्वत्र? तू चराचरात ओतप्रोत भरलेला... इथल्या कणाकणात सामावलेला... पेशीपेशीत तू पेशी द्रव्याच्या अणू रेणूत ही... काय? भक्तांच्या ह्रदयात श्वासात तुच असतोस मग हे मंदिर आम्ही कशाला बांधलंय? असं का विचारतोस? पाचशे वर्ष झालयं तुझं मंदिर आम्ही बांधू शकलो नाहीत. ऊन,वारा,पाऊस,वादळ... सारं तू सोसत आलास तक्रार नाही केलीस कधी तू. आम्ही टोलेदार बंगल्यात राहीलो. एसीत रूम मध्ये राहिलो पण तुला मंदिर नाही ही खंत होतीचं की सदैव. तू परामात्मा असला म्हणून काय झालं? तुला  मी मंदिर पाहिजे ना. गावागावात, गल्लोगल्ली,घराघरात तुझं मंदिरे आहेतच ना. देवा-हयावर ही तू असतोस पण अयोध्येत मंदिर पाहिजेचं होत तुझं. आता आम्ही एक तुझं भव्य मंदिर बांधलंय. सोहळा साजरा करतोय आम्ही भव्यदिव्य....जबरदस्त. एकदम शाहीथाटात. काय म्हणालास? देह हेच मंदिर असतं तुझं..! हो मान्य की, पण तुझं मंदिर तुला हवं की नाही पण ते आम्हाला हवं असतं. भक्तीभावांन माथा टेकायला कधी लोकांची माथी भडकायला तू हवाच असतोस ना आम्हाला हिंदूत्वाची आग पेटायला. हे जग पण पेटतं रा...
इमेज
 नविन वर्षाच्या शुभेच्छा......!!! आज नवीन वर्षाचा पहिला दिवस.रात्री वर्ष २०२३ गेलं.वर्ष २०२४ आलं.बाय बाय २०२३  व वेलकम २०२४.. रात्री बारा वाजता घसाफोड ही झाली.नाचून झाल.गाऊन झालं. जग कैफात बुडालं.  भिंतीवरलं एक कॅलेंडर गेलं नि नवीन कोर करकरीत कॅलेंडर आलं. बस्सं एवढच घडलं. उगवणारा सूर्य तोच असत़ो.त्यातून प्रसवणारा  प्रकाश ही तोच असतो.पृथ्वीच्या परिवलन व भ्रमणगतीत काहीचं फरक पडतं नसतो.सर्व भवताल जसा सदैव असतो तसाच असतो.फक्त नव्याचा भास असत़ो. प्राणी पक्षी कीटक यांना नविन वर्षांचं भान नसतं.माणसाला मात्र २०२३ सरलं म्हणून दु:ख होतं.वर्ष २०२४ आलं म्हणून आंनदी ही होतो.काळ तशी मानवी कल्पनाचं. माणसांन त्याला ही आकार दिला.उकार दिला.आपला सखा-सखी करून माणूस त्याच्या प्रेमात ही पडला. नविन  सालकडून तर किती अपेक्षा....!! निरपेक्ष प्रेम हल्ली कुठं राहिलंय? सारं शुभ मंगलच घडावं अशी अपेक्षा.अशुभ आमच्या ओंजळीत टाकू नको रे बाबा...!! खरंतर अनंत ब्रम्हाडांत दिवस उगवत नाही.दिवस मावळत नाही.काळाच्या अनंत रेषेवर ब्रम्हांड सरकते आहे.असेच सरकत राहणार आहे अनंत काल.      आपल्य...

भिमा,तू असा सूर्य आहेस .

इमेज
  भिमा  तू, एक असा सूर्य आहेस की मावळलास किती वर्ष झाले तरी अजून ही तुझा तो प्रकाश  तसाच आहे. प्रखर होत गिळतोच आहे अंधार...  ती आग .... अधिकचं तीव्र होतेयं. युगानुयुगे तू तसाच तेवत राहणार आहेस कारण अंधाराच्या गर्भातच पेरलीस  तू प्रकाशाची बीज. ही पहा ना... फुललेली असंख्य फुले प्रकशाची. अंधार तर संपेलच ना आता एक दिवस... आमच्या जीवनातला या जगातला .....       परशुराम सोंडगे,बीड .

बापू..!!! तू काही मरत नाहीस.

इमेज
  तू या देशाचा राष्ट्रपिता पण एखादया जातीच्या झुंडीला, एखादया धर्माच्या टोळीला, एखादया वर्णाच्या कळपा ला, एखादया मुलखाला तूर्त तरी फक्त त्यांचा वाटत नाहीस. म्हणून तर  तू  या संपूर्ण देशाचा आहेस. तुझ्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या पण तू  ठार नाही झालास, वेडे कुठले.....!! तू माणूस नाहीतर विचार आहेस. हे तर अजूनही कळतं नाही त्यांना. तू  मात्र इथं मातीच्या कणाकणात मनात मनात रूजत गेलास. म्हणून त्यांनी तुझ्या मारेक-याचे गौरव सुरू केले. आणि पोवाडे लिहिले. तुला रोज मारण्याचा चंग बांधला आहे त्यांनी पण तू अशानं काही मरत नाहीस. तू  अजून ही अमर होतो आहेस. छाताडं किती ही  इंचाची असू दे. ते फुटूस्तोवर  फुगू दे. पण सदैव या जगात हा देश गांधीचा आहे नि गांधीचाच राहणार आहे. आणि तू अमरचं....!!!     परशुराम सोंडगे,पाटोदा

मैत्र जीवाचे- विणवूया धागे धागे

इमेज
 माणसाच्या आयुष्यात मैत्रीला फार महत्व असतं.वंशाच्या,कुळाच्या,गावा -शिवाच्या,रक्ताच्या,नात्यापेक्षा ही मैत्रीचं नातं फार महत्वाचं असतं.ऐश्वर्य आणि दारिद्रय, सौंदर्य-कुरूपता, बुध्दी आणि मंद बुध्दी,जाती-पाती,धर्म ,देश- परदेश ,वय  लिंग वगैरे हे असले कृत्रिम भेद झुगारून ख-या  मैत्रीचे धागे अधिक घट्ट होत जातात.हया भेदाच्या सीमा मैत्रीला अडवू नाही शकतं. मैत्रीचे धागे आपल्या मतलबाच्या चिकट लगदाळीने  गुंफणारी माणसं ही कमी नसतात.अगदीच नाही असे नाही.ह्रदयातून निखळ मैत्रीचे झरे ही खळखळत असतातच की. आपल्या स्वार्थासाठी माणसं वापरण्याची वेगळीच पंरपरा हल्ली  समाजात निर्माण झाली आहे.मैत्रीच्या बेगडात स्वार्थाचा चेहरा दडवणारे माणसं  ही कमी नाहीत.मैत्री ही  एखादा व्यवहार नसते. ती कुठे हिशोब ठेवते? निखळ,जीवापाड मैत्र जपणारं कुणीतरी असावे असं सर्वांनाचं वाटतं असतं.तशी आपली सर्वांची एक फॅंटन्सी ही असतेच की. मैत्र जीवाचे शोधत आपण जगत असतो. जगभर वणवण भटकत असतो. ज्याच्या जवळ आपलं ह्रदय उलगडून दाखवावं अशी माणसं कमी भेटतात.ते विरळचं असतात. जे भेटले ते प्रामाणिक असतातचं असं नाही...

निसर्गाचं वेड पेरणारा कवी-ना.धो.महानोर

इमेज
  मनामनात झरणारा हिरवा ऋतू.....ना.धो.महानोर काही माणसं आपल्याला भेटलेली नसतात.पाहिलेली ही नसतात तरी ते काळजात खोल तळाशी कुठतरी रुतलेली असतात. नकळत रुजलेली असतात.त्यांच आपलं एक अनोखं नातं नकळतं तयार होतं.त्या नात्याला आपण नावं नाही देऊ शकतं पण ते असतं  उत्कटं आणि ओतप्रोत प्रेमात चिंबलेले...आपल्या मनाशी  घट्ट गुंफले गेलेले. नात्यांच्या कृत्रिम फ्रेम मध्ये आपण त्याला बंदिस्त नाही करू शकतं. फ्रेमचं नाही करू शकलो की त्याचा शो पीसं करणं तर अशक्यच असतं.तसंच एक नावं आहे.ना.धो.महानोर.मनाच्या तळाशी एक अनोखं नातं कोरले गेलेले. कविता गाणी वाचू लागलो.गुणगुणू लागलो तसं ना.धो.महानोर मनात ठसतं गेले.शाळेतल्या पुस्तकातील कवितेतून ते सर्व प्रथम भेटतं गेले.निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य ते उलगडत गेले.सौंदर्याचे पण पदर असतात का? अलवार ते फेडतं गेले की रूपाचं चांदणं पसरतं जाणारे? महानोरच्या  शब्दांनी भारावून टाकलं होतं आमचं तारूण्यं... रान,शिवाराचं अनोख वेडं ते माणसाच्या मनात पेरतं गेले. निसर्ग आणि सौंदर्य.सौंदर्य आणि प्रेम याचं एक नाजुक बंध असतात.मनात आपसुकचं विणले गेलेले.आभाळ दाटून आलं की मन...

लफडीचं पण राजकीय पक्षांची....

इमेज
पक्षाच्या युत्या किंवा आघाड्या नाही होतं. ते सरळ व्याभिचार करतात.ते लफडीचं असतात. लफडयाचे जे परिणाम गावाला घराला भोगावे लागतात.तेच परिणाम असल्या अभद्र युतीचे जनतेला भोगावे लागतात कसे  ? रमेश नावाचा एका आमदारांचा अतिमहत्वाच्या कार्यकर्ता होता.त्याचा पक्षचं फुटला.एका पक्षाचे दोन गट पडले.आता आपण कोणत्या गटात जायचं हा प्रश्न त्याला पडला.गद्दार व्हायचं की खुद्दार? इकडे निष्ठा व तत्व होती तर तिकडे सत्ता.इकडे सुविचार होते.गौरवशाली इतिहासाचे दाखले होते.धडाडीचा भूतकाळात होता. तिकडे आमिष होती,प्रलोभन होती. उज्जवलं भविष्याची स्वप्न होती.थोडक्यात मज्जाचं मज्जा होती. ऑफर तरी दोन्ही बाजूंनी सुरू होती.  काय करावं हे त्याला कळतं नव्हतं. पक्ष फुटला तर फुटला पण आपलं डोकंचं फुटायची वेळं येऊ नाही असं त्याला वाटू लागलं.     जुनं सारं झुगारून आपलेचं नेते आपल्या दैवतावर नको ते बोलू लागलेत हे त्याला  पचतं नव्हत.रूचतं नव्हतं.ज्यांच्या आरत्या केल्या त्यांना लाथा कश्या मारायच्या?शिव्या कश्या दयाच्या? राजकारणात असं चालायचं असे सारं म्हणतात पण दर्जा..? राजकारणाला पण एक दर्जा असतो की,नाही?इत...