पोस्ट्स

एका काॅलगर्लची डायरी | प्रेम, वेदना आणि समाजातील वास्तवाची सत्यकथा

इमेज
एका काॅलगर्लची डायरी | प्रेम, वेदना आणि समाजातील वास्तवाची सत्यकथा Callgirl'sDairy marathi story भाग आठवा गाडीनं वेग घेतला होता.पाऊस जोरात चालू होता. त्याने मॅडमचे दोन्ही ही हात धरले होते.काचा बदं होत्या.ओरडून ही काही उपयोग होणार नव्‍हता.कॉलनीत क्वचितच गाडया येत जात होत्या.अश्या उच्चभ्रू कॉलनीच्या रस्त्याला मुळातचं कित्तीकशी  रहादारी असणार? ज्या पध्दतीने तो मॅडमला ट्रीट करत होता त्यावरून त्याचा इरादा काही चांगला नव्हता.तो फारच वासना व्याकूळ झाला होता.मुळात त्यांच्या गाडीत बसणचं चूक होतं.दोन पुरूष असतानी आपण कसं त्या गाडीत बसावं?मॅडमचा कॉन्फीडन्स त्यांना नडला की काय?अशी  भीती मॅडमलाचं वाटतं होती.                       चौधरी ही मागे दिसत नव्हता.त्यांना लोकेशनं ही कळणार नव्हतं कारण मोबाईल त्यानं फेकून दिला होता.मॅडमच्या अंगाला धरधरून घाम फुटला होता.त्यांच पडलेला पदर ही त्यांना सावरता येत नव्‍हता.त्यांनी दोन्ही हात त्यांचे गच्च पकडले होते. “प्लीज,गाडी थांबवा.मला कुठे नेत आहात.माझा मोबाईल.?” राधा मॅडम कळकळून बोलत होत्या.तो मॅडम...

राधा आणि भागवत पुराण: अप्रत्यक्ष उल्लेखाचे गूढ

इमेज
राधा आणि भागवत पुराण: अप्रत्यक्ष उल्लेखाचे गूढ राधा कृष्ण हिंदू धर्मात महत्वाची देवी देवता आहेत.राधा व कृष्ण यांच प्रेम अतुट होतं.तसं मानलं जात. अनेक ठिकाणी राधाकृष्णाची मंदिरे आहेत  अनेक उत्सव ही राधा व कृष्ण या नावाने साजरे करतात  राधा तत्व हे फार महत्वाचं तत्व आहे असं मानलं जातं. कृष्णाच्या सदैव ह्रदयात वास असलेली कोण असेल तर ती आहे राधा? श्रीकृष्ण चरित्र हे राधेशिवाय पूर्ण कसे होऊ शकत? आपण चरित्र म्हणतो पण राधेशिवाय कृष्णचं कसा असू शकतो? असे भक्त म्हणतात.मानतात.  इतक सारं असताना ही श्रीकृष्ण चरित्राचा महत्वाचा पौराणिक संदर्भ असलेल्या भागवत ग्रंथात मात्र राधेचा उल्लेख नाही. का? श्रीमद् भागवत पुराणात राधेचे नाव स्पष्टपणे घेतलेले नाही तरीही तिच्या अस्तित्वाची साक्ष पुराणकार साकल्याने देतात.भागवताच्या दशम स्कंधात (१०.३०.२८) गोपिकांच्या मुखातून एक ओळ निघते:  “ अनयाराधितो नूनं भगवान् हरिरीश्वरः”  “ निश्चितच या एका गोपीने भगवान श्रीहरींची पूर्ण आराधना केली आहे, म्हणून ते इतर सर्व सोडून तिच्याकडे एकांतात गेले.”  वैष्णव आचार्य विश्वनाथ चक्रवर्ती, जीव गोस्व...

मोदी-मेलोनी भेट आणि सोशल मीडियाची असभ्यता: वय-लिंगाची टिंगल कधी थांबेल?

इमेज
इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीवरून रंगलेली चर्चा: असभ्यता की राजकीय संस्कृतीचा अपमान? सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात एका राजकीय भेटीचे फोटो, व्हिडिओ आणि छोटे-छोटे क्षण इतके व्हायरल होतात की, त्यामागील खरी राजनैतिक, आर्थिक आणि कूटनीतिक महत्त्वाकांक्षा पार दिसेनाशी होते. नुकत्याच रोममध्ये झालेल्या नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या भेटीचेही तेच झाले. चॉकलेट (मेलोडी टॉफी) भेट देणे, सेल्फी काढणे, एकत्र झाड लावणे, स्माइल्स आणि वार्म व्हिडिओ — हे सर्व क्षण इतके हायलाइट झाले की, दोन देशांच्या प्रमुखांमधील रणनीतिक भागीदारी, व्यापार लक्ष्ये, संरक्षण सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवरची चर्चा पार दुर्लक्षित झाली. यावरून जी चर्चा रंगली, ती दुर्दैवाने दोघांच्या लिंग, वय आणि व्यक्तिगत रसायनावर केंद्रित झाली. हे आपल्या सार्वजनिक संवादाची खोलवर असभ्यता दर्शवते का? हा प्रश्न विचारण्याची गरज आहे. मोदी मेलोनी सेल्फी प्रथम, मूलभूत गोष्ट स्पष्ट करूया. ही भेट दोन राष्ट्रप्रमुखांची होती. एक स्त्री (इटलीची पंतप्रधान) आणि एक पुरुष (भारताचे पंतप्रधान...

मोटेगावकर प्रकरण : पेपरफुटीमागचं खरं वास्तव काय?

इमेज
मोटेगावकर प्रकरण : पेपरफुटी मागचं खरं वास्तव काय? NEET 2026 Leake पैसा वाईट असतो.हाव फार करू नये.असा सुविचार नेहमी सांगितला जातो.तसे सारेचं सुविचार व्यवहार्य नसतातच. फक्त सांगणे व ऐकणे एवढाच त्यांचा वापर असतो. आपण लोभी म्हातारीची बोधगोष्ट लहानपणा पासूनच ऐकत असतो.सांगत असतो.कुणी वागतं का तसं? कुणीचं नाही.  हल्लीचे स्वंयघोषित संत,मंहत व बुवा भौतिक सुखात पेंगत असतात.ते चिरंतन आनंद,त्याग, मोक्ष व निष्काम कर्मयोग वगैरेवर तोंडाला फेस येईस्तोवर बडबडत असतात.बडबडे किती बडबडले तरी कुणाला घंटा फरक पडत नाही. तेच माया जमा करित बसलेले असतात. संसारात गुरफटत जातात. त्यांच कोण ऐकतयं?  मोटेगावकरांना काय कमी होतं? गड्याचे विचार काय कमी ग्रेट नव्हते? हाव व अहंकाराने त्याच्या सा-या साम्राज्याची माती केली.सावाचे मुखडे घेऊन सारेच फिरतात. एक दिवस येतो बुरखा फाटतो. सत्य तर नागडचं असतं. अंगड टोपडं आपण घालत असतो त्याला.  मोटेगावकर ही केवळ एक व्यक्ती नाही, एक प्रवृत्ती आहे. एक मानसिकता आहे. एक सामाजिक रोग आहे जो आजच्या स्पर्धात्मक, भौतिकवादी युगात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक क्षेत्रात पसरला आहे....

“वारकरी संप्रदाय वैदिक आहे का? इतिहास, तत्त्वज्ञान आणि वास्तव”

इमेज
वारकरी संप्रदाय वैदिक आहे का? इतिहास, तत्त्वज्ञान आणि वास्तव” ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर वेदांचा तो अर्थ आम्हासी च ठावा। येरांनी वाहावा भार माथा॥१॥ खादल्याची गोडी देखिल्यासी नाही। भार धन वाही मजुरीचे॥२॥ उत्पत्तिपाळणसंहाराचे निज। जेणे नेले बीज त्याचे हाती॥३॥ तुका म्हणे आले आपण चि फळ। हातोहाती मूळ सापडले॥४॥ हिंदू समाजात गेल्या हजारो वर्षांपासून दोन विचारप्रवाहांचा सतत संघर्ष चाललेला आहे. त्यातील एक विचारसरणी वैदिक आहे तर दुसरी विचारसरणी समतावादी आहे. वैदिक धर्मविचार सतत वर्णाश्रमाचा, यज्ञादी हिंसक कर्मकांडाचा, जातिविषमतेचा आणि वेदप्रामाण्याचा पुरस्कार करत आला आहे. या वैदिक धर्माला विरोध करत जैन - बौद्धादी श्रमणधर्मांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांचा कैवार घेतला. पुढच्या काळात वारकरी संप्रदाय हा प्रचलित वैदिक धर्माविरुद्ध बंड करत उभा राहिला. वारकरी संप्रदायाने सामाजिक समतेची बाजू लावून धरली. मुळात या संप्रदायाची उभारणीच स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र प्रवर्गातून आलेल्या संतांनी केलेली होती. साहजिकच वैदिक वर्णाश्रम धर्म आणि वारकरी संतांचा मूल्यविचार यात मूलभूत फरक आह...

इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नावर मोठा खर्च? सोशल मीडियात चर्चेला उधाण”

इमेज
माणसानं गरीब नसावं.अतिशय गरीब तर कुणीच नसावं.वै-यानं पण गरीब नसावं.  श्रीमंत  असावं.फार फार श्रीमंत  असावं.आपण जगात सर्वात श्रीमंत  असावं असं प्रत्येक माणसाला वाटतं असतं.ते एक स्वप्नच असतं.सुप्त असतं पण ते सां-याचं असतं.माणसानं पैशा कमवला पाहिजे कारण कोण म्हणतंय? पृथ्वी सूर्याभोवती फिरते? पृथ्वी तर पैशाभोवती फिरते. पैसा कमवा.प्रचंड  पैसा कमवा.कसा ही कमवा पैशाला महत्व आहे. सर्व माणसं श्रीमंत  होत नाहीत.जगातील दारिद्र्य  ही कुणी दूर करू शकत नाही.तुम्हाला हे मान्य का? श्रीमंत  लोक हे देवाचे लाडके असतात.श्रीमंती हे वरदान असते.श्रीमंत लोक ज्ञानी आणि हुशार असतात.गरिब  लोक हे मंद बुध्दी व मूर्ख असतात.गरीबी ही शाप असते. त्यामुळे तुम्ही श्रीमंत  व्हा.     मुक्ती, मोक्ष, चिरंतन  आनंद वगैरे या गोष्टी ख-या नाहीत. पैसा आला की सर्वत्र आनंदी आनंद असतो. आशा, लोभ हे दुःखाचं मूळ नाही.पैसा नसणं हे खरं तुमच्या दुःखाचं कारण आहे. षडविकारावर मात करणं हे शक्य नसतं.ऐश्वर्य आहेत तर ते भोगलं पाहिजे.दाखवलं पाहिजे.ऐश्वर्य  दाखवण्यात पराकोटीचा आनं...

संजय गायकवाड: लोकशाहीचा 'चांगभलं' की सत्तेचा उन्माद? राजकीय प्रवृत्तीचा सडेतोड वेध

इमेज
  ​ संजय गायकवाड: लोकशाहीचा 'चांगभलं' की सत्तेचा उन्माद? राजकीय प्रवृत्तीचा सडेतोड वेध Sanjay Gaikwad News  ​ प्रस्तावना: महाराष्ट्राचे राजकारण हे नेहमीच सुसंस्कृत आणि वैचारिक मतभेदांचा आदर करणारे राहिले आहे. परंतु, अलीकडच्या काळात ही परंपरा पुसली जात असल्याचे चित्र दिसत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी अलीकडेच केलेले विधान आणि त्यानंतर मागितलेली माफी, हे केवळ एक राजकीय नाट्य नसून ती एका विशिष्ट 'प्रवृत्ती'ची नांदी आहे. ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी घातक तर आहेच, पण ती महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेला लागलेली कीड आहे.Sanjay Gaikwad Controvers ​ १. माफी की सत्तेचा अहंकार? ​जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी माफी मागतो, तेव्हा त्यात नम्रता आणि पश्चात्ताप अपेक्षित असतो. मात्र, गायकवाड यांनी मागितलेल्या माफीतही एक प्रकारचा 'माज' आणि 'खाज' स्पष्टपणे जाणवत होती. त्यांच्या शब्दांतून व्यक्त झालेली ती 'गाज' हे सिद्ध करते की, ही माफी मनापासून आलेली नसून केवळ प्रकरण अंगाशी येतेय हे पाहून केलेली एक 'राजकीय सोय' आहे. सत्तेची गुर्मी जेव्हा कायद्याच्या कचाट्यात सापड...

भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि मूर्ख राजकारणी.

इमेज
भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि मूर्ख राजकारणी. कॅप्टन्स फाईल पाहिल्यानंतर तुम्हाला राग आला की हसू आलं?का त्या राजकारण्याची कीव आली? का किळस वाटली?  शेवटी घटना घडल्यानंतर आपल्याला काय वाटतयं हे महत्वाचं आहे ना? मला तर जॅम हसू आलंय.काय पागल लोक असतात हे ? काय थाटमाट असतो राजकरणी लोकांच? काय रूबाब असतात त्यांचे? तुम्ही बघितला ना? भोंदू बाबाच्या मागे कश्या शेपट्या हालवत फिरत आहेत हे लोक?   हे आडाणी आहेत का? हे शिकले नाहीत का? हे उच्चशिक्षित आहेत ना मग यांची अक्कल अशी शेणं  का खाते ?   कुणी माणूस ब्रम्हांडनायक असतो  का? काळी जादू किंवा तंत्रविदया नावाचा काही प्रकार अस्तित्वात असू शकतो का?अंकशास्त्रात पण तो निपुण होता म्हणे..!! तो कृष्णाचा अवतार नि त्याच्याकडे जाणारी प्रत्येक  महिला ही राधा...?? काय भंकसगिरी ही? शाळेत हे सामान्य विज्ञान तर हे शिकले असतील ना? अगदी शाळकरी पोरामध्ये जेवढा वैज्ञानिक  दृष्टिकोन दिसून येतो तेवढा पण यां राजकीय गेंडयांना नसावा का?  थोडी तरी तर्क बुध्दी जागी ठेवा ना? निव्वळ अक्कलच शेण खाल्ल्यासारखं हे कशी वागतात?  त्या...

मृत्यूला जराशी थांबवणारे डाॅ.दिवाकर गुळोजकर

इमेज
मृत्यूला जराशी थांबवणारे डाॅ.दिवाकर गुळोजकर   मरण कुणाला चुकलं नाही.मरणाच्या हजारो वाटा असतात.मृत्यू शेवटी जीवाला गाठतोचं.काही माणसं आसतात एखाद्या जीवाला मृत्यूच्या जबड्यातून सोडवणारे. त्या काळाला पण ठणकावून सांगणारे "जरा थांब रे..!!!"  असतं काही माणसात सामर्थ्य.असेच सामर्थ्य असलेले डाॅक्टर होते दिवाकर गुळोजकर. त्यांच्या निधनाची बातमी ऐकली.अनेक आठवणी उचंबळून आल्या. त्या आठवणी पापण्या ही ओल्या करून गेल्या. 2003 ची घटना आहे.आमच्या आण्णांला म्हणजे वडीलांना त्यांनी मृत्यूच्या दारातून ओढून काढले होते.ठणठणीत बरे ही केले होते.आण्णाला असेच बीड मध्ये एका नामवंत डाॅक्टरच्या हाॅस्पीटल मध्ये आटमीट केलं होतं.ते नामवंत ही होते आणि सिव्हीलमध्ये वैद्यकीय अधिकारी ही होते. आम्ही त्यांच नाव ऐकून त्या हाॅस्पीटल मध्ये गेलेलो.मला भेटलेले ते एक मूर्ख व घंमेडी डाॅक्टर होते.आण्णांच्या तब्येतीत सुधारणा करण्याऐवजी त्यांनी त्यांना बेशुद्ध केले. आण्णा गंभीर झाल्यानंतर तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता असा सल्ला ही दिला.भरमसाठ बील ही हातावर ठेवलं . आण्णा बेशुद्ध झाले असले तरी त्यांचा ताप कमी होत नव्ह...

थांबा , युध्द सुरू आहे..!!

इमेज
Eran war and India   जगात युध्द सुरू आहे.त्याचे  परिणाम जगासोबत  आपल्याला भोगावे लागणार कारण आपण याच जगात राहतो. गॅस,पेट्रोल व डिझेलचा तुटवडा होणारच आहे. सरकार नीट सांगत नाही.जनतेला  विश्वास द्यावा लागतो हे हल्लीच्या सरकारांना माहित नाही.गॅस तुटवडा दाखवून काळा बाजार ही सुरू झाला आहे.साठेबाजी वाढवू लागली. छूपेपणे दर ही वाढले आहेत.सरकार धीर ही देत नाही आणि देत माहिती नाही.अज्ञान भयंकर अश्या भयाला जन्म देते. भारतीय  नागरिकांना भयभीत करण्याचे प्रयत्न ही सुरू आहेत. देशातली जनता घाबरली नाही पाहिजे.या युध्दामुळे होणा--या परिणामाची जाणिव लोकाना द्यायला हवी. त्यासाठी जनतेला व प्रशासनाला सजग करणे आवश्यक आहे  अमेरिका आणि इराणला सोशल मिडीयावर सल्ले  देणे नक्कीच  महत्वाचं नाही.अनेक अंतरराष्ट्रीय राजकारणाचे तज्ञ माध्यमावर  ज्ञान पाजळत आहेत.  सरकार तर वादळात सापडलेल्या शहामृग डोळे बंद करून बसले आहे. आपण डोळे बंद केले की,आपल्या अंगावर  वादळ येणार नाही अश्या मूर्ख शहामृगासारखे  केंद्र सरकार वागते आहे. राज्य सरकारे आपल्या नेत्याच्या टिमकी व...

एका काॅलगर्लची डायरी| भाग 7 | प्रेम, वेदना आणि समाजातील सत्यकथा

इमेज
      भाग सातवा. Callgrils Diary एका काॅलगर्लची डायरी भाग -7 “ही तुमची मैत्रीण?” ते फोटो पाहून त्याच्या चेह-यावर आश्चर्याची अनेक चिन्हं उमटले.तो मोठयानं चित्कारला नाही हे काय कमी नव्हतं.ते फोटो त्याच्या ओळखीचं असतील का?त्याला ते फोटो पाहून नक्की काही तरी आठवत होतं. callgril's dairy “ओळखता तुम्ही हिला?”हातातला फोटो त्याच्या पुढे नाचवत त्या मोठया उत्साहाने बोलल्या.त्याला लगेच कळलं.आपलं काही तरी चुकलं.तो जरा चपापला.दात चावले.माणसाच्या मनातलं असं चेह-यावर नकळत उमटून जात. हीची तर डेड बॉडी सापडली ना? नसती झझटं आपल्या मागे लागायची. तो जरा सावध ही झाला होता. “नाही.नाही.मी ओळखत वगैरे नाही पण.” त्यानं स्वत:ला सावरलं.मॅडम त्याच्याकडेचं पहात होता.त्याच्या चेह-यावर उमटणारे भाव त्या अगदी सूक्ष्मपणे टिपत होत्या.त्याला मात्र मॅडमच्या डोळयाशी डोळा भिडता नाही आला. तेवढं धैर्यं त्याच्याकडं नसावं. “पण काय?ओळखीचा नाही पण पाहण्यातला चेहरा वाटतोय का?” “पाहण्यातला नाही.खूपचं स्मार्टं होत्या त्या.यांची डेड बॉडी सापडली का? अरे रे…!! हे नक्कीचं मरायचं वय नव्हतं.मृत्यू फारचं क्रूर असतो, ना...

एका काॅलगर्लची डायरी|भाग 6 | प्रेम, वेदना आणि समाजातील सत्यकथा

इमेज
                                                                                   भाग सहावा “तुम्हाला काही बोलयचं का?”धिप्पाड देहाच्या त्या टक्कल्या माणसाजवळ जाऊन राधा मॅडम बोलल्या. ते पण त्याच्या डोळयात पहात.तो अजून ही त्यांच्याकडे ‘ऑ’ वासून पहात होता.तो मॅडमकडे आणि मॅडम त्याच्याकडे पहात होत्या आणि गर्दी दोघांकडे पहात होती.तो टक्कला असला तरी श्रीमंत माणूस असावा.स्टार्च केलेले कडक इस्त्रीचं शर्टं.ब्रँन्डेड जीन्स्.हातात सोन्याच्या अंगठया होत्या.गळयात सोन्याची जाड साखळी.श्रीमंतीचा एक माज असतो तो पण चेह-यावर आतोनात होता. “नाही.नाही..!!मला कुठं काय बोलायचं?कोण आहात आपण?”त्याला हा अनपेक्षित धक्का होता.त्याच्या नजरेत एक तुच्छता होती.ती इतकी होती की तो थुंकला नाही हे काय कमी नव्हतं.सहज तिच्याकडं पाहिलं आणि ही डायरेक्ट असं विचारते.तो अधिकच गांगरला. त्याला हे माहित नव्हतं की,तो एका पोलीस ...

मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे रिव्ह्यू २०२५: राणी मुखर्जीच्या दमदार अभिनयासह आईच्या अटल लढ्याची खरी कहाणी

इमेज
  मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे रिव्ह्यू २०२५: राणी मुखर्जीच्या दमदार अभिनयासह आईच्या अटल लढ्याची खरी कहाणी परिचय: एक आईचा लढा जो संपूर्ण जगाला हेलावून टाकतो २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट केवळ एक सिनेमा नाही, तर एका आईच्या अथक संघर्षाची, सांस्कृतिक भेदांची आणि परदेशातील बालकल्याण व्यवस्थेच्या जटिलतेची कथा आहे. राणी मुखर्जीने साकारलेली देबिका चटर्जी ही भूमिका इतकी प्रभावी आहे की चित्रपट पाहताना आपण स्वतःला त्या व्याकुळ आईच्या जागी अनुभवतो. हा चित्रपट सागरिका चक्रवर्ती या खऱ्या महिलेच्या जीवनावर आधारित आहे, जिच्या मुलांना नॉर्वेच्या बालसेवा विभागाने (बार्नेवर्नेट) हस्तगत केले होते. जर तुम्ही आई-मुलांच्या नात्यावर आधारित भावनिक चित्रपट शोधत असाल, परदेशातील भारतीयांच्या समस्या समजून घ्यायच्या असतील किंवा राणी मुखर्जीच्या कमबॅकच्या भूमिकेची चर्चा करत असाल, तर हा चित्रपट तुमच्यासाठी आहे. चला, या चित्रपटाची सविस्तर समीक्षा, खरी कहाणी, अभिनय, कमतरता आणि सामाजिक संदेश याबद्दल जाणून घेऊया. चित्रपटाची कथा: एका आईचा तीन वर्षांचा लढा कथा साधी पण अत्यंत तीव्र आ...