पोस्ट्स

का वाढताहेत अफेअर?

इमेज
 विवाहाच्या योग्य वेळेची शोधार्थ : वयात येण्यापासून लग्नापर्यंतचा वाढता अंतर आणि त्याचे सूक्ष्म परिणाम जीवनाच्या प्रवाहात काही टप्पे असे असतात, जे नैसर्गिक नियमांनी बांधलेले असतात. वयात येणे – ते शारीरिक परिपक्वतेचे पहिले पाऊल – आणि विवाह – जो जीवनाला स्थिरता आणि संतुलन देतो – हे दोन टप्पे एकमेकांशी जवळून जोडलेले आहेत. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत विवाह हा केवळ सामाजिक बंधन नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक गरजांची नैसर्गिक पूर्तता मानला गेला आहे. परंतु आधुनिक युगात शिक्षण, करिअर आणि आर्थिक स्वावलंबनाच्या नावाखाली विवाहाचे वय दिवसेंदिवस पुढे ढकलले जात आहे. जसे बालविवाहाचे दुष्परिणाम समाजाने अनुभवले आहेत, तसेच अनावश्यक उशिरा विवाहही समाजाच्या नैतिक आणि सामाजिक आरोग्याला हानी पोहोचवतो. वयात येण्याचे आणि विवाहाचे बदलते अंतर : एक दृष्टिक्षेप भारतात मुलींच्या वयात येण्याचे सरासरी वय (मेनार्क किंवा पाळी सुरू होणे) सुमारे १२-१३ वर्षे आहे. अनेक अभ्यासांनुसार, स्तन विकास (थेलार्क) १०-११ वर्षांपासून सुरू होतो, तर मुलांमध्ये हे वय ११-१२ वर्षे आहे. म्हणजेच, हार्मोनल बदल आणि शारीरिक आकर्षणाच्य...

एका काॅल गर्लची डायरी -भाग 3

इमेज
                                                        तिसरा भाग झिमझिम पाऊस सुरू होता.राधा मॅडम बाल्‍कनीत उभ्या होत्या.सारं शहरं पावसात चिंब भिजत होतं.पावसाचा पण एक सूर असतो ना? झिमझिम…! रिमझिम…!! थंडगार वारं अंगास झोंबत होतं.तसं त्यांनी अंग चोरलं. एक गोड शहरा अंगभर पसरत गेला.वा-यावर उडणारे केस त्यांनी सावरले.पाचव्या मजल्यावर त्या उभ्या होत्या.पाऊस बरसत असला तरी  रोडवरील गर्दी कमी नव्हती.दुथडी  भरून रस्ते वाहत होते.वेगवेगळया रंगाचे रेन कोटस्, छत्र्या ,वाहनं रंगीत ठिपक्यांची दिसत होते. एक विलक्षण दृश्य दिसतं होतं.माणसंच काय वाहन ही इवल्या इवल्या रंगीत ठिपक्यासारखे दिसत होती.                    पाऊस म्हणजे धरती आणि आकशाचा प्रणयचं ना? धूवाधार पावसाला सोसत राहणारी धरती.हिरवागार शालू परिधन करून पाऊस झेलत,शोषत उतावीळ प्रणयीचं ना? राधा मॅडमला उगीच कुठं तरी वाचलेली ही कवी कल्पना आठवली.बाल्‍कनीतच ...

एका काॅलगर्लची डायरी भाग 2

इमेज
एका काॅलगर्लची  डायरी                                                                         भाग -2 ब्ल्यूस्टार हॉटेलच्या भव्य हॉल मध्ये लग्‍नाच्या गर्दीत राधा मॅडमला अचानक आवाज आला.त्या वर्दीतच होत्या.त्याचं एकमेव महिला त्या लग्नात असतील की त्या साडीत नव्हत्या.नटलेल्या,सजलेल्या नव्हत्या. त्या ऑनडीयुटी सहभागी झाल्या होत्या.त्यामुळे वर्दीतच होत्या. “तुम्ही राधा.. देसाई ना?”ओळखीचा चेहरा.ओळखीचा आवाज.कोण असावा याचा अंदाज त्या बांधत बसल्या.खरतर त्यांना काहीच आठवत नव्हतं.गर्दीत असं कुणी तरी अचानक येते आणि डायरेक्टं नावानंच बोलत.त्यावेळी इतकं गोंधळून तर माणूस जाणारच ना?एक सुंदर बांधेसूद तरूण महिला त्यांच्याकडे हासत येत होती.काही क्षण त्या नुसत्या तिच्याकडे पहात राहिल्या.त्या एकटयाचं तिच्याकडे पहात नव्हत्या.अनेक नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.ती बाई नटलेली असली तरी ओव्हर मेकअप मुळीच के...

रावण: राजा राक्षसांचा वेगळा दृष्टीकोन देणारी कांदबरी

इमेज
 रावण: राजा राक्षसांचा वेगळा दृष्टीकोन देणारी कांदबरी शरद तांदळे यांची रावण राजा राक्षसांचा (४३२ पृष्ठे, न्यू एरा पब्लिशिंग हाऊस) ही कादंबरी मराठी साहित्यातील एक महत्त्वाची संशोधनात्मक कृती आहे. पारंपरिक रामायणात रावण हा केवळ अहंकारी खलनायक म्हणून दाखवला जातो, पण तांदळे यांनी रावणाच्या दृष्टिकोनातून त्याचे पूर्ण जीवन चित्रित केले आहे. ही कादंबरी रावणाला एक महान नेता, विद्वान, शिवभक्त आणि न्यायप्रिय राजा म्हणून उभी करते, ज्याने दैत्य, दानव, असुर आणि भटक्या जमातींना एकत्र करून सोन्याची लंका निर्माण केली. लेखकाने अनेक पौराणिक संदर्भांचा अभ्यास करून काल्पनिक अतिशयोक्ती टाळली आहे, ज्यामुळे कथा वास्तववादी आणि विचारप्रवर्तक वाटते. Ravan:Raja Rakshncha Novel कादंबरी रावणाच्या बालपणापासून सुरू होते – त्याच्या कौटुंबिक कलह, आई-वडील, आजोबा सुमाली आणि भावंडांशी असलेले नाते. रावण हा ब्राह्मण वंशज असूनही राक्षस संस्कृतीत वाढतो. त्याची महत्त्वाकांक्षा, ज्ञानाची भूक आणि अन्यायाविरुद्ध बंडखोरी यातून तो लंकेचा राजा बनतो. तो देवांना पराभूत करतो, पण त्याचे निर्णय नेहमी न्याय आणि स्वाभिमानावर आधारित अस...

एका काॅलगर्लची डायरी - भाग 1

इमेज
  भाग एक Callgril काॅलगर्ल पहाटेचे पाच वाजले होते.पूर्वेला तांबडा रंग दाटून आला होता.वारं मंद वाहत होतं.थंडी ही चांगलीचं बोचत होती.स्वेटर,मफलिरी गुंडाळून माणसं चालत होती.स्ट्रीट लाईट जळत होत्या.गुलमोहरांच्या फुलांचा खचीचं खच पडला होता रस्त्यावर.कुणाकुणाच्या दारात पारिजाताकांचा सडा पडला होता.त्यांचा मंद पण धूंद गंध मनाला मोहित करीत होता.पाच वाजून गेल्या होत्या तरी माणसांची वर्दळ फारसी नव्हती.तुरळक तुरळक माणसं टोळक्या टोळक्यांनी चालत होते.काही नवीन पोरं पळूपळू घाम काढीत होते.            राधा देसाई ही जाँगींग करत होत्या.रनिंग केल्यामुळे अंग सारं घामेजून गेलं होतं त्यांच.अंग सारं  थबथबलेलं होतं.थोडसं थकल्या ही होत्या त्या.तेवढयात मोबाईल वाजला.               इतक्या सकाळी फोन एकतरी घरीहून तरी असावा नाहीतर पोलिस स्टेशनवरून तरी.दुसरा कॉल या नंबरवर शक्यचं नव्हतं कारण त्यांचा हा प्राव्हेट नंबर होता.अश्या ऑफिसर्सना असे फोन ठेवावेच लागतात.त्या थोडया थांबल्या.कॉल रिसिव...

एपस्टीन फाइल्स १९ डिसेंबरला उघड: भारतातील सत्तापालटाची अफवा की सत्य? पूर्ण विश्लेषण

इमेज
  जगाच्या राजकारणात काही तारखा अशा असतात, ज्या केवळ कॅलेंडरवरच्या आकड्यांपेक्षा जास्त काही दर्शवतात. १९ डिसेंबर २०२५ ही अशीच एक तारीख ठरली आहे, ज्याकडे केवळ अमेरिकेच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांच्या राजकीय वर्तुळांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील कुख्यात जेफ्री एपस्टीन सेक्स स्कँडलशी निगडित गोपनीय कागदपत्रे – ज्यांना 'एपस्टीन फाइल्स' म्हणतात – या दिवशी अमेरिकन न्याय विभागाकडून (DOJ) सार्वजनिक होण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासनाने नोव्हेंबरमध्ये 'एपस्टीन फाइल्स ट्रान्स्परन्सी अॅक्ट' कायद्यावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे ३० दिवसांत ही फाइल्स उघड करण्याची बंधनकारकता आली. आता वेळ जवळ आली आहे, आणि या फाइल्समधून काय बाहेर येईल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जेफ्री एपस्टीन हा नाव अमेरिकेच्या उच्चभ्रू वर्तुळातले एक काळे पडदे उघडणारा आहे. धनाढ्य उद्योगपती, राजकारणी, सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींशी जवळीक असलेला हा माणूस, अल्पवयीन मुलींच्या माध्यमातून एक घाणेरडे जाळे विणत होता. हनीट्रॅप, सेक्स ट्रॅफिकिंग आणि ब्लॅकमेलिंगचे आरोप त्याच्यावर होते. २०१९ मध्ये तुरुंगात त्याचा मृत्य...

तिने केले बाॅयफ्रेंडच्या प्रेतासोबत लग्न

इमेज
मानवी भावना मध्ये प्रेम ही अतिशय उत्कट भावना आहे.कोवळया वयात ही भावना अधिक मनावर गारूड करते.आई वडीलांवर-मुलांच प्रेम, बहीण भावाचं प्रेम, या सा-यात  मुलं मुलीच प्रेम असतं.त्याच्या,लौकिक  कथा आपण चित्रपटातून  पहात असतो.  प्रेम अजिंक्य असतं. प्रेम उदात्त असत असचं आपल्याला वाटत आलेलं आहे पण प्रेम ही माणसाच्या मनाची अवस्था आहे. मन बदल की प्रेम ही बदलत.कमी वयात जे प्रेम होत ते शारीरिक आकर्षणचा भाग असतो. ते आकर्षण  कमी झालं की प्रेम ही विरत जातं. खर प्रेम  असतच नाही.असा दावा केले आहे  विश्वासाचं  धागे अधिक घट्ट झाले की प्रेम अधिक दृढ होत जात. She,married, with boyfriends  corspe कथा कांदब-यातून ही अशा अनेक अमर प्रेमाच्या कथा आपण ऐकत आलो आहोत. हिंदी चित्रपटात तर प्रेमाचा विजय हा ठरलेलाच असतो.अनेक कवीच्या पहिली कविता ही  प्रेम कविता असते.  नांदेड२शहरात,८ नोव्हेंबर २०२५ रोजी घडलेल्या एका प्रेमप्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. प्रेमसंबंध आणि जातीय विखारामुळे एका तरुणाची निर्घृण हत्या झाली, आणि त्याच्या प्रेयसीने त्याच्या पार्थिवाशीच प्र...

जरा नेत्यांना पण समजून घ्या

अहो, नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुका आल्या की सगळे पक्षीय नेते एकदम “कुटुंबप्रेमाने” पछाडले जातात.  बायको, पोरे, पोरी, सून, नातू, पुतणे, मेहुणे, सासरे-सासू... अगदी त्यांच्या घरातल्या कुत्र्यालाही तिकीट द्या असं वाटावं इतकं प्रेम उफाळून येतं.  कार्यकर्ते मात्र रडकुंडीला आलेत. 'आम्ही फक्त सतरंज्या उचलायच्या का ? ' का फक्त बॅनर लावायची? पण अरे, हे बघा ना, नेता बिचारा किती असहाय्य आहे?  तिकीट वाटपाचा फॉर्म्युला शोधताना त्याच्या डोक्यात कॅल्क्युलेटर फिरत असतं. "एक तिकीट आणि शंभर इच्छूक. कुणाला दयायचं तिकीट? एकाला दिलं की दुसरा नारज,दुस-याला दिलं की तिसरा नाराज. नाराजी नाटय  नुसतं रंगत जातात.  फूस लावायला ना कार्यकर्ते पळवायला तर सारेच टपलेले. हल्ली  गद्दा-या पण किती वाढल्यात बरं? राजकरणात असचं असतं. अस सारेच म्हणतात.गद्दा-या करणं ही एक कला आहे अशी मान्यता आपण दिल्लीचं की. कुटूबांच्या बाहेरच्या माणसाला तिकीट दिलं की ५० कार्यकर्ते नाराज, २० बंडखोर, १० विरोधात.हातची सीट जाण्याची पण रिस्क मोठी असते. जग बुडलं तरी चालेल पण हातची सीट गेली तर काय उपयोग? सीट गेली तर पक्षश्रे...

महाराज, हे पाप कशाने धूवायचे? कीर्तनाला ही गर्दी होऊ शकते.इंदुरीकर तरुणाईला कीर्तनाकडे मोठया संख्येने आकृष्ट करून घेण्यात कमालीचे यशस्वी झाले. त्यांची भाषा विनोदी आहे.उपहासात्मक आहे.व्यंग निर्माण करणारी आहे.ती अस्सलं बोली भाषा आहे.प्रमाण भाषेचा वापर ते करत नाहीत. इंदुरीकर लोकप्रिय होण्याची कारणे अनेक असले तरी ते फार स्पष्टं बोलतं.स्पष्टं आणि खरं बोलले लोकांना आवडतं. त्यामुळेच लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते. इंदोरीकरच्या कीर्तनाची भाषा ग्राम्य असली तरी ती अनेकदा अश्लील व शिवराळ असते.लोक इंदुरीकरला शिव्या खाण्यासाठी पैसे देतात असं ही बोललं जातं. "या बोंकाडी बसा..!!" पठ्याच्या एका डायलॉवर गाणं निघालं.अनेक वरातीत गाजलं.अनेक बेवडे त्यावर थिरकले पण. समाजातील व्यसनाधीनतेवर व अनिष्ट रूढी परंपरेवर ते प्रखर बोलतं असतात. इतकं कटू बोलणं ही लोक एन्जॉय करायचे. इंदुरीकर यांच कीर्तन या व्याख्येत बसत नाही अशी ओरड काही दिवस चालू होती.पुन्हा असल्या विनोदी कीर्तनाची लाटचं आली. कपात माशी पडली तर दूध फेकून देतात येतं. दुधाच्या कढईत जर माझी पडली तर काय करणार? स्वच्छ पाणी शिंपडून कढईतले दूध पवित्र करण्याची प्रथा आहे. तसचं झालं. लोकांनी कीर्तनाच्या नावाखाली कसले ही जोक विनोद सहन केले. वारकरी संप्रदायात कीर्तनाचा एक साचा आहे.त्याची एक शैली आहे.त्याची एक अचारसंहिता आहे.वारकरी संप्रदायाच्या पडठीत इंदुरीकराचं कीर्तन बसत नाही. हल्ली अनेक कीर्तनकाराची कीर्तने वारकरी संप्रदायाचे अचारसंहिता न पाळणारे आहेत. इंदोरीकर एकटेच नाहीत. व्हाटस्ॲपवरचे जोक सांगून,किस्से सांगून करमणूक करणारे कीर्तनकार ही शेकड्याने आहेत. विनोदाचार्य,समाजप्रबोधनकार,गायन सम्राट अशी बिरुदावली घेऊन कीर्तनाचे धंदा करणारे उदंड झाले आहेत. पक्ष व पुढा-यां मागे लाळ घोडमारे ही अनेक पाहिले आहेत. इंदुरीकर व तश्याच धाटणीच कीर्तनकार वारकरी संप्रदायातील लोकांना आवडत ही नाहीत. त्यांना नाही आवडलं तरी लोकांना ते फार आवडतात. आज ही इंदुरीकरांच्या दोन दोन वर्षाच्या तारखा बूक असतात.लोकांना, ते हसवतात.डोळ्यांत, अंजन घालतात.लोकांना इंदुरीकरचं कीर्तन जाम आवडतं. ते,अध्यात्मिक आनंद देते असं नाही पण ते एन्टरटेनमेंट चांगल करतं. इंदुरीकर एका अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात स्पष्टं बोलले होते की लाख दीड लाखाचा इंदुरीकर व पाच सहा लाखाचा ढोक महाराज ऐकण्याची ऐपत नाही तुमची तरी तुम्ही तो खर्च करता. देव तुमचं भलं करो. इतकं स्पष्टं बोलून ही त्यांच किर्तन लोक आज ही ठेवतात.ऐकतात. आता कीर्तन हा धंदा झाला आहे.उदरनिर्वाहाचं साधन झाले आहे. अनेक जण त्याच्या कडे करिअर म्हणून पाहतात. त्यातील अध्यात्मिक ढाचा गळून पडला आहे. धंदा कुणी कोणता ही करू शकते.कीर्तनाचा धंदा करणं हाडाच्या वारक-याला आवडणार नाही. त्यांना ते पचत नाही. लोकांना मनोरंजन प्राधान्य किर्तन आवडतात. कीर्तनकार ही तसचं किर्तन करतात. लोक वर्गणी करून लाखाच्या खर्चाचे सप्ताह करतात.काही संस्थानाच्या सप्ताहाच्या कीर्तनाचे बजेट कोटीत असतात.लोक वर्गणी करून ते खर्च करतात.लोकांना ते परवडत पण. हरी किर्तन करताना पैसे घेऊ नयेत.तिथं जेऊ,नये.चंगळीत व चैनीत जीवन जगू नये असे अनेक संत प्रमाण आहेत.किर्तनकार सांगतात पण तसं वागत नाहीत. उलट किर्तनकार भलं मानधन घेतात त्याचं ही समर्थन करतात. गावागावात स्पर्धा लावून सप्ताहाचे मोठे इव्हेंट साजरे करून घेतले जातात.महागाडया गाड्या घेतात. ख-या सुखाची व्याख्या करताना अनेक कीर्तनकार भौतिक सुखात गुरफटत जातात. 'संसार दुःख मूळ' आहे हे सांगताना अनेक किर्तनकार त्यात जखडून गेले आहेत. ऐश्वर्य तर ते जमा करतातचं पण त्याचं प्रदर्शन ही करतात. मत्सर तर महाराज लोकांत पराकोटीचा असतो. कोणत्याही जीवाचा ना घडो मत्सर हे कोण्या तोंडानी महाराज सांगतात काय माहित? अध्यात्मिक मूल्य जोपासणारे अनेक महाराज अडगळीत पडले आहेत.लाखोचे मानधन स्वीकारून अनेक बड्या नेत्याच्या,वाढदिवसाला हे महाराज लोक किर्तन करतात. आपले मानधन वाढवून ते आपला बाजार भाव ही वाढवून घेतात. मार्केटिंगचे अनेक फंडे ते आमलात आणतात.आपलं नाणं टिकलं पाहिजे. ते वाजले पण पाहिजे. असा आटोकाट त्यांचा प्रयत्न असतो. 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले" असं म्हणतात. बोलणं सोप असतं. तसं वागणं अवघड असतं. इंदुरीकर महाराजांचं पण हेच चुकलं आहे. ते ज्या प्रमाणे बोलत आले तसं वागणं अपेक्षित होते. लोक अपेक्षा ठेवणारं. त्यांना ते जमलं नाही. समाजप्रबोधनकार इंदुरीकरचा त्यांच्यातला बापाने पराभव केला. मोहमायात ते गुतत गेले. षट्कार विजय मिळवणे सोपे नाही. आता अनेक महाराज इंदुरीकरचं समर्थन करताना तुम्हालाच दिसतील. ते अनेक वाईट प्रथाच उदात्तीकरण करताना ही दिसतील. मराठा समाज मुलीच्या लग्नात बडेजावपणाने मोठा खर्च करतात.हे एक मराठा समाजाच्या अर्थिक मागासलेपणाचे कारण आहे. सकल मराठा समाजाने हगवणे हुंडाबळीच्या प्रकरणा नंतर साधेपणाने लग्न करण्याचा एक मनोदय व्यक्त केला होता. जे करून ह्या प्रथेला आळा बसेल. ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी खर्च केला तर काय होते? विवाह सोहळ्यावर ही अनेकांची पोटं भरतात असा ही युक्तिवाद केला जातो. श्रीमंत व प्रसिध्द लोकांनाच सामान्य लोक फालो करत असतात.श्रीमंत लोकांनी साधे लग्न केले तरचं हा पायंडा पडणार आहे.तरच गरीब लोक कर्ज काढून लग्न करणार नाहीत. हे पायंडे कुणी पाडायचे? गरीब लोकांना तर आपण श्रीमंत आहोत याचा आव आणायचा असतोच.भिका-याला हि भिकारी म्हणून नसतं मरायचं. इंदोरीकर महाराज,तुम्ही साधं लग्न करायचं. लोकांनी डोक्यावर घेतलं असतं तुम्हाला.आता किर्तन कसले बंद करता? का फेटा ठेवता? वारकरी संप्रदायातील ही घाण कोण साफ करणार आहे? इथून पुढ जर काही चांगलच करायचं असेल तर फुकट किर्तन करा.कशाला मानधन घेता? व्हा की जरा खरं संत. किर्तनकार पैसे घेणे हे जर तुम्हाला पाप वाटत नसेल तर तुम्ही वारकरी संप्रदायाशी व संतपंरपरेशी प्रतारणा करत आहात. दया फुकट सल्ले. कीर्तनाच्या गादी कलंकित करण्याचं पाप शेकडो महाराज करत आहेत. हे पाप कशाने धूवायचे? घ्या शपथ की एक रूपया ही मानधन घेणार नाही. तुम्ही जसं स्पष्टं बोलतात ना तसचं बोला पण तसं वागायचा प्रयत्न करा. पुढा-यांच्या दावणीला बांधलेले काही महाराज आहेत त्यांची सुटका करा.या,दास्यातून...!! पक्षाची तळी उचलणारे भटीगंण त्यांच्या डोळ्यांत थोडं अंजन घाला. जाती जातीची पाटलाकी करून जातीयवाद पोसणा-याच्या गढया पण उध्वस्त करा. इंदुरिकर महाराज पुन्हा किर्तन करा...!! शेवटी ही सारी घाण कुणी काढयाची? वारकरी संप्रदायाची निर्मळ गंगा अखंड वाहिली पाहिजे मानव जातीच्या कल्याणासाठी. या विश्वस्वधर्म सूर्य पाहण्यासाठी....!!!

इमेज
 महाराज, हे पाप कशाने धूवायचे? कीर्तनाला ही गर्दी  होऊ शकते.इंदुरीकर तरुणाईला कीर्तनाकडे मोठया संख्येने आकृष्ट करून घेण्यात कमालीचे यशस्वी झाले. त्यांची भाषा विनोदी आहे.उपहासात्मक आहे.व्यंग निर्माण करणारी आहे.ती अस्सलं बोली भाषा आहे.प्रमाण भाषेचा वापर  ते करत नाहीत. इंदुरीकर लोकप्रिय होण्याची कारणे अनेक असले तरी ते फार स्पष्टं बोलतं.स्पष्टं आणि खरं बोलले लोकांना आवडतं. त्यामुळेच  लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले  होते. इंदोरीकरच्या कीर्तनाची भाषा ग्राम्य असली तरी ती अनेकदा अश्लील व शिवराळ असते.लोक इंदुरीकरला शिव्या खाण्यासाठी पैसे देतात असं ही बोललं जातं.  "या बोंकाडी बसा..!!" पठ्याच्या एका डायलॉवर गाणं निघालं.अनेक वरातीत गाजलं.अनेक बेवडे त्यावर थिरकले पण. समाजातील  व्यसनाधीनतेवर  व अनिष्ट  रूढी परंपरेवर ते प्रखर बोलतं असतात. इतकं कटू बोलणं ही लोक एन्जॉय  करायचे. इंदुरीकर यांच कीर्तन या व्याख्येत बसत नाही अशी ओरड काही दिवस चालू होती.पुन्हा असल्या विनोदी कीर्तनाची लाटचं आली.  कपात माशी पडली तर दूध फेकून देतात येतं. दुधाच्या कढईत जर माझ...

टीईटीचं भूत शिक्षकांच्या मानगुटीवर

इमेज
टीईटी परीक्षेचे भूत शिक्षकाच्या मानगुटीवर  प्रस्तावना १ सप्टेंबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने (न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व मनमोहन) दिलेल्या निर्णयानुसार, कक्षा १ ते ८ पर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टीचर एलिजिबिलिटी टेस्ट (टीईटी) उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरले आहे. हा नियम २०११ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही लागू होतो. या लेखात या निर्णयाची पार्श्वभूमी, परिणाम, तथ्ये आणि शक्य उपाय यांचा वस्तुनिष्ठ आढावा घेतला आहे. १. आरटीई २००९ कायद्याची भूमिका राइट टू एज्युकेशन (आरटीई) कायदा २००९ हा भारतातील प्राथमिक शिक्षणाचा कायदेशीर आधार आहे. या कायद्याच्या कलम २३ अंतर्गत शिक्षकांच्या कमीतकमी पात्रतेची अट निश्चित करण्यात आली. त्यानुसार, राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद (एनसीटीई) ने २९ जुलै २०११ रोजी टीईटी अनिवार्य केली. टीईटी पेपर १: कक्षा १ ते ५ टीईटी पेपर २: कक्षा ६ ते ८ उत्तीर्ण गुण: १५० पैकी ९० (६०%) २०११ पूर्वी नियुक्त शिक्षकांना ही अट लागू नव्हती. आता मात्र सर्वोच्च न्यायालयाने ती सर्वांसाठी बंधनकारक केली आहे. २. इतर देशांतील शिक्षक पात्रता व दर्जा देश पात्रता सामाजिक स...

तुफानातील दिवे

इमेज
 तुफानातील दिवा...!!! अंधार दाटला आहे. गच्च  सभोवती.अशात उजेडाची सुतराम शक्यता नाही.अश्या काळया कुट्ट अंधारात  एक पणती तेवत आहे. तेवढयात वादळ ही सुटलं आहे. आता कसं तेवायचं..?? कसं अंधाराच्या उरावर नाचायचं..??? अंधार असो नाहीतर वादळ असो. ते क्रूरचं असतं. ते तेवत राहिले.. भिडत राहिले.... इवलीशी पणती शरण येत नाही.हा कदाचित तिचा विजय नसतो पण त्या क्रूर अंधाराचा नि वादळाचा सपशेल पराभव नक्कीच असतो. संजय राऊत साहेब, तुम्ही अनेकदा पराभूत केले या भयंकर संकटांना. तुमची झुंज फार कडवी. तुमच्या रक्तातचं आहे ती. तुम्ही या गंभीर आजाराला हरवून ही लवकर बरे व्हालं असा विश्वास ही आहे. पण काही छोटी माणसं मात्र... तुमच्या आजाराला राजकीय संधी बनवतायत. कीचड उडवतायत. दिल ही छोटासा है..!! खरा योध्दा तर आपल्या शत्रूवर  ही प्रेम करतो. तेच तर खरं शौर्याचं तेज असतं. आज राजकारण बाजूला ठेवूया.माणुसकी पुढे येऊ द्या.  मा.पंतप्रधान नरेंद मोदींनी लवकर बरे होण्येसाठी  शुभेच्छा दिल्या.पवार साहेबांनी फोन केला.फडणवीसांनी संवेदना  व्यक्त केल्या.हीच महाराष्ट्राची शान आहे.हीच भारताची माणुसकी आ...

DNA आख्यानं

इमेज
 DNA आख्यान तुमचा डीएनए  कोणता? असा प्रश्न कुणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही काय करणार? आहो,दात ओठ काय खाता? सध्या हा प्रश्न कुणी ही कुणाला विचारू शकत? DNA ही गोष्टं तितकीशी  खाजगी पण राहिली नाही. ती एक सार्वजनिक  बाब झाली आहे. जीवाचा व त्याचा वंशवृक्षचा डीएनए असतो.DNA ची  एक लिपी पण असते.तिचे अर्थ ही उमगले आहेत.DNA ही एक सूक्ष्म जीवशास्त्रीय  संज्ञा आहे. विज्ञान या क्षेत्रात  प्रचंड  गतीने प्रगती करत आहे. DNA चे आख्यान व ज्ञान पाजळण्याचा हेतू नाही माझा.मग कोणता हेतू?  ..तर राजकरणात या DNA शब्दांचा फार वापर सुरू झाला आहे.महाराष्ट्राच्या झणझणीत  राजकीय  भाषेत  DNA ला पर्यायी शब्द आहे आवलाद. जीनस्...?? म्हणजे तुमची अवलाद कुणाची आहे? असा प्रश्न कुणी विचारलं तर लयं गरम नका होऊ.  कुणी कुणाच्या अवलादीवर जाऊ नये.सध्या सर्रास माणसं आवलादीवर जातात.जे जातात त्यांना ही फॉलोअर्स प्रचंड  संख्येने आहेत. लोकशाहीत शेवटी आकडा महत्वाचा असतो. त्यामुळे त्यांचे ही बाहू स्फुरस्फुरतात. नुसता जीव व वंशवृक्ष यांनाच डीएनए नसतो तर राजकीय पक्षाला ...

Phaltan Doctor Death: महिला डाॅक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिस अधिकाऱ्याने केला अत्याचार, CM फडणवीसांचा सातारा एसपींना फोन

इमेज
Phaltan Doctor Death: महिला डाॅक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिस अधिकाऱ्याने केला अत्याचार, CM फडणवीसांचा सातारा एसपींना फोन Phaltan Doctor Death : डाॅ.संपदा मुंडे यांनी हाॅटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी त्यांच्यावर अत्याचार केल्याचा उल्लेख आहे. Phaltan Doctor Death :* साताऱ्यातील फलटण शहरामध्ये महिला डाॅक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी पीडित डॉक्टरनं आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिलेली आहे. या नोटीमध्ये पोलिस निरीक्षक गोपाल बदने याने आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचे म्हटले आहे. तसेच प्रशांत बनकर याने आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी साताऱ्याचे एसपींना फोन करून तत्काळ दोनही पोलिसांना निलंबित करत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची दखल महिला आयोगाने देखील घेतली असून संबंधितांवर कठोर करावाईच्या सुचना पोलिसांना केल्या आहपीडित डॉक्टर महिलेला त्रास दिला जात असल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली ...

गलिच्छ राजकरणाचा भाडखा प्रशासनाचा बळी ठले डाॅ.संपदा मुंडे.

इमेज
 सरकार आमचं.सत्ता आमची.इथं फक्त आमचं चलं पाहिजे. खासदार,आमदार कुणी असेल? वठं तर आपलाच पाहिजे.  आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं. नोकरी करयाची तर आमच्याशी जुळून घ्या. आमच्या चमच्याशी पण. चेल्याचपाटयाशी पण..... सरंजामशहा असल्याच्या फिलिंग आल्यात अनेक राजकारण्यांना....  ते आणि त्यांचे लाडाचे पाडाचे कार्यकर्ते स्वतःला जहागिरदार समजात.  प्रशासनात पण असे काही चेलेचपाटे असतात. अधिकारी नि पुढारी यांच्यासाठी यांनी कासेची पण सोडलेली असते. प्रशासनातोल हरामखोर अवलादीमुळे राजकारण्याच फावत.  प्रामाणिक, स्वाभिमानी व कर्तव्यकठोर अधिका-याचा डाॅ. संपदा  मुंडे केला जातो.  तुम्ही लाचार असलं पाहिजे. तुम्ही गुलाम असले पाहिजे  सच्चेपणाचा,कर्तव्य निषठतेचा व जनसेवेचा, देशप्रेमाचा पुळका आणला की आम्ही...खपवून नाही घेत. डाॅ.संपदा मुंडे यांची आत्महत्या हा सज्जन नागरिकाला आणि प्रामाणिक अधिका-याला दिलेला सज्जड दम आहे. कळत ना? चड्डीत राहायचं...!!! न्याय द्या..!! न्याय द्या..!!! म्हणून कसली घसाफोड करता तुम्ही? कुठं राहतो तो न्याय? कसला असतो न्याय ? काळा की गोरा...?? गलिच्छ राजकारणाच...

देव,नरेंदमोदी आणि भाविक भक्त महेश कोठारे

इमेज
 देव,नरेंदमोदी आणि भाविक भक्त महेश कोठारे ************************************* तुम्हाला  माहित का? पंतप्रधान  पण बिचारे असतात.क्काय..?? खरचं..!!! सारी टीकाचं त्यांच्या वाट्याला येते.कधी कधी त्यांची पण स्तुती केली पाहिजे.त्यांना पण आपल्या कौतुकाचे दोन शब्द ऐकायचे असतात. का ते माणूस नसतात का?  खरंतर अशी मोठी माणसं दोन कौतुकाच्या शब्दांसाठी आसुसलेले असतात.पंतप्रधानाचे पण भक्त असतात. भक्ताची मांदियाळी कुणाला नको असते बरं?  भक्तात  अंधभक्त नि डोळस भक्त असे प्रकार करू नका.भक्ती ही आंधळीच असते. भक्ताकडून आपल्या आरत्या करून घेणं देवाला आवडतं तसं आपले पोवाडे केलेले कोण्या राजाला आवडत नाहीत?  राजाचं काय घेऊन बसले?आमच्या ऑफीसात आमच्या बाॅसचा एका  टिमके नामक कर्मचाऱ्यांने पोवाडा लिहीला.नुसता लिहिला नाहीतर  तो  जाहीर पणे गाऊन दाखवला. बाॅसची स्वारी खूश..!! मोगँबो खूश हुआ..!! त्या टिमके नावाच्या कारकुनाचे ऑफिसातले महत्व फार वाढले हे सांगणे नको. भक्तीत एक विलक्षण ताकद असते.  आमच्या ऑफिसातील सुंदर चेहरा असलेल्या सुजाता मॅमने मग साहेबाची आरती लिहील...
इमेज
 ‘आरपार’ : एक भावनिक प्रवास आणि प्रेमाची गहनता ॠता आणि ललित  आरपार या चित्रपटात  रोमँटिक  दृश्यात. मराठी चित्रपटसृष्टीत प्रेमकथा हा नेहमीच एक लोकप्रिय प्रकार राहिला आहे, पण तो सामाजिक संदर्भ आणि वैयक्तिक संघर्षांशी जोडला गेला की चित्रपट अधिक प्रभावी होतो. ‘आरपार’ (Aarpar) हा २०२५ चा मराठी चित्रपट असा एक चित्रपट आहे, जो प्रेम, विश्वासघात आणि भावनिक संघर्ष यांचा एक सुंदर संगम साधतो. दिग्दर्शक गौरव पाटकी यांच्या या चित्रपटाने १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शनाला येताच प्रेक्षक आणि समीक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. IMDb वर ८.२ च्या रेटिंगसह हा चित्रपट रोमँटिक ड्रामा म्हणून उभा राहिला आहे, ज्यात ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांच्या अभिनयाने सिनेमाला एक वेगळी उंची मिळवली आहे. कथानक: प्रेमातील खोलवर खणलेले जखम चित्रपटाची कथा कॉलेजमधील दोन प्रेमळ जोडप्यावर आधारित आहे. अमर रांडिवे (ललित प्रभाकर) आणि प्राची दीक्षित (हृता दुर्गुळे) हे दोघे कॉलेजमधील मित्र आहेत, जे एकमेकांवर वेड्यासारखे प्रेम करतात. त्यांचे प्रेम अतिशय निष्कपट आणि उत्कट आहे,जे कॉलेजच्या वातावरणात उमलते. मात्र...

मराठा आणि ओबीसी आरक्षण उपसमित्या 2025: तुलनात्मक अभ्यास आणि महाराष्ट्रातील सामाजिक राजकारण

इमेज
आरक्षण उपसमिती आणि ओबीसी उपसमिती 2025 चा तुलनात्मक अभ्यास. त्यांची स्थापना, उद्देश, कार्यपद्धती आणि सामाजिक प्रभाव जाणून घ्या. महाराष्ट्रातील आरक्षण वादावर तपशीलवार विश्लेषण.    मराठा आरक्षण, ओबीसी उपसमिती, महाराष्ट्र आरक्षण 2025, मराठा कुणबी प्रमाणपत्र, ओबीसी कल्याण, मंत्रिमंडळ उपसमिती, सामाजिक सौहार्द, आरक्षण वाद.    परिचय  महाराष्ट्रातील आरक्षणाचा मुद्दा हा सामाजिक आणि राजकीय चर्चेचा कायमचा केंद्रबिंदू राहिला आहे. 2025 मध्ये, मराठा समाजाच्या आरक्षण मागण्यांमुळे आणि त्यामुळे ओबीसी समाजात निर्माण झालेल्या असंतोषामुळे, राज्य सरकारने दोन स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमित्या स्थापन केल्या: मराठा आरक्षण उपसमिती आणि ओबीसी उपसमिती. या दोन्ही समित्या सामाजिक सौहार्द राखण्यासाठी आणि आरक्षणाच्या जटिल प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कार्यरत आहेत. या ब्लॉग पोस्टमध्ये, आम्ही या दोन्ही समित्यांचा तुलनात्मक अभ्यास करू, त्यांचे उद्देश, कार्यपद्धती आणि प्रभाव यांचा आढावा घेऊ, ज्यामुळे तुम्हाला या विषयाची सखोल माहिती मिळेल.   मराठा आरक्षण उपसमिती 2025 स्थापना आणि रचना मराठा स...

तुला पहाते रे

इमेज
#TulaPhateRe तुला पहाते रे एका अतृप्त आत्म्याची प्रेम कथा मी पराग.नवीन शहर, नवा जाॅब.पुणे हे माझ्यासाठी नवीनचं शहरं होतं. पुण्याला,जाॅब लागला आणि एका अपार्टमेंटमध्ये मी खोली घेतली ती पण तिसऱ्या मजल्यावर.पहिलाचं दिवस होता.झोप येत नव्हती.  नविन जागा म्हटलं की झोप सहसा लागत नाही.जागाचं होतो.बाहेर लख्ख चांदण पडलं होतं.मी खिडकीत उभा राहिलो.बाहेरच्या अंधारात काहीतरी हलतंय असं वाटलं.माझं लक्ष गेले.बाजूच्या गॅलरीत  एक सुंदर स्त्री  उभी होती.ती टक लावून माझ्याकडेच पहात होती.एकटक .!! मी तर घाबरलोच.अशी अनोळखी स्त्री अशी आपल्याकडे पहाते आहे  ही कल्पनाच मला विलक्षण व विचित्र वाटली.असल्या  चांदण्या रात्री.  'तुला पहाते रे'         मी फार वेळ तिच्या कडे पाहू शकलो नाही. नजरानजर झाली.चक्क तिन मंद स्मित केल.माझ्या अंतरंगात  अनोख चांदण  बरसून गेलं.ती कुमारिका नव्हती तरी मला ती खूप आवडली.कुणी पहाते आहे म्हणून आपल्या प्रेमात आहे असं कसं समजावं? असा मी कोण लागून गेलो होतो?पहिल्याच नजरेत माझ्या कुणी परस्त्री प्रेमात पडायला?तिच्याकडे पाहण्याचं मला धाड...